
Pratik S Patil
@Liberal_India1 • 92,875 subscribers
YouthActivist | AvidReader | Journo |PoliticalAnalyzer | PublicRelation | Nehruvian | Legislative Research |
Shorts
Videos

पार्थ पवार मित्रा काँग्रेसचे पतन करायला तुझ्या आजोबांनी आणि तुझ्या वडिलांनी असंख्य प्रयत्न केले पण काँग्रेसचा डाऊन फॉल करण्याचा अजेंडा त्या दोघांना कधी हशील झाले नाही अजित दादा आणि पवार साहेबाबद्दल आदर आहे पण जे तुझ्या वडिलांना आणि आजोबांना जमले नाही अशा गोष्टी बोलून तुझे हसू करू नकोस प्रफुल्ल पटेलांसोबत सुखी रहा.
Pratik S Patil124,545 views • 2 months ago

केरळमध्ये व्ही डी सतीशन यांच्या शपथविधीतील सर्वात सुंदर आणि लोकशाही मजबूत करणारा क्षण कोणता असेल, तर विरोधी विचारांचे असूनही पिनरायी विजयन स्वतः स्टेजवर उपस्थित होते हा! मतभेद असू शकतात, राजकीय संघर्षही असू शकतो… पण लोकशाहीत परंपरा, सभ्यता आणि एकमेकांबद्दलचा आदर जिवंत राहणं हेच खरं मोठेपण असतं.
Pratik S Patil24,517 views • 1 month ago

अजित दादांच्या अंत्यसंस्काराला आलेली लोक ही बघ्यांची गर्दी नव्हती.ती आपल्या घरातला जबाबदार पुरुष गमावल्यावर जशी माणसं जमतात, तशी जमलेली माणसं होती. लोक तिथे चेहरा पाहायला आले नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या एका आधाराला निरोप द्यायला आले होते. कारण अजित दादा फक्त नेता नव्हते. गावगाड्यातला एक ओळखीचा चेहरा होते. अडचणीत नाव घ्यावं असं एक नाव होते. संकटात आपला माणूस म्हणून आठवणारा एक पत्ता होते. एखाद्या घरात कर्ता पुरुष जातो, तेव्हा रडणं कमी असतं, गोंधळ कमी असतो, पण माणसं जास्त असतात.कारण सगळ्यांना कळलेलं असतं.इथं माणूस नाही, एक आधार गेला आहे. अजित दादांच्या बाबतीत तेच झालं. लोक आपल्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून निघाले.ते औपचारिकतेसाठी नाही, तर आपल्या गावगाड्यातलं काहीतरी तुटलंय ही जाणीव त्यांना तिथपर्यंत घेऊन गेली. त्या रांगेत उभा असलेला प्रत्येक माणूस एकच गोष्ट बोलत होता.आपल्या मधला कुणीतरी गेला आहे. ती गर्दी गावगाड्याच्या एका आधारस्तंभासाठी होती.
Pratik S Patil75,544 views • 4 months ago

आज जे दृश्य दिसतंय ते अंगावर येणारं आहे. पवार साहेबांच्या भावनाविवश होऊन क्षीण झालेला आवाज जो माणूस संकटातही शांत उभा राहिला, ज्याच्या चेहऱ्यावर भावनांना कधीच फारशी जागा नव्हती, ते आज स्वतःला सावरू शकत नाहीये. हे फक्त एका नेत्याचं भावनाविवश होणे नाही. ही एका पिढीची, एका नात्याची, एका आधाराची झालेली पडझड आहे. अजित दादा, तुमच्या जाण्याने लोक काय हरवून बसलेत ते आज स्पष्ट दिसतंय.
Pratik S Patil49,642 views • 4 months ago

काकूंनी मतदान तर केले पण जाता जाता पुणेरी भाषेत भाजपचा बाजारच उठवला 🤣🤣
Pratik S Patil233,496 views • 3 years ago

अटल सेतू हा केवळ पूल नाही, तो दूरदृष्टीचा सेतू आहे. मुंबई–नवी मुंबईला थेट जोडणाऱ्या या ऐतिहासिक प्रकल्पामागे पृथ्वीराज चव्हाण यांचे व्हिजन, नियोजन आणि संस्थात्मक तयारी होती. मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाची संकल्पना, पर्यावरणीय मंजुरी, आणि आंतरराष्ट्रीय निधी (JICA) यांचा मजबूत पाया घातला गेला. योगायोगाने आज बाबांना भेटलो आणि त्यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेल्या या पुलावरून जाण्याचा योग आला सरकारे बदलतात, प्रकल्प पूर्ण होतात पण दिशा देणारी दृष्टी इतिहासात कायम राहते.
Pratik S Patil35,223 views • 4 months ago

महाराणी या वेब सिरीजच्या 4 च्या सीझन मध्ये आजच्या राजकारणावर वर चपखल डायलॉग आहे जेव्हा मुख्यमंत्री अर्थमंत्र्याला म्हणते प्रधानमंत्री त्यांची पॉलिटिकल लढाई ही पर्सनल कसे काय करू शकता? तेव्हा अर्थमंत्र्यांचे उत्तर : तुम्ही असे म्हणताय जसे देशाचे पीएम नेहरू आणि शास्त्रीजी आहेत
Pratik S Patil47,818 views • 7 months ago

व्हॉट्सॲप विद्यापीठातून भरलेला द्वेष आता बाहेर येतोय मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी परवा सेवानिवृत्त होत असताना सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तके वाटले तर एका बाईला राग आला आणि ते पुस्तके कदमांच्या तोंडावर फेकून मारली हा विखार भयंकर आहे
Pratik S Patil51,065 views • 8 months ago