Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

झाडभर पावसामुळे पुणे तुंबत आहे 🤦‍♂️ कुठं गेले नव्या पुण्याचे शिल्पकार

34,915 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Santosh Mohite
Santosh Mohitevor 3 Jahren

Spelling mistake aahe bhau in झाडभर 🤣🤣 जागरूक नागरिक म्हणून आपणांस कळवल बाकी राहिलं विकास तो तर या भारताचा नाही झाला तर या पुण्याचा काय करतील हे फेकू सरकार #bjp फेकू

Profilbild von चिंटू 🏹🚩😈 The Bully शूटर
चिंटू 🏹🚩😈 The Bully शूटरvor 3 Jahren

ह्यांना आता मुंबई हवी आहे पुणे तर ताब्यात आहे मग काय फरक पडतो ह्यांना

Profilbild von રોહિત પવાર
રોહિત પવારvor 3 Jahren

पावसाळ्यात ❤️ डे लागणार लोकांना आणि शिल्पकार मस्त जोपेत असणार गार ac मध्ये

Profilbild von Rajba
Rajbavor 3 Jahren

प्लास्टिक गोळा करायला.

Profilbild von s
svor 3 Jahren

@KalpeshSJ नागपुरी शिल्पकार

Profilbild von Nilesh Wadgave
Nilesh Wadgavevor 3 Jahren

पुणेकर सूशिक्षित, सुसंस्कारी, सर्वज्ञानी व परिपूर्णच असतात..? मग अशाना शिल्पकारची गरज..? शिस्थ व टापटिपतेचे धडे पाजनारे लोक कचरा उघड्यावर टाकून तुंबवा तुंबवी करतात? मग ते मूळचे पुणेकर असतील तर नवलच..!! #पुणेरी_पुणेकर

Profilbild von गौरवभाऊ 🚩
गौरवभाऊ 🚩vor 3 Jahren

शिल्पकार दुसर्‍याच्या घरी #ED पाठवण्यात व्यस्त आहे

Profilbild von 🐦
🐦vor 3 Jahren

भरती ची वेळ होती आणि पाऊस पण खूप होता पाण्याचा निचरा कसा होणार अ. महोदय

Profilbild von Mangesh Shelke
Mangesh Shelkevor 3 Jahren

साहेब हेच ते acche दिन ahe as वाटतंय आता

Profilbild von Rameez Sayyed
Rameez Sayyedvor 3 Jahren

इलेकशन मधी दिसणार डिजिटल पुणे, आता जाहिरात मशीन बंद ठेवली आहे सोशल मीडिया द्वारे दाखवण्यात येईल 👍

Ähnliche Videos

कालच्या माझ्या पोस्टने महाराष्ट्रात पुणे vs उर्वरित महाराष्ट्र असा वाद सगळा सोशल मिडीयावर आता टोकाला पोहोचला पन माझ्यावर टिकास्र सोडायच्या आधी ह्या सरांना भेटा..! हे आहेत पुण्याचे जहागीरदार शशिकांतशेठ गरडकर हे सर रोज पुणे मुंबई आपल्या swift गाडीतून (पिवळी नंबर प्लेट) भाडे मारतात व सुत्रांच्या हवाल्याने सांगतो सरांनी यंदा vivo v50 हा आय फोनपेक्षा महागडा फोन हप्त्यावर घेतलेला आहे…! सरांनी परवा पोस्टर फडकावत नॅानपुणेकरांना विनवणी केली आहे की परत पुण्यात येवु नका…! असो… आसे झालेच तर सरांची swift गाडी व हप्त्यावर घेतलेला Vivo फोन लवकरच बॅंकेच्या लिलावात येवु शकतो..! व्हिडिओत शेवट तीन व्हिडिओ सरांचे देत आहेत ते नक्की पहा सरांनी Vivo फोन घेतलेला दुसरा गरडकर सर रविवारी पन सुट्टी घेत नाही व तिसरा पुण्याचे जहागिरदार गरडकर सरांना तुम्हाला भेटायचे आसेल तर पुणे एअरपोर्टच्या पाकिंग मध्ये जा सर तासानतास पार्किंग मध्ये भाडे मिळेल ह्या आशेने उभे असतात…! 🤣🤣 पुणेकर काय रोज मुंबईला जात नाही वर्ष दोन वर्षातून कधी जायचे झालेच तर लोकल रेल्वे टमध्ये टिकीट न काढता गाडीत बसतात व टिकीट चेकर आलाच तर नाकात बोलून दहा वीस रूपये टेकवून बरोबर चुना लावतात…! तेव्हा गरडकर सरांची हप्त्याची वांधी होण्याची दाट शक्यता आहे त्यात घर सोडले तर जमीन आसेल आसे त्यांच्याकडे पाहून वाटत नाही तरी पुण्याचे जहागीर गरडकरांना व घरं PG ला भाड्याने देवुन भाडं खावुन जगणाऱ्या कोर पुणेकरांना पन दिवाळी शुभेच्छा 💫✨👍💐 #Diwali2025

