Loading video...

Video Failed to Load

Go Home

पुढच्या पिढीचे उज्वल भविष्य फक्त 44 सेकंदात !

19,501 views • 1 year ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

आज साताऱ्याच्या एका छोट्या गावात राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा ड्रग्स साठा सापडल्याचे कानावर येत आहे. जिथे 43 कर्मचारी होते ते फक्त तीन कर्मचारी दाखवून हे मोठा ड्रग्सचा कारखाना राज्यातील लाखो युवकांचे आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब करत आहे. होणाऱ्या चर्चेतून माहिती अशी आहे की हे सर्व प्रकरण दाबण्यामध्ये राज्याच्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे. प्रकाश शिंदे हे नाव वाचवण्यासाठी वारंवार संबंधित पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आहे. राज्यातील सत्ताधारी जर अशा पद्धतीने देशाच्या भविष्याला राज्याच्या भविष्याला ड्रग्स आहारी टाकणार असेल तर देशाचे व राज्याचे भविष्य हे खूप वाईट असेल. साताऱ्याचे ग्रामीणचे एसपी हे प्रकरण दाबून खूप मोठे पाप करत आहे.

Sagar Kailas Salunke

38,869 views • 8 months ago

“अब्जोंची उलाढाल करणारी #Dmart कंपनी… पण कामावर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय देताना मात्र चिरकुट मानसिकता!” कामावर असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होतो… तरीसुद्धा त्या कुटुंबाला न्याय देण्याऐवजी प्रकरण चिरकुट पद्धतीने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. मृत कामगाराच्या पश्चात फक्त त्याची आई, पत्नी आणि एक छोटी मुलगी आहे. त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कंपनीने पुढे येऊन जबाबदारी घेणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने आज आम्हाला स्वतः जाऊन एवढ्या मोठ्या कंपनीला प्रश्न विचारावे लागले की कामगारांप्रती त्यांची नेमकी सामाजिक आणि नैतिक जबाबदारी काय आहे? कामगार हा फक्त मशीन नसतो… त्याच्यामागे एक संपूर्ण कुटुंब असतं, त्यांच्या भावना असतात, त्यांचं भविष्य असतं. मानवतेच्या नात्याने आणि सामाजिक जबाबदारी म्हणून त्या कुटुंबाला योग्य ती भरपाई आणि न्याय मिळालाच पाहिजे. #राजसाहेबांचाभानुशाली #JusticeForWorker #कामगारन्याय #DMart #मानवता #WorkersRights Raj Thackeray Amit Thackeray Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Repost Thackeray मनसे बातमी ~ MNS INFO

Mahendra Bhanushali

31,465 views • 3 months ago

समाजाला जागं करणारा प्रश्न - “आपण कोणावर विश्वास ठेवतोय?” वादग्रस्त ज्योतिष **कॅप्टन अशोक खरात** यांच्या संदर्भात समोर येत असलेल्या घडामोडींनी एक गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न समाजासमोर उभा केला आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही लोक त्यांचे स्वागत करताना, फुलांची उधळण करताना दिसतात. पण दुसऱ्या बाजूला गंभीर आरोप, पोलिसांची कारवाई आणि संशयास्पद बाबीही समोर येत आहेत. मग प्रश्न असा - 👉 जर एखाद्या व्यक्तीकडे इतका पैसा, प्रभाव आणि मोठा पाठिंबा असेल, तर तो खरोखर “सच्चा” आहे का? 👉 की हा सर्व फक्त लोकांच्या अंधविश्वासावर उभा असलेला दिखावा आहे? ❗ समाजासमोर उभे राहिलेले महत्त्वाचे प्रश्न 👉 आपण कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवतो? 👉 फक्त गोड बोलणे, भविष्य सांगणे किंवा प्रसिद्धी - हेच विश्वासाचं मापदंड आहे का? 👉 गंभीर आरोप असूनही लोक अशा व्यक्तींच्या पायावर का पडतात? 👉 समाजात शिक्षण आणि माहिती असूनही अंधश्रद्धा का टिकून आहे? ⚠️ अंधविश्वास की वास्तव? अशा प्रकरणांमध्ये अनेकदा लोक भावनिक, आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणींमुळे “कोणीतरी मदत करेल” या आशेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत अनेक भोंदू लोक स्वतःचं साम्राज्य उभं करतात. 👉 मोठे दावे 👉 राजकीय किंवा सामाजिक संपर्क 👉 दिखाऊ जीवनशैली हे सगळं “विश्वासार्हता” निर्माण करण्यासाठी वापरलं जातं - पण ते खरं असतंच असं नाही. 🚨 समाजासाठी महत्त्वाचा संदेश 👉 कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका 👉 संशयास्पद गोष्टी दिसल्यास दुर्लक्ष करू नका 👉 स्वतः जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा 👉 आणि सर्वात महत्त्वाचं - जर अशा प्रकारचा त्रास, फसवणूक किंवा गैरप्रकार तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील कोणासोबत होत असेल, तर त्वरित **नाशिक पोलीस** किंवा संबंधित प्रशासनाकडे तक्रार करा. 🧠 निष्कर्ष हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही - हा आपल्या समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे. 👉 आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली, तरच बदल होईल 👉 जागरूक समाजच सुरक्षित समाज असतो

