Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

पार बेक्कार अवस्था करून ठेवलीय शिंदेसेनेची... सगळीकडे रडारड चालू आहे....

11,059 Aufrufe • vor 7 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

मिसिंग लिंक प्रकल्पला फक्त ११ दिवस बाकी आहेत.महाराष्ट्र दिनी याचे लोकार्पण होणार आहे.शेवटची कामं चालू आहेत.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून याचे लोकार्पण होणार आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानचा हा साधारण १३.३ किमी लांबीचा मार्ग आहे.यात दोन मुख्य बोगदे आणि दोन भव्य पुलांचा समावेश आहे. या प्रकल्पातील १०.५५ किमी लांबीचा बोगदा हा भारतातील सर्वात रुंद (४५ फूट पेक्षा जास्त) बोगदा आहे.'ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा' वापर करून याचे पूर्ण करण्यात आले आहे. खंडाळा घाटातील दरी पार करण्यासाठी १८० मीटर उंचीचा एक भव्य Cable-Stayed Bridge बांधला जात आहे. त्याचे केबल बाहेर देशातून मागवले आहेत. Devendra Fadnavis

शुभम कराड

28,147 Aufrufe • vor 4 Monaten

पुणे जिल्ह्यातील देवाची उरुळी येथील हे गरीब कुटुंब आपल्या मुली साठी विनविण्या करत आहे. ... मुलगी अगदी 13 वर्ष्याची आहे. ..24 दिवस झालेत पोलीस केवळ तपास चालू आहे. ..एवढच सांगत आहेत, असही कुटुंब सांगत आहे. .!! सोबत ते त्यांना कोणाकडून माहिती मिळाली हे पण सांगत आहेत. ..!! पहिली गोष्ट जरी मुलगी 18 वर्ष वयाच्या पुढे असती तरी एकदा कुटुंबाची तक्रार आली म्हणल्यावर. ..योग्य तपास करून मुलगी कुटुंबियासामोर आणणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. .. इथे तर मुलगी अगदीच 13 वर्ष्याची आहे. ..तेव्हा तिच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय, गरीब कुटुंब हतबल आहे. ..दिवसा मागून दिवस जात आहेत. .. तेव्हा प्रशासनाने आता तरी तात्काळ सदरील प्रकरणात तपास करून. ..मुलगी आई वडीला कडे पोहचवावी. ..पुणे शहर पोलीस punecommissioner महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Amita Chate

26,222 Aufrufe • vor 9 Monaten

या सगळ्यात मराठीत कॉमेडी करणारे कुठेही मागे नाहीत. स्वतःचं दुकान चालवायला येणारी पिढी कशी बरबाद करायची त्याचं शिस्तीत प्लानिंग सुरू आहे. आपण समाजाला काय देतोय या माध्यमातून याचा विचार करायला हवा. ते दोन चिमुकले त्यांचं वय काय आपण त्यांना कसले प्रश्न विचारतोय.. त्यांना कुठल्या दिशेला विचार करण्यास प्रवृत्त करतोय याचा थोडा विचार करा. Cute म्हणून हसू नका. तुमच्याच लेकरांचं नुकसान आहे यात.. लग्न म्हणजे सेक्स, जगासमोर स्वतःच्या बायकोला गलिच्छ रित्या रोस्ट करवून घेणं आणि मोठ्याने त्यावर दात काढून हसणं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती नाही. Bharatiya Digital Party Queen of Kothrud थोडं आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. चांगला विनोद असेल तर स्वागतच आहे पण ही अश्लीलता सहन करून घेणार नाही. ज्या महाराष्ट्राला पु. ल. देशपांडे व व. पू. काळेंचा वारसा लाभलाय त्या महाराष्ट्रात ही घाण चालू देणार नाही. सस्ती कॉपी of IGL चा प्रयत्न हाणून पाडू.

Sunaina Holey

83,038 Aufrufe • vor 1 Jahr

कोकणात अनेक आंदोलनं सध्या चालू आहेत तळकोकणातलं हे अभिनव… अवैध वाळू उपसा विरोधात. ३०/३५ रेती उपसा करणाऱ्या बोटी २ गावांच्या शेतीत खारं पाणी शिरणं गोड्या विहीरीत खारं पाणी जाणं पोलिसांचं गावकऱ्यानी अवैध रेती उपशाच्या भरलेल्या बोटींना पकडून देऊनही नोंद करून न घेणं आदी प्रश्न मोठ्या न्यूज चॅनल्सना तकलादू वाटत असल्याने त्यांनीही याकडे दुर्लक्ष केलंय ज्यांनी बातम्या चालवल्यात ते पब्लिकचे रात्रीच्या काळोखातले व्हीडीओ आहेत बाकी हा एक रिलस्टार पुढे आला त्याचे आभार. त्याच्या कमेंटमध्ये घरी बसून पब्लिक बाकी रिलस्टार कुठे आहेत त्यांना टॅग करून शिव्या देतायत. म्हणजे पत्रकार-मिडीया यावरचा विश्वास केव्हाच उडालाय. बाकी संबंधित मंत्री प्रशासन यांचा या विषयाकडे दुर्लक्ष करण्याचाच इंटरेस्ट आहे.