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

71,565 Aufrufe • vor 10 Monaten

बारामती लोकसभा मतदारसंघातील भूगाव ता. मुळशी येथील 'द वन सोसायटी'कडे जाणाऱ्या ३० मीटर रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. सोसायटीची निर्मिती करणाऱ्या बिल्डर कडून हा रस्ता होणे अपेक्षित होते, परंतू अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती होत नाही. यामुळे सोसायटीतील सभासदांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सोसायटीतील सभासदांनी या संदर्भात पोलिसात देखील तक्रार दाखल केली होती. पण पोलीसांनीही याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोसायटीतील सभासदांना होणारा त्रास लक्षात घेता पीएमआरडीए प्रशासनाने बिल्डर आणि स्थानिकांच्या प्रश्नावर समन्वयाने तोडगा काढून रस्ता दुरूस्त करण्याचे निर्देश द्यावे ही विनंती. PMRDA collectorpune पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

Supriya Sule

27,211 Aufrufe • vor 2 Jahren

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार. 2014 ते 2019 या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांति 🙏🏽 #GirishBapat

Devendra Fadnavis

238,634 Aufrufe • vor 3 Jahren

अपघातग्रस्त पुणेकर… एअर एम्बुलंसची व्यवस्था आणि अवघ्या १३ मिनिटांत पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटल… अपघातग्रस्त पुणेकराला तातडीने पोर्ट ब्लेअरहून पुण्यात आणण्यात यश आलं असून शोभना लोहपात्रे असं अपघातग्रस्त त्यांचं नाव आहे. पोर्ट ब्लेअर येथून तातडीने एअर एम्बुलंन्सची उपलब्धता केल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले. शोभना यांना घेऊन निघालेली एअर एम्बुलंस गुरुवारी रात्री ९ः३० वा. पुणे विमानतळावर पोहोचली. त्यानंतर आपण दिलेल्या सूचनेवरून पुणे पोलिसांनी पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटलदरम्यान ‘ग्रीन कॉरिडॉर’ करुन हे अंतर अवघ्या १३ मिनिटांत कापले. शोभना लोहपात्रे यांच्यावर आता पुना हॅास्पिटलमध्ये उपचार सुरू झाले असून त्यांच्यावरील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. झालं असं की, लोहपात्रे कुटुंबिय सहपरिवार अंदमान निकोबार-पोर्ट ब्लेअर येथे फिरायला गेले होते. २६ मार्च रोजी संध्याकाळी शोभना लोहपात्रे यांचा एका बेटावर जबरदस्त अपघात झाला. त्यांच्या भाडे तत्वावर घेतलेल्या दुचाकीला एका भरधाव वाहनाने उडवले. जिथे घटना घडली, त्या छोट्या बेटावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. म्हणून रात्री उशिरा एअर फोर्सच्या मदतीने त्यांना त्या बेटावरुन पोर्ट ब्लेअर येथे एअर लिफ्ट करण्याची व्यवस्था केली आणि पुढे एअर एम्बुलंन्सने पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला. पण आता त्यांच्यावर यशस्वी उपचार सुरू झाले आहेत. Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda BJP Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र

Murlidhar Mohol

31,678 Aufrufe • vor 1 Jahr

आज एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेमुळे मी अत्यंत व्यथित आहे. माझे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी सौ. मोनाली सुशांत भिसे यांना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे गेले असता, 📷 रुग्णालयाने त्वरित १० लाख रुपये भरण्यास सांगितले! 📷 ३ लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही प्रवेश नाकारला! 📷 मंत्रालयाकडून संपर्क होऊनही हॉस्पिटलच्या प्रशासनाने निर्णय झुगारला. 📷 वेळेवर उपचार न मिळाल्याने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले. 📷 तेथे उपचारानंतर दोन जुळ्या मुलींचा जन्म झाला, पण दुर्दैवाने त्या मातेचा मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल गरिबांसाठी एक ट्रस्ट म्हणून ओळखले जाते, मात्र इथेच अशा प्रकारे उपचार नाकारले जातात, हे अत्यंत संतापजनक आहे! अशा अनेक तक्रारी या हॉस्पिटलविरुद्ध आल्या आहेत. 📷 या अन्यायाविरोधात मी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे! 📷 माननीय मुख्यमंत्री आणि प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Prakash Abitkar Ajit Pawar Mahesh Landge Shankar Jagtap Uma Khapre( Modi Ka Parivar) #dinanathmangeshkarhospital #trust #JusticeMustBeServed #HealthcareInjustice

