Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

प्रजासत्ताक दिन आपण जो पाळतो ते बाबासाहेबांमुळेच! भाजपवाले स्वतःला देशापेक्षाही मोठे समजू लागलेत.

25,930 Aufrufe • vor 7 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

जरांगेंना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटतेय. गोरगरीब महिलांना, भाऊ-बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे म्हणून लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट करण्यासाठी केल्याचा फुटकळ आरोप ते करताहेत. या योजनेतून मराठा समाजातील गरीब महिलांनाही मदत होणार आहे. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपेक्षित, वंचित सर्व गरीब घटकांना न्याय मिळणारी ही योजना आहे. पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगें बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत.

Pravin Darekar - प्रविण दरेकर

53,395 Aufrufe • vor 2 Jahren

माझ्या एका राजकीय उपहासात्मक बॅनरबद्दल माझ्यावर १४ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला... कोणत्या कायद्याखाली तर म्हणे 'महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्यान्वये' मग माझी Mumbai, आपली BMC हे जे शहरभर मोदी-फडणवीसांचे बॅनर लागलेत ते आपल्या शहराचं सौंदर्य वाढवत आहेत का? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ह्याच कलमाखाली गुन्हा दाखल होणार का ? मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMCWardHW असली अघोरी बॅनरबाजी मुंबईला विद्रुप करत नाही का? सत्ताधाऱ्यांनी काहीही केलं, कितीही उन्माद घातला तरी माफ आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेली साधी टीकाही सहन होत नाही तर आपण एकपक्षीय 'हुकूमशाही'कडे वेगाने चाललोय इतकं निश्चित !

Akhil Chitre अखिल चित्रे

21,566 Aufrufe • vor 6 Monaten

नरसापूर प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही प्रकारची लाठीचार्ज केला नाही. - पुणे पोलीस आयुक्त कांबळे नावाचा नराधामला सोडलं जाणार नाही, पण, भावनिक होऊन चालणार नाही. जे काम कायदा करतो ते काम कोणीही करू शकत नाही. तुमची माझी लाख जरी ईच्छा असली कांबळेला फाशी आजच होयला पाहिजे. पण, हे प्रत्यक्षात शक्य नाही. राग , संताप सगळं समजू शकतो , तुम्हाला जेवढा राग आहे, तेवढा राग मला सुद्धा आहे, सर्वांना राग आहे. देशात आपल्या कायदा हा सर्वोपरी आहे. मान्य आहे कायदेशीर मार्ग वेळखाऊ असतात. पण, कायदा हातात घेऊन आपण सुद्धा कायद्याचं उल्लंघन करून स्वतःच आयुष्य देखील आपण अडचणीत आणतो. त्यासाठी कायदा त्याच काम करणार भावनिक होऊन चालणार नाही. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. १०० टक्के त्याला मृत्यू दंड होणार आहे. कारण, तशी कायद्यात तरतूद आहे.

Prakash Gade

36,799 Aufrufe • vor 4 Monaten

आज २५ जुलै २०२४ रोजी, मुंबईतील रंगशारदा सभागृहात, मी आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यातील काही महत्वाचे मुद्दे... १) मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला. एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं. २) अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. ३) पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं. ४) पण सध्या कोणाचं लक्ष नाहीये. सगळे व्यस्त आहेत 'लाडकी बहीण', 'लाडक्या भावात'. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मुळात अशा योजना राबवायला राज्यसरकारकडे पैसे आहेत का? सरकारकडे रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनांना कुठून पैसे येणार ? ५) माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे जा, त्यांना मदत करा, त्यांना काय हवं नको ते पहा. ६) महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हेच तुमचं प्रचाराचं कॅम्पेन पाहिजे. ७) आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे. ८) निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही.

