Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

खोटं बोला पण रेटून बोला हे धोरण देवेंद्र फडणवीस कधी सोडणार? जाहीर व्यासपीठावरून वारंवार पवार साहेबांबद्दल अपप्रचार करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे जे प्रयत्न फडणवीस यांनी चालवले आहेत त्यातूनच ‘पवार’ नावाच्या पॉवरची त्यांना किती भीती वाटते हे ते दाखवून देत आहेत. Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र

31,796 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

30 Kommentare

Profilbild von तार्किक नास्तिक
तार्किक नास्तिकvor 3 Jahren

@Dev_Fadnavis साहेब आणि फडणवीस एकत्र एकाच ताटात जेवतात कार्यकर्त्यांनी जितका भाकर तुकडा मिळतो तितकेच काम करावे. उगाच साहेबासाठी मारामारी करत बसू नका. साहेब फडणवीस एकत्र येऊ शकतात आपण आपल्या गावातील मित्रांशी यांच्यासाठी वैर घेऊ नका. शेजारी नातेवाईक कामात येतील साहेब नाही लक्षात ठेवा.

Profilbild von American Stories Network
American Stories Networkvor 2 Jahren

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

Profilbild von KailashGWagh 🇮🇳
KailashGWagh 🇮🇳vor 3 Jahren

Dear @OfficeofUT #UddhavThackeray why are you still in #MVA alliance with #Congress and #NCP parties : 1) Late Hon #BalasahebThackeray saheb had said that he will shut down and close #ShivSena party shop rather then go with Congress and NCP for power ! 2) Hon Balasaheb also used very harsh words about begging before #SoniaGandhi for alliance and power ! 3) It can be understood that in November’2019 #UddhavThackeray went with Congress and NCP just for CM chair and formed MVA alliance govt in Maharashtra. 4) But now after losing CM chair and also losing Party symbol and Party organisation why are you still not leaving Congress and NCP #MVA alliance ? 5) Hon Balasaheb never went to court when his party broke and MLAs were taken away mostly by #SharadPawar be it #ChhaganBhujal #GaneshNaik #NarayanRane ! 6) For that matter even #RajThackeray also left party. It is said that all of them left ShivSena party because of misbehaviour, arrogance and jealousy of #UddhavThackeray ! Hon Balasaheb used to rebuild ShivSena party and not cry for people’s sympathy or do pity parties. 7) UddhavThackeray Saheb why are you still in MVA alliance with Congress and NCP ? 8) Uddhav ji is it correct that you are not confident and not capable to start fresh and rebuild your new party ? 9) #SharadPawar saheb in his Autobiography had said many negative things about #UddhavThackeray incapabilities and unable to perform or do any work. 10) UddhavThackeray ji , can you think what Hon Balasaheb must be thinking in heaven ? Will Hon Balasaheb be cursing you and all those who are still with Congress and NCP even after losing govt and party leadership and symbol ? 👇

Profilbild von KailashGWagh 🇮🇳
KailashGWagh 🇮🇳vor 3 Jahren

Are UT AT,SR real gaddars of Maharashtra who backstabbed Maharashtra peoples 2019 mandate and went with Congress and NCP just for CM chair to UT...? UT wanted 2 1/2 years as CM and he was CM from Nov2019 till June22 ... Why is UT not happy with SS hardcore Leader Shinde as CM ? With 56 MLAs SS got CM post for 5 years UT should be happy and stop wasting time and efforts in Court cases

Profilbild von Ira
Iravor 3 Jahren

@Dev_Fadnavis अहो, साहेबांची प्रतिमा आधीच तयार झाली आहे ती आणखी मलिन कुठून करणार? त्यावर फक्त शिक्कामोर्तब होत आहे. तसेही साहेबांना अशा बदनामीची सवय आहेच की पार वसंतदादा पाटील यांच्या काळापासून! त्यामुळे फार मनावर घेऊ नका.

Profilbild von KailashGWagh 🇮🇳
KailashGWagh 🇮🇳vor 3 Jahren

@Dev_Fadnavis Best speech of #UddhavThackeray

Profilbild von Bhaskar Govardhane
Bhaskar Govardhanevor 3 Jahren

@Dev_Fadnavis पवार नावाची पॉवर असती तर राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन केली असती परंतु २५ वर्षात हे पवार साहेबांना शक्य झाल नाही हे @AjitPawarSpeaks त्यांचे भाषणात वर्धापन दिनाच्या दिवशीच सांगुन घरचा आहेर @PawarSpeaksयानां दिला आहे.

Profilbild von Charu Dxit
Charu Dxitvor 3 Jahren

@Dev_Fadnavis काय भीतीदायक शक्ती आहे ही. उद्धव ठाकरे साहेबानी राजीनामा देताना ज्यांना विचारले पण नाही. राज्याचा मुख्यमंत्रि घरात बसून काम करत आहे हे पटत नसताना त्यांना खडे बोल सुनावता नाही आले पण पुस्तकात मात्र लिहिले.स्वतः च्या पुतण्याला बळीचा बकरा करून गुगली टाकली. काय भीतीदायक शक्ती आहे ही

Profilbild von KailashGWagh 🇮🇳
KailashGWagh 🇮🇳vor 3 Jahren

Should #SharadPawar Saheb apologise to Maharashtra and country for playing Dirty politics of backstabbing which Saheb calls goolee’s ? 1) 1978 Saheb backstabbed VasantDadaPatil , stole Congress 40 MLAs and became CM with help of Leftists and Jansangh. 2) 1988 Saheb again joined Congress during RajivGandhi tenure. 3) 1999 Saheb protested against Foreigner origin issues of SoniaGandhi and left Congress to form NCP. 4) in 1999 Saheb again formed govt in Maharashtra with Congress and became Agriculture Minister, after General & State elections. 5) after 2019 Maharashtra state elections Saheb played double game with BJP by agreeing to form govt with Fadnavis as CM and @AjitPawarSpeaks as DCM. 6) but after early morning swearing ceremony of Fadnavis-AjitDadaPawar, Saheb did UTurn and again played dirty double game by forcing #AjitPawar to resign as DCM. 7) Saheb stole 2019 Maharashtra people mandate and showed carrot of CM chair to #UddhavThackeray to form MVA govt. 8) Saheb lied to Maharashtra and Country that he did not knew anything about AjitDadaPawar morning swearing ceremony when it was all pre-decided as per Saheb meeting with PM and latter on with Fadnavis 9) all through out last 40+ years of political career Saheb played dirty politics just to any how grab power but in the process messed up political atmosphere in Maharashtra. 10) Leftist-Communists Purogaami Print and MSM helped Saheb and Saheb always used Leftists dominated media,Journalists to play politics and spread fake narrative/propaganda.

