Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

तिळगुळ बनवण्याचा माझा पहिला प्रयत्न! 😀 #MakarSankranti

1,235,717 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля R A T N I S H
R A T N I S H3 лет назад

Kuch samjh nahi aaya but sun kar achha laga

Фото профиля Aditya Pittie 🇮🇳
Aditya Pittie 🇮🇳3 лет назад

तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….💐

Фото профиля Ashu
Ashu3 лет назад

Master Blaster for a reason. 😁

Фото профиля Mojila Dahi Bhalla
Mojila Dahi Bhalla3 лет назад

Make Dahi Bhalla ❤️😋

Фото профиля Mandar Bhide & 10 others
Mandar Bhide & 10 others3 лет назад

Pahila tilgul devala. Aamchya gharat sarvaat aadhi tumchya poster samor thevto aamhi :)

Фото профиля Raashii Rai
Raashii Rai3 лет назад

Sir jo likhe samaj nahi aya but Happy Makar Sankranti to you & your family ❤️🧿

Фото профиля Sagar
Sagar3 лет назад

@SlayerofWights Tilgul ghya "God" "God" bola

Фото профиля PK Rohera
PK Rohera3 лет назад

I couldn't understand Marathi langauage what you made in kitchen but surely would like to taste. Love You Sachin 💐

Фото профиля Rajan Singh Thind
Rajan Singh Thind3 лет назад

Happy Makar Sakranti Sachin sir, love from Punjab. Sir my first fascination, love towards cricket was just because of you. Still adore the opening partnerships of you & @SGanguly99 Still fresh in mind your amazing 186* vs NZ in Hyderabad Red Ball Odi n 1999.

Фото профиля Devavrat Bhatkhande देवव्रत भातखंडे
Devavrat Bhatkhande देवव्रत भातखंडे3 лет назад

Utmost Dedication आणि Involvement ने केलेली कृती कशी फलदायी होते ह्यासाठी तुमचं उदाहरण हा आम्हा सगळ्यांपुढे एक वस्तुपाठ आहे सचिन सर😌🙏🏻 तिळगूळही तसेच केले असतील ह्यात शंका नाही😊 तुम्हालाही ☀️मकरसंक्रांतीच्या☀️ हार्दिक शुभेच्छा🙏🏻 तिळगूळ घ्या, गोड बोला #मकरसंक्रांति

Похожие видео

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्ष काही विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी सातत्याने राजकारण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा स्वतःचे राजकीय करिअर घडविण्याची धडपड अधिक दिसून येते. मात्र आजचा विद्यार्थी अत्यंत जागरूक आहे. कोण मनापासून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आले आहे आणि कोण केवळ प्रसिद्धीसाठी धडपड करते, हे त्यांना चांगलेच कळते. महाविकास आघाडीच्या काळात MPSC परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले, अनेक निर्णयांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. महायुती सरकारने ती घडी पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अचानक लागू करण्यात आलेल्या Descriptive Pattern ला देखील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. माझी कार्यपद्धती पहिल्यापासून स्पष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकार परिषद, सोशल मीडियावरील दिखाऊ भूमिका, केवळ tweet करणे किंवा आंदोलनांना खतपाणी घालण्यापेक्षा मुख्यमंत्री, MPSC अध्यक्ष, सचिव आणि संबंधित विभागांशी प्रत्यक्ष पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यावर माझा विश्वास आहे. काही जणांना प्रत्येक प्रश्नात कॅमेरे, ट्वीट आणि आंदोलन दिसते पण मला मात्र त्या प्रश्नामागे विद्यार्थ्यांचे भविष्य दिसते. म्हणूनच मी आजपर्यंत या विषयाचे राजकारण केले नाही आणि पुढेही करणार नाही. विद्यार्थी अनेकदा पुण्यात येण्याचा आग्रह करतात. पण केवळ फोटो, व्हिडिओ किंवा टाळ्यांसाठी विद्यार्थ्यांमध्ये जाणे माझ्या स्वभावात नाही. प्रश्न सुटणे महत्त्वाचे की प्रसिद्धी मिळणे, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा विषय आहे. काहींना महाराष्ट्राच्या तरुणाईचा स्वयंघोषित मसीहा बनण्याची घाई आहे. त्यांना त्यांच्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा. माझा मार्ग मात्र एकच राहील; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर थेट पाठपुरावा. #mpsc

