
Ashok Chavan
@AshokChavan1958 • 399,658 subscribers
Member of Rajya Sabha & Ex. Chief Minister, Maharashtra State
Videos

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गतवर्षी आत्महत्या केली होती. एन.डी. स्टुडिओ हा त्यांच्या जीवनातील महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी कर्जत येथे उभारला होता. या प्रकल्पावर मोठे कर्ज होते. मात्र त्यांच्या मृत्युनंतर या स्टुडिओचा लिलाव न होऊ देता शासनाने तो ताब्यात घ्यावा, अशी मागणी ३ ऑगस्ट २०२३ रोजी आम्ही विधानसभेत केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कायदेशीर बाबी तपासून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे घोषित केले होते. मी महायुती सरकारचा मनःपूर्वक आभारी आहे की नितीन देसाईंसारख्या प्रतिभाशाली, प्रख्यात मराठी कलावंताने अतिशय मेहनतीने उभारलेला एन.डी. स्टुडिओ शासनाच्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला व त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी काल महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे देण्यात आली. नितीन देसाईंना ही खरी आदरांजली असून, या माध्यमातून त्यांची आठवण जपली जाणार आहे.
Ashok Chavan62,093 просмотров • 1 год назад

काँग्रेस पक्षात सर्वोच्च असलेल्या काँग्रेस कार्यसमितीवर काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, त्यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष मा.खा. मल्लिकार्जूनजी खरगे, माजी काँग्रेस अध्यक्षा मा.खा. सोनियाजी गांधी, देशाचे आशास्थान मा.खा. राहुलजी गांधी आणि पक्षाचे महासचिव मा.खा. के.सी. वेणुगोपालजी यांचा मनःपूर्वक आभारी आहे. युवक काँग्रेसपासून पक्षाच्या अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या मला मिळाल्या आहेत आणि प्रत्येक जबाबदारी मी नेहमीच प्रामाणिकतेने व परिश्रमपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस कार्यसमितीचा सदस्य म्हणून देखील मी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविण्यास वचनबद्ध आहे. काँग्रेस कार्यसमितीत महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते मुकूलजी वासनिक, अविनाश पांडे यांचा समावेश आहे. चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, रजनीताई पाटील, यशोमतीताई ठाकूर, प्रणितीताई शिंदे यांनाही कार्यसमितीत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्यासह समितीतील सर्वांचंच मी अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो.
Ashok Chavan67,937 просмотров • 2 лет назад

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत संविधान बदलण्याबाबत अपप्रचार झाला. मात्र ही विरोधकांची राजकीय खेळी होती. प्रत्यक्षात संविधानाचा मूळ गाभा बदलण्याचा अधिकार संसदेलाही नाही. २ जुलै २०२४ रोजी राज्यसभेत केलेल्या भाषणात ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्याचा संदर्भ देत या विषयावर मी माझे मत मांडले होते. #75YearsOfConstitution #संविधान_दिवस #ConstitutionDay
Ashok Chavan40,646 просмотров • 1 год назад

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला विनंती केल्यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष थांबला, ही वस्तुस्थिती भारतीय सैन्याने स्पष्ट केली आहे. मात्र, विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अधिक विश्वास असल्याचे दिसते. राजकीय विरोधामुळे विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नाहीत. त्यांनी किमान भारतीय सैन्यावर तरी विश्वास दाखवायला हवा होता. #OperationSindoor #OperationMahadev #Parliament #RajyaSabha #NarendraModi #BJP4ViksitBharat
Ashok Chavan20,269 просмотров • 11 месяцев назад

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती आल्यानंतर अपुर्णावस्थेत असलेल्या अनेक विभागांच्या नोकरभरती प्रक्रियेतील मराठा उमेदवारांना अधिसंख्य पदांवर सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मात्र, महावितरणच्या नोकरभरतीमधील मराठा उमेदवार आजही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. पीएसआय पदाच्या भरतीमधील मराठा उमेदवारांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने तातडीने अशा सर्व उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, अशी आमची मागणी आहे. #मराठाआरक्षण
Ashok Chavan17,869 просмотров • 2 лет назад

केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सितारमण यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची विकसित भारताची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. शेतकरी, महिला, युवक, गरिब आणि मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा एक समतोल अर्थसंकल्प आहे. यामध्ये शिक्षणाच्या सुविधा, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि एमएसएमईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची तरतूद आहे. तेलबियांच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी धोरण या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होते. भाजीपाल्याला मागणी असलेल्या बाजार क्षेत्रानजिक मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर्स विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांवर सुमारे ३ लाख कोटींहून अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे. एकूण श्रमशक्तीमध्ये महिलांची भागीदारी वाढविण्यासाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहे. सोने-चांदीवरील सीमाशुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्के केल्याने दागिने स्वस्त होणार आहेत. शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी सुमारे १.५ लाख कोटींची तरतूद केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे. सुमारे २ लाख कोटी रुपये खर्चाच्या ५ योजनांतर्गत पुढील ५ वर्षांमध्ये ४ कोटींहून अधिक रोजगार निर्मिती केली जाणार आहे. देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज आणि मुद्रा कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपये करण्याच्या घोषणेमुळे तरुणांना लाभ होणार आहे. एक कोटी तरुणांना दरमहा ५ हजार रुपये भत्ता आणि एक वेळची मदत म्हणून ६ हजार रुपयांसह टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. देशाचा महागाई दर नियंत्रणात आणि स्थिर असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज सांगितले. नागरिकांच्या बचतीत वाढ होईल, असेही अनेक निर्णय त्यांनी प्रस्तावित केले आहेत. आयकराच्या रचनेतील बदलांमुळे सर्वसामान्य करदात्यांची मोठी बचत होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी वजावट मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजार तर कौटुंबिक पेन्शनर्ससाठी १५ हजारांवरून २५ हजार रुपये केल्याने त्यांच्याकडे अधिक पैसा उपलब्ध होऊ शकेल. पायाभूत सुविधांना दिलेले भक्कम पाठबळ, गृहनिर्माण व ग्रामीण रस्त्यांसाठीचे निर्णय, विदेशी कंपन्यांच्या कर रचनेत पूरक बदल करून विदेशी गुंतवणुकीला अधिक चालना देण्याचा प्रयत्न, सर्व समाजघटकांच्या अपेक्षा ओळखून त्यांची पूर्तता करण्यावर दिलेला जोर, पुढील काळातील आव्हाने ओळखून संशोधन कार्याला चालना आदींमुळे यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे. #BudgetForViksitBharat #Budget2024
Ashok Chavan12,167 просмотров • 2 лет назад
Больше нет контента для загрузки