Profilbild von Nishant Borse
Nishant Borsevor 3 Jahren

@Dev_Fadnavis खोटं रेटून बोलण्याचे काम पवार साहेब करतात ,हे त्यांनी मुंबई बॉम्ब स्पोट वेळी सिद्ध केले आहे, त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही

Profilbild von Responsible Citizen
Responsible Citizenvor 3 Jahren

@Dev_Fadnavis सबटायटल देत चला काका काय बोलले ते कळत नाही

Profilbild von Charu Dxit
Charu Dxitvor 3 Jahren

@Dev_Fadnavis ज्यांना स्वबळावर सत्ता कधीच आणता आली नाही, सोनिया गांधी ना विरोध करून राष्ट्रवादी पक्ष स्थापन करून पुन्हा त्यांच्याच समर्थनाने सत्ता स्थापन केली.२०१९ गुगली टाकुन सत्ता स्थापन करून एक वर्ष्याने तीच सत्ता फडणवीस आणि शिंदेनी त्यांच्या नाका खलुन काढून नेली काय भीतीदायक शक्ती आहे ही

Profilbild von KailashGWagh 🇮🇳
KailashGWagh 🇮🇳vor 3 Jahren

@Dev_Fadnavis Will NCP become JDS of DeveGowda after #2024Elections ? 👇

Profilbild von Shashank Paithankar
Shashank Paithankarvor 3 Jahren

@Dev_Fadnavis नवीन येणारा राजकारणी हा जुन्या,अनुभवी, मुरब्बी राजकारणी मंडळी चा कित्ता गिरवत असतात किंवा त्यांच्या वाटचाली वर च चालत असतात, त्यावेळी वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. जे पेरले तेच उगवले

Profilbild von Rajshri
Rajshrivor 3 Jahren

@Dev_Fadnavis देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते खरचं आहे , तुम्हाला एवढा राग येण्याचं कारण नाही, एक लक्षात ठेवा फडणवीस कोणाच्या बापाला भित नाहीत, खरा मुद्दा हा आहे की फडणवीस आता जी वस्तुस्थिती आहे त्याबद्दल बोलतात, त्यामुळे NCP ला राग येण्याची काही गरज नाही,

Profilbild von Dnyaneshwar barde
Dnyaneshwar bardevor 3 Jahren

@Dev_Fadnavis Fakt devendr fadnvis saheb

Profilbild von Mac Diablo
Mac Diablovor 3 Jahren

@amolmitkari22 @Dev_Fadnavis

Profilbild von NILESH KUDLE
NILESH KUDLEvor 3 Jahren

@Dev_Fadnavis

Profilbild von Namdev Satpute
Namdev Satputevor 3 Jahren

@Dev_Fadnavis फडणवीस साहेबानी पवार साहेबांच्या तोंडातून बोलवून घेतले की अजित दादा ना त्यांनी च पाठवले होते

Profilbild von NILESH KUDLE
NILESH KUDLEvor 3 Jahren

@Dev_Fadnavis

Profilbild von durgaprasad sathe
durgaprasad sathevor 3 Jahren

@Dev_Fadnavis अकेला देवेंद्र क्या करेगा.... अस तुम्हीच म्हणत होता...मग कशाला त्यांचं मनावर घेताय...झालेल्या प्रकारावर ज्या दिवशी अजित पवार बोलतील त्या वेळी तुमचं म्हणणं खर की खोटं ते ठरेल.... पण अजिदादांना बोलू देणार नाही हे पण तितकंच खर आहे.

Profilbild von राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती - संपदांची
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती - संपदांचीvor 3 Jahren

@Dev_Fadnavis देवेंद्रनी जे पण बोलले त्याला दुजोरा चक्क स्वत: पत्रकार परिषदेत पवार देतात! आणि ट्विटर हॅंडलर 🤣🤣🤣🤣🤣🤣 जोक

Profilbild von Smita Warpe
Smita Warpevor 3 Jahren

@Dev_Fadnavis त्यांनी शिवसेना फोडली आता राष्ट्रवादीच्या मागे.

Profilbild von Anand
Anandvor 3 Jahren

@Dev_Fadnavis तुमचे साहेब आतून किती हादरले आहेत हे त्यांच्या सततच्या (ऐनवेळच्या) होत असलेल्या पत्रकार परिषदांवरूनच कळतंय. सारखी सफाई द्यावी लागतिये..फडणवीसांनी केलेल्या दाव्यांबद्दल. केविलवाणी अवस्था झालिये साहेबांची. असो.

Profilbild von Govind Parab🇮🇳NDA मजबूत राजनीतिक संघटन !
Govind Parab🇮🇳NDA मजबूत राजनीतिक संघटन !vor 3 Jahren

@Dev_Fadnavis ज्या माणसाने आपल्याकडील सर्व शक्ती पिना मारणे, काड्या करण्यासाठी पणाला लावली त्या काकांना कोण समजावणार.

Profilbild von आकाश
आकाशvor 3 Jahren

@Dev_Fadnavis चूक तुमची आहे तेव्हाच लोकमत वाल्यांची ठासली असती ना तर हे अशी वेळ आली नसती, आता कितीही वेळा सांगितलं ना तरी त्यांनी लोकांच्या डोक्यात जे fix करायचंय ते केलंय.

Profilbild von Neel
Neelvor 3 Jahren

@Dev_Fadnavis पवारांना कोण भित असेल असं नाही वाटत कारण हरविंदर सिंग पण घाबरला नव्हता तर फडणवीस तर कायदेशीर मार्गाने लढाई करत आहेत ते का घाबरतील ?

Profilbild von Kundan Jadhav
Kundan Jadhavvor 3 Jahren

@amolmitkari22 @Dev_Fadnavis आता काय बोलणार

Profilbild von NILESH KUDLE
NILESH KUDLEvor 3 Jahren

@Dev_Fadnavis

Profilbild von 𝚁𝚊𝚟𝚒𝚗𝚍𝚛𝚊 𝙿𝚛𝚊𝚋𝚑𝚊𝚔𝚊𝚛
𝚁𝚊𝚟𝚒𝚗𝚍𝚛𝚊 𝙿𝚛𝚊𝚋𝚑𝚊𝚔𝚊𝚛vor 3 Jahren

@Dev_Fadnavis विषण्ण मनाने बातम्या बघत असताना साहेबांचा डोळा लागला स्वप्नात बाळासाहेब आणि गोपीनाथ आले आणि म्हणाले "शरदबाबू आपलं अपत्य आपला वारसा केवळ आपलं आहे या निकषावर पक्षप्रमुख असू नये, ते कर्तबगार पण असावं लागतं. खेद करू नका, आमच्याकडं बघा. आम्ही त्याच चक्रातून गेलो आहोत..."