Abhimanyu Pawar

20,380 просмотров • 19 дней назад

बातमी आहे एबीपी माझामुळे आपल परदेशात शिक्षण घेण्याच स्वप्न पूर्ण करणाऱ्या आदिवासी टॅक्सी ड्रायव्हर तरुणीची. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यापासून जवळपास ७० किलोमीटर दूर असलेल्या रेगुंठा गावात टॅक्सी ड्राईव्हर म्हणून काम करणाऱ्या किरण कुर्मावार हीची दोन वर्षापूर्वी एबीपी माझाने बातमी दाखवली होती. किरण दररोज अनेक आव्हानांचा सामना करत रेगुंठा ते सिरोंचा या आदिवासीं भागात टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढत होती. आशा ही परिस्थितीत आपलं परदेशात शिकण्याच स्वप्न पूर्ण व्हाव यासाठी किरण प्रयत्न करत होती. अनेक प्रयत्न केल्यानंतर किरणला लंडन येथील लीड्स युनिव्हर्सिटीत एमएससी इन मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळाला मात्र जायच कस हा प्रश्न उभा राहिला. एबीपी माझाने किरणची उच्च शिक्षण घेण्याची धडपड दाखवली आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विशेष अधिकारातून ४० लाख रुपयांची रक्कम किरणसाठी उपलब्ध करून दिली. या शिष्यवृत्ती मुळे किरणने आपलं उच्च शिक्षण घेण्याच स्वप्न पूर्ण केलं. नुकतीच तिचा पदवीप्रधान समारंभ लीड्स युनिव्हर्सिटी लंडन येथे पार पडला. यासाठी प्रामुख्याने मदत झाली ती एबीपी माझा संपूर्ण टीम, आमदार सचिन अहिर, पत्रकार राजेश कोचरेकर, प्रा. सुषमा अंधारे, वैशाली जाधव, विशाल ठाकरे, प्रवीण निकम तुम्हा सर्वांचे मनपुर्वक आभार. Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Sachin Ahir SushmaTai Andhare University of Leeds

Nilesh Budhawale

21,440 просмотров • 1 год назад

यंदाच्या फुटबॉलच्या महाकुंभात अर्थात ‘फिफा वर्ल्ड कप- २०२६’मध्ये आमचा मित्र व ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण याच्या रूपात मराठी पत्रकारितेचा सन्मान झालाय... मेक्सिको, कॅनडा व अमेरिका या तीन देशांमध्ये पार पडणाऱ्या फिफा विश्वचषकाचे तिथूनच एकमेव अधिकृत मराठी भाषिक क्रीडा समीक्षक म्हणून संदीप चव्हाण कव्हरेज करतोय.. थेट मेक्सिकोहून संदीपने हा ब्लॅाग लिहिलाय… त्यात तो लिहितोय, फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून हे शब्द मी लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; हा फुटबॉलच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी अजूनही या शहराच्या हवेत तरंगताना जाणवतात. आज, त्याच मेक्सिको सिटीत, त्या इतिहासाच्या सावलीत उभा राहून, दै. मुंबई तरुण भारतचा क्रीडा प्रतिनिधी म्हणून अधिकृत मान्यता घेऊन विश्वचषकाच्या प्रेस बॉक्समधून वार्तांकन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. हा केवळ माझा वैयक्तिक प्रवास नाही; हा मराठी पत्रकारितेच्या स्वप्नांचा, जिद्दीचा आणि अस्मितेचा प्रवास आहे. जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. अब्जावधी चाहत्यांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, अशा या महाकुंभासाठी अधिकृत मान्यता मिळवणे हे कोणत्याही माध्यमासाठी अभिमानाचे असते. पण यावेळी अभिमानाची गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच दै. मुंबई तरुण भारतला विश्वचषकाचे अधिकृत अ‍ॅक्रिडिटेशन मिळाले आहे. आणि त्या इतिहासाचा पहिला साक्षीदार, पहिला प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे. हा क्षण केवळ एका पत्रकाराचा नाही. हा प्रत्येक मराठी वाचकाचा आहे. हा त्या मातृभाषेचा आहे, जिच्या शब्दांमध्ये आपण जग पाहतो, स्वप्ने रंगवतो आणि भावना व्यक्त करतो. अनेक दशकांपासून इंग्रजी आणि इतर भाषांच्या माध्यमांनी गाजवलेल्या या जागतिक व्यासपीठावर आज मराठीचा आवाजही तितक्याच अभिमानाने घुमत आहे. मेक्सिको सिटीच्या रंगीबेरंगी रस्त्यांवर, स्टेडियममधील गगनभेदी जल्लोषात, चाहत्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये आणि विजयानंतरच्या आनंदोत्सवात मला जगभरातील भावनांचा महासागर दिसतो आहे. पुढील महिनाभर संपूर्ण जग हसू आणि आसू यांच्या हिंदोळ्यावर झुलणार आहे. कुणाचे स्वप्न साकार होईल, कुणाचे तुटेल; कुणी इतिहास घडवेल, तर कुणी इतिहासाचा भाग बनेल. त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक थराराचा, प्रत्येक भावनेचा साक्षीदार म्हणून मी येथे आहे. आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या माझ्या मराठी वाचकांपर्यंत त्या प्रत्येक क्षणाची धडधड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, या फुटबॉलच्या महाकुंभात आपण सर्वजण सहभागी होऊया. मेक्सिकोच्या या ऐतिहासिक भूमीवरून, मराठी मनांपर्यंत पोहोचणाऱ्या या प्रवासाचे सहप्रवासी होऊया. कारण हा केवळ विश्वचषक नाही; हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. [email protected]

