Loading video...

Video Failed to Load

Go Home

तरी सुद्धा महाग्रु १००० मतांनी तर संतोष जुवेकर ५०० मतांनी आघाडीवर ,

35,604 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

🇮🇳's profile picture
🇮🇳1 year ago

कशाला उगाच पुष्कर जोग ला ट्रोल करता? त्याची इच्छा आहे मराठी चित्रपटाला ऑस्कर मिळवून द्यायची आणि तो ही गोष्ट खूप वेळा बोलून झाला आहे.

आशीष माळी's profile picture
आशीष माळी1 year ago

सर पुष्कर जोग ह्यांनी किती लक्षात ठेवण्याजोगे फिल्म केले. तेच मल्याळम किंवा दक्षिणात्य फिल्म किती पुढे गेले. ह्यांनी एखादा तर फिल्म असा करावा की त्यामुळे पुणे मुंबई मध्ये मराठी गर्दी होईल(उदाहरण सैराट) पण तसे काहीच नाही उलट मोठ्या गप्पा करतात सर्व. आपली मतभिन्नता असू शकते.👍

Ajinkya.🏹🚩's profile picture
Ajinkya.🏹🚩1 year ago

ओव्हर कॉन्फिडन्स आहे मान्य पण इच्छा वाईट नाही

Aditya Chaudhari's profile picture
Aditya Chaudhari1 year ago

एक मराठी माणूस , मोठे स्वप्न बाळगून मराठी भाषेचा जागतिक पटलावर गौरव करू इच्छिणाऱ्या दुसऱ्या मराठी माणसाला Troll करतोय हे पाहून बर वाटलं , महाराष्ट्राचा इतिहासच आपल्याला ते शिकवतोय , याव्यतिरिक्त लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार

🇮🇳आंबेडकरवादी मावळा🇮🇳's profile picture
🇮🇳आंबेडकरवादी मावळा🇮🇳1 year ago

दक्षिणात्य कलाकार आपल्या भाषेसाठी खंबीरपणे उभे असतात. सांगायचं तर मोठी स्वप्न बघण्यात काही हरकत नाही परंतु ही भटाळलेली मराठी कलाकारांची टोळकी मराठीवर आक्रमण होत असताना मुग गिळून गप्प आहेत. "महाराष्ट्रभूषण अशोक सराफ हे सुद्धा हिंदी सक्ती विरोधात काहीच बोलले नाहीये."

प्रवीण ✍️❤️'s profile picture
प्रवीण ✍️❤️1 year ago

ह्यात काय चूक आहे. तो स्वप्न बघतोय, थापा मारत नाहीय..

मराठी बाणा's profile picture
मराठी बाणा1 year ago

अरे ह्यात काहीच वावग नाही...माझ्या मराठी भाषेच्या चित्रपटाला ऑस्कर मिळाला तर आनंदच आहे की...

Santu's profile picture
Santu1 year ago

माझं पण ट्विट Reddy आहे भाषण अपलोड कर ☺️

TheReviewPicker's profile picture
TheReviewPicker1 year ago

संतोष सरांचं ठिके पण महागुरू स्पर्धेतच येत नाहीत कारण ते बाहेर पडलेत म्हणूनच ही स्पर्धा जिवंत आहे 😂😂

आशीष माळी's profile picture
आशीष माळी1 year ago

😂😂

Related Videos

कोल्हापूर महानगरपालिका अंतिम निकाल काँग्रेस ३४ जागा उबाठा १ आसे ३५ जागा तर भाजपा २६ शिवसेना १५ राष्ट्रवादी कॉंग्रेस ४ व जनसुराज्य १ जागा निवडून आल्या आहेत तरी कोल्हापूरात सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेसच आहे…! त्यात आमचा एक उमेदवार फक्त १६ मतांनी पडला तर पाच ते सहा उमेदवार १००-१५० मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत त्यामुळे सत्ता स्थापन करता येत नसली तरी चालेल पण आम्हाला अभिमान आमचा बावड्याचा एकटा वाघ #सतेज_पाटील आमच्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांना घेवूनच निवडणूक लढला व सत्ताधारी लोकं पैशावाले उपरे उमेदवार घेऊन महायुतीत झुंडीने लढले आहेत…! #कोल्हापूर_महानगरपालिका Satej (Bunty) D. Patil

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

46,089 views • 7 months ago

आजचा गोवा एक्सप्रेस मधला किस्सा आहे. दोन पायावर उभा राहायला जागा नाही इतकी गर्दी. टॉयलेट्स सामानने भरलेली. वाट काढत टॉयलेटपर्यंत जाण सुद्धा अवघड होतं. या लहानुसा मुलग्याचं कुटुंब जळगाव वरून सकाळी 9:30 वाजता ट्रेन मध्ये चढले होतं. साधारण 2 वाजता या मुलाला लघवी लागली. त्याआधी त्याने 100% टक्के थोडं तरी कंट्रोल केलं असणार. कारण भयंकर गर्दी होती. याला अक्षरशः दरवाज्यात उभा करून मूतवावं लागलं. काहीजण आदल्या रात्री बसलेले दुसऱ्या दिवशी दुपार झाली तरी टॉयलेट नाही. मोदीजी म्हणाले 2022 ला बुलेट ट्रेन येईल. त्या मुलाचं कुटुंब पाहून वाटत नव्हतं कि त्याच्याकडे तितके पैसे असले तरी तो बुलेट ट्रेन ने प्रवास करेल. देशात अजूनही फक्त स्वस्तात पडत म्हणून general class/ स्लीपर क्लास नेच प्रवास करणारे लोकं खूप आहेत. जास्तकरून मजूर. बुलेट ट्रेन आली तर नाहीच पण उगाच जनतेला मोठमोठ्या थापा मारून गेल्या नऊ वर्षात मूलभूत सुविधा सुद्धा देणं झालं नाही मोदी सरकार ला. लोकांना या गोष्टी कळत नाहीत का ? अजून किती दिवस मोदीजींच्या थापांना भुलणार आहेत लोक. वंदे भारतचा एव्हडा गाजावाजा करतय सरकार त्यांची सच्चई तुम्हाला सांगतो मित्रानो. मी महिन्यातून एकदा तरी पुणे-कुर्डूवाडी प्रवास करतो इंटरसिटी ने. आमच्या मार्गावर वंदे भारत सुरु झाली आहे. सर्वसामान्यांना अजिबात परवडत नाही. त्यापेक्षा अजून एक इंटरसिटी सुरु केली असती तर परवडलं असतं. गोरगरिबांना लुटून मोठ्यांची घरं भरणे हाच अमृतकाळ आहे मित्रांनो.