Amit Gorkhe

120,723 Aufrufe • vor 1 Jahr

सन्माननीय देवेंद्रजी, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालात याबद्दल प्रथमत: आपले मनःपूर्वक अभिनंदन! मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांना लागून आहे. मात्र, आपणही पुन्हा तोच कित्ता गिरवत आहात, असे दिसते. आपण आजच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोयाबीन खरेदीचा मुद्दा सांगितला. आर्द्रतेचा निकष १२ टक्के होता. तो शेतकरी हित लक्षात घेऊन वाढवला व १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीनही हमीभाव केंद्रावरून विकत घेत आहात व त्यामुळे विक्रमी खरेदी झाल्याचे आपण म्हटले आहे. पण, त्याची एकदा पडताळणी करायला हवी होती. केंद्रावरील वास्तव आपण म्हणता त्यापेक्षा वेगळे आहे. धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील एकाही हमीभाव केंद्रावरून १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीन खरेदी केले गेले नाही, आजही करीत नाहीत. आपण स्वतः काही केंद्रांना भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. त्यामुळे हे वास्तव आपणास अवगत करून देणे आवश्यक वाटते. नव्या सरकारची सुरुवातच अशा थापानी होणार असेल तर पुढे शेतकऱ्यांनी आपल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला.. शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका, ही आपणास विनंती.. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Kailas Patil

17,930 Aufrufe • vor 1 Jahr

वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप पुढे आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय 22 राहणार तुर्भे एमआयडीसी नवी मुंबई हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात असताना कार क्रमांक एम एच 12आर टी 5000 या कारला मिक्सरचा धक्का लागल्याने कार मधील दोघांनी त्याला जबरदस्ती ने आपल्या कारमध्ये नेऊन त्याचे अपहरण केल्याबाबत तक्रार दिल्याने रबाळे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे कारचा मागोवा घेत पुणे येथे गेले असता सदरची कार ही वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतुश्रृंगी हद्दीतील घरी मिळून आली. तेथून अपहरण केलेला चालक याची एपीआय खरात व त्यांच्या टीमने सुटका केली. तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवी पणा केला व दरवाजा न खोलताच पोलिसांशी हुज्जत घातलेली आहे. पोलिसांनी त्यांना रबाळे पोलीस स्टेशन येथे येण्याची सूचना केली असून पुढील तपास चालू आहे. #pujaKhedkar #IAS #Accident #DriverKidnapped

Vijay Kumbhar

37,527 Aufrufe • vor 11 Monaten

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील आयोवा राज्याच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे झालेला सामंजस्य करार महाराष्ट्रासाठी आणि आयोवा राज्यासाठीही महत्त्वाचा टप्पा आहे. आयोवा हे अमेरिकेत "कॉर्न स्टेट" म्हणून ओळखले जाते, तर महाराष्ट्र हे भारतातील एक महत्त्वाचे कृषीप्रधान राज्य आहे.या करारातून आधुनिक शेतीतंत्रज्ञान, सिंचन पद्धती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी मार्केट लिंकेज यामध्ये सहकार्य होणार आहे.ड्रोनद्वारे पिकांचे निरीक्षण, प्रिसिजन फार्मिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होऊ शकतो. आयोवा मध्ये बायोटेक रिसर्च आणि उत्पादन यामध्ये खूप काम आहे.महाराष्ट्रातील पुणे, मुंबई सारख्या शहरांतील बायोटेक कंपन्यांसोबत संयुक्त संशोधन प्रकल्प राबवले जातील.कृषी क्षेत्रासोबतच आरोग्य आणि औषधनिर्मिती या क्षेत्रांनाही गती मिळेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान मिळेल.संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात आदान-प्रदान होऊन विद्यार्थ्यांना व संशोधकांना नवी संधी मिळेल.परकीय गुंतवणूक वाढेल, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा करार म्हणजे महाराष्ट्र आणि आयोवा यांच्यातील केवळ आर्थिक देवाण-घेवाण नाही, तर ज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती आणि विकासदृष्टी यांचा संगम आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राला जागतिक भागीदारीचे दार उघडले गेले आहे. भविष्यात या करारातून महाराष्ट्र "ग्लोबल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन" म्हणून अधिकच सक्षम होईल, यात शंका नाही. Devendra Fadnavis साहेब खूप खूप धन्यवाद ❤️🙏

