Loading video...

Video Failed to Load

Go Home

दादा, आता विसावा घ्या… आपल्या स्मृतीतून आपला सहवास सदैव जाणवत राहील! #AjitPawar

92,264 views • 7 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

नेहमी पाठीशी राहीन म्हणालात... आणि एका क्षणात आम्हाला पोरके करून गेलात दादा..! आपण ज्येष्ठ आहात म्हणून मी कधीच आपल्यावर रुसले नाही... पण आज मी आपल्यावर रुसले दादा...! ही जाण्याची वेळ नव्हती.. सदैव महाराष्ट्राच्या पाठीशी आपण आधार बनून उभे राहिलात, हा आधार यापुढे महाराष्ट्राच्या पाठीशी नसणार, आपल्या नावापुढे "स्वर्गीय" शब्द लिहावा लागणार हा विचारच अंगावर काटा आणणारा, वेदनादायक आहे. आपण आम्हाला सोडून गेलात ही बाब अजूनही महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही. आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आपल्या आठवणींनी अश्रू वाहत आहेत. आपण महाराष्ट्राला जे प्रेम दिलं ते प्रत्येकाच्या डोळ्यात आज दिसतंय. आपलं केवळ असणं हे माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणारं होतं. कठोर शासक, कार्यतत्पर प्रशासक, झुंजार नेतृत्व हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सबंध महाराष्ट्राने अनुभवले. पण, आपल्या या कठोर व्यक्तिमत्वाचा हळवा कोपरा अनुभवण्याचं भाग्य मला लाभलं. अगदी पोटच्या मुलीप्रमाणे आपण मला भरभरुन प्रेम दिलं. आपण आमच्यातून गेलात हे मानण्यास मी तयार नाही, आपल्या उत्तुंग कार्यातून, असंख्य आठवणींतून आपण आमच्या मनात चिरायू आहात ! #दादा #AjitPawar 💔💔

Aditi S Tatkare

19,526 views • 7 months ago

दादा अखेरचा दंडवत..! ज्या हातांनी हजारो निवेदने स्वीकारली, ज्या आवाजाने अन्यायाविरुद्ध आणि जनतेच्या हक्कासाठी साद घातली, तो आवाज आज शांत झाला. दादा, तुमची दररोजची सकाळ लोकांच्या समस्या सोडवण्यापासून सुरू व्हायची आणि शेवटचा श्वासही जनसेवेच्या त्या अर्जांच्या गराड्यातच असावा, हे तुमच्या महान कार्याचे प्रतीक आहे. ​तिरंग्यात लपेटलेलं तुमचं शरीर बघताना आजही वाटतंय की, तुम्ही अचानक डोळे उघडाल आणि म्हणाल, "अरे बाबाहो, काळजी नका करू, मी हाय अजून!" ​तुमची शिस्त, तुमचा रोखठोकपणा आणि तो प्रेमळ 'दिलदार' स्वभाव आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. ज्या देहाने शेवटच्या क्षणापर्यंत जनतेची गाऱ्हाणी ऐकली, निवेदने स्वीकारली आणि सामान्यांचे अश्रू पुसले, तो देह आज शांतपणे विसावलेला पाहून मन प्रचंड दुःखी झाले. रस्त्यावरचा सामान्य कष्टकरी असो, शेतकरी असो वा छोटा कार्यकर्ता, प्रत्येकाला वाटतंय की माझ्या पाठीवरचा मायेचा हात निघून गेला. दादा, तुमची ती शिस्त, तो रोखठोकपणा आणि तुमच्या शब्दाशब्दातून ओसंडून वाहणारं प्रेम आम्हाला सदैव आठवणीत राहील. अखेरचा दंडवत दादा..! साश्रू नयनांनी तुम्हाला निरोप देताना मनी हीच भावना आहे "पुन्हा असा दादा माणूस होणे नाही.." #AjitPawar