Samadhan Kate

69,719 views • 3 years ago

वरळीतलं प्रकरण हिट अँड रन नाही तर हत्याच... वरळीत नवरा बायको प्रवास करत असताना मागून एक बीएमडब्ल्यु कार बाईकला धडक देते.. नवरा बायको गाडीच्या बोनेटवर पडतात. नवरा लगेच स्वतःला बाजुला होतो आणि बायकोलाही आपल्याकडे खेचणार तेवढ्यात बीएमडब्ल्यु वाला निर्दयीपण अपघातानंतरही जिवंत असलेल्या महिलेच्या अंगावरुन गाडी नेतो. महिलेची साडी गाडीच्या टायरमध्ये अडकते. या महिलेचा नवरा आरोपीला रडवेल्या चेहऱ्याने थांब थांब म्हणतो तरी आरोपी गाडी पुढे नेत २ ते अडीच किलोमीटरपर्यंत त्या महिलेला रस्त्यावरुन फरफटत नेतो. गाडी पुढे नेत असताना गाडीसोबत फरफटत जाणाऱ्या महिलेला किती वेदना होत असतील याचा विचार सुद्धा आरोपी मिहीर शहाच्या डोक्यात येत नाही. इतक्या क्रुरपण तो गाडी पुढे नेत राहतो. आपल्या अब्रुची सर्वाधिक पर्वा करणाऱ्या या पत्नीच्या, दोन मुलांच्या आईचा जीव जातो आणि बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेल्यामुळे अंगावरचा कपडा सुद्धा शिल्लक राहत नाही. पण सगळे कपडे निघुन गेल्यावर सुद्धा आरोपी फरफट सुरुच ठेवतो. आणि हे सगळं हतबलपणे तिचा नवरा बघतो त्याची बायको मरेपर्यंत.. पुण्यातल्या पोर्शे अपघाताप्रमाणेच मुंबई अपघातातला आरोपी मिहीर शहा सुद्धा या अपघातापुर्वी बारमध्ये गेला होता. जवळपास १८ हजारांचं बिल दिल्यानंतर तो निघाला. गाडी बदलली. आणि त्यानंतर कावेरी नाखवांचा जीव घेऊन एक कुटुंब उध्वस्त केलं. आरोपी थांबला असता तर ही महिला आपल्या कुटुंबासोबत आज सुखरूप असती. पण मिहिरने फरफटत नेऊन तिचा जीव घेतला. मग हा अपघात कसा? ही तर हत्या झाली. पण मुंबई पोलिसाना तपासाबद्दल विचारल्यावर या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे का नाहीयेत. ? १. या अपघातातला पीडित आणि ज्याने डोळ्यासमोर आपली बायको गमावली तो माणूस स्वतः सांगतोय की मिहीर शाहाच गाडी चालवत होता तरी पोलिस यावर काही का बोलत नाहीयेत. २. पोलिसांनी त्यावेळी गाड़ीत उपस्थित असलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. पण ड्रायव्हरने गाडी कोण चालवत होतं याबाबत काय जबाब दिला याबद्दल पोलिस का सांगत नाहीयेत. ? 3. पुणे पॉर्शे प्रकरणासारखं इथे सुद्धा प्रकरणत ड्रायव्हरवर ढकलण्याचा प्रयत्न होतोय का? 4. बारमधून आरोपी मिहीर शाह बाहेर पडताना, आणि ड्रायव्हर ड्रायव्हींग सीटवर बसनाचंच फुटेज पोलिसांनी कसं बाहेर येऊ दिलं. ते आरोपीच्या सोयीसाठी का? 5. ज्या भागात अपघात झाला तिथलं सीसीटीव्ही फुटेज जर बाहेर आलं तर त्यात स्पष्टपणे कळेल की गाडी कोण चालवत होतं. म्हणून हे फुटेज बाहेर येऊ दिलं जात नाहीये का ? 6. अपघातानंतर कावेरी नाखवांना आरोपीच्या गाडीने फरफटत नेलं, त्यामुळे मृत महिलेच्या अंगावर एक कपडा सुद्धा राहीला नाही. पण पोलिस फरफटत नेण्यासंदर्भात कुठलीही ठोस माहीती देत नाहीये. ७. गाडीने फरफटत नेतानाच्या मार्गावर अनेक सीसीटीव्ही आहेत. मग पोलिसांना याची शहानिशा करण्यासाठी ईतका वेळ का लागतोय? 8. पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली, गाडी मिळाली. मग आरोपी मिहीर शहा नेमका कसा फरार झाला.? 9. यावेळी जर गाडी ड्रायव्हर चालवत होता तर ड्रायव्हर फरार झाला असता. पण इथे नेमकं उलटं होतंय. ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि मिहीर गाडी चालवतच नसेल तर तो का फरार झाला. या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडे नाहीयेत कारण मरणारी व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी सामान्य होती. आरोपीच्या गाडीपेक्षाही कमी किंमत तुमच्या आमच्या जगण्याची जिवाची आहे. आता बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, पॉर्शे अश्या महागड्या कार विकतानाच मालकांना एक खुन माफ करावा तसं एक दोघांना चिरडलं तरी खून माफ करावे. किंवा लोकांचे जीव घेण्याचं परमिट द्याव. - Saurabh Koratkar

Saurabh Koratkar

61,104 views • 2 years ago

आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला.हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे.हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे, प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे.बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे,मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे ? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता करता त्याच पैश्यातून #वोटचोरी करून आमदार ही झाले….अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ? #मिंधे #भ्रष्ट #आमदार #खाजदार #KDयमC #डोंबिवलीकर