Raj Thackeray

43,313 Aufrufe • vor 2 Jahren

मातृत्व: समाजाच्या अपेक्षांच्या पलीकडचा एक प्रवास. १३ प्रदीर्घ वर्षे, तिनं केवळ स्वतःच्या स्वप्नांचाच नव्हे, तर समाजाच्या अथक अपेक्षांचाही भार वाहिला. समाजाचे निरनिराळे प्रश्न, कुजबुज आणि निर्णयांनी तिला अदृश्य ढगासारखे घेरलं, तिच्या आत्म्याला गुदमरलं. आई होण्याचा दबाव ही फक्त तिची इच्छाच नव्हती, तर ती जगाने केलेली मागणीही होती, जी स्त्रीची क्षमता नवजीव सहन करण्यावरून मोजते. ज्या दिवशी ती गरोदर राहिली, तिचे डोळे, लवचिकतेच्या अकथित कथांनी जड झाले, ते अश्रू रोखू शकले नाहीत. तीच काय, तोही त्याचे अश्रू रोखू शकला नाहीय... किती लोकांच्या आणि किती घाणेरड्या टीकाटिप्पणी झाल्या असतील त्या दोघांवर...??? ते केवळ आनंदाचे अश्रू नव्हते, तर सामाजिक न्यायाच्या बंधनातून सुटका करणारा निश्वास होता. हे केवळ एकाच स्त्रीबद्दल नाही, तर अश्या लाखो करोडो स्त्रियांबद्दल आहे... काही ठिकाणी तर, पुरुषांचं "पुरुषपण" देखील स्त्रीच्या मातृत्वावर अवलंबून असतं, नाही तर त्या पुरुषाला विविध "नावांनी"-दूषणांनी संबोधलं जातं... "आई होणं" हे समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणं आहे का? "मातृत्व" हा एक सखोल वैयक्तिक आणि भावनिक प्रवास आहे, जो जैविक टाइमलाइन आणि सामाजिक कालमर्यादा ओलांडतो. हे प्रेम, काळजी आणि निवडीचं पालनपोषण करण्याबद्दल आहे, सामाजिक बंधन नाही. तरीपण, महिलांवर होणाऱ्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करून, समाज अनेकदा त्यांच्यावर कठोर लिखितं लादतो. आपण स्वतःला विचारलं पाहिजे: "आई" या लेबलचे पालन करण्यासाठी आपण स्त्रियांवर इतका प्रचंड दबाव का ठेवतो? तिची स्वप्नं, आकांक्षा, संघर्ष याकडे दुर्लक्ष करून, जन्म देण्याच्या क्षमतेनुसार तिची ओळख करणं योग्य आहे का? मातृत्व खऱ्या अर्थानं साजरं करण्यासाठी, या प्रवासाला न जाण्याचा निर्णय घेणाऱ्या किंवा अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेणाऱ्यांच्या निवडींचाही, आपण आदर केला पाहिजे. मातृत्व ही शर्यत नाही; हा एक प्रवास आहे आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या मार्गावर, तिच्या गतीने चालण्याचं स्वातंत्र्य असले पाहिजे....!!!