Ähnliche Videos

विद्या धुमाळ म्हणतात, साहेब ही गरिबा घरची राखी आहे... देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीच महत्त्वाची आहे... •⁠ ⁠विजय धुमाळ यांच्या पत्नी विद्या धुमाळ यांनी बांधली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी •⁠ ⁠विजय धुमाळ हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांडा येथील रहिवासी. 41 वर्षांचे आहेत... •⁠ ⁠विजय धुमाळ यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांचे हृदय प्रत्यारोपण करावे लागले. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण 23 लाख रुपये खर्च हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत करण्यात आला. •⁠ ⁠विजय धुमाळ हे बांधकाम मजूर असून, त्यांची पत्नी विद्याताई या शेतमजूर आहेत. या कुटुबांचे उत्पन्न वार्षिक अवघे 31 हजार रुपये. त्यामुळे त्यांना उपचारापासून वंचित रहावे लागले होते. •⁠ ⁠भाजपाच्या एका कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना उपचार मिळवून देण्याच्या सूचना केल्या. धर्मदाय आरोग्य कक्ष हा विधी व न्याय विभागांतर्गत काम करतो. •⁠ ⁠धुमाळ दामत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगते. अशात या आरोग्याच्या संकटाने ते पूर्णत: कोलमडून गेले होते. त्यांना नगरमधील मोरया क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाने त्यांना रुबी क्लिनीक पुणे येथे हलविले आणि तेथे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. •⁠ ⁠परवा रात्री त्यांच्या पत्नीने देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. Devendra Fadnavis #DevendraFadnavis #RakshaBandhan #Maharashtra

@OfficeOfDevendra

20,967 Aufrufe • vor 2 Jahren

नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी मुख्यमंत्री यांचा संवाद नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांची परिस्थिती जाणून घेत, “घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे,” असा धीर दिला. पर्यटकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले तसेच परराष्ट्र मंत्रालयाशीही संवाद साधून त्यांच्या सुरक्षित परतीला प्राधान्य देण्याबाबत पाठपुरावा केला. नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशीही मुख्यमंत्री यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी पर्यटकांना सांगितले. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods

CMO Maharashtra

47,670 Aufrufe • vor 8 Tagen

देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवा... भाजपाचा एकही आमदार विधानसभेला निवडून येणार नाही असे पहा -मनोजदादा जरांगे पाटील जरांगे पाटलांचे हे विधान मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नाही तर महाविकास आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी आहे . आणि त्यासाठी फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण टार्गेट करीत आहात . मराठा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही हे ठामपणे बोलणारे शरदचंद्र पवार साहेब यांना मात्र आता खोटा पुळका मराठा समाजासाठी का? उट सुट उपोषणाला बसायचे - उठायचे. देवेंद्रजी फडणवीस यांना शिवीगाळ करायची काय खेळ मांडून ठेवलाय का जरांगे पाटील आपण? मराठ्यांची भाषा रांगडी आहे पण अर्वाच्य, अश्लील नाही . आपण मराठ्यांचे नेते आहात तर मराठ्यांची मान गर्वाने ताठ राहील अशीच भाषा अपेक्षित आहे पण आपल्या भाषेमुळे माझ्यासारख्या असंख्य मराठ्यांना मान खाली घालावी लागत आहे. सत्ताधारी पक्षाने मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक लावली त्यावेळेस विरोधी पक्षातील मराठा नेते उपस्थित राहिले नाहीत ,त्यांना उपस्थित राहण्याचे, मिळून तोडगा करण्याचे आवाहन आपण का केले नाही? तसे न करता उलट मराठा समाजाच्या आडून फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करण्याचा विडा आपण घेतला आहे, तुमची ही कृती न समजन्या इतका मराठा समाज मूर्ख नाही. माझा मराठा समाज राकट आहे, कणखर आहे, पण तो लाचार नाही.. हे लक्षात ठेवा, जरांगे पाटील. त्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठा नेत्यांना माझी विनंती आहे ,एकत्र या. फक्त जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही सर्वपक्षीय मराठ्यांनो एकत्र या राजकारण बाजूला ठेवून आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढूया . छत्रपतींचा आशीर्वाद मराठा आरक्षणासाठी देऊया साथ फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत राहण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार केला त्या सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठक करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या मनोज जरांगे पाटील आणि शरदचंद्र पवार साहेब यांचा खरा चेहरा जनतेसमोर येऊ देत . भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra BJP Mumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Kishor Wagh #MarathaReservation #maratha

Prof.Varsha Bhosale

54,134 Aufrufe • vor 2 Jahren

भाजप आणि संघाच्या यंत्रणेला धक्का पोहोचू लागला की सत्तेच्या माध्यमातून त्यांचे हस्तक बनलेल्या प्रशासनाकरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करून बोलणाऱ्यांचा आवाज ते दाबू पाहतात. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला लढाऊ बाणा वारसा हक्काने लाभलाय. याच स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीतील स्वतंत्र पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मुक्ता कदम व मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष व मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते डॉ. दीपक पवार यांना शासकीय यंत्रणेमार्फत दिला जाणारा त्रास हा व्यक्तीस्वातंत्र्याचा वारसा जपणाऱ्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रावर डाग असल्यासारखाच आहे. महानगरपालिका निवडणुक काळात मुक्ता कदम यांनी आपल्या स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून नांदेडचे सत्ताधारी म्हणवून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या अपयशाचा पाढा वाचला. यामुळेच त्यांना आता नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांत चूकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न केला आहे. “नांदेडचा राजमहाल हलला” हे खरोखरच यावरून दिसते. तसेच महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आपल्या परखड वाणीने मराठी भाषेचा जागर करून मराठी भाषा चळवळ मजबूत करू पाहणाऱ्या प्रा. डॉ. दीपक पवार यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये “शहरी नक्षलवादी” असे संबोधून मराठी भाषेच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मराठी भाषा द्वेषी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरच या गोष्टी घडवल्या जात आहेत, यात कोणालाही शंका नसावी. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात लाचारांची फौज उभी करायची असेल तर त्यांनी नक्कीच प्रयत्न करून बघावेत. पण प्रत्येक व्यक्ति त्यांच्या सत्तेसमोर झूकून त्यांचे, त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीचे कौतूक नक्कीच करणार नाही किंवा त्यांना आवडेल अशा भूमिकाही घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात आपला स्वाभिमान व वैचारिक बाणा जपणाऱ्या व्यक्तिंची कधीही कमी असणार नाही. वर उल्लेख केलेल्या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेला धक्का देणाऱ्या आहेत, हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविसांनी लक्षात घ्यावे. कॉंग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत असून मुक्ता कदम व डॉ. दीपक पवार Dr. Deepak Pawar दीपक पवार यांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Harshwardhan Sapkal