Shekhar

17,829 views • 5 months ago

भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचं स्मारक, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात उभं राहिलं. खरंतर इतक्या मोठ्या माणसाचं स्मारक याआधीच उभं रहायला हवं होतं. पण कुठल्याही अधिकृत गोष्टीला आपल्याकडे इतक्या परवानग्या आणि त्यासाठी खूप वेळ जातो. असो, आज आचरेकर सरांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा पार पडला त्यावेळेस रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकर हे उपस्थित होते. आपल्याकडे स्मारक म्हणलं की फक्त पुतळा असं एक समीकरणच झालं आहे, पण आचरेकर सरांचं स्मारक हे वेगळं असावं, त्यात पुढच्या पिढयांना प्रेरणा मिळावी असं काहीतरी असावं असं माझं मत होतं. त्यानुसार सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हे स्मारक उभारलं आहे. आपल्याकडे गुरूंचा उचित सन्मान करण्याची परंपरा कमी होत चालली आहे. मला बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दरवर्षी अनेक मुलं भेटायला येतात, मी त्या प्रत्येकाला विचारतो की तुम्हाला पुढे काय करायचं आहे ? इंजिनीअर, डॉक्टर, आर्किटेक्ट अशी साच्यातील उत्तरं येतात, पण कोणीही मला शिक्षक व्हायचं आहे असं मला सांगितल्याचं आठवत नाही. चांगले शिक्षक नसतील तर चांगले विद्यार्थी कसे घडणार असा मला नेहमी प्रश्न पडतो. असो, पण हे स्मारक येणाऱ्या पिढयांना प्रेरणा देईल अशी मला आशा आहे. या कार्यक्रमातल्या मी मांडलेल्या मनोगताची ही चित्रफीत...

Raj Thackeray

135,507 views • 1 year ago

प्रो मुकेश कुमार – आप राहुल गांधी का यहां से आगे का क्या भविष्य देखते हैं....? यशवंत सिन्हा –"में मानता हूं उनका भविष्य उज्वल है" प्रो मुकेश कुमार – राहुल गांधी एजेंडा सेट करने लगे नैरेटिव सेट करने लगे हैं...? यशवंत सिन्हा – बिल्कुल राहुल गांधी जी एजेंडा सेट करने लगे हैं, पहले सरकार और बीजेपी नेरेटिव सेट करती थी और विपक्ष रिएक्ट करता था...। लेकिन पहली बार विपक्ष और खासकर कांग्रेस राहुल गांधी जी नैरेटिव सेट करने लगे हैं...! विपक्ष में स्वाभाविक रूप से पूरे देश में कांग्रेस मुख्य विपक्षी दल है तो आने वाले समय मुख्य विपक्षी कांग्रेस से नेता राहुल गांधी जी ही होंगे....।

Ratan acharya

35,688 views • 6 months ago

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. १) सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्र सैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. मी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. बाकी मला जो दांडपट्टा फिरवायचा आहे तो मी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात फिरवणार आहे. २) आज महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे त्यात फक्त मतं, त्यातून सत्ता मिळवणे आणि ही दोन्ही मिळवण्यासाठी तुमची आपापसात भांडणं लागली पाहिजेत, तुम्ही एकमेकांची डोकी फोडली पाहिजेत जेणेकरून तुम्ही विभागलेले रहाल आणि यांना यांचा स्वार्थ साध्य करून घेता येईल यासाठीच सगळं सुरु आहे. ३) कालच जागतिक महिला दिन साजरा झाला. शुभेच्छा दिल्या गेल्या. पण माझ्या मते महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. जिजाऊ साहेब लहान असताना त्यांचे वडील मुघलांकडे चाकरी करत आहेत हे त्यांना पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती मुघलांकडे चाकरी करतोय हे त्यांना पाहवलं नाही, त्यांनी आपल्या पतीला बंड करायला लावलं. त्यांच्या मनात स्वराज्य नावाची कल्पना अगदी पहिल्यापासून होती आणि ती कल्पना त्यांनी आपल्या मुलाकडून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांकडून ती वास्तवात आणून घेतली. या सगळ्याच्या मागे एका स्त्रीची प्रेरणा होती. हे आपण विसरतो. महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांची एक मोठी परंपरा आहे पण हे आपण आज विसरलो आहे. ४) पक्षाला १९ वर्ष पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना, प्रश्न पडतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय पाहिला पराजय पाहिला पण तरी या पक्षातील माणसं एकत्र कशी राहतात ? याला दृष्ट लागू नको दे ५) सध्या जे राजकीय फेरीवाले आलेत की जे आज या फुटपाथवर, कोणी डोळे मारले की त्या फुटपाथवर. असले फेरीवाले मला पक्षात नको आहेत. आपली संघटना आजसुद्धा राज्यभर पसरली आहे त्याची अजून बांधणी करायला हवी. पक्षातील गटाध्यक्षाला त्याच्या घरच्यांना वाटलं पाहिजे की त्याची काळजी पक्षातील लोकं घेत आहेत. त्याच्याशी कोणीतरी बोलतंय. म्हणून पुढच्या २ दिवसांत पक्षातील नेत्यांपासून ते गटाध्यक्षांपर्यंत प्रत्येकाची कामं, त्याची आचारसंहिता हे घेऊन येत आहे. आणि हो माझी आचारसंहिता पण त्यात असणार आहे. दर १५ दिवसाला प्रत्येकाचं काम तपासलं जाणार आहे आणि त्याची यंत्रणा पण लावली आहे. आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही. ६) मध्यंतरी मुंबईतल्या मेळाव्यात काही पदाधिकारी हजर नव्हते. त्या गैरहजर पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातल्या काहींनी कारणं सांगितली की कुंभ मेळ्याला गेलो होतो. मी त्यांना म्हणलं इतकी पापं करता कशाला की जी धुवायला गंगेत जावं लागतं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार ? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे काय झालं ? अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं. ७) पुढच्या काही दिवसांत प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्याचं नीट पालन झालंच पाहिजे. आणि येत्या ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी वाजतगाजत गुलाल उधळत शिवतीर्थावर या. #वर्धापनदिन२०२५

Raj Thackeray

54,506 views • 1 year ago