महाकाळ

47,372 Aufrufe • vor 1 Jahr

जर्मनीतील वीजनिर्मिती- अणुऊर्जा आणि जगाची भविष्यातील वाटचाल. जर्मनीत १९६२ ते २०२४ पर्यंत तीन अणुऊर्जा प्रकल्प जवळपास ६.३ % इतकी प्रचंड मोठी वीजनिर्मिती करायचे. ते सर्व अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यांनी बंद केलेत. त्यातलाच हा एक कुलिंग टॅावर नियंत्रित स्फोटात आता पाडला गेलाय. हा जो व्हिडीओ आहे त्याकडे आपण प्रतिकात्मक दृष्टीने पहायला हवे. एका बाजूला न्यूक्लियर एनर्जी चांगली तर दुसऱ्या बाजूला प्रचंड विनाशकारी दिसते. जगभरात यावर सतत चर्चा होत असते. भारतात यावर आपल्या राज्याइतकी चर्चा इतर कुठेच झाली नसेल. महाराष्ट्र गेली दीड- दोन दशके याने ढवळून निघालेला. जगभरात आता न्यूक्लियर एनर्जी आधारित प्लांट कमीच होत आहेत. तरीही येणाऱ्या काळात हा निर्णय योग्य कि अयोग्य हे कळेल. जर्मनीत गेल्या वर्षभरापासूनच अणुऊर्जा आधारित उर्जा निर्मिती शून्यावरच होती. त्यांनी ही ६.३ % टक्क्यांची तूट नवे सोलार प्लांट टाकून सहज भरून काढलीये. त्याशिवाय त्यांनी बॅटरीज आणि उर्जा साठवणूक करण्याच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक केलीये. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया आणि नव्या पॅावर ग्रीड साठी खास तंत्रज्ञांची नेमणूक केलीये. सरकार आणि खाजगी कंपन्या यात चांगला सहभाग नोंदवितात. याकामात जर्मनीने जगात आघाडी घेतलीये हे मात्र नक्की. जर्मनी हा एक असा देश आहे जो अपारंपारिक उर्जा क्षेत्रात फार प्रचंड वेगाने पुढे गेलाय. सोलार आणि विंड एनर्जी सारख्या अपारंपारिक उर्जेतून देशाला लागणारी जवळपास ५७% उर्जा हे लोक तयार करतात. (जगाची सरासरी ४१ % आहे.) आणि उरलेली ४३% उर्जा ते कोळसा, नॅचरल गॅस, बायोमास व इतर जीवाश्म इंधनांपासून तयार करतात. २०३० म्हणजे पुढील फक्त ४ वर्षात ७५ % उर्जानिर्मिती ही सोलार आणि विंड आधारित घेऊन जायचे मोठे टार्गेट त्यांनी सेट केलेय आणि सरकार तसेच खाजगी क्षेत्रातील त्यांची एकंदर घोडदौड पाहता हे सहज शक्यही वाटतेय. ग्रीन हायड्रोजन/अमोनिया संदर्भात गेली तीन वर्षे मी जर्मनीत जात आहे आणि त्यांचे इलेक्ट्रोलायझर्स, इंडस्ट्रीयल बर्नर्स, ग्रीन हायड्रोजन इंधन म्हणून वापरण्यासाठीचे प्रयत्न, त्यावरील प्रयोग हे नक्कीच वाखाणण्याजोगे, जगाला दिशादर्शक आहेत. एका तर घरात त्यांच्या रूम हिटिंग /स्पेस हिंटिंग साठी सोलार आधारित ग्रीन हायड्रोजन सिस्टिम तीन वर्षांपूर्वी बसवली आहे. रूफ टॅाप सोलार हे त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मोठ्या प्रमाणावर विंड एनर्जी हे ही त्यांचे वैशिष्ट्य आहे. अपारंपारिक उर्जा हे फक्त जर्मनीतच नाही तर संपुर्ण जगासाठीच भविष्य आहे हे मान्य केले तरी यात काही गंमतीजमतीही आहेत. सोलार आणि विंड एनर्जी ही खूप स्वस्त आहे, स्वच्छ आहे वगैरे वगैरे आपण नेहमीच म्हणतो परंतू सोलार पॅनल्स बनविणासाठी आणि विंड मिल तयार करून बसविण्यासाठी जेवढं जीवाश्म इंधनं लागतं आणि मोठ्या प्रमाणावर रेअर अर्थ मिनरल्स लागतात त्याचे गुणोत्तर काही आजही फारसा मेळ खात नाही. दुसरं ज्या जर्मनीत आज ही मोठ्या प्रमाणावर, स्वच्छ, पर्यावरणपुरक, अक्षय उर्जा तयार होतीये ते पाहता तिथे विजेचे दर जगात सर्वात स्वस्त असायला हवेत. परंतू वास्तव मात्र अगदी उलटे आहे. जर्मनी, असो की युरोप, अमेरिका किंवा इतर अनेक देश जिथे जिथे सोलार आणि विंड पॅावर आहे तिथे विजेचे दर प्रचंड महाग आहेत. उदाहरणार्थ भारतात विजेचा दर प्रती किलोवॅट $ ०.०८ आहे तर जर्मनीत तोच $०.३७ आहे. नेदरलॅंड, सिंगापूर, बेल्जियम, स्वीडन, जपान यातही तो तुलनेने $०.२२ ते ०.३२ पर्यंतच आहे. येणाऱ्या दशकभरात सोलार आणि विंड प्लांटच्या किंमती कमी होणार आणि हे रेट कमी होणार असं म्हणणं म्हणजे सोन्याचे दर पुन्हा “दहा - वीस हजार तोळ्यावर” किंवा “डिझेल, पेट्रोल खरचं ५० - ६० रूपये लिटरने मिळेल” अशी अपेक्षा बाळगणं…. असो. सहसा एवढे मोठे करेक्शन्स होत नाहीत हे इथे सुचवायचेय, इतकेच. आपल्यालाही या उर्जेशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपण नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करायलाच हवी पण त्यापूर्वी - आपल्या जुन्या ग्रीड सिस्टिम मधून जे ट्रांन्समिशन आणि डिस्ट्रिब्युशनचे जे १८ ते २० % लॅासेस होताहेत ते कमी करावे लागतील. घरातही आपण किमान २० ते ३० % उगीचच उर्जेचा वापर, चूकीच्या विजेच्या वस्तू, चूकीच्या पद्धतीचे इंस्टॅालेशन्स करतो, ते कमी करावं लागेल. नवे, इफिशियंट पॅावर प्लांट नव्याने लावावे लागतील आणि सर्वात महत्वाचे - आपल्या इथल्या सरकारला, तंत्रज्ञांना, खाजगी कंपन्यांनाही रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी पैसे ओतावे लागतील. पॅरासाईट राहून फक्त दलाली आणि कमिशन खाऊन परदेशी वस्तू इकडे चिकटवायची पद्धत बंद व्हायला हवी. मोठमोठ्या कॅार्पोरेट्स वर जशी CSR फंड वापराची बंधने आहेत तशीच R&D निधी योग्य ठिकाणी वापरला जावा अशी नवी नियमावली यायला हवी. #उर्जासाक्षरता