ashish jadhao

11,702 просмотров • 1 месяц назад

रक्षकच भक्षक झाले, खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना अभय नाही... चाळीसगाव शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्को च्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्याकडुन १ लाख २० हजार रुपये खंडणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन च्या काही कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती मला मिळाली. तात्काळ संबंधित तक्रारदार यांच्यासह शहर पोलीस स्टेशन गाठून ४ तास ठिय्या दिला असता खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सदर पोलीस कर्मचारी याच्या घरून त्याने खंडणी घेतलेले १ लाख २० हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले. ज्या पोलिसांनी नागरिकांना अपप्रवृत्ती पासून संरक्षण दिले पाहिजे तेच कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही. या प्रकरणाच्या बाबतीत मी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची IPS दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मी माझ्या आमदारकीच्या पहिल्या दिवसांपासून अश्या प्रवृत्तीच्या विरोधात असून मग तो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा जवळचा असो त्याला योग्य ते शासन व्हावे व पीडित नागरिकांना न्याय मिळावा असा माझा प्रयत्न राहत आला आहे. माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की, शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैश्यांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अश्या नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देतो. - आमदार मंगेश रमेश चव्हाण #Chalisgaon

Mangesh Chavan

48,081 просмотров • 1 год назад

राज्यातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा : #तलाठी_भरती_घोटाळा #तलाठी_भरती_घोटाळ्यात अख्खे परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात आले होते. त्याबद्दलची ऑडिओ-व्हिडीओ-फोन रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तलाठीचे एक पद २०-२५ लाखात विकण्यात आल्याचे पुराव्यातून स्पष्ट झालं आहे. तलाठी भरतीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पोलीस तक्रार दाखल केली होती. आमच्या तक्रारी नंतरच #धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी FIR दाखल केली आहे. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी महसुलच्या अपर मुख्य सचिवांना पाठविलेला गोपनीय अहवाल अनेक महिन्यांपासून आमच्याकडे आहे. तो अहवाल कधीतरी पब्लिक होईलच पण त्यासोबतच इतर सर्व #पुरावे पब्लिक करण्याबद्दल सुध्दा विचार करण्यात येईल. राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी तलाठी भरती दिलेली आहे. तलाठी भरती घोटाळा इतका मोठा आहे की तो #विधानसभा निवडणुकीसाठी एक मुख्य मुद्दा ठरू शकतो, आणि आम्ही त्याला मुख्य मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू. परंतु राज्याचे #गृह_खाते अत्यंत कर्तव्यदक्ष व्यक्तीच्या हाती आहे. तलाठी भरती घोटाळ्याचा तपास धाराशिव पोलीस करत नाहीयेत किंवा अत्यंत संथ गतीने