Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

भाजपचे खासदार नेहरूंबद्दल बोलत होते तेव्हा तुम्ही गप्प बसले होते. जेव्हा मी नोटाबंदीबद्दल बोलतो तेव्हा तुम्हाला त्रास होतो आहे - टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्देशून 🔥😃

36,817 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

11 Yorum

꧁ R̥ͦ B̥ͦ N̥ͦ ꧂ profil fotoğrafı
꧁ R̥ͦ B̥ͦ N̥ͦ ꧂2 yıl önce

कधी ओम बिरला चे हातवारे बघा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाना खाली बसायला सांगतांना आणि भाषा तर अशी असते की विरोधी पक्षाचे नेते कोणी गुन्हेगार आहेत…

Troomy Nootropics profil fotoğrafı
Troomy Nootropics1 yıl önce

Melatonin + Reishi = Sleep mastered. Troomy Sleep helps you rest easy and wake up refreshed. 💤

Arvind Atale profil fotoğrafı
Arvind Atale2 yıl önce

हा ओम बिर्ला एक नंबरचा ह-रामखोर माणूस आहे सभापती पदासाठी ना-लायक आहे!

Advocate Herambh Shastri profil fotoğrafı
Advocate Herambh Shastri2 yıl önce

मान्यवर हा खुप मोठा बदल आहे. विरोधी पक्ष या आधी काँग्रेसच्या बाजुने कधीही उभा नव्हता त्यामुळेच मोदीच फावल होतो. मोदीने केलेल्या सर्व टिकेची परतफेड होणार अस दिसतय. आता रोज असे किस्से घडणार आहेत.

Sourabh Patil profil fotoğrafı
Sourabh Patil2 yıl önce

Worst Speaker

शेतकरी 🙏🚩 profil fotoğrafı
शेतकरी 🙏🚩2 yıl önce

😂😂

🚩हिंदु 🚩🔅 profil fotoğrafı
🚩हिंदु 🚩🔅2 yıl önce

ममता बाई बांगलादेशी मुस्लिमांना आश्रय देणारा आहे.. 🤔 बांगलादेश नाही बंगाल पूर्व पाकिस्तान बनत आहे.

Bagwan shaboddin profil fotoğrafı
Bagwan shaboddin2 yıl önce

ओम बिरला सोच रहा होगा फालतू में ही स्पीकर बन गया सब धुलाई कर रहे हैं इस बार 😫😫😫

The Witcher profil fotoğrafı
The Witcher2 yıl önce

जो तो बिर्ला जी चं डमरू वाजवून जातो यासाठी च पुन्हा बसवलं का काय माहिती 🤣😂

Arunpawar profil fotoğrafı
Arunpawar2 yıl önce

ओम बिर्ला हे पक्षपाती आहे !

NDH profil fotoğrafı
NDH2 yıl önce

Agadi barobar.👍

Benzer Videolar

लोकशाहीच्या मंदिराला करतो नमन,जनतेसाठी लढत राहीन हे देतो वचन. आज लोकसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस. मायबाप जनतेच्या प्रेमाने खासदार म्हणून जेव्हा सदनात पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हाच मनाशी गाठ बांधली होती की ही खासदारकी धाराशिव मतदार संघाच्या मतदारांनी दिली तिच्यावर पूर्ण हक्क त्यांचाच आहे. या पवित्र सदनात जेव्हा जेव्हा बोलायची संधी मिळाली तेव्हा तेव्हा जनतेशी, शेतकरी बांधवांशी सर्व समाज घटकांशी सबंधित प्रश्न मांडत राहिलो व सरकार बरोबर यथाशक्ती लढा देत राहिलो. आज या लोकशाही च्या मंदिराच्या पायऱ्यांवर नतमस्तक झालो. या पवित्र सदनात प्रामाणिकपणे पोट तिडकीने जनतेचा आवाज हा सरकार पर्यंत पोहचवित राहिलो. हे सदन म्हणजे जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे साधन आहे हे मी जाणून आहे. पैश्याच्या नव्हे तर मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर पुन्हा लढू, पुन्हा जिंकू आणि पुन्हा या सदनात लोकांच्या भावना ,प्रश्न मांडुन न्याय मिळवु असा निर्धार यावेळी केला…! #parlimentofindia #लोकसभा #अधिवेशन