Vaibhav Shetkar

15,926 Aufrufe • vor 4 Monaten

शनिवारी दिल्लीत नॅशनल टेलिव्हिजनचा बेस्ट रिपोर्टर आणि रिपोर्ट पुरूस्कार मिळाला. NDTV मराठीला एकुण चार सन्मान मिळाले. या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये लवासा इथल्या प्रकल्पातले तीन बंगले डोंगरावरून थेट खाली कोसळले. रेस्क्यू तीन दिवस करावे लागले. तरीही दोन मृतदेह हाती लागलेच नाहीत. लवासा, त्या मागचे अर्थकारण, शरद पवारांवरील आरोप आणि शेवटी झालेली प्रकल्पाची अवस्था ही बातमी जगाला एनडीव्हीने पहिल्यांदा दाखवून दिली. भरपावसात कॅमेरामन निकेतन मानेसह बंद पडलेले रस्ते, डोंगर ओलांडून, पायी चालत चालत लवासात पोंहचलो होतो. निसर्गाचा विनाश करून केलेले प्रकल्प जसा समुद्र कोणतीही गोष्ट पोटात ठेवत नाही तसा लवासाला परत केला. या बातमी नंतर या प्रकल्पाची पुन्हा चौकशी सूरू झाली आहे

Rahul Kulkarni

26,902 Aufrufe • vor 1 Jahr

हडपसर विधानसभेचे उमेदवार श्री. साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे आज जाहीर सभा घेतली, त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) २००९ ला हडपसर मतदारसंघ तयार झाला. इथली गावं महापालिकेत आली. आज कित्येक लोकं म्हणतात की आमची गावं होती ती बरी होती, विनाकारण महापालिकेत आलो. या संपूर्ण भागाचा विचका ट्रॅफिकने झाला आहे. आज महाराष्ट्रात मी असे अनेक भाग बघतो, त्याची अवस्था अशी आहे की मरण येत नाही म्हणून जिवंत आहोत. रोजच्या जगण्यातील स्वस्थता गेली आहे, लहान मुलांना बाहेर पाठवताना माता-भगिनींना धाकधूक होते. आणि या मूळ प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये म्हणून तुम्हाला नको त्या प्रश्नांमध्ये गुंतवलं जातं. २) महाराष्ट्राच्या राजकारणाचा जातींनी झालेला विचका मोठा आहे. जातीपातीत तुम्ही गुंतून पडावं आणि तुमचं मतदान काढून घ्यायचं असं सुरु आहे. ३) मराठवाड्यातील दुर्दैवी घटना सांगतो. एका गावातील घरात निधन झालं, घरात तीन माणसं, मृत व्यक्तीला खांदा द्यायला माणूस नव्हता, नातेवाईक यायला सहा तास लागले, म्हणून अंत्यसंस्कार थांबले. दुसऱ्या जातीची माणसं बहुसंख्य माणसं शांतपणे बघत राहिली पण कोणी पुढे आलं नाही. याहून दुर्दवी घटना काय असू शकते ? हे सगळं विष पेरलं गेलं ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर. ४) आज महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की महापुरुषांना आपण जातीत विभागलं आहे. महाराष्ट्रात जातीबद्दलचं प्रेम होतं, पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष कधीच नव्हता. आपल्याकडे आत्ता काय पसरतंय याचा विचार केलाय का ? इथल्या मोहल्ल्यांमध्ये सिमी, आयसिसचे अतिरेकी सापडलेत. बरं जे सापडले ते सापडले पण जे नाही सापडले ते काय करतील ? ५) शहरांचा सत्यानाश झाला आहे, इथे रोजगार मिळत नाहीयेत, इथे महिला सुरक्षित नाहीयेत, लोकांना घरं परवडत नाहीयेत, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत आणि तरीही या सगळ्याची चिंता करायची सोडून सत्ताधारी आणि विरोधक तुम्हाला जातीत गुंतवतात... ६) इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अहवलेंना केली गेली, त्यावेळेला फक्त आमचा साईनाथ रस्त्यावर उतरला होता. त्यावेळेला आमदार आणि इतर पक्षांचे नेते कुठे होते ? अशा माणसांच्या हातात