शुभम कराड

25,131 Aufrufe • vor 11 Monaten

विद्या धुमाळ म्हणतात, साहेब ही गरिबा घरची राखी आहे... देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीच महत्त्वाची आहे... •⁠ ⁠विजय धुमाळ यांच्या पत्नी विद्या धुमाळ यांनी बांधली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी •⁠ ⁠विजय धुमाळ हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांडा येथील रहिवासी. 41 वर्षांचे आहेत... •⁠ ⁠विजय धुमाळ यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांचे हृदय प्रत्यारोपण करावे लागले. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण 23 लाख रुपये खर्च हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत करण्यात आला. •⁠ ⁠विजय धुमाळ हे बांधकाम मजूर असून, त्यांची पत्नी विद्याताई या शेतमजूर आहेत. या कुटुबांचे उत्पन्न वार्षिक अवघे 31 हजार रुपये. त्यामुळे त्यांना उपचारापासून वंचित रहावे लागले होते. •⁠ ⁠भाजपाच्या एका कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना उपचार मिळवून देण्याच्या सूचना केल्या. धर्मदाय आरोग्य कक्ष हा विधी व न्याय विभागांतर्गत काम करतो. •⁠ ⁠धुमाळ दामत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगते. अशात या आरोग्याच्या संकटाने ते पूर्णत: कोलमडून गेले होते. त्यांना नगरमधील मोरया क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाने त्यांना रुबी क्लिनीक पुणे येथे हलविले आणि तेथे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. •⁠ ⁠परवा रात्री त्यांच्या पत्नीने देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. Devendra Fadnavis #DevendraFadnavis #RakshaBandhan #Maharashtra

@OfficeOfDevendra

20,967 Aufrufe • vor 2 Jahren

आज पुणे येथील एका कार्यक्रमानंतर समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबाबत पत्रकारांशी संवाद साधला. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी या महामार्गावरुन जात असताना काही लोकांनी याबाबत त्यांचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्या लोकांनी या महामार्गाची महाराष्ट्रात फार मोठी चर्चा झाली, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाद दुसरा अपघात पहायला मिळत आहेत. त्याचे कारण कदाचित याचे सायंटिफिक नियोजन केले नसावे त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत. हा महामार्ग तयार करण्याच्या कालावधीत, निर्णय घेण्यात, त्याचे नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत - नकळत दोषी ठरवतात. काय झाले असेल ते झाले असेल पण जी दुर्घटना घडली ती दु:खद आहे. अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच - सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाहीत. जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी...संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी... कुठे चूक झालेली आहे... कशामुळे चूक झाली आहे...ती शोधून काढावी आणि याप्रकारे लोक जात आहेत ती स्थिती आणि याप्रकारचे वाढते अपघात आहेत ती स्थिती थांबवण्यास हातभार लावावा. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे.आपण प्रवास करताना डोक्यात काही खुणा असतात, काही वळणे दिसतात, झाडे दिसतात परंतु या प्रवासात रस्त्याची सलगता आहे आणि आजुबाजुला कुठे काही नाही. अनेक ठिकाणी या गोष्टीचा परिणाम वाहन चालवतो त्यांच्यावर होतो का अशी शंका काही लोकांनी बोलून दाखवली आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण यातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुठे दुरुस्ती करायची शक्यता असेल तर ती केली पाहिजे. एमएसआरडीसीने त्यांच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दुसर्‍यावर ढकलायचा प्रयत्न केला आहे. माझे मते या देशातील इंडियन रोड काँग्रेसने यांची पाहणी केली असे तुम्ही म्हणत असाल आणि जर हे खरे असेल तर जगातील जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवावे. त्यांची एक कमिटी करावी. त्यामार्फत चौकशी करावी, त्यांचे रिकमेंडेशन घ्यावे आणि करेक्शन मेजर द्यावीत असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी कारण लोकांचे प्राण हे महत्वाचे आहेत.