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

16,605 views • 10 months ago

इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो 🔥 ~ मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. ज्याला शिव्या दिल्या, कपटी कारस्थानी म्हंटलं, अनाजी पंत म्हंटलं, जातीवरून, शरीरावरून हिणवलं त्याच बामनानी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मराठ्यांना समजून घेतलं.. इतके मराठा मुख्यमंत्री झालेत महाराष्ट्राच्या इतिहासात पण एकानेही नोंद घेतली नाही. शिंदेंनी दिलं कारण फडणवीस होते त्यांच्या पाठीशी. अभ्यास त्यांचा होता आणि पाहिलं दिलेलं आरक्षणही त्यांचंच होतं. सही मात्र शिंदे साहेबांची होती त्यावेळी मुख्यमंत्री असल्या कारणाने. इतकी षडयंत्र रचली गेली पण फडणवीस मात्र खचले नाहीत. आतल्यांनी रचलेल्या कटाचं दुःख आहे पण हेच तर खरं राजकारण आहे. इतकं घाण बोलल्यानंतरही एकदा सुद्धा Devendra Fadnavis यांनी आपला संयम सोडला नाही. शांतपणे सगळं सहन केलं.. यानंतरही घाण बोलले तर देव आहे आणि तुम्ही आहात. उत्तर तर देवाला द्यायचंय. आता तरी त्यांच्या आई, बायको आणि मुलीला घाण बोलू नका 🙏 श्रेयाची लढाई कालही नव्हती आजही नाही आणि पुढे कधी असणारही नाही.. कुठल्याही समाजाकरता केलेलं कार्य म्हणजे उपकार नसतात ती जवाबदारी असते. पण जेंव्हा समाजाला केलेल्या कार्याचा विसर पडतो तेंव्हा त्याची आवर्जून आठवण करून द्यावी लागते. मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे मनापासून अभिनंदन.. त्यांनी विषय लावून धरला कसाही का असेना.. राज्यात कुणाचं कल्याण होतंय हे महत्वाचं 🚩 शिका, मोठे व्हा 🚩 Sharad Pawar Office of Uddhav Thackeray Prithviraj Chavan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rohit Pawar Supriya Sule