सत्ता देणार का तुमच्यासाठी धावून येणारा साईनाथ सत्तेत हवा ? विचार करा साईनाथ आमदार झाले तर तुमच्यासाठी रात्रीअपरात्री धावून येतील. ७) तुम्ही कुठल्याही पुण्यातील असो की मुंबईतील किंवा ठाण्यातील किंवा अगदी कुठल्याही शहरातील जुन्या माणसाला विचारून बघा की तुम्हाला तुमचं जुनं शहर हवं का नवं तर लोकं उत्तर देतात जुनं शहर. पण दुबईत विचारून बघा तिथल्या लोकांना, कुठलं शहर आवडतं तर म्हणतील आत्ताची दुबई आवडते, का तर तिथल्या माणसांची गरज लक्षात ठेवून दुबई घडवली आहे. ८) ५ वर्षात मी तुम्हाला सगळं बदलून दाखवेन असं सांगणार नाही, पण या ५ वर्षात असं काम करून दाखवेन की ज्याने तुम्हाला पुढची ५ वर्ष आम्हाला सत्तेत परत आणावं असं वाटेल, इतकं सुंदर आणि मनापासून काम करून दाखवेन, ९) महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज्यातील नाहीतर देशातील एकमेव पक्ष आहे ज्याने राज्याचा विकास आराखडा मांडला. मला खुर्चीचा सोस नाही. मी शिवछ्त्रपतींच्या राज्यात जन्माला आलो आहे, त्या राज्याचं गतवैभव मला परत आणायचं आहे. १०) आज माझी मुलाखत घ्यायला येणारे पत्रकार मला फक्त यांनी असं म्हणलं त्यांनी तसं म्हणलं यावरच प्रश्न विचारतात. पण कोणी महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विसरू नका हे महाराष्ट्र राजय आहे, कोणतं लेचापेचं राज्य नाही. या राज्याला इतिहासाला भूगोल पण आहे आणि इतिहास पण आहे. अशा राज्याच्या विकासाबद्दल तळमळीने बोलणाऱ्या माझ्या पक्षाला, माझ्या उमेदवारांना निवडून द्या. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, यासाठी मला तुमची साथ हवी आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या राज्यात तमाशा करणाऱ्यांना एकदा धडा शिकवा, आणि तुम्ही जर धडा नाही शिकवलात तर या सगळ्यांची खात्री पटेल की तुम्ही काहीही केलंत तरी सगळं चालून जातं. ११) मला आणि माझ्या उमेदवारांना एकदा संधी देऊन बघा. माझा साईनाथ तर आहेच पण जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्या प्रत्येकाला मतदान करा. मी सगळ्या मतदारसंघात पोहचूच शकत नाही, त्यामुळे मी इथून प्रत्येकाला आवाहन करतो की माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

56,039 Aufrufe • vor 1 Jahr

पेशवाई गेली आणि इंग्रज आले. त्यावेळेला एक जमत निर्माण झाली हे केलं तुम्ही धर्म बुडवला ते केलं तुम्ही धर्म बुडवला तुम्ही इंग्लिश शिकला धर्म बुडला तुम्ही पाव खाल्ला धर्म बुडला तुम्ही समुद्र पार केला धर्म बुडला टिळकांनी एकदा इंग्रजांबरोबर चहा पिला तर धर्म बुडला म्हणून त्यांना शेण गोळा खायला लावला होता. त्याला पंचगव्य हे नाव दिलं गेलं होतं. पंचगव्य म्हणजे शेणाचा गोळा ते तुमचं शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात आणायचं टिळकांनी समुद्र पार केला होता म्हणून त्यांना स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये योनीमधून पुन्हा जाऊन पंचगव्य खाऊन त्यांचा पुनर्जन्म झाला आहे आणि ते पुन्हा ब्राह्मण झाले आहेत हे सिद्ध करावे लागलं होतं अशा भरपूर कथा लोकहितवादींनी आपल्या पुस्तकात लिहिले आहेत ही मनुवादी जमात ही पूर्वी फक्त ब्राह्मणांच्या होती काही बहुजन मनुवादी होण्याच्या मार्गावर आहेत आणि ते सुदामेच्या मागे पडले आहेत

गजाभाऊ

35,304 Aufrufe • vor 11 Monaten