11,129 Aufrufe • vor 5 Monaten

काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. १) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का...? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती. २) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. 3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..? आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी - मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल. सतर्क रहा... Devendra Fadnavis CP Pune City Police पुणे शहर पोलीस #kalyaninagar_accident #justicefor_avnishashvini #banpubsinpune

Ravindra Dhangekar Official

352,338 Aufrufe • vor 2 Jahren

आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत पार पडलेल्या येवला येथील 'संवाद' सभेला उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. येवल्याला आल्यानंतर दोन गोष्टी जिव्हाळ्याच्या वाटतात एक म्हणजे कांद्याचा सुगंध आणि दुसरी म्हणजे पैठणी साडी... येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावेळी मोठे नुकसान झाले याला केवळ भाजपाचे आयात निर्यात विषयीचे धोरण कारणीभूत असल्याची भूमिका मांडली. कोणत्याही शेतीमालाला आज योग्य भाव नाही. शहरात टोमॅटो महाग विकला जात आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. मग मधला पैसा जातोय कुठे असा सवाल उपस्थित केला. मध्यंतरी केंद्र सरकारने परदेशातून दूध आयात करण्याचा निर्णय घेतला होता पण पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत परदेशातून एक लिटरही दूध भारतात येऊ देणार नाही. त्यानंतर हा निर्णय मागे घेत सरकारने त्याची जबाबदारी राज्यांवर टाकली. एकीकडे कांदा आयात निर्यातीचे धरसोडीचे धोरण आणि दुसरीकडे दूध आयातीचा निर्णय अशी विचित्र भूमिका केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप केला. तुमच्यासाठी इथले स्थानिक का लढले नाही हे माहित नाही. पण ही तुमची भगिनी, तुमची ताई ही हक्काची ताई आहे. तुम्ही म्हणाल ते काम करून न्याय मिळवून देईन, असा शब्द यावेळी दिला. आपल्यातील काहीजण भाजपाकडे गेले आहेत. त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण आज महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. युपीएचे सरकार असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रु होता. तो आज ११५० रुपये झाला आहे. हे बघता पुढच्या निवडणूकीत कोणाला मतदान करणार असा सवाल उपस्थित केला. मागील १५ वर्षात येवल्यात एकही मोठा प्रकल्प आला नाही. पण जर येवलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आणि पवार साहेबांवर ठाम विश्वास असणारा उमेदवार निवडून दिला तर तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळू शकेल. या भागात उद्योग येऊन रोजगार उपलब्ध होतील असे आश्वासन दिले. येथे येत असताना रस्त्यावर असंख्य प्रेम करणारे नागरिक भेटत होते. प्रत्येकजण म्हणत होता, ताई तु घाबरू नकोस लढ, त्यांचे हे प्रेमच आमच्यासाठी ताकत असल्याचे आवर्जून सांगितले. पण मी घाबरत नाही मी जर घाबरले असते तर आज तिकडे गेले नसते का? शोले चित्रपटात एक डायलाॅग आहे जो डर गया वो मर गया आणि आज सत्ताधारी विरोधकांना lCE चा धाक दाखवला जात आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय, आणि ईडी याची भीती दाखवली जाते. कोणी घाबरून तिकडे गेले की वाँशिंग पवाडर वापरून त्याला क्लिन केले जाते. त्यामुळे या प्रवृत्तीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. ही लढाई सोपी नाही, पण निष्ठेने आणि एकीने लढलो तर विजय आपलाच होईल. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीपुढे कधीही झुकला नाही आणि झुकणार नाही हे दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिला हळव्या असतात पण जर कोणी तिच्यावर घात केला तर तीच महिला मा जिजाऊ, ताराराणी आणि अहिल्याबाई होते. माझ्यावर पद मागितल्याचा आरोप केला जात आहे. पण एक लोकसभेचे तिकिट सोडले तर मी पक्षाकडे कोणतही पद मागितले नाही. मी मागितल्यावर मला पद मिळाले असते पण माझी विचारावर निष्ठा आहे. पद मिळाले नाही तरी चालेल पण मी माझा विचार कधीही सोडणार नाही असे ठामपणे सांगितले. सत्ता येत जात असते. केंद्रात सत्तर मंत्री आहेत पण देशाला आज कृषी मंत्री कोण आहे हे माहित नाही. येवल्यात आमदार निवडून आल्यास मांजरा पाडा कॅनाॅल, उणेगाव वरतवाडी कॅनाॅलचा विषय पूर्ण करु असे आश्वासन दिले. महाराष्ट्राविरोधात एक षडयंत्र केले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, आज पवार साहेबांचा पक्ष फोडलाय. पण आज दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारे कोण असतील तर ते पवार साहेब आहेत. म्हणून हे षडयंत्र करत महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. रोजगार बाहेर जात आहेत. यासाठी एक अदृश्य हात काम करत आहे. पण मला महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची आन बान शान टिकवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे असे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तत्वावर काम करणारा आहे. त्यामुळे येवल्यातून सुरु झालेल्या लढाईचा शेवट जनताच करेल आणि महाराष्ट्राविरोधात कट कारस्थान करणाऱ्याला सोडणार नाही असे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. #Live #Nashik #Yeola