Sunaina Holey

26,790 views • 11 months ago

हैदराबाद निजाम सरकारने तत्कालीन मुंबई प्रांतिक सरकारला नोव्हेंबर 1956 मध्येच सर्व रेकॉर्ड ऑफिशिअली दिल्याच्या नोंदी आहेत. काखेत कळसा आणि गावाला वळसा ! पाच निवृत्त न्यायाधीशांची कमिटी पाठवली तरी हैदराबादमध्ये काय मिळणार ? इथे रेकॉर्ड पोचल्याच्या दोन्ही सरकारने नोटिफिकेशन सुद्धा काढल्या होत्या. मग गरीब शेतकऱ्यांचे रेकॉर्ड गेले कुठे ? आज रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर त्या परिस्थितीला किती मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री जबाबदार ? विश्वास पाटील . याबाबतीतले माझे नम्र निवेदन माझ्या यूट्यूब चैनल वर या संकेतस्थळावर आपण मुद्दाम ऐका. तत्कालीन हैदराबादच्या चीफ सेक्रेटरीनी आपल्या अखत्यारीतील सर्व District Collectors ना निजामाच्या हद्दीतील मराठवाड्याचे रेकॉर्ड तात्काळ मुंबई सरकारकडे व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे सर्क्युलर ऑक्टोबर 1956 मध्ये काढले होते. त्यानुसार एक नोव्हेंबर 1956 च्या दरम्यानच सर्व रिव्ह्यून्यू, ट्रेझरी, पोलीस आणि त्यानंतर काही महिन्यात न्यायालयीन रेकॉर्ड मुंबई सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते. तशी नोटिफिकेशन्स हैदराबाद आणि मुंबई सरकार या दोघांनीही काढली होती. तर ते रेकॉर्ड गेले कुठे ? गेली दोन वर्ष आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. भारत सरकारच्या स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 च्या सेक्शन 76 तसेच 77 व इतर संबंधित कलमानुसार नवीन राज्य किंवा त्याची पुनर्रचना झाली झाल्यावर तात्काळ संबंधित रेकॉर्ड ज्या त्या सरकारकडे देण्याचे आदेश पारित झाले होते. त्यानुसार किती तारखेपर्यंत कुठले रेकॉर्ड हस्तांतर झालेच पाहिजे अशा “डेडलाईन” सुद्धा ठरवणारे आदेश काढले गेले होते. त्यानुसार महसूल व जमाबंदी दप्तर हे डिसेंबर 1956, ट्रेझरी लेजर्स 31 डिसेंबर 1956 आणि हैदराबादच्या सचिवालयातील संबंधित सर्व सेक्रेटरीएट फाईल ह्या फेब्रुवारी 1957 पर्यंत द्यावयाच्या डेडलाईन्स ठरवून गेल्या दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार संबंधित हस्तांतरण त्यावेळीच्या उत्तम प्रशासकीय यंत्रणेने विनाविलंब पार पाडले होते. मग मग ते दिलेले सर्व रेकॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी कोणाची ? कायद्याच्या भाषेत हू इज कस्टस्टोडीयन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स ? 18 91 मध्ये “इम्पेरियल रेकॉर्डस कीपर” नावाची पोस्ट निर्माण झाली होती. आता भारत सरकारने 1993 मध्ये पब्लिक रेकॉर्डस Act निर्माण केला आहे. कायद्यानुसार महसुली रेकॉर्डसाठी डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि त्या विभागाचे जे प्रमुख असतात ते कस्टोडियन ऑफ गव्हर्मेंट रेकॉर्ड असतात. त्यानुसार एक नोव्हेंबर 1956 च्या दरम्यान औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बिदर लातूर, नळदुर्ग ह्या सीमेवरील जिल्ह्यांचे हस्तांतरण तीन राज्यांमध्ये विधिवतरीत्या पार पाडले गेले आहे. जेव्हा एखादे नवीन राज्य किंवा देश निर्माण होतो. तेव्हा सैन्य किंवा सुरक्षा घुसवण्याच्या आधीही त्या प्रांतातले जमिनींचे नकाशे आणि मालकी हक्कपत्रक ही सर्व रेकॉर्ड्स महत्वाची असतात. हा बाळबोध नियम आमच्या प्रशासकांना माहित नाही का ? तसेच मौर्य काळापासून संबंधित कास्तकार किंवा शेतकरी याच्या मालकीचे कोणते क्षेत्र आहे अशा कागदपत्रांच्या दुय्यम सत्यप्रती राजाने आपल्या दप्तरांमध्ये सांभाळून ठेवायच्या असतात. तशीच कागदपत्रे ब्रिटिश आणि निजामाच्या किंवा तेव्हाच्या मुंबई राज्यांमध्ये सुद्धा सांभाळली गेली होती. समजा गाव पातळीवरचे तलाठ्याचे दप्तर हरवले, शेतकऱ्याकडचे जरी हरवले तरी राजाकडे म्हणजे सरकारकडे त्याच्या दुहेरी प्रती ठेवणे बंधनकारक असते. त्यानुसार व्हिलेज रेकॉर्डच्या नोंदी, त्यामध्ये काही जिल्हा पत्रके तसेच मुख्य तहशील पत्रके ही सांभाळली जात. त्यानुसार निजाम सरकारने तत्कालीन मुंबई सरकारला प्रत्येक जिल्ह्यातील कोणती पत्रके हस्तांतरित केली होती ? 1 खसरा पत्रक __ज्यामध्ये त्या तालुक्यातील प्रत्येक सर्वे नंबर, खातेदाराचे नाव, फसल अशी पूर्ण माहिती असायची 2 खतौनि पत्रक. ज्याची आजच्या सात बाऱ्याशी तुलना करता येईल. हू इज ओनर अँड हू इस कल्टीवेटर ? 3. जमाबंदी तथा सालाना पत्रक. ज्यामध्ये लगान , मागणी आणि बकाया म्हणजे राहिलेली बाकी याच्या नोंदी असतात. 4. लाल किताब. दिल्लीच्या मुघल प्रशासनापासून ते हैदराबादच्या निजामापर्यंत सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. ते तांबड्या वेस्टर्नमध्ये बांधले जायचे. एक प्रकारे हे गाव पातळीवरचे गॅझेट होते. त्याच्यामध्ये गाव, गावातील माणसे, तळी, पाण्याची साधने, वसूल, जहागिरीचे क्षेत्र सर्व काही असायचे. हे दरवर्षी तलाठ्याकडून प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाऊन त्याचे अवलोकन होऊन पुन्हा गावात परत यायचे. प्रत्येक गावात हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. 5 शजरा ( खेतो का नक्शा) प्रत्येक शेतकऱ्याच्या शेती क्षेत्राचा सरकारमार्फत नकाशा काढला असायचा. त्यासाठी नक्शाणवीस नावाचे खास अधिकारी नेमलेले असायचे. हे पत्रक सुद्धा प्रत्येक गावात होते. 6 माल वसुली रजिस्टर, डिमांड अँड कलेक्शन 7 तहसील दप्तरी रजिस्टर 8 इक्रारनामा आणि सनद रजिस्टर. ज्यामध्ये गावातील इनामे जहागीर तसेच व पुढच्या वफ जमिनीच्या नोंदी असत. अशी सर्व रजिस्टर्स ही जा त्या िल्हाधिकार्‍याकडे निजाम सरकारने सुपूर्त केली होती. ती सुपूर्त करताना स्पष्टपणे “हँड ओव्हर लिस्ट” म्हणजे हस्तांतरणाची यादी सुद्धा तयार केली गेली होती. हे सर्व रजिस्टर्स आज तालुका दप्तर मध्ये किंवा डिस्टिक कलेक्टर दप्तरमध्ये मिळत नसतील तर त्याबाबत गरीब शेतकऱ्यांचा काय दोष ? लोकांकडे जे डॉक्युमेंट्स असतील ते तपासण्यासाठी जर कायदेशीररित्या पर्यायी दप्तर जे पर्मनंट रेकॉर्ड म्हणून कस्टोस्डियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्डने मेंटेन करायला हवे, ते नसेल तर त्यात लोकांचा काय दोष. ? मी चांद्यापासून ते बांधापर्यंतच्या सर्व ब्रिटिश गॅजेटीयारअसचा अभ्यास गेली दोन वर्ष करतो आहे. दिल्लीचे पार्लमेंट लायब्ररी रेकॉर्ड, जनगणना कार्यालय, हैदराबादचे तीन नाक्यावरचे कार्यालय व इतर कार्यालय सारी धुंडाळून झाली आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मराठा हे कुणबी होते असे ब्रिटिशांची गॅझेट सुद्धा सांगत नाहीत. मात्र शेती करणारा बहुतांशी 85% मराठा वर्ग हा कुणबी होता हे या रेकॉर्डवरून आढळून येते. तशा अनेक ठिकाणी नोंदी आहेत. निजामाच्या पिरेड मध्ये सुद्धा कोर्टात, हायकोर्टात केसेस जाऊन तसे डिसिजनही झालेले आहेत. आता तत्कालीन जिल्ह्यांचा वानगी दाखल विचार करायचा तर तेव्हाचा रत्नागिरी जिल्हा व सावंतवाडी संस्थान यांची 1881 ची जनगणना लक्षात घेता एकूण संख्या 9 लाख 41 हजार 49 होती. पैकी दोन लाख तीन हजार चारशे सहा हे मराठा होते. तर दोन लाख 84 हजार 267 हे कुणबी होते. जिल्ह्यात धनगर अठरा हजार पाचशे पाच, ब्राह्मण 66 हजार ०४६ महार समाज 85 हजार 513 तर भटक्यांची संख्या 6553 होती. ठाणे आणि मुंबई मध्ये कुणब्यांची संख्या अधिक आहे. तर सोलापूर मध्ये मराठा एक लाख ऐंशी हजार आणि मराठा कुणबी एक लाख 78 हजार 938, माळी 23898 वंजारी 3508 धनगर 57 04 ब्राह्मण 26979 महार समाज 44001 तर मातंग 1923 अशी संख्या आहे. साधारणता माझ्या माहितीप्रमाणे 1985/ 86 पर्यंत महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही सर्व रेकॉर्ड्स उपलब्ध होती. त्याचे महत्व न जाणता रेकॉर्डरुम कोणाच्या आदेशाने आणि कुणी खाली केल्या ? हे अविवेकी आदेश कोणी दिले. गेल्या पंचवीस तीस वर्षात ज्यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून कामे केली त्यांना त्याची उत्तरे द्यावे लागतील. तरच मग महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य वगैरे मैदानातली भाषा शोभून दिसेल. सद्यस्थितीत आता जे रेकॉर्ड आहे त्यातून संबंधित शेतकरी वर्गाला कसा फायदा देता येईल, याचाही विचार व्हावा. माझ्या आजोबांचे आणि पंजोबांच्या नावे मोडीमध्ये कुणबी नावाची नोंद आहे. पण मला इथल्या जटील प्रशासकीय व्यवस्थेने तेव्हा तो दाखला मिळू दिला नाही. आज खानदानाच्या नावाने जे मोठ्या मोठ्या थापा मारतात त्यांचेही रेकॉर्ड माझ्याकडे आहे. संपूर्ण मराठा समाज जरी कुणबी ठरत नसला तरी ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याकडे तरी संशयाने पाहू नका. ब्रिटिशांनी दिलेल्या वर्गवारीनुसार साधारण प्रत्येक तालुक्यात कुठल्या समाजाचे किती लोक होते याची आकडेवारी आहे. त्या सरासरीचा विचार करून लोकांना काही फायदे देता येतील. जे ब्रिटिश रिकॉर्ड पहिले प्लॅनिंग कमिशन आणि शेड्युल्ड कास्ट कमिशन वगैरे रचताना आधारभूत ठरवले गेले होते. ते रेकॉर्ड पूर्णता या प्रश्नावर नाकारण्यात काय अर्थ आहे ? या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हावा आणि उनापावसामध्ये, शेतामध्ये राबणाऱ्या लोकांना न्याय मिळावा आणि तो सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळावं. आपली लोकशाही, प्रत्येक राजकीय पक्षाची लोकशाही ही आज “स्वकुटुंबकल्याणशाही” झालेली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळेच सार्वजनिक हिताच्या गोष्टींकडे सर्वांनीच ध्यान द्यायला हवे. नेत्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अविवेकामुळे लोकांचे हाल होऊ नयेत असेच मला वाटते. विश्वास पाटील #vishwaspatil #author #HistoricalTruth #MissingRecords #FarmersRights #LandOwnership #RevenueRecords #HyderabadNizam #hyderabad #StateReorganization1956 #PublicRecords #CustodianOfRecords #Maratha #AccountabilityInGovernance #LostDocuments