Sharad Pawar

245,836 Aufrufe • vor 3 Jahren

📍संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 🛣️ पालखी मार्ग निरीक्षण दर वर्षी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि विना अडथळ्यांची व्हावी या उद्देशाने श्रद्धा व आधुनिकतेचा प्रभावी संगम साकारत पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) कामाचे आज राज्याचे कृषीमंत्री श्री Dattatray Bharane जी, आमदार श्री Rahul Subhash Kool जी, माजी आमदार श्री Harshvarrdhan Patil जी यांच्यासह निरीक्षण केले. भारत भूमीच्या सनातन परंपरेत वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजेच ‘वारी’ ही श्रद्धा, तपस्या आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. दर वर्षी आषाढी एकादशीच्या पर्वावर लाखो वारकरी पालखी समवेत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मात्र अनेक वर्षे ही वारी विविध आव्हानांना, अडचणींना सामोरे जात होती. या समस्यांवर उपाय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) या मार्गांचा व्यापक पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला, जो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांची वारी आता सुखकर व आल्हाददायक होणार आहे. देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) हा पाटस ते पंढरपूर असा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. ४,४१६ रुपयांच्या तरतुदीतून उभारण्यात येत असलेला हा मार्ग वारकऱ्यांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवून विकसित करण्यात येत आहे. पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा ३ पॅकेजमध्ये या मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून इंदापूर ते तोंडले भागाचे काम ९६% आणि बारामती ते इंदापूर भागाचे काम ८४% पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण केले जाईल. हा महामार्ग बारामती, भिगवण, अकलूज आणि श्रीपूर यांसारख्या भागांना बायपास करून जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाप्रमाणेच या मार्गावरही स्वतंत्र पदयात्रा मार्ग, आधुनिक पूल, अंडरपास आणि बायपास मार्गांच्या सहाय्याने यात्रा अधिक सुरक्षित आणि वेळेवर होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पालखी मार्गांचा विकास केवळ रस्ते बांधकामापुरता मर्यादित नसून, तो एक समग्र विकास मॉडेल म्हणून साकार झाला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सदर पालखी मार्गावर पॅकेज क्र. २ व ३ वर सुमारे ४०० वृक्षांचे पुनर्स्थापन (ट्रान्सप्लांटेशन) यशस्वीरीत्या करून त्यांचे संगोपन केले गेले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बारामती, निमगाव केतकी, भवानीनगर, बावडा, अकलूज व श्रीपूर/बोरगाव याठिकाणी बायपास रस्ते प्रस्तावित केले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल आणि वाहतूक जलद गतीने होईल. महामार्गाच्या परिसरातील जलसंधारण क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जवळपास २५ तलावांचे खोलीकरण करून अतिरिक्त जलसाठी निर्माण करण्यात आला आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या २५ गावांना याचा फायदा झाला आहे. याठिकाणी आवर्जून स्व. अजितदादा पवार यांची आठवण येते. त्यांनी बारामतीच्या बायपासवर कान्हेरी गावाजवळ तलावाचे खोलीकरण करून घेतले होते. यामध्ये महामार्गाच्या कामासाठी जवळपास २ लाख क्युबिक मटेरियल काढून वापरण्यात आले. पुढे याचे खोलीकरण झाल्यावर तलावाच्या इरिगेशन मधून कॉंक्रीटचा सांडवा तयार करून घेतला. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूने हिंगणगडा व कान्हेरी येथे वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्ग निर्माण करून वन्य प्राण्यांचे अधिवास जतन केले आहेत. त्यामुळे प्राणी व वाहनांच्या अपघाताला आळा बसला आहे. #Palkhi_Marg_Inspection #SantTukaramMaharajPalkhiMarg #PalkhiMarg #पालखीमार्ग #PragatiKaHighway #GatiShakti