Dr.Amol Kolhe

17,512 views • 7 months ago

स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच स्मारक..! 🚩 हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे नेणारे, धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करणारे, तेजस्वी पराक्रमी योद्धा, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय असे अतिभव्य स्मारक पिंपरी-चिंचवडच्या माझ्या भूमीत उभारण्याचं स्वप्नं आज सत्यात उतरताना पाहतोय..! ही शंभूसृष्टी सदैव समाजाला प्रेरणा देत राहील, आणि प्रत्येक पिढीला आठवण करून देईल की, तुम्हा आम्हा सर्वांसाठी, आपल्या धर्मासाठी धर्मवीरांनी आपल्या रक्ताने ही भूमी पावन केली.. माझ्या सामाजिक व राजकीय वाटचालीत ही शंभूसृष्टी एक सुवर्णपान ठरेल, याचा मला विशेष अभिमान आहे. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभूराजे.. 🚩 #StatueOfHindubhushan #DharmaveerChhatrapatiSambhajiMaharaj #ShambhuSrushti #HindaviSwarajya #MarathaEmpire #CulturalHeritage #HistoricalMonument #PimpriChinchwad #PrideOfMaharashtra #LegacyOfBravery #IconOfInspiration #NationFirst #HistoryAndHeritage #IndianCivilization #MarathaGlory #StatueOfHonor #WarriorKing #IndianPride

Mahesh Landge

60,981 views • 1 year ago

अजित दादांच्या अंत्यसंस्काराला आलेली लोक ही बघ्यांची गर्दी नव्हती.ती आपल्या घरातला जबाबदार पुरुष गमावल्यावर जशी माणसं जमतात, तशी जमलेली माणसं होती. लोक तिथे चेहरा पाहायला आले नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या एका आधाराला निरोप द्यायला आले होते. कारण अजित दादा फक्त नेता नव्हते. गावगाड्यातला एक ओळखीचा चेहरा होते. अडचणीत नाव घ्यावं असं एक नाव होते. संकटात आपला माणूस म्हणून आठवणारा एक पत्ता होते. एखाद्या घरात कर्ता पुरुष जातो, तेव्हा रडणं कमी असतं, गोंधळ कमी असतो, पण माणसं जास्त असतात.कारण सगळ्यांना कळलेलं असतं.इथं माणूस नाही, एक आधार गेला आहे. अजित दादांच्या बाबतीत तेच झालं. लोक आपल्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून निघाले.ते औपचारिकतेसाठी नाही, तर आपल्या गावगाड्यातलं काहीतरी तुटलंय ही जाणीव त्यांना तिथपर्यंत घेऊन गेली. त्या रांगेत उभा असलेला प्रत्येक माणूस एकच गोष्ट बोलत होता.आपल्या मधला कुणीतरी गेला आहे. ती गर्दी गावगाड्याच्या एका आधारस्तंभासाठी होती.

Pratik S Patil

75,568 views • 7 months ago

आज 'शिवजयंती'च्या निमित्ताने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवजन्मोत्सवात मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सहभागी झाले. यावेळी महाराजांच्या कार्याला व विचारांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले. तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी नतमस्तक झाले. महाराजांची दूरदृष्टी, शिस्तबद्ध प्रशासन आणि लोककल्याणाचा ध्यास हे सारे काही आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, धैर्य आणि जनसेवेचा मंत्र आपल्या कार्यातून अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी केला. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत लोकाभिमुख आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जाऊ या, हीच ठाम बांधिलकी सदैव असेल. #शिवजयंती Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Sunetra Ajit Pawar

16,406 views • 6 months ago

20 नोव्हेंबर साजरा केल्या जाणार्‍या लोकशाहीच्या सर्वोच्च महोत्सवाचा शंखनाद तर आधीच झाला आहे. आता फक्त 1 महिन्याचा अवधी शिल्लक आहे. माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात देशात आणि महायुती सरकारच्या काळात राज्यात झालेली विकासकामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आपल्या विकासाची वचनबद्धता स्पष्ट करा. मतदारांशी संवाद साधा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करा. चला एकत्र येऊ, काम करू! Narendra Modi भाजपा महाराष्ट्र #Maharashtra #MaharashtraElection2024