Supriya Sule

44,909 Aufrufe • vor 3 Jahren

#ठाकरेंचे महाविकास आघाडी v/s #फडणविसांच्या महायुती सरकार मधील फरक बघा : महाविकास आघाडीचे सरकार असताना समन्वय समितीने म्हाडा भरती, आरोग्य भरती पेपरफुटी आणि TET घोटाळा (हा घोटाळा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाला होता 2017,2018 पण तो उघडकीस आणला 2021 ला.) उघड केला होता. आमच्या तक्रारी आणि पुराव्यांद्वारेच FIR दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांनतर घोटाळ्याचा सखोल तपास करून भरती रद्द करण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटलांनी समन्वय समितीचे अध्यक्ष यांचा नाम्मोलेख विधानसभेत केला होता, #राहुल_कवठेकरांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ते सभागृहाला देत आहेत. तर फडणवीसांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टल घोटाळा, मुंबई पोलीस, तलाठी, महानिर्मिती, वन विभाग ई. पेपरफुटी झाल्याचे समन्वय समितीने पुराव्यासहित समोर आणले आहे. पण गृहमंत्री या नात्याने फडणविसांनी सदर घोटाळ्यांचा तपासाचे आदेश द्यायचे सोडून समन्वय समिती खोटा #Narrative पसरवीत आहे आणि त्यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सभागृहाला सांगत आहेत. आम्ही आधी आणि आताचे सरकार असताना दोन्ही वेळा नोकर भरती मधील घोटाळे उघड केले आहेत पण फरक हा आहे की महाविकासआघाडी सरकारने घोटाळ्यांचा सखोल तपास केला, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी कधी दिली नाही. पण याउलट फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा सखोल SIT तपास करण्याचे आदेश दिले नाहीत. सभागृहाला पण पेपरफुटी झाली नसल्याची माहिती दिली. तर आमच्यावर खोटा Narrative पसरवीत आहोत म्हणून गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. राहुल कवठेकर आणि समन्वय समिती कोण? घोटाळे उघड करताना आम्ही पक्षभेद केला का? याचं उत्तर सगळ्यांना मिळालं असेल.. दोन्ही सरकार मधील फरक स्पष्ट आहे!! "गिरे तो भी टांग उपर" कोणाची आहे ते जनता ठरवेल. Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Dilip Walse Patil Rohit Pawar Dr.Jitendra Awhad Vijay Wadettiwar Prakash Ambedkar Kailas Patil Kunal Raut Nana Patole Abhimanyu Pawar Shivaani Wadettiwar 🇮🇳 भाजपा महाराष्ट्र Maharashtra Congress ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Ajit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Maharashtra Youth Congress

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

38,167 Aufrufe • vor 2 Jahren

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 Aufrufe • vor 1 Jahr

कदाचित मी आक्षेप घेतल्याने ….देवभाऊ टॅक्सी चे नाव नमो टॅक्सी करण्यात आले…. पण त्यात काय बदलले? नाव “नमो” असो वा “देवभाऊ” आमचा विरोध तत्त्वाला आहे. हयात राजकारण्यांच्या नावाने सार्वजनिक पैशातून योजना राबवणे अयोग्य आहे. आजच नाही, उद्याही नाही. दोन - अमित शाह यांनी नुकतीच अशीच ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू केली आहे. मग देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचा Cold War आहे का? महाराष्ट्र सरकार “भारत टॅक्सी” का आणत नाही, ह्यामागे काय कारण आहे ते फडणवीसांनी आणि दरेकरांनी स्पष्ट करावे. २८ राज्यांनी आणि ८ केद्रशासित प्रदेशांनी वेगवेगळी टॅक्सी सेवा सुरू करून कसे चालेल? भरत टॅक्सी आणा ना महाराष्ट्रात, काय प्रॉब्लम आहे? नका भांडू आपापसात . एक देशी नाव, देशी उद्देश, देशव्यापी नेटवर्क. हे जनतेच्या हिताचे आहे. राजकीय श्रेयापेक्षा जनसेवा मोठी असते, हे सरकारला कधी कळणार? माझा दुसरा आक्षेप असा आहे की, ‘देवदत्त वाहतूक व पर्यटन सहकारी संस्था’च्या बँक खात्यात शून्य रुपये आहेत. या संस्थेने गेल्या २५ वर्षांत एकदाही निवडणूक घेतलेली नाही. संपूर्ण वर्षभरात ज्या संस्थेच्या खात्यात केवळ ₹२४६ ची उलाढाल झाली, अशा एका ‘शेल’ सहकारी संस्थेचं नाव बदलून ‘नमो टॅक्सी’ ठेवल्याने तिची पात्रता बदलत नाही. मुंबई बँकेचे कर्ज जर याच संस्थेला देण्यात येणार असेल, तर आमचे सर्व आक्षेप कायम आहेत. लोकांना नावात नाही, सेवेत बदल हवा आहे.

Mrs Anjali Damania

37,920 Aufrufe • vor 2 Monaten

महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई…..Supriya Sule छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 कोटींचे ड्रग्ज जप्त, सोलापुरातील ड्रग्जचे कारखाने उद्धवस्त, मुंबई पोलिसांकडून हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त, या बातम्या महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष गृहमंत्र्यांच्या कामाला पावती देणार्‍या आहेत, हे तुम्हाला कळतेय. पण, तुमच्यातील कुटिल राजकारणी ते कधीही तुम्हाला पटवू देणार नाही, आणि म्हणूनच तुमची अस्वस्थता अधिक आहे. जरा आठवा, सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्यावेळीही महाराष्ट्रात ड्रग्जची कारवाई मोठ्या प्रमाणात झाली होती. एनसीबीला महाराष्ट्रात यावे लागले होते. तेव्हा तुम्ही ड्रग्जवर कारवाई करणार्‍या यंत्रणांना विरोध करत होतात त्यांना नावे ठेवत होतात. आज देवेंद्र फडणवीसांच्या Devendra Fadnavis जी नेतृत्त्वात महाराष्ट्रातील पोलिस दल बिनधास्त कारवाई करते आहे आणि त्यांना कुणीही अडवत नाही. फक्त भाषणात महाराष्ट्राची अस्मिता सांगून उपयोग नाही, तर आज आपले पोलिस दल ड्रग्जवर प्रहार करते, याचा अभिमान वाटायला हवा. ड्रग्जवर प्रहार होत असताना तुम्हाला अस्वस्थ वाटतय ???? पोलिस परिषदेत देवेंद्रजी फडणवीस यांनी ड्रग्जवर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते, त्याचेच परिणाम आज दिसताहेत. असो, तुम्हाला अस्वस्थ रहायचे असेल तर रहा. फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या, मुंबईत प्रवेश करताच 3 ते 4 सिगारेट ओढल्यासारखे प्रदूषण आहे, याचे मोजमाप तुम्ही नक्की कसे केले? एकरी 100 कोटींच्या वांग्याचे रहस्य तर अजून समजले नाही, जरा हे सिगारेटचे तरी सांगाल का? महाराष्ट्राला हा प्रश्न पडला आहे... Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai

Chitra Kishor Wagh

29,486 Aufrufe • vor 2 Jahren

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार श्री. राजू पाटील यांच्या प्रचारार्थ मी आज शुभारंभाची सभा घेतली. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे- १) आज आमचे आमदार श्री. राजू पाटील यांच्या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. आज व्यासपीठावर आमचे उल्हास भोईर, भगवान भालेराव आणि संगीताताई चेंदवणकर उपस्थित आहेत. संगीताताईनी बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यामुळे ती भयानक घटना महाराष्ट्राच्या समोर आली, आख्ख प्रशासन हललं. त्यांनी जे काम केलं त्याची शाबासकी म्हणून त्यांना मी विधानसभेची उमेदवारी दिली. २) मी तुमच्याकडून हमी घ्यायला आलोय की जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही विजयी कराल. हे सगळं कशासाठी तर महाराष्ट्राची आज जी अवस्था आहे ती बदलण्यासाठी. २०१९ ला युतीत कोण होतं, आघडीत कोण होतं आता युतीत कोण आहे आघाडीत कोण आहे काहीच कळत नाहीये. गेल्या ५ वर्षात जे घडलं त्याची मतदारांनी उजळणी केली पाहिजे. कोणी कुठेही गेलं, पण आमचा राजू विधानसभेत एकटा होता, आणि मला राजुचा अभिमान आहे की माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. ३) २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजप यांच्यासमोर कोण तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मग निकाल लागले, मग सकाळी एक शपथविधी झाला, ते लग्न १५ मिनिटांत तुटलं, कारण काकांनी डोळे वटारले मग हे आले घरी काका मला माफ करा म्हणत. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोरबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. कारण काय तर अमित शाह यांनी मला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. तुमच्यासमोर जर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मग तेंव्हाच का नाही आक्षेप घेतलात ? २०१९ चा निकाल लागेपर्यंत गप्प बसले आणि जेंव्हा लक्षात आलं की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही तेंव्हा यांनी अडीच वर्षांचा मुद्दा बाहेर काढला. ४) उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यावर त्यांनी सन्माननीय बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट करणं बंद केलं. होर्डिंगवर पण हिंदुहृदय सम्राट असा उल्लेख करणं बंद केलं. काही ठिकाणी होर्डिंगवर तर उर्दूत त्यांनी चक्क जनाब बाळासाहेब ठाकरे पण लिहिलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतके खाली गेलात तुम्ही ? ५) मग हे गेले काँग्रेसबरोबर, यांची अडीच वर्ष संपली आणि यांना यांचे चाळीस कुठे गेले हे कळलंच नाही. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. त्यांच्याकडे गुप्तचर विभाग रोज काय चाललं आहे हे सांगत असतात तरी मुख्यमंत्र्यांना कळलं नाही. या चाळीस जणांना घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणि त्यातल्या त्यात अजित पवारांबरोबर बसताना आमचा श्वास कोंडतो. मग पुढे अचानक अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून बाहेर पडले आणि इथे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. काय राजकारण सुरु आहे ? महाराष्ट्रात इतके ज्वलंत प्रश्न सुरु असताना हे सगळे हवं तसं वागतात कारण तुम्ही चिडत नाही, शांत लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असतात. महाराष्ट्रातील जनता आम्ही कसेही वागलो तरी आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची खात्री आहे त्यांना. ६) पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता काही वाटत नाही या लोकांना. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तरीही तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला... ७) फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती सन्माननीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही ? माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीये. महाराष्ट्राची किती वैचारिक घसरण झाली आहे ? देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा ? ८) आत्ता मी एक क्लिप पाहिली... मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावरती एक बाई भोजपुरी गाण्यावर लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून नाचत आहे... ही लाडकी बहीण योजना ? व्यासपीठावर बायका आणून नाचवणं हे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये व्हायचं, हे आपल्याकडे कधीपासून सुरु झालं ? ९) महाराष्ट्रातले प्रश्न प्रलंबित असताना आपल्याकडे चेष्टा सुरु आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रासाठी जागा रहा. आपल्याकडे त्या ओळी आहेत ना महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले।अनेकांचा डोळा आहे हे राज्य मारण्यासाठी. महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी सुरु आहेत त्या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत. मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून माझ्या हाती सत्ता द्या. १०) राजू पाटील यांनी कोव्हीड काळात खूप काम केलं. तुमच्या सगळ्यांसाठी झगडणारा राजू आहे, त्याला भरघोस मतांनी निवडून द्या. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