Nitin Gadkari

14,005 Aufrufe • vor 3 Monaten

कसबा विधानसभेचे उमेदवार श्री. गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ पुण्यात कसबा पेठेत सभा घेतली. त्यात मांडलेले मुद्दे १) माझ्यासाठी कसब्याचं वेगळं महत्व आहे. मी जेंव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो आणि महाराष्ट्राचा दौरा केला आणि पक्षाची स्थापना केली, त्यावेळी कसबा गणपतीची पूजा करून पक्षाची स्थापना केली होती. याचं कारण या जागेचं महात्म्य. या जागेचं महत्व काय आहे समजून घ्यायला हवं. शहाजी राजांनी जेंव्हा बंड केलं ते बंड मोडण्यासाठी संपूर्ण पुणे उध्वस्त केलं. मग शहाजीराजे आदिलशाहीकडे गेले आणि नंतर कित्येक वर्ष शाहजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब बंगलोरला राहिले. पुढे जेंव्हा महाराज आणि जिजाऊ महाराज इकडे परत आले. इथे लाल महाल बांधला गेला. तेंव्हा इकडे आपलं देऊळ नव्हतं. जिजाऊ महाराजा २) या भागाने अख्ख्या हिंदवी प्रांतावर जवळपास एक शतक राज्य केलं. पण आपण आपला इतका दैदिप्यमान इतिहास विसरलो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्यांच्या जयंतीलाच आठवतात. परदेशात बघा लहान लहान मुलांना कसा त्यांचा इतिहास शिकवला जातो. ३) ज्या कस्ब्याचा इतिहास इतका दैदिप्यमान आहे आज त्या कसब्याची परिस्थिती किती भीषण आहे. इतक्या छोट्या गल्ल्या, कशीही पसरलेली वस्ती. पण तुम्हाला काहीच वाटत नाही. ४) आज मी उमरखेडला गेलो, तिकडे मी बोललो की या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या उमरखेडला झाली त्यावर लोकांनी टाळया वाजवल्या. काय झालंय लोकांना ? आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाबद्दल पण आपल्याला सहानभूती नाही वाटत. काय झालं आहे या महाराष्ट्राला? ५) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची कारकीर्द संपायच्या आधी १० दिवस असताना एक कायदा केला, की युद्धावरती जे कुत्रे बॉम्बचा शोध घेण्यासाठी पाठवले जातात त्या कुत्र्यांना युद्धाच्या ठिकाणी जखमा झाल्या किंवा तो अपंग झाला तरी त्याला अमेरिकन भूमीत परत आणलं पाहिजे, कारण काय तर तो कुत्रा पण अमेरिकन नागरिक आहे. कुत्र्यांचा पण जगभरात सन्मान होतो आणि भारतात नागरिकांना पण किंमत दिली जात नाही. काय अवस्था झाली आहे आपली ? ६) आज पुण्यात मेट्रो, फ्लायओव्हर बनत आहेत, पण ही प्रगती नाही. पुणे शहर आतून पोखरले जातंय. आज पुण्यात हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, बागा नाहीत, चालायला धड रस्ता नाही, मला सांगा तरीही तुम्ही कसं म्हणू शकाल की पुण्याची प्रगती झाली म्हणून ? ७) २०१९ ला आधी अजित पवारांचा शपथविधी झाला, पण ते लग्न पंधरा मिनिटं नाही टिकलं, काकांनी डोळे वटारले आणि अजित पवार परत आले. पुढे उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसले. मग शिंदेंना म्हणे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना घुसमट होते म्हणून शिंदे ४० आमदार घेऊन गेले, बरं हे जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला नकोसं वाटत होतं तेच अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यायच्या आधी १० दिवस नरेंद्र मोदी म्हणाले होते की ७०,००० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकू, पण पुढे १० दिवसांत जेलमध्ये टाकायच्या ऐवजी त्यांना उपमुख्यमंत्री केलं. ८) माझ्या पक्षाने जितकी आंदोलनं केली तितकी आंदोलनं कोणी केली ते सांगा? मोबाईलवर जे मराठी ऐकू येतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कानफटीमुळे सुरु झालं. मी मोबाईल कंपन्यांना सांगितलं की ४८ तासाच्या आत मोबाईलवरमराठी ऐकू यायला पाहिजे आणि ते करून घेतलं. हे का नाही इतर कुठल्या पक्षांना सुचलं ? ९) मी मराठीपण सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. मी जितका कडवट हिंदुत्ववादी आहे तितका कडवट मराठी आहे. इतर भाषिक लोकं किती कडवट असतात. मी सिंगापूरला गेलो होतो तेंव्हा एका दुकानात एक तामिळ बाई तमिळ रेडिओ ऐकत होती. आपण असं करू कधी ? महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो देशात कुठल्याही प्रांताला नाही. आपण भाषेबद्दल कडवट नाही, इतिहासाबद्दल आपल्याला प्रेम नाही. १०) काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत मी फोटो पाहिले की रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेश, बिहार मधून आलेली मुलं झोपली आहेत. मग जरा चौकशी केली तेंव्हा कळलं की ती रेल्वेभरतीसाठी आली आहेत. बरं रेल्वेभरती महाराष्ट्रातील पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्राच्या बाहेर. मग असं का म्हणून आम्ही संघर्ष केला, त्या संघर्षानंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या परीक्षा मराठीत घ्यायला सुरुवात झाली आणि हजारो मराठी मुलांना रेल्वेत नोकरी मिळाल्या. ११) मराठी पाट्या होत नव्हत्या, आमच्या आंदोलनामुळे त्या झाल्या. मी त्या आंदोलनाच्या वेळेस त्यांना एक पत्र लिहिलं, त्यात लिहिलं की दुकान महाग आहे का पाटी महाग आहे का हे ठरवावे आणि शेवटची ओळ लिहिली की तरी पण तुम्ही पाट्या मराठीत नाही केल्या तर माझे महाराष्ट्र सैनिक त्यांना भेटायला येतील. पाट्या झाल्या मराठीत. १२) मशिदींवरचे भोंगे उतरवले पाहिजेत म्हणून मी आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मी सरकारला समज दिली की मशिदींवरचे भोंगे नाही उतरवलेत तर माझे महाराष्ट्र सैनिक मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा लावतील. त्यावर उद्धव ठाकरेंनी भोंगे उतरवायच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मशिदींवरचे भोंगे उतरवायचा ऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर केसेस टाकतो ? १३) राहुल गांधींना एका सभेत खासदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत होत्या तर राहुल गांधी सरळ दुर्लक्ष करून निघून गेले. आपल्या महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही निवडून देणार ? १४) महाराष्ट्राच्या राजकारणाची पार रया घालवली ती संत शरद पवारांनी. इतर संतांनी जातीभेद विसरा म्हणून सांगितलं तर शरद पवार नावाच्या संताने मात्र जाती जातीत भांडण लावणे, एकमेकांना शिव्या द्यायची शिकवण देत आहेत. १५) या महाराष्ट्राला आकार देण्याचं माझं स्वप्न आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं माझं स्वप्न आहे, इथल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळायला हवी, इथल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, शेतकरी सुखी व्हायला हवेत ही माझी इच्छा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, इतरांना संधी दिलीत मला एकदा संधी देऊन बघा. #विधानसभ_२०२४