तपास सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण घोटाळा दाबला गेला असून अनेक भ्रष्टाचाऱ्यांची निवड झाली आहे. #दिल्ली मध्ये बसलेल्या व्यक्तीला रियल टाइम रिमोट ॲक्सेस देऊन भ्रष्ट उमेदवारांचे पेपर सोडविण्यात आले आहेत. यात कोणत्या परीक्षा केंद्राचे मालक सामील आहेत आणि #TCS मधील कोण व्यक्ती सामील आहेत याची नावानिशी माहिती आमच्याकडे आहे. अनेक परीक्षा केंद्र मॅनेज झाल्याचे आमच्या तपासात समोर आलं आहे. परंतु आमच्यातील काही फितूर झाले असतील किंवा सरकारने आमच्यावर जी गुन्हे दाखल केले किंवा काही व्यक्तींनी विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे याप्रकरणी आम्हाला पूर्ण पाठपुरावा आजवर करता आलेला नाही याची आम्ही आज दिलगिरी व्यक्त करतो. निवड झालेल्या उमेदवारांबद्दल आम्हाला कोणताही आकस नाही,पण ते फक्त स्वतःचे बघत आहेत. पण आम्ही तलाठी भरती घोटाळा कधीतरी पूर्ण बाहेर काढूच मग त्यासाठी येत्या विधानसभेत सत्तांतर गरजेचे असेल तर त्यासाठी सुध्दा आम्ही जोमाने प्रयत्न करू. #महसूल_विभाग किंवा पोलीस विभाग यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे स्पष्ट झालं आहे, त्यामुळे फडणवीस सरकार कडून तपासाची कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही. महसूल मंत्री #विखे_पाटील घोटाळा झाला असल्यास संन्यास घेऊ म्हणताय, विखे साहेब नगरच्या जनतेने याआधीच आपल्या पोराला राजकीय बेरोजगार केलं आहे येत्या विधानसभेत आपला पण सुपडा साफ होईल. तलाठी भरतीत घोटाळा झाला आहे, असेल हिम्मत तर करा आमच्यासोबत बैठक,सर्व पुरावे समोर मांडल्या नंतर निर्णय घ्या अन्यथा महसूल मंत्री पदावरून राजीनामा देऊन मोकळे व्हा. राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना तलाठी घोटाळ्याचे फक्त राजकारण करायचे नसेल Rohit Pawar Balasaheb Thorat तर त्यांनी मैदानात यावं, आपण #पंधरा दिवसानंतर जनतेच्या दरबारात आंदोलनाला बसू. वेळ आणि ठिकाण आपण सांगाल तिथं आम्ही येऊ. कुणी साथ दिली नाही तरी, योग्य वेळी तलाठी भरती घोटाळ्याचे वादळ आल्याशिवाय राहणार नाही. #सत्यमेव_जयते !! Radhakrishna Vikhe Patil Devendra Fadnavis Revenue Department, Government of Maharashtra Sujata Saunik CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Aaditya Thackeray Vijay Wadettiwar Shivaani Wadettiwar 🇮🇳 Abhimanyu Pawar Niranjan Davkhare Kunal Raut Supriya Sule Kailas Patil Raju Shetti Ravikant Tupkar Prakash Ambedkar Raj Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nana Patole ABP माझा SaamTV News ZEE २४ तास Girish Kuber BBC News Marathi ashish jadhao nikhil wagle Prashant Kadam Satej (Bunty) D. Patil Satyajeet Tambe Maharashtra Youth Congress Maharashtra Congress भाजपा महाराष्ट्र Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Dipali Jagtap Dr Sujay Vikhe Patil Jayant Patil- जयंत पाटील

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

36,070 просмотров • 1 год назад

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,702 просмотров • 1 год назад