51,754 Aufrufe • vor 1 Jahr

कसबा विधानसभेचे उमेदवार श्री. गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ पुण्यात कसबा पेठेत सभा घेतली. त्यात मांडलेले मुद्दे १) माझ्यासाठी कसब्याचं वेगळं महत्व आहे. मी जेंव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो आणि महाराष्ट्राचा दौरा केला आणि पक्षाची स्थापना केली, त्यावेळी कसबा गणपतीची पूजा करून पक्षाची स्थापना केली होती. याचं कारण या जागेचं महात्म्य. या जागेचं महत्व काय आहे समजून घ्यायला हवं. शहाजी राजांनी जेंव्हा बंड केलं ते बंड मोडण्यासाठी संपूर्ण पुणे उध्वस्त केलं. मग शहाजीराजे आदिलशाहीकडे गेले आणि नंतर कित्येक वर्ष शाहजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब बंगलोरला राहिले. पुढे जेंव्हा महाराज आणि जिजाऊ महाराज इकडे परत आले. इथे लाल महाल बांधला गेला. तेंव्हा इकडे आपलं देऊळ नव्हतं. जिजाऊ महाराजा २) या भागाने अख्ख्या हिंदवी प्रांतावर जवळपास एक शतक राज्य केलं. पण आपण आपला इतका दैदिप्यमान इतिहास विसरलो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्यांच्या जयंतीलाच आठवतात. परदेशात बघा लहान लहान मुलांना कसा त्यांचा इतिहास शिकवला जातो. ३) ज्या कस्ब्याचा इतिहास इतका दैदिप्यमान आहे आज त्या कसब्याची परिस्थिती किती भीषण आहे. इतक्या छोट्या गल्ल्या, कशीही पसरलेली वस्ती. पण तुम्हाला काहीच वाटत नाही. ४) आज मी उमरखेडला गेलो, तिकडे मी बोललो की या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या उमरखेडला झाली त्यावर लोकांनी टाळया वाजवल्या. काय झालंय लोकांना ? आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाबद्दल पण आपल्याला सहानभूती नाही वाटत. काय झालं आहे या महाराष्ट्राला? ५) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची कारकीर्द संपायच्या आधी १० दिवस असताना एक कायदा केला, की युद्धावरती जे कुत्रे बॉम्बचा शोध घेण्यासाठी पाठवले जातात त्या कुत्र्यांना युद्धाच्या ठिकाणी जखमा झाल्या किंवा तो अपंग झाला तरी त्याला अमेरिकन भूमीत परत आणलं पाहिजे, कारण काय तर तो कुत्रा पण अमेरिकन नागरिक आहे. कुत्र्यांचा पण जगभरात सन्मान होतो आणि भारतात नागरिकांना पण किंमत दिली जात नाही. काय अवस्था झाली आहे आपली ? ६) आज पुण्यात मेट्रो, फ्लायओव्हर बनत आहेत, पण ही प्रगती नाही. पुणे शहर आतून पोखरले जातंय. आज पुण्यात हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, बागा नाहीत, चालायला धड रस्ता नाही, मला सांगा तरीही तुम्ही कसं म्हणू शकाल की पुण्याची प्रगती झाली म्हणून ? ७) २०१९ ला आधी अजित पवारांचा शपथविधी झाला, पण ते लग्न पंधरा मिनिटं नाही टिकलं, काकांनी डोळे वटारले आणि अजित पवार परत आले. पुढे उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसले. मग शिंदेंना म्हणे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना घुसमट होते म्हणून शिंदे ४० आमदार घेऊन गेले, बरं हे जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला नकोसं वाटत होतं तेच अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यायच्या आधी १० दिवस नरेंद्र मोदी म्हणाले होते की ७०,००० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकू, पण पुढे १० दिवसांत जेलमध्ये टाकायच्या ऐवजी त्यांना उपमुख्यमंत्री केलं. ८) माझ्या पक्षाने जितकी आंदोलनं केली तितकी आंदोलनं कोणी केली ते सांगा? मोबाईलवर जे मराठी ऐकू येतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कानफटीमुळे सुरु झालं. मी मोबाईल कंपन्यांना सांगितलं की ४८ तासाच्या आत मोबाईलवरमराठी ऐकू यायला पाहिजे आणि ते करून घेतलं. हे का नाही इतर कुठल्या पक्षांना सुचलं ? ९) मी मराठीपण सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. मी जितका कडवट हिंदुत्ववादी आहे तितका कडवट मराठी आहे. इतर भाषिक लोकं किती कडवट असतात. मी सिंगापूरला गेलो होतो तेंव्हा एका दुकानात एक तामिळ बाई तमिळ रेडिओ ऐकत होती. आपण असं करू कधी ? महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो देशात कुठल्याही प्रांताला नाही. आपण भाषेबद्दल कडवट नाही, इतिहासाबद्दल आपल्याला प्रेम नाही. १०) काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत मी फोटो पाहिले की रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेश, बिहार मधून आलेली मुलं झोपली आहेत. मग जरा चौकशी केली तेंव्हा कळलं की ती रेल्वेभरतीसाठी आली आहेत. बरं रेल्वेभरती महाराष्ट्रातील पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्राच्या बाहेर. मग असं का म्हणून आम्ही संघर्ष केला, त्या संघर्षानंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या परीक्षा मराठीत घ्यायला सुरुवात झाली आणि हजारो मराठी मुलांना रेल्वेत नोकरी मिळाल्या. ११) मराठी पाट्या होत नव्हत्या, आमच्या आंदोलनामुळे त्या झाल्या. मी त्या आंदोलनाच्या वेळेस त्यांना एक पत्र लिहिलं, त्यात लिहिलं की दुकान महाग आहे का पाटी महाग आहे का हे ठरवावे आणि शेवटची ओळ लिहिली की तरी पण तुम्ही पाट्या मराठीत नाही केल्या तर माझे महाराष्ट्र सैनिक त्यांना भेटायला येतील. पाट्या झाल्या मराठीत. १२) मशिदींवरचे भोंगे उतरवले पाहिजेत म्हणून मी आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मी सरकारला समज दिली की मशिदींवरचे भोंगे नाही उतरवलेत तर माझे महाराष्ट्र सैनिक मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा लावतील. त्यावर उद्धव ठाकरेंनी भोंगे उतरवायच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मशिदींवरचे भोंगे उतरवायचा ऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर केसेस टाकतो ? १३) राहुल गांधींना एका सभेत खासदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत होत्या तर राहुल गांधी सरळ दुर्लक्ष करून निघून गेले. आपल्या महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही निवडून देणार ? १४) महाराष्ट्राच्या राजकारणाची पार रया घालवली ती संत शरद पवारांनी. इतर संतांनी जातीभेद विसरा म्हणून सांगितलं तर शरद पवार नावाच्या संताने मात्र जाती जातीत भांडण लावणे, एकमेकांना शिव्या द्यायची शिकवण देत आहेत. १५) या महाराष्ट्राला आकार देण्याचं माझं स्वप्न आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं माझं स्वप्न आहे, इथल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळायला हवी, इथल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, शेतकरी सुखी व्हायला हवेत ही माझी इच्छा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, इतरांना संधी दिलीत मला एकदा संधी देऊन बघा. #विधानसभ_२०२४

Raj Thackeray

62,399 Aufrufe • vor 1 Jahr

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत. २) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. ३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो. ४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही. ५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. ६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे... ७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ? ८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ? ९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू. १०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे. ११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत... १२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ १३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल... १४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे... १५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?

Raj Thackeray

33,713 Aufrufe • vor 1 Jahr

मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनला ₹ ५३२८ प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. २०१३ ला प्रदेशाध्यक्ष असताना Devendra Fadnavis जींनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ₹ ६००० प्रति क्विंटल हमीभाव मागीतला होता. दिंडीला १२ वर्षे आणि मोदी सरकारला ११ वर्षे झाली. फडणवीस साहेब ₹ ६००० भाव तरी कधी मिळणार? २०४७ साली विकसित महाराष्ट्राचे स्वप्न दाखवताना बळीराजाचा तुमच्या राज्यात आदीयुगाकडे उलटा प्रवास सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे. ‌भाजपाच्या उक्ती आणि कृती मधील हा फरक आहे. आज बाजारात शेतकरी ₹३५०० प्रति क्विंटल भावाला सोयाबीन विकत आहे. अर्थात प्रतिक्विटल ₹१८०० ते ₹२००० शेतकऱ्यांचे थेट नुकसान होत आहे. तुमचे हमीभाव केंद्र सुरू झाले नाहीत. त्यात जाणिवपूर्वक दिरंगाई होत आहे. गंभीर बाब म्हणजे खरेदी केंद्र वाटपात यावेळी अधिकार वाटण्या करून नवा घोळ घालण्यात आला आहे. पूर्वी पणन महासंघाकडे अधिकार होते ‌ आता नवीन वाटेकरी आणला आहे. हा घोळ मिटून केंद्र सुरू होण्यास अधिक विलंब लागणार आहे. मूग उडीद अतिवृष्टीने जवळपास पूर्ण गेले. सोयाबीनचे उत्पादन घटून कमी भावामुळे हाती काहीच पडत नाही. अतिवृष्टी ग्रस्तांना सरकारी मदत दिवाळीपूवी देऊ म्हणून कोरड्या घोषणा केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. पूर्वी दिवाळीपूर्वी हमीभाव केंद्राकडून खरेदी सुरू व्हायची. शेतकरी अडचणीत आहे हे पाहून हमीभाव केंद्र महिनाभर अगोदर सुरू झाली पाहिजे होती. सोयाबीनची बाजारात आवक सुरू होऊन आता महिना होईल तरी सरकार ढम्म बसून आहे. खरीपाचे उत्पादन बुडाल्याने भाव वाढले पाहिजेत पण कमी होत आहेत. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार हात वर करत आहे. भाजपाच्या दृष्टीने निवडणूका व सत्ताच सर्वस्व आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माणूस म्हणून तुम्ही पाहत नाहीत निदान मतदार म्हणून तरी मदत करा.