Raj Thackeray

62,399 Aufrufe • vor 1 Jahr

…जेव्हा यंत्रणांचा उपयोग गरजुंच्या मदतीसाठी करता येतो ! पुण्यातील दोन दाम्पत्य फुकेत येथे सहलीसाठी गेले होते. मात्र, सहलीच्या दुसऱ्याच दिवशी एका दाम्पत्याचा अपघात झाला आणि दोघेही गंभीर जखमी झाले. घडलेल्या प्रकाराची माहिती नातेवाईकांकडून मिळताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने योग्य ती कार्यवाही करत आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या आणि स्ट्रेचर अरेंजमेंटसह अपघातग्रस्त दाम्पत्याला सुरक्षितपणे भारतात आणले. त्यांना आणण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर राबविली आणि भारतात परत आणले. संवेदनशील प्रशासन आणि प्रभावी यंत्रणेच्या मदतीमुळे त्यांच्यावर पुण्यात संचेती हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार करण्यात आले. सध्या दोघेही ठणठणीत असून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची दोघांचीही मला भेटण्याची इच्छा होती. मात्र मी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्ली येथे व्यस्त असल्याने त्यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करुन आभार मानले. गरजूंना मदतीचा हात देणे ही सामाजिक जबाबदारी समजून अशा परिस्थितीत तत्पर राहण्याचा माझा संकल्प कायम आहे. अशा प्रकारच्या कामामधून मिळणारे समाधान निश्चितच मोठे असते. #Pune #पुणे #SocialWork Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda BJP Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र