Omprakash Rajenimbalkar

36,914 görüntüleme • 2 yıl önce

सुषमाताई तुमचा व्हिडिओ पाहिला. प्रथमतः ह्या प्रकरणात मी DG श्री सदानंद दाते ह्यांची वेळ मागितली आहे. तुम्हाला काळजी नसावी. आता तुमच्या व्हिडिओ बद्दल…… तुम्हाला फक्त माझ्या विरुद्ध बोलायला फार आवडत असेल. मुद्द्यावर बोलण्या ऐवजी माझ्यावर इतका राग? पण विषय फार गंभीर आहे, माझ्याविरुद्धची लढाई दुसऱ्या दिवशीसाठी ठेवा. मी तुमच्याशी कुठल्याही स्पर्धेत नाही. खरतर तुम्हाला काळजी ह्या गोष्टीची वाटायला हवी होती की १) उपमुख्यमंत्र्यांनी १७ कॉल का केले? ते २१ मिनिट काय बोलले ? ते सत्तेत आहेत, मी नाही. २) रुपाली चकनकरांनी १७७ कॉल का केले? चौकशी व्हायला नको ? ३) सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, संजय शिरसाठ , दीपक लोंढे आणि मिलिंद नार्वेकर ह्यांची चौकशी कधी होणार? काय संबंध होते ह्या सगळ्यांचे ? मी ह्या मुद्द्यावर बोलते, त्या मुद्द्यावर नाही…. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी प्रत्येक मुद्द्यावर बोलत नाही. कारण आयुष्यात कुटुंब, मित्र, आणि इतर जबाबदाऱ्या आहेत. पण जेव्हा एखादा मुद्दा हातात घेते, तेव्हा पूर्ण ताकदीने लढते. फक्त बोलत राहत नाही.

Mrs Anjali Damania

93,442 görüntüleme • 5 ay önce

औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष श्रीमान उद्धव ठाकरेंना आज अचानक हिंदुत्व आठवलं… तुम्हाला हवं तेव्हा हिंदुत्वाचा मुखवटा लावता आणि एरवी तो खुंटीवर टांगवून ठेवता… तुष्टीकरण करत उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना कुठे गेलं होतं हिंदुत्व? पाकिस्तानी झेंडे तुमच्या डोळ्यासमोर नाचवले गेले तेव्हा कुठे गेलं होतं हिंदुत्व? वोट जिहाद करताना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर मशीद उभारण्यापर्यंत घोषणा करताना कुठे गेलं होतं हिंदुत्व? वक्फ बोर्डाला विरोध करायच म्हटलं तर तर मूग गिळून गप्प राहता आणि जेव्हा जनता तुमच्या विरोधात कौल देते तेव्हा जनतेचा कौल अमान्य करायचा ही तुमची जुनी खोड… आता तर म्हणे तुम्हाला सूड घ्यायचा आहे… कोणाचा सूड घेणार तुम्ही? जनतेचा? तुम्ही वारंवार गद्दार खंजीर सारखी भाषणं करत आणि रोज सकाळी माध्यमांवर तुमच्या भोंग्याला सोडणं हा जनतेवर उगवला जाणारा सूडच आहे. बाकी विकास आणि प्रत्यक्ष काम याचा आणि तुमचा काहीही संबध नाही हे जनता देखील जाणते… Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan #बेगडीहिंदुत्व

