Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

कोल्हापूर मधील बावड्यातील पुतळ्याचे शुद्धीकरण करायला जोरदार मुसळधार पाऊस ✅ पप्पूचं शिवप्रेम देवालाही माहिती आहे! #kolhapur #MaharashtraPolitics

43,856 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

यावर्षीची अतिवृष्टी - यावर्षीचा पाऊस हा अभूतपूर्व आहे. मराठवाड्याच्या व राज्याच्या ज्या भागांमध्ये कायम कमी पाऊस पडायचा त्या भागात यावर्षी अतिवृष्टी आहे. पण हा विषय निव्वळ अतिवृष्टी पुरता नाही तर त्याही पलीकडे या पावसाचा पॅटर्न वेगळा आहे हे लक्षात येते. अत्यंत कमी काळात खूप जास्त पाऊस पडणे, फ्लॅश फ्लड, सातत्यपूर्ण पाऊस, संततधार पाऊस अशी या पावसाची लक्षणे आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये तर एका शेतकऱ्याच्या अनेक गाई वाहून गेल्या त्याबाबत मला जे समजले ते असे आहे की पाऊस सुरू झाल्यावर त्या गाई सोडण्यापूर्ती सुद्धा त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला वेळ मिळाला नाही. इतक्या कमी वेळात व वेगाने पाऊस व पुराचे पाणी आले. यावर्षी राज्यातील किमान ३५ ते ४० टक्के शेती प्रभावित झाली आहे असे माध्यमांमध्ये आले आहे. वातावरणीय बदल व त्याचे परिणाम हे आता दृश्य स्वरूपात दिसू लागले आहेत व दरवर्षी हे अधिकाधिक तीव्र होत जाणार आहेत. याबाबत अजूनही सर्वसामान्यांमध्ये मात्र हवी तशी जागृती दिसून येत नाही. पण याचा परिणाम मात्र सर्वसामान्य माणसावरच सर्वाधिक होत असतो. अशा परिस्थितीत वातावरण बदल मर्यादित करण्यासाठी सामान्य माणूस म्हणून आपण दोनच गोष्टी करू शकतो. एक म्हणजे कार्बन सिंक वाढवणे. म्हणजेच वातावरणातील कार्बन शोषून घेणारी यंत्रणा निर्माण करणे. जो की आपल्या हातात फक्त झाडे लावून व झाडे जगवून व असलेली झाडे टिकवून करणे शक्य आहे. दुसरा म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करणे. यासाठी आपण विजेच्या वापरात काटकसर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, तसेच आपल्या दैनंदिन जीवनात ज्या ठिकाणी ज्या कोणत्या गोष्टी आपण वापरत आहोत त्या तयार करण्यासाठी किंवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आपण वापरत असताना किंवा आपण वापरून झाल्यावर कार्बन वायू ( किंवा इतर हरितगृह वायू जसे की मिथेन, क्लोरो फ्ल्यूरो कार्बन्स जे फ्रिज, एसी वापरल्याने बाहेर पडतात ) वातावरणात सोडतात त्या सर्व बाबींचा वापर किमान किंवा गरजेपुरता करणे व त्यात बचत करणे एवढेच आपल्या हातात आहे. उदाहरणार्थ आपण सकाळी टूथपेस्ट वापरतो ती तयार करणे आणि आपल्यापर्यंत पोहोचण्यात सुद्धा कार्बन उत्सर्जन झालेले असते, जे पाणी आपण वापरतो ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्बन उत्सर्जन झालेले असते. अशाप्रकारे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण करत असलेल्या, वापरत असलेल्या प्रत्येक बाबीचा कार्बन उत्सर्जनाला हातभार लागत असतो आणि त्यामुळे त्यातील बचत किंवा काटकसर ही कार्बन उत्सर्जन कमी करते ( हे थेट आपल्या हातात असते ) फक्त ते आपल्या जाणिवेत नसते एवढेच ! याबाबत आपले काहीही मत असले तरी त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते थेट आपल्यावर होत असल्याने आपल्याला काहीही वाटले तरी या उपायोजना करणे आता अपरिहार्य आहे ! डॉ प्रशांत भामरे.

Dr prashant bhamare

21,967 просмотров • 11 месяцев назад