हिंदू धर्म नष्ट करणारे नष्ट होतील, हिंदू धर्म कधीच नष्ट होणार नाही ! युवा स्वाभिमान पक्षातर्फे व खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेल्या, बडनेरा (अमरावती), भाजपा युवा मोर्चा (मध्य आणि पश्चिम नागपूर), सदभावना सांस्कृतिक क्रीडा मंडळ (गरोबा मैदान, नागपूर), आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल (नंदनवन, नागपूर) भव्य दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके आणि मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. अमरावती येथे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राजपाल यादव आणि हजारो भक्तांसह हनुमान चालिसाचे पठण केले व प्रतिकात्मक पद्धतीने अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली. मागील 9 वर्षांत केंद्रातील मोदी सरकार व राज्यात महायुती सरकारने अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. आज अमरावती जिल्ह्याला क्रीडा विद्यापीठ, मराठी भाषा विद्यापीठ, मेडीकल कॉलेज, एअरपोर्ट, टेक्सटाइल पार्क दिले आहे. या टेक्सटाइल पार्कमुळे अमरावती जिल्ह्यातील 3 लाख युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यामध्ये रस्ते बांधणीसाठी ₹ 2000 कोटीचा निधी देण्यात आला आहे. या सरकारने अमरावती येथील छत्री तलाव, ऋणमोचन, संत गाडगेबाबा महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींना हनुमान चालीसाचे पठण केल्याने तुरुंगात पाठविण्यात आले होते. मविआ सरकारच्या मुख्य राज्यकर्त्याला माझा थेट प्रश्न आहे की, जर हनुमान चालीसा भारतात म्हणणार नाही तर काय पाकिस्तानात म्हणणार का? आणि तो दिवस देखील दूर नाही जेव्हा आम्ही पाकिस्तानातही हनुमान चालीसाचे पठण करु. मुंबईत उद्धव ठाकरे ज्यांच्यासोबत बसले होते, त्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा ज्युनियर स्टॅलिन हिंदू धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करत हिंदू धर्म संपवण्याची भाषा करत आहे. अरे नादान स्टॅलिन, हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या परकीय आक्रमकांचा नायनाट झाला. हिंदू धर्माबद्दल वाईट बोलणार्‍या लोकांना त्यांची जागा दाखवणे फार महत्वाचे आहे. भगवान श्रीकृष्णाने भेदभावमुक्त समाजाचा संदेश दिला. हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सद्भावना सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृष्ण जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! Chandrashekhar Bawankule Pravin Datke Navnit Ravi Rana MLA Ravi Rana Dr. Anil Bonde SHILPA SHETTY KUNDRA Rajpal Naurang Yadav #DahiHandi #Gokulashtami #Amravati #Celebration #JaiShreeKrishna #dahihandi2023 #ShreeKrishnaJanmotsav #Gopalkala #दहीहंडी #DahiHandiFestival #GovindaReGopala #Maharashtra