Prafulla Wankhede 🇮🇳

35,015 Aufrufe • vor 10 Monaten

आपण कोणत्याही सरकारी कार्यालयात , विद्यापीठात , न्यायालयात , महाविद्यालयात गेलो तर तिथे राष्ट्रपुरुष , प्रेरणा देणारी व्यक्तिमत्त्वं यांचे फोटो दिसतात. पंतप्रधान, राष्ट्रपती , राज्यपाल यांचे फोटो प्रोटोकॉल प्रमाणे असतात.. नेहरू , इंदिरा गांधी , राजीव गांधी यांचे फोटो आजही अनेक ठिकाणी तसेच्या तसे दिसतात .. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची तुलना बरी होतं नाही ..!! मोदीजी तुम्हाला आवडो अथवा न आवडो .. ते देशाचे पंतप्रधान आहेत हे सत्य बदलणार नाही. शिवसेना भवन येथील बाळासाहेबांचा फोटो जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर लावलेला आहे तो हटवून दाखव बरं. आणि असल्या फालतू कृतीमुळेच तुम्हाला जनता मतदान करत नाही हे सत्य आहे. म -न -से = मत नसलेली सेना #मत_नसलेली_सेना

🚩 सोनाली 🚩🇮🇳

21,413 Aufrufe • vor 1 Tag

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. १) सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्र सैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. मी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. बाकी मला जो दांडपट्टा फिरवायचा आहे तो मी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात फिरवणार आहे. २) आज महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे त्यात फक्त मतं, त्यातून सत्ता मिळवणे आणि ही दोन्ही मिळवण्यासाठी तुमची आपापसात भांडणं लागली पाहिजेत, तुम्ही एकमेकांची डोकी फोडली पाहिजेत जेणेकरून तुम्ही विभागलेले रहाल आणि यांना यांचा स्वार्थ साध्य करून घेता येईल यासाठीच सगळं सुरु आहे. ३) कालच जागतिक महिला दिन साजरा झाला. शुभेच्छा दिल्या गेल्या. पण माझ्या मते महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. जिजाऊ साहेब लहान असताना त्यांचे वडील मुघलांकडे चाकरी करत आहेत हे त्यांना पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती मुघलांकडे चाकरी करतोय हे त्यांना पाहवलं नाही, त्यांनी आपल्या पतीला बंड करायला लावलं. त्यांच्या मनात स्वराज्य नावाची कल्पना अगदी पहिल्यापासून होती आणि ती कल्पना त्यांनी आपल्या मुलाकडून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांकडून ती वास्तवात आणून घेतली. या सगळ्याच्या मागे एका स्त्रीची प्रेरणा होती. हे आपण विसरतो. महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांची एक मोठी परंपरा आहे पण हे आपण आज विसरलो आहे. ४) पक्षाला १९ वर्ष पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना, प्रश्न पडतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय पाहिला पराजय पाहिला पण तरी या पक्षातील माणसं एकत्र कशी राहतात ? याला दृष्ट लागू नको दे ५) सध्या जे राजकीय फेरीवाले आलेत की जे आज या फुटपाथवर, कोणी डोळे मारले की त्या फुटपाथवर. असले फेरीवाले मला पक्षात नको आहेत. आपली संघटना आजसुद्धा राज्यभर पसरली आहे त्याची अजून बांधणी करायला हवी. पक्षातील गटाध्यक्षाला त्याच्या घरच्यांना वाटलं पाहिजे की त्याची काळजी पक्षातील लोकं घेत आहेत. त्याच्याशी कोणीतरी बोलतंय. म्हणून पुढच्या २ दिवसांत पक्षातील नेत्यांपासून ते गटाध्यक्षांपर्यंत प्रत्येकाची कामं, त्याची आचारसंहिता हे घेऊन येत आहे. आणि हो माझी आचारसंहिता पण त्यात असणार आहे. दर १५ दिवसाला प्रत्येकाचं काम तपासलं जाणार आहे आणि त्याची यंत्रणा पण लावली आहे. आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही. ६) मध्यंतरी मुंबईतल्या मेळाव्यात काही पदाधिकारी हजर नव्हते. त्या गैरहजर पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातल्या काहींनी कारणं सांगितली की कुंभ मेळ्याला गेलो होतो. मी त्यांना म्हणलं इतकी पापं करता कशाला की जी धुवायला गंगेत जावं लागतं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार ? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे काय झालं ? अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं. ७) पुढच्या काही दिवसांत प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्याचं नीट पालन झालंच पाहिजे. आणि येत्या ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी वाजतगाजत गुलाल उधळत शिवतीर्थावर या. #वर्धापनदिन२०२५

Raj Thackeray

54,506 Aufrufe • vor 1 Jahr

आज पुण्यात विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात, माझ्या हस्ते अभिनेते आणि माझे मित्र, श्री. रितेश देशमुख यांचा सत्कार झाला. या संमेलनाला मी उपस्थित रहावं अशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी मला गळ घातली. आणि त्याचा मान राखून, मी या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यावेळी माझं मनोगत मी व्यक्त केलं. त्या मनोगतातील महत्वाचे मुद्दे... '... मी हल्ली अनेक ठिकाणी बघतो की २ मराठी माणसं भेटली की ती एकमेकांशी हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतात, का असं ? आपणच आपल्या भाषेचं अस्तित्व टिकवलं नाही तर कसं होणार ? आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मराठी माणसांना जसा मानसन्मान मिळायला हवा तो मिळत नाहीये. त्यात आपली भूमी, इथली जमीन बाहेरचेच गिळंकृत करत आहेत. आपण इतिहास असं म्हणतो तो कुठल्यातरी प्रदेशाला पादाक्रांत करण्यासाठी झालेल्या लढाईचा इतिहास असतो. आज महाराष्ट्रातील जमीन गिळंकृत करण्याचा जो डाव सुरु आहे, त्यातून उद्या जर आपलं म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्वच पुसलं गेलं, तर मराठी भाषेचं अस्तित्व तरी काय राहणार आहे? मग आपला इतिहास तरी काय असणार ? यामुळे सरकारने मराठी भाषा टिकवण्यासाठी जसे प्रयत्न केले पाहिजेत, तसे प्रयत्न मराठी माणूस टिकावा म्हणून केले पाहिजेत. आम्ही आमच्या परीने मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी जे जे करणं शक्य आहे ते करत आहोत, करत राहू. सरकारने त्याला साथ द्यावी, काही वेळेला आमचे मार्ग वेगळे असतात, त्यामुळे सरकारने आमच्यावर केसेस टाकू नये, कारण जे आम्ही करत आहोत ते मराठी माणसासाठी करत आहोंत. बाकी साहित्यिकांनी साहित्य निर्माण केलंच पाहिजे पण भूमिका पण घेतली पाहिजे. आणि मराठी तरुण-तरुणींनी पण साहित्य वाचायला हवं, पुस्तक वाचलीच पाहिजेत. बौद्धिक मशागतीसाठी पुस्तकांना पर्याय नाही. आपला इतिहास, आपले महापुरुष हे जगापर्यंत आपण पोहचवले पाहिजेत, पण हे करताना सध्या आपल्या महापुरुषांना जातीत विभागणं सुरु आहे, ते थांबलं पाहिजे... आपण मराठी भाषिक म्हणून एकत्र आलो, आपल्या भाषेशी, संस्कृतीशी घट्ट राहिलो तर जगात आपलं कोणीच वाकडं करू शकणार नाही हे विसरू नका....' या भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहे. ती जरूर बघा..