Vishwas patil

16,535 views • 1 year ago

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार श्री. राजू पाटील यांच्या प्रचारार्थ मी आज शुभारंभाची सभा घेतली. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे- १) आज आमचे आमदार श्री. राजू पाटील यांच्या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. आज व्यासपीठावर आमचे उल्हास भोईर, भगवान भालेराव आणि संगीताताई चेंदवणकर उपस्थित आहेत. संगीताताईनी बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यामुळे ती भयानक घटना महाराष्ट्राच्या समोर आली, आख्ख प्रशासन हललं. त्यांनी जे काम केलं त्याची शाबासकी म्हणून त्यांना मी विधानसभेची उमेदवारी दिली. २) मी तुमच्याकडून हमी घ्यायला आलोय की जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही विजयी कराल. हे सगळं कशासाठी तर महाराष्ट्राची आज जी अवस्था आहे ती बदलण्यासाठी. २०१९ ला युतीत कोण होतं, आघडीत कोण होतं आता युतीत कोण आहे आघाडीत कोण आहे काहीच कळत नाहीये. गेल्या ५ वर्षात जे घडलं त्याची मतदारांनी उजळणी केली पाहिजे. कोणी कुठेही गेलं, पण आमचा राजू विधानसभेत एकटा होता, आणि मला राजुचा अभिमान आहे की माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. ३) २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजप यांच्यासमोर कोण तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मग निकाल लागले, मग सकाळी एक शपथविधी झाला, ते लग्न १५ मिनिटांत तुटलं, कारण काकांनी डोळे वटारले मग हे आले घरी काका मला माफ करा म्हणत. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोरबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. कारण काय तर अमित शाह यांनी मला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. तुमच्यासमोर जर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मग तेंव्हाच का नाही आक्षेप घेतलात ? २०१९ चा निकाल लागेपर्यंत गप्प बसले आणि जेंव्हा लक्षात आलं की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही तेंव्हा यांनी अडीच वर्षांचा मुद्दा बाहेर काढला. ४) उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यावर त्यांनी सन्माननीय बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट करणं बंद केलं. होर्डिंगवर पण हिंदुहृदय सम्राट असा उल्लेख करणं बंद केलं. काही ठिकाणी होर्डिंगवर तर उर्दूत त्यांनी चक्क जनाब बाळासाहेब ठाकरे पण लिहिलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतके खाली गेलात तुम्ही ? ५) मग हे गेले काँग्रेसबरोबर, यांची अडीच वर्ष संपली आणि यांना यांचे चाळीस कुठे गेले हे कळलंच नाही. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. त्यांच्याकडे गुप्तचर विभाग रोज काय चाललं आहे हे सांगत असतात तरी मुख्यमंत्र्यांना कळलं नाही. या चाळीस जणांना घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणि त्यातल्या त्यात अजित पवारांबरोबर बसताना आमचा श्वास कोंडतो. मग पुढे अचानक अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून बाहेर पडले आणि इथे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. काय राजकारण सुरु आहे ? महाराष्ट्रात इतके ज्वलंत प्रश्न सुरु असताना हे सगळे हवं तसं वागतात कारण तुम्ही चिडत नाही, शांत लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असतात. महाराष्ट्रातील जनता आम्ही कसेही वागलो तरी आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची खात्री आहे त्यांना. ६) पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता काही वाटत नाही या लोकांना. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तरीही तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला... ७) फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती सन्माननीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही ? माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीये. महाराष्ट्राची किती वैचारिक घसरण झाली आहे ? देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा ? ८) आत्ता मी एक क्लिप पाहिली... मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावरती एक बाई भोजपुरी गाण्यावर लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून नाचत आहे... ही लाडकी बहीण योजना ? व्यासपीठावर बायका आणून नाचवणं हे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये व्हायचं, हे आपल्याकडे कधीपासून सुरु झालं ? ९) महाराष्ट्रातले प्रश्न प्रलंबित असताना आपल्याकडे चेष्टा सुरु आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रासाठी जागा रहा. आपल्याकडे त्या ओळी आहेत ना महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले।अनेकांचा डोळा आहे हे राज्य मारण्यासाठी. महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी सुरु आहेत त्या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत. मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून माझ्या हाती सत्ता द्या. १०) राजू पाटील यांनी कोव्हीड काळात खूप काम केलं. तुमच्या सगळ्यांसाठी झगडणारा राजू आहे, त्याला भरघोस मतांनी निवडून द्या. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