Devendra Fadnavis

41,177 просмотров • 2 лет назад

साक्षात वाघिणींशी कुस्ती खेळणाऱ्या मुली आणि वाघिणीचं बाळंतपण पार पाडणारी सातारची बहाद्दर माणसं! अमीर खानच्या “दंगल” सिनेमाच्या आधीही 100 वर्षांपूर्वी भारतीय मातीतील बहाद्दर मुलींनी उडवलेली ‘अपूर्व दंगल’! — विश्वास पाटील “साहेब, बाळंतपणाच्या बाजल्यावर तडफडणाऱ्या लेकीची काळजी घेताना जसा तिच्या आईच्या पोटात गोळा उठतो, अगदी तसंच बघा लेकुरवाळ्या होणाऱ्या वाघिणींना जीव लावत आम्ही बाळ-बाळंतिणीचा जीव वाचवत होतो बघा,” असा विलक्षण थरारक जीवनानुभव घेणारी माणसं जेव्हा भेटतात, तेव्हा माझ्या “द ग्रेट कांचना सर्कस” सारख्या कलाकृतीचं आपोआप मोल वाढतं. म्हणूनच ह्या सह्याद्रीच्या बहाद्दर स्त्री-पुरुषांचा साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजांच्या हस्ते मी सत्कार करायचा मुद्दाम घाट घातला होता. तो सुंदर सोहळा अनेकांच्या मनावर ठसून गेला आहे. गेल्या शतकाच्या सुरुवातीला खडकलाटच्या गुलाब शिंदे या नावाच्या शेतकऱ्याची मुलगी तारा शिंदे ही चक्क वाघाशी कुस्ती खेळायची. शाहू महाराजांनी तिला हत्ती आणि घोडी देऊन तिचा सत्कार केला होता. तेव्हा तिची सर्कस सिंगापूर, जपान, जर्मनीपर्यंत खेळून आली होती. याशिवाय लाहोरची रेवा रखी, जी ए. सर्कस ऑफ बॉम्बेमध्ये काम करणारी जमेला, तासगावच्या जगप्रसिद्ध परशुराम लायन सर्कसमध्ये वाघिणीच्या जबड्यात डोकं देणारी छबुताई, कागवाडच्या ग्रेट कर्नाटक सर्कसमध्ये वाघिणींशी खेळणारी बिबा या साऱ्या सर्कसबालांनी इतिहास निर्माण केला आहे. नुकताच मी चाळीसगावला जाऊन सुमन या श्रेष्ठ सर्कसबालेला भेटून आलो. सुमनजींनी आपल्या आयुष्याची साठ वर्षं सर्कशीला वाहिली होती. मनुष्यप्राणी आणि जंगलातले प्राणी यांच्या गहिऱ्या नात्याचा वेध मी माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “ग्रेट कांचना सर्कस” या कादंबरीमध्ये घेतलेला आहे. भारतीय साहित्यात या आधी असा प्रयत्न “जंगल बुक” मध्ये झाला होता, पण “जंगल बुक”मधले प्राणी हे कल्पित होते. माझ्या सुदैवाने लेखक या नात्याने मला ही आगीशी आणि जीवनातील भयानक संकटांशी, जीवघेण्या खेळात रमलेली माणसं प्रत्यक्ष भेटली. गेली अनेक वर्षं ती भेटत होती. त्यांचं ते मुलखावेगळं आयुष्य मी माझ्या “कांचना”मध्ये मांडलेलं आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावं. श्रेष्ठ भारतीय कादंबरीकार मृदुला गर्ग यांनी “कांचना” ही भारतीय साहित्यातील अपूर्व कलाकृती असल्याचं या आधीच लिहिलं आहे. मराठीत येण्यापूर्वी “ग्रेट कांचना सर्कस” दिल्लीच्या वाणी प्रकाशनमार्फत दहा महिन्यांपूर्वीच प्रकाशित झाली होती. वाचकांनी तिचा जरूर लाभ घ्यावा. आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबद्दल नुकताच साताऱ्यात माझा जो सत्कार झाला, त्या परिसरातील 80 ते 90 च्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्व बहाद्दर सर्कसवीरांना मी माझ्यासोबतच सत्कारासाठी बोलावलं होतं. वाचकांना “ग्रेट कांचना सर्कस” ही मॅजेस्टिकच्या साइटवर तसेच अक्षरधारा बूक गॅलरीच्या सांकेतिक स्थळावर उपलब्ध आहे. ती वाचून मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. Akshardhara Vani Prakashan #Vishwaspatil #akshardharabookgallery #vaniprakashan #GreatKanchanaCircus #LegendaryPerformers #BraveWomen #CircusHistory #IndianCircus #FearlessGirls #TaraShinde #SumanCircus #SatyaraHeroes #MustReadBook #CircusLegends

Vishwas patil

13,974 просмотров • 9 месяцев назад

आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती. तेंव्हा श्री. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती. माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार. मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत... • भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा. • या भाषेत प्राचीन साहित्य हवं. • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. •'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. २०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी श्री. रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो... तर, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील... •मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल. •भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल. •प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल. •महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील. •मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल. * प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल. * अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल. या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता. जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे. पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन... राज ठाकरे ।

Raj Thackeray

147,751 просмотров • 1 год назад