Devendra Fadnavis

232,310 views • 1 year ago

ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काय केले ?? ह्या आहेत शिवसेनेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका स्नेहल शिवकर. या अत्यंत सामान्य घरातील गृहिणी आहेत आणि नगरसेविकेचे पती रिक्षाचालक आहेत. यांच्यासमोर बलदंड उमेदवार उभा असताना देखील, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी विश्वास ठेवत त्यांना तिकीट दिले व त्या नगरसेविका झाल्या. शिवसेना पक्षाने सदैव सामान्य घरातील मराठी लोकांना मोठे करायचे काम केले. आता देखील जे मोठे नेते झाले आहेत त्यांचा पूर्वीचा इतिहास बघा. ठाकरे म्हणजे मराठी माणूस आणि मराठी माणूस म्हणजे ठाकरे. आपला ठाकरे ब्रँड! Credit: ABP माझा

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

18,488 views • 7 months ago

स्व. अजितदादांना 'अजितसृष्टी' च्या माध्यमातून श्रद्धांजली..! महाराष्ट्राचे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये असलेले योगदान अविस्मरणीय आहे.. त्यांच्या स्मरणार्थ भव्य 'अजितसृष्टी' साकारण्याच्या संकल्पनेचे सर्वपक्षीय मान्यवरांनी स्वागत केले.. या स्मारकाच्या माध्यमातून स्व. अजितदादांच्या आठवणींचे जतन होईल.. येणाऱ्या पिढ्यांना स्व. अजितदादा पवार यांच्या उत्तुंग कार्याची आणि योगदानाची प्रचिती होईल.. शिवाय त्यांची विकासदृष्टी आणि लोककल्याणाची भावना सदैव आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.. ही समस्त पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने लोकनेते अजितदादांना श्रद्धांजली ठरेल..! #AjitSrushti #AjitDadaPawar #TributeToLeader #VisionaryLeader #PeopleLeader #PimpriChinchwad #PCMC #MaharashtraPolitics #LegacyOfLeadership #DevelopmentVision #PublicWelfare #InspirationalLeader #ForeverInHearts

Mahesh Landge

62,549 views • 7 months ago

"इतिहासाचा खून – तोही आपल्या डोळ्यांदेखत!" तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर — हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास. पहिली रचना – अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात. त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे येऊन तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आणि रयतेच्या राज्याची पायाभरणी केली. अहिल्याबाई होळकरांनी मंदिर परिसरात विहीर बांधली, जी आजही अस्तित्वात आहे. पण आता… "विकास" या नावाखाली हाच वारसा पाडून टाकण्याचा प्रयोग सुरू आहे! इतिहास मोडून टाकून मंदिर नवं होईल, पण त्या दगडात कोरलेल्या आठवणींचं काय होणार? 📌 विकास म्हणजे वारसा संपवणं नाही! 📌 छत्रपतींच्या पाऊलखुणा पुसणं हे प्रगती नव्हे – ती संस्कृतीवरची तोडफोड आहे! 📌 आपल्या मुलांना इतिहास दाखवायचा की फक्त त्याचा फोटो? उद्या कदाचित सांगावं लागेल – "इथे कधी काळी तुळजाभवानीचं जुना मंदिर होतं… मग कुणीतरी त्याला ‘अपग्रेड’ केलं!" --- आता आवाज उठवा! ही फक्त वास्तू नाही – हा आपला इतिहास, आपली ओळख, आपली अस्मिता आहे. मंदिर वाचवण्यासाठी, हा पोस्ट शेअर करा. #SaveTuljabhavaniTemple हा हॅशटॅग वापरून तुमचा आवाज पोहोचवा. #तुळजाभवानी #तुळजापूर #इतिहासाचेसंवर्धन #Heritage #SaveTuljabhavaniTemple #MarathaHistory #CultureUnderThreat #StopHeritageDestruction ---

Dr.Jitendra Awhad

60,037 views • 1 year ago

“भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा. पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का … मी कायम तुमच्या बरोबर आहे .. आपला गळा दाबत आहे तुकाराम जेल मध्येच बसले असते ह्यानी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुश्य भर जेल मध्ये बसवले असते विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे

Dr.Jitendra Awhad

146,198 views • 3 years ago

सुनेत्रा पवार शपथविधीसाठी मुंबईत पोहोचणं.. शरद पवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेणं., शपथविधीबाबात आपल्याला कल्पना नाही असं सांगणं.. विलिनीकरणसाठी दादा तयार होते, त्या बैठकीचा व्हिडिओ आताच बाहेर येणं..! शरद पवारांच्या नेत्यांकडून विलिनीकरणांची तारीखही सांगणं... दादांच्या नेत्यांकडून मात्र विलिनीकरणाच्या विषयावर बोलणं टाळणं...! हे पाहून तरी नक्कीच वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची दादांना इच्छा होती पण त्यांना कितीही इच्छा असली तरीही अनेकांना हे होऊ नये असंच वाटत असावं..! दादांची राष्ट्रवादी काकांनी टेकओव्हर करण्याआधीच शपथविधी उरकणे... आणि दादांचा काकांसोबतचा व्हिडिओ शपथविधी आधीच समोर येणे... दादांवरचा हक्क सांगण्याची चढाओढ दोन्ही पक्षांमध्ये सुरु झालीय हेही नक्की.. खरा खेळ तर आता सुरु झालाय... #राजकारण #शरदपवार #SharadPawar #AjitPawar #NCP #SunetraPawar #supriyaSule

Shishupal Kadam

30,660 views • 7 months ago

एका चायनीज कंपनीचा रोबोट कुत्रा,भारताने आयोजित केलेल्या जागतिक Ai समीट मध्ये गलगोटीया या नोएडा स्थित युनिव्हर्सिटीने "आपला" म्हणून शोकेस केला.त्याची ब्रिफिंग देणारी ही बाई तोंडाने सांगते आहे की,"it was developed by our Centre of Excellence.”पुढे ती असेही सांगते की,"350 कोटी रुपये आम्ही Ai तंत्रज्ञानावर खर्च करत आहोत." गंमत अशींय की हा रोबोट कुत्रा निव्वळ 2अडीच लाख रुपयांचा आहे.युनिट्री या चायनीज कंपनीने तो बनवला आहे. आता काही वेळापूर्वी गलगोटीया ने स्पष्टीकरण दिल आहे की, "Its globally available tools for student learning.” असो.एकंदरीत ही आहे आपल्या Ai मधील उडी.याने काय शेठच नाव खराब होत नसत.नाव खराब होत ते आपल्या देशाच. बाकी या गलगोटीया वाल्यांचा बाजार त्यांच्याच जुन्या विद्यार्थ्यांनी उठवला आहे.कारण काय तर,डिग्री पूर केल्यानंतर जेंव्हा हे विद्यार्थी त्यांचं डिग्री सर्टिफिकेट घ्यायला गेले तेंव्हा अनेकांना सांगण्यात आलं की,"तुमचं फर्स्ट इयर चे बॅकलॉग आहेत.ते काढा आणि मग डिग्री घेऊन जा..!'मुळात अस काही नव्हतंच. पण यामुळे अनेक मुलांच भवितव्य टांगणीला लागलं आहे.त्यांनी शिस्तीत घोडे लावले मग युनिव्हर्सिटीला..!