51,754 views • 1 year ago

वणी विधानसभेचे उमेदवार श्री. राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ आज वणी येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सगळे पक्ष त्या त्या मतदारसंघात कोणत्या जातीच प्राबल्य आहे हे बघून उमेदवाऱ्या देत आहेत. मला जातीतलं काही समजत नाही. आजारी झाल्यावर डॉक्टरची जात पाहून जाता का ? का तो आजार बरा करू शकेल का हे बघता ? मग आमदार निवडून देताना जात बघून का देता ? म्हणून म्हणतो राजू उंबरकरसारखे चांगले उमेदवार निवडून द्या जो तुमच्यासाठी झटेल. २) विदर्भ, मराठवाड्यातले आमदार निवडून इथून येतात आणि त्यांची मुलंबाळं, कुटुंब मुंबई पुण्याकडे असतात. आपला प्रदेश तसाच भकास ठेवायचा आणि यांनी स्वतः ऐषआरामात रहायचं. इथले आमदार म्हणाले की मी परत निवडून आलो तर माझी हॅट्रिक होईल. तुझ्या हॅट्रीकने काय फरक पडतो. ३) यवतमाळ जिल्ह्याची ओळख कापूस म्हणजेच पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून नाही ओळखला जात तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय;. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा कुटुंबाचं पुढे काय होतं याचं कोणाला काही पडलं नाहीये. निवडणुका येतात तेच खासदार, आमदार निवडून येतात, मात्र परिस्थिती जैसे थे. ४) यवतमाळ जिल्हा पुरेसा सिंचनाखाली का नाही? एकदा तरी आमदारांना/खासदारांना प्रश्न विचारा की तुम्ही नक्की काय केलंत आमच्यासाठी ? ५) सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणी ठरवतात आणि तुम्ही इतक्या महत्वाच्या राजकारणाकडे दुर्लक्ष कस करू शकता? तुमच्या आयुष्यातील ५, ५ वर्ष निघून जातात. आपल्यासमोर आपली मुलं मोठी होतात, आपण म्हणतो की अरे बघता बघता मोठा झाला. तसंच तुमचं पण वय वाढत जातं. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, हाच जन्म खरा आणि या जन्मात तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणली जाते. काय चाललंय ? ६) २०१९ ला तुम्ही ज्यांना मत दिलं ते नक्की कुठे आहे याचा विचार केलात का ? दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष ज्यांच्यातून विस्तव जात नसे ते पक्ष एकत्र आले आणि सत्तेत बसले. लोकांनी मतदान शिवसेना-भाजपला, काँग्रेस-राष्ट्रवादीला केल आणि इकडचा गट तिकडे गेला, तिकडचा गट इकडे आला. वाट्टेल तशा युत्या, आघाड्या झाल्या. आणि यांत काय घडलं तर बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली. वैचारिक व्यभिचार किती करायचा? अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले, पुढे वर्षभरात अजित पवारच शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले. यातून तुमच्या मताची लायकी काय आहे ते कळलं का ? ७) महाराष्ट्र जातीपातीत विभागला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत ? स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि इतकं असताना पण हे राजकीय पक्ष येतील, तोंडावर पैसे फेकून मारतील, आणि त्यांना खात्री आहे की तुम्हाला कसंही वागवलं तरी तुम्ही त्यांना परत निवडून देणार . हा त्या लोकांचा समज तुम्ही मोडून काढणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही. ८) रेल्वे भरती महाराष्ट्रात पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्रात यायच्या नाहीत, शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झटका दिला आणि महाराष्ट्रात जाहिराती यायला लागल्या. ९) मशिदींवरचे भोंगे आम्ही बंद केले, सरकारने जर थोडं सहकार्य केलं असतं तर कायमचे भोंगे बंद केले असते. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं म्हणून माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला खुश करायला उद्धव ठाकरेंनी केसेस टाकल्या. १०) जी कामं सरकारने करायची ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहेत. त्यामुळे एकदा माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता एकदा देऊन तर बघा. ११) गेली ५ वर्ष जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुमचा अपमान केला आहे. येणारी निवडणूक हा तुमच्या अपमानाचा बदला घेण्याची निवडणूक आहे. मी तुम्हाला हमी देतो की राजू उंबरकर हा वणीत राहील, इथल्या लोकांच्यासोबत कायम राहील. माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