Murlidhar Mohol

45,908 Aufrufe • vor 1 Jahr

**पिंपरी चिंचवड येथील नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पातील वृक्षतोडीवरील नागरिकांच्या आक्षेपांवरील सुनावणीत नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न** दि. १९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प उद्यान येथे पिंपरी-चिंचवड नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पातील वाकड ते सांगवी या स्ट्रेचसाठी प्रस्तावित ११५०+ झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर नागरिकांनी नोंदवलेल्या आक्षेपांवर वृक्ष अधिकारी श्री. उमेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून तब्बल ६०-७० नागरिक या सुनावणीसाठी हजर होते, नदीकाठच्या मुक्या झाडांचा आवाज बनून! ##नागरिकांच्या प्रश्नांना बगल वृक्ष अधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितले की, "आम्ही आपल्या सर्व आक्षेपांची आज इथे नोंद घेऊन वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्याकडे अहवालाद्वारे पाठवले जातील आणि अंतिम निर्णय ते घेतील". मात्र, संपूर्ण सुनावणी दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले नाही. "मी उत्तर द्यायला बांधील नाही" अशा त्यांच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष आणि प्रशासक पि.चि. मनपा आयुक्त श्री शेखर सिंह यांनी जनसुनावणी भरवावी अशी मागणी नागरिकांनी आक्षेप पत्रात केली होती पण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी न भरवता फक्त एक औपचारिकता म्हणून उद्यान विभागात वृक्ष अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी भरवण्यात आली. ## वृक्षतोडीतील अनियमितता आणि कायद्यांचे उल्लंघन: याबाबत नागरिकांनी वृक्ष कायद्यानुसार आवश्यक कागदपत्रांच्या अभावाकडे वृक्ष अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जागा मालकाची परवानगी, झाडांचे अचूक स्थान दर्शवणारा नकाशा, मोठ्या संख्येने झाडे बाधित होत असतील तर त्यांना वाचवण्यासाठी पर्यायी संकल्पचित्र, वारसा वृक्षांना (Heritage Trees) विशेष संरक्षण, झाडांचे वय मोजण्याची वैज्ञानिक पद्धत, तसेच वन्यजीव संरक्षण कायदा आणि Wetlands Act च्या उल्लंघनाचे मुद्दे नागरिकांनी ठळकपणे मांडले. नदीकाठावर भराव टाकून नदीची रुंदी कमी केली जात आहे, ब्लू लाइनमध्ये बांधकाम सुरू आहे, त्यामुळे प्राणी व पक्षी जीवनाला धोका उद्भवला आहे तसेच भविष्यात पुराचा धोका निर्माण होणार आहे, आत्ताच मागील पावसाळ्यात काही भागांत पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती —हे मुद्दे उपस्थित नागरिकांनी पुराव्यासह मांडले. SEAA ची परवानगी आहे का? SEAA ने घातलेल्या अटी पूर्ण केल्या आहेत का? अशा अनेक गंभीर त्रुटींमुळे ही सुनावणीच बेकायदेशीर असल्याचे जाणकारांनी निदर्शनास आणून दिले. ## लोकशाहीचा अपमान आणि नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न पुणे संवाद या नागरी मंचाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रेखा जोशी यांनी "मांडलेल्या विविध कारणांमुळे ही सुनावणीच बेकायदेशीर आहे, त्रुटींची पूर्तता करून सर्व प्रक्रिया सुनावणीसह नव्याने राबवावी" अशी स्पष्ट मागणी केली आणि अधिकाऱ्यांना त्याची लेखी नोंद घेण्यास सांगितले. मात्र, वृक्ष अधिकारी उमेश ढाकणे यांनी केवळ माना डोलावल्या, पण ते असे लेखी नोंदवण्यास तयार नव्हते. रेखा जोशी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यासाठी पुढे आल्या, तेव्हा तिथे असलेल्या महिला सुरक्षा रक्षकाने त्यांना हात लावला आणि हुज्जत घातली. यामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा रक्षकांची सगळ्यांवर करडी नजर होती. ## सुनावणी म्हणजे केवळ एक औपचारिकता? ही एकतर्फी आणि लोकशाहीविरोधी सुनावणी असल्याचा निषेध नागरिकांनी व्यक्त केला. "हे प्रशासन लोकांचे ऐकण्यासाठी आहे की त्यांना गप्प बसवण्यासाठी?" असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. तीन तास चाललेल्या या सुनावणीत नागरिकांचे म्हणणे फक्त ऐकून घेण्यात आले, मात्र एका प्रश्नालाही उत्तर देण्यात आले नाही. शेवटी, वृक्ष अधिकारी उमेश ढाकणे यांनी "सुनावणी संपली" असे जाहीर केले व ते निघून गेले. ## नागरिकांचा निर्धार – हा लढा सुरूच राहील! शहरभरातून वेळ काढून आलेल्या ६०-७० नागरिकांचा पूर्ण भ्रमनिरास झाला. पण "आम्ही येथे थांबणार नाही! एकही झाड तोडले गेले नाही पाहिजे, यासाठी जे काही करता येईल ते सर्व करू!" अशा निर्धाराने नागरिक एकमेकांना बळ देत घरी परतले. ही लढाई केवळ ११५० झाडांची नाही, ही नदीकाठ वाचवण्याची, पर्यावरण रक्षणाची आणि लोकशाही टिकवण्याची लढाई आहे! PCMC Commissioner Shekhar Singh PCMC Smart Sarathi MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र MAHARASHTRA DGIPR Aaditya Thackeray Ballot Paper Janata Party Anil Shidore अनिल शिदोरे Mahesh Landge Ajit Pawar Supriya Sule Pune River Revival prajakta mahajan Priyadarshini Karve AngadPatwardhan ameet singh राम सुत रुपेश Rohan Aaron #AirPollution #EnVironMent योगेश कातारे पाटील Rahul Kulkarni Prashant Kadam Sarang Yadwadkar Meghna Bhandari Pune Pulse Shrikishan Kale श्रीकिशन काळे Brijmohan Patil Eeshwari Amar Jedhe Vandana Chaudhary Hema Chari Madabhushi Jaideep Baphna, CFA #म #पुणे #मुळा #मुठा #राम #नदी #RFD

ChaloPMC Puneसंवाद

50,650 Aufrufe • vor 1 Jahr