
Girish Mahajan
@girishdmahajan • 120,650 subscribers
Minister of Water Resources and Disaster Management, Maharashtra State |
Videos

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासातील अत्यंत काळा दिवस आज आपण अनुभवत आहोत. चांदा ते बांदा, शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी आपल्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले. “दादा… यावेळी वेळ चुकली…” असे शब्द ओठांवर येऊनही ते स्वीकारायला मन तयार होत नाही. अजितदादा सत्तेत असताना मी विरोधी पक्षात काम केले, मी सत्ताधारी पक्षात असताना काही काळ अजितदादा विरोधी पक्षात राहिले, तर अनेक वर्षे आम्ही दोघांनी एकत्र सत्तेतही काम केले. या संपूर्ण वाटचालीत जनतेचे हित हेच अजितदादांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचे केंद्रस्थान राहिले. कोणताही निर्णय घेताना महाराष्ट्रातील सामान्य माणसाला त्याचा कसा लाभ होईल, याची ते नेहमीच काटेकोर काळजी घेत. कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही अनेक विषयांवर दीर्घ आणि कधी कधी तीव्र चर्चा केल्या. या चर्चांमधून “कर्तव्यकठोर” या प्रतिमेच्या आड दडलेले अजितदादांचे हळवे, आपुलकीचे व्यक्तिमत्त्व मी जवळून अनुभवले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची सततची धावपळ सुरूच असायची… आणि आज ती धावपळ कायमची थांबली आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. माझे मित्र, राजकारणातील रांगडे पण तितकेच प्रामाणिक व्यक्तिमत्त्व अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज केवळ एक नेता नाही, तर माझा दमदार, दिलदार मित्र आणि एक खंबीर साथीदार हरपला आहे. “काम करणारा माणूस” ही प्रतिमा कुणी दिलेली नव्हे, ती दादांनी त्यांच्या कृतीतून स्वतः निर्माण केली होती. राजकारणापलीकडे संबंध जपणारा, स्पष्टवक्तेपणा, बोलण्यातली मिश्कीली आणि राजकारणातील अस्सल “नमुना” आज आपण गमावला आहे. काल कॅबिनेटमध्ये आमच्यासोबत असलेले दादा आज आपल्यात नाहीत… यापुढे ते समोर दिसणार नाहीत, बोलणार नाहीत, खांद्याला खांदा लावून उभे राहणार नाहीत… हे वास्तव स्वीकारायला मन तयार होत नाही. “कामाचा माणूस” म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणारे अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या कार्यातून, निर्णयांतून आणि असंख्य आठवणींतून ते सदैव आपल्या मनात चिरायू राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली! #AjitPawar #Ajitdada #अजितपवार
Girish Mahajan11,597 görüntüleme • 6 ay önce

मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून श्री. मनोज जरांगे यांच्याशी महायुती सरकारच्या वतीने माझ्यासह अनेक सहकाऱ्यांनी अनेकदा संवाद साधला. श्री. मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्ही सातत्याने सन्मानच केला. परंतु मराठा आरक्षण हा सर्वस्वी सामाजिक प्रश्न असताना त्याला नाहक राजकीय वळण देऊन श्री. मनोज जरांगे यांनी स्वतःचेच पितळ उघडे केले आहे. श्री. मनोज जरांगे यांच्या या कृत्याचा मराठा समाजातील अनेक पिढ्या निषेधच करतील. #Maharashtra
Girish Mahajan26,866 görüntüleme • 2 yıl önce

वारसा संस्कृतीचा... वारसा संस्कारांचा... वारसा देशकार्याचा... देशाच्या उज्वल भविष्यासाठी, संस्कारी पिढी घडविण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यासाठी, सुरुवात स्वतःच्या घरातूनच... #RSS #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ #GudiPadwa #Jamner #GirishMahajan RSS Friends of RSS भाजपा महाराष्ट्र
Girish Mahajan15,897 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.