34,724 views • 1 year ago

प्रश्न हा मान्य करायचाच नाही, मग त्याचे उत्तर द्यावा लागत नाही. असच सध्या Devendra Fadnavis साहेब यांच आहे. पेपरफुटी मान्यच करायची नाही मग तपास कसला करायचा ना. ते म्हणताय पेपरफुटी झालीच नाही मग आम्हाला सांगा मुंबई पोलीस भरतीचा फुटलेला पेपर आमच्याकडे कसा. पेपर सुरू असतानाच पेपर बाहेर गेला आणि हजारो मुलांना त्याची उत्तरे मिळाली. तपासात सापडली फक्त 100, 150 बाकी बोगस मुले जॉईन झाली. फडणवीस साहेब यांच्या गृह विभागाचा मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला होताच तसेच त्यांच्या mahagenco विभागाचा सुद्धा पेपर फुटला होता तरी हे मान्य करत नाही म्हंटल्यावर अजून काय बोलावे. असले गृहमंत्री असल्यावर पेपर तर मग फुटणारच ना. फडणवीस साहेब तुम्हाला वाटते ना पेपर फुटले नाही मग मला सांगा लातूर मधील गुरू ऑनलाईन सेंटर हे तलाठी भरती नंतर रद्द का केले गेले. पूर्ण सेंटरच मॅनेज केले गेले होते. मग यांना पेपर फोडायची गरजच काय. पेपर घेणारेच घोटाळे करत आहेत. Tcs चे कित्येक कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हीच का तुमची पारदर्शकता. एका एका बोगस सेंटर वरून किती बोगस विद्यार्थी लावले हे लातूरच्या गुरू ऑनलाईन सेंटर वरून समजते. तिथे 100 प्लस बोगस तलाठी निवडले गेले. सेंटर वर काम करणारी सेंटर मालकाच्या गावची जवळपास 10 एक मूल तसेच त्याची सख्खी बहीण, तसेच कित्येक नातेवाईक त्या गुरू ऑनलाईन सेंटर वरून लावली गेली तरी तुम्ही म्हणताय परीक्षा पारदर्शक झाली. लाज वाटते आम्हाला असले गृहमंत्री भेटले आहेत महाराष्ट्राला. तुम्हाला काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आहेत ते करा कारण तुम्ही ज्यांनी पेपर फोडले त्यांचावर गुन्हे दाखल करू शकत नाहीत कमीत कमी आमच्यावर तर करा. CMO Maharashtra Nana Patole Vijay Wadettiwar Rohit Pawar Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Abhimanyu Pawar @News18lokmat LoksattaLive nikhil wagle @Dhananjay_AAP Devesh Gondane SakalMedia Radhakrishna Vikhe Patil महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

11,117 views • 2 years ago

हडपसर विधानसभेचे उमेदवार श्री. साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे आज जाहीर सभा घेतली, त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) २००९ ला हडपसर मतदारसंघ तयार झाला. इथली गावं महापालिकेत आली. आज कित्येक लोकं म्हणतात की आमची गावं होती ती बरी होती, विनाकारण महापालिकेत आलो. या संपूर्ण भागाचा विचका ट्रॅफिकने झाला आहे. आज महाराष्ट्रात मी असे अनेक भाग बघतो, त्याची अवस्था अशी आहे की मरण येत नाही म्हणून जिवंत आहोत. रोजच्या जगण्यातील स्वस्थता गेली आहे, लहान मुलांना बाहेर पाठवताना माता-भगिनींना धाकधूक होते. आणि या मूळ प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये म्हणून तुम्हाला नको त्या प्रश्नांमध्ये गुंतवलं जातं. २) महाराष्ट्राच्या राजकारणाचा जातींनी झालेला विचका मोठा आहे. जातीपातीत तुम्ही गुंतून पडावं आणि तुमचं मतदान काढून घ्यायचं असं सुरु आहे. ३) मराठवाड्यातील दुर्दैवी घटना सांगतो. एका गावातील घरात निधन झालं, घरात तीन माणसं, मृत व्यक्तीला खांदा द्यायला माणूस नव्हता, नातेवाईक यायला सहा तास लागले, म्हणून अंत्यसंस्कार थांबले. दुसऱ्या जातीची माणसं बहुसंख्य माणसं शांतपणे बघत राहिली पण कोणी पुढे आलं नाही. याहून दुर्दवी घटना काय असू शकते ? हे सगळं विष पेरलं गेलं ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर. ४) आज महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की महापुरुषांना आपण जातीत विभागलं आहे. महाराष्ट्रात जातीबद्दलचं प्रेम होतं, पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष कधीच नव्हता. आपल्याकडे आत्ता काय पसरतंय याचा विचार केलाय का ? इथल्या मोहल्ल्यांमध्ये सिमी, आयसिसचे अतिरेकी सापडलेत. बरं जे सापडले ते सापडले पण जे नाही सापडले ते काय करतील ? ५) शहरांचा सत्यानाश झाला आहे, इथे रोजगार मिळत नाहीयेत, इथे महिला सुरक्षित नाहीयेत, लोकांना घरं परवडत नाहीयेत, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत आणि तरीही या सगळ्याची चिंता करायची सोडून सत्ताधारी आणि विरोधक तुम्हाला जातीत गुंतवतात... ६) इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अहवलेंना केली गेली, त्यावेळेला फक्त आमचा साईनाथ रस्त्यावर उतरला होता. त्यावेळेला आमदार आणि इतर पक्षांचे नेते कुठे होते ? अशा माणसांच्या हातात सत्ता देणार का तुमच्यासाठी धावून येणारा साईनाथ सत्तेत हवा ? विचार करा साईनाथ आमदार झाले तर तुमच्यासाठी रात्रीअपरात्री धावून येतील. ७) तुम्ही कुठल्याही पुण्यातील असो की मुंबईतील किंवा ठाण्यातील किंवा अगदी कुठल्याही शहरातील जुन्या माणसाला विचारून बघा की तुम्हाला तुमचं जुनं शहर हवं का नवं तर लोकं उत्तर देतात जुनं शहर. पण दुबईत विचारून बघा तिथल्या लोकांना, कुठलं शहर आवडतं तर म्हणतील आत्ताची दुबई आवडते, का तर तिथल्या माणसांची गरज लक्षात ठेवून दुबई घडवली आहे. ८) ५ वर्षात मी तुम्हाला सगळं बदलून दाखवेन असं सांगणार नाही, पण या ५ वर्षात असं काम करून दाखवेन की ज्याने तुम्हाला पुढची ५ वर्ष आम्हाला सत्तेत परत आणावं असं वाटेल, इतकं सुंदर आणि मनापासून काम करून दाखवेन, ९) महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज्यातील नाहीतर देशातील एकमेव पक्ष आहे ज्याने राज्याचा विकास आराखडा मांडला. मला खुर्चीचा सोस नाही. मी शिवछ्त्रपतींच्या राज्यात जन्माला आलो आहे, त्या राज्याचं गतवैभव मला परत आणायचं आहे. १०) आज माझी मुलाखत घ्यायला येणारे पत्रकार मला फक्त यांनी असं म्हणलं त्यांनी तसं म्हणलं यावरच प्रश्न विचारतात. पण कोणी महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विसरू नका हे महाराष्ट्र राजय आहे, कोणतं लेचापेचं राज्य नाही. या राज्याला इतिहासाला भूगोल पण आहे आणि इतिहास पण आहे. अशा राज्याच्या विकासाबद्दल तळमळीने बोलणाऱ्या माझ्या पक्षाला, माझ्या उमेदवारांना निवडून द्या. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, यासाठी मला तुमची साथ हवी आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या राज्यात तमाशा करणाऱ्यांना एकदा धडा शिकवा, आणि तुम्ही जर धडा नाही शिकवलात तर या सगळ्यांची खात्री पटेल की तुम्ही काहीही केलंत तरी सगळं चालून जातं. ११) मला आणि माझ्या उमेदवारांना एकदा संधी देऊन बघा. माझा साईनाथ तर आहेच पण जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्या प्रत्येकाला मतदान करा. मी सगळ्या मतदारसंघात पोहचूच शकत नाही, त्यामुळे मी इथून प्रत्येकाला आवाहन करतो की माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

