Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

इथून पुढं न्यायालयात न्याय मिळेल याची खात्री राहिली नाही - जयंत पाटील

12,788 Aufrufe • vor 2 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला पाणी देण्याची विनंती केली आहे. यावर प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उन्हाळ्यात नेहमी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते. आपल्याकडून पाणी गेल्याशिवाय कर्नाटकमधील सुरुवातीच्या लोकसंख्येला पाणी मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत दोन-अडीच महिने जिकीरीचे जाऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारकडून तिथल्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी नकार कोणीही देत नाही. कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे पाण्याची मागणी केली असेल तर राज्यातील पाण्याची शिल्लक पाहून, महाराष्ट्रातील लोकसंख्येची पाण्याची आवश्यकता पाहून राज्य सरकार निर्णय घेईल, असे ते म्हणाले. Jayant Patil- जयंत पाटील

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

11,797 Aufrufe • vor 3 Jahren

आपल्या नवर्‍याची ज्यांनी हत्या केली, त्यांना अटक करावी, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना एक भगिनी न्यायासाठी लढा देत असताना न्याय मिळेल, अशी आशा संपल्याने आत्महत्येचा प्रयत्न करीत असेल तर ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. राजरोसपणे महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचे कुंकू पुसले जात आहे; त्यांच्या बांगड्या फोडल्या जात आहेत. न्याय देण्याऐवजी खुन्यांना पाठिशी घालण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारकडून लाडक्या बहिणींना न्याय मिळणार आहे की नाही? मायबाप सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे !

Dr.Jitendra Awhad

38,720 Aufrufe • vor 1 Jahr

मणिपूरमधील घटना अतिशय दु:खद आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. ही घटना केवळ मणिपूर नाही तर 140 कोटी देशवासीयांना प्रचंड वेदना देणारी आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे कालच मा.पंतप्रधान Narendra Modi नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले आणि 4 आरोपींना अटक सुद्धा झाली. महिला सुरक्षा हा विषय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अधिक गांभीर्याने घेतला आणि सर्वच राज्यांना महिला सुरक्षेचे कायदे अधिक कठोर करण्यास सांगितले. वेदना जाणवून थांबून जाणे किंवा नुसते विव्हळत राहणे, हा कुठल्याच समस्येवरील उपाय असू शकत नाही, तर वेदनेवर उपचार अधिक महत्वाचा असतो. मा. नरेंद्र मोदीजी यांची हीच कार्यशैली नेहमी राहिली आहे, आम्हाला खात्री आहे,मणिपूरच्या दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. #Manipur

Chitra Kishor Wagh

53,125 Aufrufe • vor 3 Jahren