Sachin Sawant सचिन सावंत

18,780 Aufrufe • vor 10 Monaten

आज, १२ जानेवारी २०२६ रोजी ठाणे येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - भाजपचे लोकं पैसे वाटतायेत आणि शिंदेंचे लोकं पकडतायेत. काय चालुये सरकारमध्ये तेच कळत नाहीये. - आज घराघरामध्ये पाच-पाच हजार रुपये वाटतायेत. एका बाजूला म्हणतायेत आम्ही विकास केला आणि मग पैसे वाटतायेत. नक्की काय सुरू आहे? - कल्याण-डोंबिवलीत गुलामांचा बाजार मांडलाय. महाराष्ट्रात ६६ ठिकाणी पैसे वाटून फॉर्म मागे घ्यायला लावले. - सोलापूरात फॉर्म मागे घेण्यासाठी आमच्या विद्यार्थी सेनेच्या शहरअध्यक्षाचा खून करण्यात आला. इथपर्यंत सरकार चाललंय? - डोंबिवलीत शैलेश धात्रक, पूजा धात्रक आणि मनिषा धात्रक या एका कुटुंबातील तीन उमेदवारांना १५ कोटींची ऑफर देण्यात आली. पण ती ऑफर नाकारून ते तिघेही निवडणूक लढवत आहेत. - सौ. राजश्री नाईक यांना ५ कोटी रुपयांची ऑफर दिली. ती ऑफर नाकारून त्या निवडणूक लढवत आहेत. आणि तुम्ही ५ हजारांमध्ये मतं विकताय? - सुशील आवटे यांना १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली अशी अनेक लोकं आहेत. कुठून येतो हा पैसा? - बदलापूरात एका लहान मुलीवर अत्याचार झाला त्यातील आरोपीला एन्काऊंटरमध्ये ठार मारला. आणि त्यातल्या सहआरोपीला स्विकृत नगरसेवक केला. हिंमत कशी होते यांची? - रसमलाई (के. अण्णामलाई) सांगतोय मुंबईचा आणि महाराष्ट्राचा संबंध नाही. आणि फडणवीस म्हणतायेत तो असं बोललाच नाही. मला वाटलं होतं फडणवीसांना कळतं. किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा? कोणासाठी करताय हे सगळं? - माझ्या घरी गौतम अदाणीही येऊन गेले, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेले, अंबानी, आनंद महिंद्राही येऊन गेले. म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी? - ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येईल, ज्यावेळी मुंबई-ठाणे यांसारख्या आमच्या शहरांवर संकट येईल. राज ठाकरे दोस्ती वगैरे बघणार नाही - आमचं आणि गुजराती समाजाचं भांडण नाहीये. खरंतर जो डाव सुरू आहे त्याच्याविरोधात इथल्याही गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे. - एक विमानतळ आणि एक पोर्टसोडून अदाणींचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव आणि मोदींचं नाव याच्या जोरावर हा माणूस देशभर पसरत गेलाय. - इंडिगोच्या मालकाकडे या देशाची ६५ टक्के हवाई वाहतूक दिली आहे. त्यानंतर एक दिवस त्या मालकाने वाहतूक बंद केल्यानंतर वाहतूक ठप्प झाली. मग जर, एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते तर अदाणी काय करू शकतो? - या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत पण सगळे व्हावेत एकच नाही. - मी उद्योगपतींच्या विरोधातला माणूस नाहीये. पण एकाच उद्योगपतीवर इतकी मेहरबानी का? हे विचारणारा माणूस आहे. - प्रत्येकाची एक भाषा असते, प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला तुम्ही नख लावताय? - गौतम अदाणीने मुंबई विमानतळ ताब्यात घेतलं त्यानंतर विमानतळावर गरबा खेळवण्यात आला. यातून तुम्हाला काय सांगायचं होतं? वाजवायचे असतील तर फक्त ढोल -लेझिमचं वाजलं पाहिजे मुंबई विमानतळावर बाकी काहीच नाही. - घोडबंदरची नॅशनल पार्कची जमीन एका उद्योगपतीला विकत आहेत. त्याला गणेश नाईकांनी विरोध केला त्यांचं अभिनंदन. - ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे याचा आपण नीट विचार केला पाहिजे. ठाण्याचे अनेक प्रश्न आहेत जशी इथं लोकसंख्या वाढत आहे तसेच प्रश्न सुद्धा वाढतायेत. - हे संकट सध्या तुमच्या उंबरठ्यावर उभं आहे. कोणत्याही क्षणी दरवाजा ठोठावेल. त्यामुळे आज जर चुकाल तर फसाल. - हे ठाणं आपलं आहे. हे ठाणं टिकवणं, यांनी जो आराखडा आखला आहे तो उध्वस्त करणं तुमच्या हातात आहे. - तुमचे जे मित्रपरिवारातील लोकं असतील, नातेवाईक असतील त्या सगळ्यांना सांगा शिवसेनेची मशाल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन जोरात धावलं पाहिजे. - आम्हाला सत्तेचा हव्यास नाहीये वाईट या गोष्टीचं वाटतं डोळ्यादेखत ही शहरं जाऊ नये. डोळ्यादेखत इतरांनी ही शहरं घेऊ नयेत एवढ्यासाठीचं हे युद्ध सुरू आहे. - येत्या १५ तारखेला आपण सर्व सतर्क राहा, कुठेही गाफील राहू नका. जर दुबार मतदार मतदान करायला कोणी आले तर तिथेच कानफडवायचे.

Raj Thackeray

40,578 Aufrufe • vor 7 Monaten