Raj Thackeray

49,591 Aufrufe • vor 1 Jahr

.Devendra Fadnavis साहेब उध्दव ठाकरे यांच्या काळात झालेली पेपर फूट कोणी बाहेर काढली होती हे पण पहा. ते सर्व घोटाळे आम्हीच बाहेर काढले होते पण अजून एक सांगतो त्या घोटाळ्यांचा तपास पहा आणि तुमच्या काळात झालेल्या पेपरफुटी चा तपास पहा यात स्पष्ट समजते की गृहमंत्री पद तुम्हाला झेपलेले नाहीये आपण एक निष्क्रिय गृहमंत्री आहात कारण सर्व पुरावे देऊन सुद्धा पोलीस काहीच कारवाई करत नाही. कसलाच तपास झाला नाही. Office of Uddhav Thackeray साहेब मुख्यमंत्री असताना एक सचिव, जिल्हाधिकारी, 2 आयुक्त आणि इतर असे मोठ मोठे मासे पेपरफुटी मध्ये पकडुन त्यांना अटक झाली होती,फुटलेले पेपर रद्द केले होते. पण तुम्ही काय केले काहीच नाही न तपास केला न फुटलेले पेपर रद्द केले फक्त गोरगरिबांच्या पोरांच्या आयुष्याची बरबादी केली. फडणवीस साहेब तुमच्या कडे जे खाते आहे त्यांचे पेपर सुद्धा फुटले ते सुद्धा आम्हीच पुरावे सकट बाहेर काढले पण तुम्हाला साधा तपास करता आला नाही. अजून हि mahagenco चे बोगस मुले बाहेर काढले नाहीत. मुंबई पोलीस भरती मध्ये आरोपी पकडले गेले नाहीत. कित्येक बोगस पोर आज पोलीस शिपाई म्हणून मुंबई मध्ये काम करताय हे तुम्हाला नाही दिसणार. महाराष्ट्र मधील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना माहित आहे स्पर्धा परीक्षांचे वाटोळे कोणी केले ते याची परतफेड आम्ही नक्की करू. CMO Maharashtra Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dr.Jitendra Awhad Rohit Pawar MAHARASHTRA DGIPR ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Nana Patole Vijay Wadettiwar Shivaani Wadettiwar 🇮🇳 Mohasin @Dhananjay_AAP LoksattaLive ABP माझा TV9 Marathi SakalMedia Sanjay Raut Satyajeet Tambe Devesh Gondane Lokmat

