Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

बळी राजा संतापला तर बाराच्या भावात जाल.

21,479 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

अंधश्रद्धेमुळे अनेक महिलांवर अन्याय होतात, हे तर आपण वारंवार पाहतोच. पण जेव्हा महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांच्या नेतृत्वात असलेले रूपाली चाकणकरांसारखे लोकच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात, तेव्हा परिस्थिती अधिक चिंताजनक होते. अशोक खरात याच्या अटकेनंतर समोर आलेल्या सेक्स स्कँडलच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. तथाकथित “बुवा” संस्कृती, श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण आणि त्यात अडकणाऱ्या महिलांची वेदना – हे वास्तव नाकारता येत नाही. अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलांचे मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे ही केवळ कायद्याची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. परंतु ज्या वेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात आणि कुणाच्या तरी “बुवाचे” पाय धुतात, तेव्हा हा विरोधाभास अधिक ठळकपणे समोर येतो. आज गरज आहे ती अंधश्रद्धेच्या मुळावर प्रहार करण्याची. समाज जागृत झाला, तरच अशा घटनांना आळा बसेल. #अंधश्रद्धा #महिलासुरक्षा #सामाजिकजागरूकता #महाराष्ट्रएपस्टीनफाइल्स #SexScandal #अशोकखरात #रुपालीपाटीलचाकणकर #सत्ताआणिअत्याचार

Vijay Kumbhar

11,041 Aufrufe • vor 5 Monaten

“... मुलांवर हिंदी भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं , अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका. उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला ) येतील.... राज ठाकरे ।

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

16,472 Aufrufe • vor 1 Jahr