56,039 views • 1 year ago

काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे. आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !

Raj Thackeray

41,986 views • 5 months ago

बेलापूर विधानसभेचे उमेदवार श्री. गजानन काळे आणि ऐरोली मतदारसंघाचे उमेदवार श्री. निलेश बाणखेले यांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) या भागाला नवी मुंबई म्हणतात कारण त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा विचार व्यापक होता. मुंबई आणि त्याला लागून नवी मुंबई उभी करावी हा विचार वसंतराव नाईकांच्या डोक्यात आला. कारण त्यांच्या लक्षात आलं की १९५० ते १९७० या २० वर्षात मुंबईची लोकसंख्या दुपटीने वाढली. आणि आता यापुढे मुंबई माणसं घेऊ शकणार नाही म्हणून नवी मुंबईला आकार देण्यात आला. पुढे मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स उभं राहिलं. हे सगळं उभं करताना शहर कसं उभं करायचं याचा विचार केला गेलाच नाही. ब्रिटिशांनी मुंबई उभी करताना खूप विचार केला. आपल्याकडे शहराचा विकास आराखडा बनवला जातो पण इथे शहर नियोजन आराखडा बनवला जात नाही. २) ब्रिटिशांनी मुंबई उभारताना अनेक मैदानं उभी केली. पण त्यानंतर जी शहरं उभी राहिली त्यात कुठे मैदानं दिसत नाहीत. आज नवी मुंबईत खाजगी क्रीडासंकुल आहे पण सरकारी क्रीडासंकुल का नाही ? नवी मुंबईत फक्त एक नाट्यगृह का आहे ? हेच मुंबईत बघा तर किती नाट्यगृहं आहेत. नवी मुंबईत शिवाजी पार्कसारखं किंवा आझाद मैदानासारखं मैदान आहे? नाहीये... ३) ब्रिटिशांनी अनेक हॉस्पिटल्स एकत्र करणारा एक भाग बनवला. थोडक्यात लोकसंख्येला काय काय लागेल याचा केवढा विचार ब्रिटिशांनी केला ? पण नवी मुंबईत समजा एखाद्या कुटुंबाला कुठे जायचं असेल तर कुठे जायचं ? मॉलमध्ये ? थोडक्यात काय शहराच्या कुठल्याच गरजांचा विचार केला जात नाही. ४) गेली ६०-७० वर्ष निवडणुका होत आहे, पण तेच प्रश्न, तीच आश्वासनं हेच सुरु आहे आणि जगणं तसंच सुरु आहे. याला काय अर्थ आहे ? आपल्याकडे प्रगती म्हणजे विविध उपकरणं येणं, गाड्या येणं इतकं नसतं. मला विकासाचा विचार इतका तोकड्या पद्धतीने करता येत नाही. महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता. बरं तो जाहीरनामा होता, तर प्रत्येक प्रश्नावरच उत्तर आम्ही त्यात दिलं. ५) आज नवी मुंबईत एकाच घरातील २,२ जणं वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत, दिवसभर वेगवेगळ्या पक्षातून फिरतात रात्री घरी पुन्हा एकत्र येतात. काय चाललं आहे नवी मुंबईत ? ६) नाशिकमध्ये ५ वर्ष आमची सत्ता होती, त्या ५ वर्षाच्या काळात आम्ही मुकणे धरणांतून थेट पाईपलाईन टाकून नाशिकमध्ये पाणी आणलं, आणि नाशिक शहराचा ५० वर्षांचा प्रश्न सोडवला. असा विचार इतर कोणी करतं का हो तुमच्यासाठी ? ७) रतन टाटा गेल्यावर संपूर्ण भारत हळहळला. एक सज्जन आणि सरळ उद्योगपती गेला म्हणून लोकं दुखी झाले. का दुःखी झाले ? कारण लोकांना सरळ, सज्जन माणसं आवडतात जर सरळ, सज्जन माणसं लोकांना आवडतात, तर मग लोकांना सरळ विचार करणारे राजकारणी का नाही आवडत ? तिथेच नेमकी वेडावाकडा विचार करणारी आणि कृती करणारी माणसं का निवडता तुम्ही ? ८) महाराष्ट्रात दुकानांवर मराठी मध्ये पाट्या लागत नव्हत्या, मी साधंसोपं पत्र लिहिलं आणि त्यात त्यांना लिहिलं की तुम्ही ठरवाव की दुकानाची पाटी महाग आहे का दुकान महाग आहे ? आणि पुढे त्या पत्रात लिहीलं की जर तुम्ही पाट्या नाही केलात तर माझे महाराष्ट् सैनिक तुम्हाला भेटीला येतील. आणि पाट्या झाल्या. आम्ही सत्तेत नसताना कामं करून दाखवत असू तर सत्तेत आल्यावर किती कामं करू याचा विचार करा. ९) माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रातील माझ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

42,727 views • 1 year ago