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

59,167 Aufrufe • vor 2 Jahren

समाजाला जागं करणारा प्रश्न - “आपण कोणावर विश्वास ठेवतोय?” वादग्रस्त ज्योतिष **कॅप्टन अशोक खरात** यांच्या संदर्भात समोर येत असलेल्या घडामोडींनी एक गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न समाजासमोर उभा केला आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही लोक त्यांचे स्वागत करताना, फुलांची उधळण करताना दिसतात. पण दुसऱ्या बाजूला गंभीर आरोप, पोलिसांची कारवाई आणि संशयास्पद बाबीही समोर येत आहेत. मग प्रश्न असा - 👉 जर एखाद्या व्यक्तीकडे इतका पैसा, प्रभाव आणि मोठा पाठिंबा असेल, तर तो खरोखर “सच्चा” आहे का? 👉 की हा सर्व फक्त लोकांच्या अंधविश्वासावर उभा असलेला दिखावा आहे? ❗ समाजासमोर उभे राहिलेले महत्त्वाचे प्रश्न 👉 आपण कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवतो? 👉 फक्त गोड बोलणे, भविष्य सांगणे किंवा प्रसिद्धी - हेच विश्वासाचं मापदंड आहे का? 👉 गंभीर आरोप असूनही लोक अशा व्यक्तींच्या पायावर का पडतात? 👉 समाजात शिक्षण आणि माहिती असूनही अंधश्रद्धा का टिकून आहे? ⚠️ अंधविश्वास की वास्तव? अशा प्रकरणांमध्ये अनेकदा लोक भावनिक, आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणींमुळे “कोणीतरी मदत करेल” या आशेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत अनेक भोंदू लोक स्वतःचं साम्राज्य उभं करतात. 👉 मोठे दावे 👉 राजकीय किंवा सामाजिक संपर्क 👉 दिखाऊ जीवनशैली हे सगळं “विश्वासार्हता” निर्माण करण्यासाठी वापरलं जातं - पण ते खरं असतंच असं नाही. 🚨 समाजासाठी महत्त्वाचा संदेश 👉 कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका 👉 संशयास्पद गोष्टी दिसल्यास दुर्लक्ष करू नका 👉 स्वतः जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा 👉 आणि सर्वात महत्त्वाचं - जर अशा प्रकारचा त्रास, फसवणूक किंवा गैरप्रकार तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील कोणासोबत होत असेल, तर त्वरित **नाशिक पोलीस** किंवा संबंधित प्रशासनाकडे तक्रार करा. 🧠 निष्कर्ष हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही - हा आपल्या समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे. 👉 आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली, तरच बदल होईल 👉 जागरूक समाजच सुरक्षित समाज असतो

Shekhar

17,829 Aufrufe • vor 5 Monaten

गोड बोलून केसाने गळा कापणारे “देवेंद्र फडणवीस” किती सहज बोलताहेत मी माझ्या विरोधकांना माफ केलं. माननीय देवेंद्र फडणवीस आज जो काही राजकारणाचा चिखल झालाय तो मागच्या दहा वर्षात झालाय हे आपण विसरताय. सोशल मिडीयावर तुम्हाला ट्रोल केलं यांचे विक्टिम कार्ड खेळताय तर तुमच्या माहितीसाठी सांगतो जी “टीम देवेंद्र” सोशल मिडीयावर नंगानाच करतेय ती कोणाच्या वरदहस्ताने करतेय सांगाल का? आम्ही तर मागच्या दोन वर्षात सोशल मिडीयावर वर ट्रोलिंग सुरू केली. पण मागच्या १२-१५ वर्षांपासून जी भाजप आयटी सेल विरोधी नेत्यांचे विकृतीकरण करत आहे त्यावर तर तुमच्या कधी भावना दुखावल्या गेल्या नाहीत. आज जेव्हा तुमची ट्रेनिंग सुरू झाली तर तुम्हाला विरोधक आणि ट्रोलर दिसायला लागले. खूप जास्त साळसुदपणाचा आव आणला म्हणजे माणूस खूप चांगला होतो असं बिलकुल नाही. मागच्या दहा वर्षात तुम्ही काय थराचे घाणेरडे राजकारण खेळताय ते जाणून आहोत आम्ही. आम्ही शांत तेव्हाच बसू जेव्हा तुमची आयटीसेल शांत बसेल तसं जर होणार नसेल तर मागच्यापेक्षा जास्त ट्रोलिंग केली जाईल.

गजाभाऊ

70,010 Aufrufe • vor 1 Jahr