Mohasin

23,005 views • 6 months ago

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासातील अत्यंत काळा दिवस आज आपण अनुभवत आहोत. चांदा ते बांदा, शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी आपल्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले. “दादा… यावेळी वेळ चुकली…” असे शब्द ओठांवर येऊनही ते स्वीकारायला मन तयार होत नाही. अजितदादा सत्तेत असताना मी विरोधी पक्षात काम केले, मी सत्ताधारी पक्षात असताना काही काळ अजितदादा विरोधी पक्षात राहिले, तर अनेक वर्षे आम्ही दोघांनी एकत्र सत्तेतही काम केले. या संपूर्ण वाटचालीत जनतेचे हित हेच अजितदादांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचे केंद्रस्थान राहिले. कोणताही निर्णय घेताना महाराष्ट्रातील सामान्य माणसाला त्याचा कसा लाभ होईल, याची ते नेहमीच काटेकोर काळजी घेत. कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही अनेक विषयांवर दीर्घ आणि कधी कधी तीव्र चर्चा केल्या. या चर्चांमधून “कर्तव्यकठोर” या प्रतिमेच्या आड दडलेले अजितदादांचे हळवे, आपुलकीचे व्यक्तिमत्त्व मी जवळून अनुभवले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची सततची धावपळ सुरूच असायची… आणि आज ती धावपळ कायमची थांबली आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. माझे मित्र, राजकारणातील रांगडे पण तितकेच प्रामाणिक व्यक्तिमत्त्व अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज केवळ एक नेता नाही, तर माझा दमदार, दिलदार मित्र आणि एक खंबीर साथीदार हरपला आहे. “काम करणारा माणूस” ही प्रतिमा कुणी दिलेली नव्हे, ती दादांनी त्यांच्या कृतीतून स्वतः निर्माण केली होती. राजकारणापलीकडे संबंध जपणारा, स्पष्टवक्तेपणा, बोलण्यातली मिश्कीली आणि राजकारणातील अस्सल “नमुना” आज आपण गमावला आहे. काल कॅबिनेटमध्ये आमच्यासोबत असलेले दादा आज आपल्यात नाहीत… यापुढे ते समोर दिसणार नाहीत, बोलणार नाहीत, खांद्याला खांदा लावून उभे राहणार नाहीत… हे वास्तव स्वीकारायला मन तयार होत नाही. “कामाचा माणूस” म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणारे अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या कार्यातून, निर्णयांतून आणि असंख्य आठवणींतून ते सदैव आपल्या मनात चिरायू राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली! #AjitPawar #Ajitdada #अजितपवार

Girish Mahajan

11,597 views • 7 months ago

भाजप आणि संघाच्या यंत्रणेला धक्का पोहोचू लागला की सत्तेच्या माध्यमातून त्यांचे हस्तक बनलेल्या प्रशासनाकरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करून बोलणाऱ्यांचा आवाज ते दाबू पाहतात. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला लढाऊ बाणा वारसा हक्काने लाभलाय. याच स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीतील स्वतंत्र पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मुक्ता कदम व मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष व मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते डॉ. दीपक पवार यांना शासकीय यंत्रणेमार्फत दिला जाणारा त्रास हा व्यक्तीस्वातंत्र्याचा वारसा जपणाऱ्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रावर डाग असल्यासारखाच आहे. महानगरपालिका निवडणुक काळात मुक्ता कदम यांनी आपल्या स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून नांदेडचे सत्ताधारी म्हणवून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या अपयशाचा पाढा वाचला. यामुळेच त्यांना आता नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांत चूकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न केला आहे. “नांदेडचा राजमहाल हलला” हे खरोखरच यावरून दिसते. तसेच महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आपल्या परखड वाणीने मराठी भाषेचा जागर करून मराठी भाषा चळवळ मजबूत करू पाहणाऱ्या प्रा. डॉ. दीपक पवार यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये “शहरी नक्षलवादी” असे संबोधून मराठी भाषेच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मराठी भाषा द्वेषी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरच या गोष्टी घडवल्या जात आहेत, यात कोणालाही शंका नसावी. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात लाचारांची फौज उभी करायची असेल तर त्यांनी नक्कीच प्रयत्न करून बघावेत. पण प्रत्येक व्यक्ति त्यांच्या सत्तेसमोर झूकून त्यांचे, त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीचे कौतूक नक्कीच करणार नाही किंवा त्यांना आवडेल अशा भूमिकाही घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात आपला स्वाभिमान व वैचारिक बाणा जपणाऱ्या व्यक्तिंची कधीही कमी असणार नाही. वर उल्लेख केलेल्या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेला धक्का देणाऱ्या आहेत, हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविसांनी लक्षात घ्यावे. कॉंग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत असून मुक्ता कदम व डॉ. दीपक पवार Dr. Deepak Pawar दीपक पवार यांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Harshwardhan Sapkal

11,129 views • 5 months ago