Chitra Kishor Wagh

51,191 görüntüleme • 1 yıl önce

कालच्या माझ्या भाषणानंतर जे काही मला फोन आले; त्यातील ९९% फोन हे माझे समर्थन करणारे होते. पण, महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती किती प्रबळपणे उभारल्या गेल्यात हे प्रत्येक फोनमधून ध्वनित होत होते. यातील एक वाक्य मला खूपच खटकले, "साहेब, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात." मी माझ्या भाषणातच सांगितले होते की, ' मी वंजारी आहे. मी वाल्मिक कराडच्या विरोधात बोलतोय. तो पण वंजारीच आहे.' यामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आहे. जिथे अन्याय- अत्याचार होतो; त्याविरोधात उभे ठाकलेच पाहिजे.अन्याय करणाऱ्याला जात नसते आणि ज्याच्यावर अन्याय होतो, त्यालाही जात नसते आणि अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यानेही जात तपासू नये. मी भुसावळच्या प्रकरणात मणियार चाचाची बाजू घेतली. तेव्हा अनेकांनी माझे कौतूक केले आणि अनेकांनी माझ्यावर टीकाही केली. पण त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली की, जर मणियार चाचाच्या जागी माझा बाप असता तर मी काय केले असते किंवा तुम्ही काय केले असते? तिथे धर्म आड आला. अनेकवेळा मी दीन-दलित, शोषित- पीडितांची बाजू घेत असतो. तेव्हाही जातीपातीचे राजकारण आड येत असते. वर्षानुवर्ष ज्या समाजावर अन्याय होत असतो; त्या समाजासाठी आपण बोललेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही भूमिका शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतूनच येते. शोषक हा वेगळा आणि शोषित हा वेगळा समाज आहे. आपण कुठल्याही समाजाचे असू पण शोषितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हेच महाराष्ट्राची माती कायम शिकवत आली आहे अन् ही शिकवण मी तरी कधी विसरणार नाही. मी जे काल बोलायला विसरलो ते खाली लिहितोय... * वाल्मिक कराड चप्पल का घालत नाही? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राने जरूर विचारावे. * २०० च्या वर एफआयआर नोंदवणारा वाल्मिक कराड हा एफआयआर नोंदवायला पोलीस स्टेशनला किती वाजता जातो की पोलीस त्याच्या घरी येऊन सह्या घेतात? याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. * प्राजक्ता धस या भगिनीवर अन्याय होतो. न्याय मिळविण्यासाठी त्या वेगवेगळे दरवाजे ठोठावतात.आजही त्या प्राजक्ता धस यांना न्याय मिळत नाही. त्यांना न्याय कोण देणार? आणखी खूप प्रश्न आहेत. बीडमधील खुनांची मालिका ही एखाद्या सिरियल किलरने केलेल्या खुनांप्रमाणे आहे. एखाद्या पुस्तकात जे आपण वाचले असते की, एकाने ४० खून केले; ५० खून केले, नंतर ते उघडकीस आले. असाच एक सिरियल किलर आपणाला ठेचायचा आहे अन् त्या सिरियल किलरचे नाव आहे, वाल्मिक कराड!

Dr.Jitendra Awhad

101,418 görüntüleme • 1 yıl önce

फडणवीस आणि फडणवीसांचे पक्षाच्या आतले आणि पे रोलवर काम करणारे पक्षाच्या बाहेरचे सगळेच म्हणत आहेत की, फडणवीस आरक्षण देणार आहेत. याचा अर्थ ते हे मान्य करतात की फडणवीसांकडे देण्याची कुवत आहे. मग प्रश्न असा उरतो की फडणवीस वाट कसली बघत आहेत ? ते जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी थांबले आहेत का? – फडणवीसा बद्दल अपशब्द वापरू नये असे वारंवार आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडणारे भाजपचे आमदार खासदार बोलत आहे. अपशब्द वापरणे चुकीचे हे मान्यच. पण हेच तत्त्वज्ञान सभागृहामध्ये शंभूराजे देसाई जेव्हा आईबहिणी वरून शिवीगाळ करत होते, अमित साटम अत्यंत गलिच्छ भाषेत अधिकाऱ्यांशी बोलत होता, किंवा काही चित्रविचित्र बायका भर सभेत आयझेड ची भाषा करत होत्या तेव्हा भाजपच्या लोकांना का सुचले नसेल बरे? "मराठा आंदोलनासाठी रिसोर्सेस कोणी उभे केले ते आम्हाला सारं दिसते. मात्र आंदोलनात फायदा पाहणाऱ्यांचं नुकसान होईल" असंही देवेंद्रजी म्हणाले. खरंतर आंदोलनासाठी येणारे लोक पायी, सायकलने, मोटरसायकलवर वडापमध्ये जमेल तसे येत आहेत आणि स्वाभिमानाने पदरमोड करून येत आहेत. पण तरीही देवेंद्रजींनी वरील वाक्य हे नेमके कुणाकडे बघून उच्चारले? काय ते एकनाथ शिंदेंना इशारा देऊ पाहत आहेत का? असेलही कदाचित. आमचं मात्र एवढेच म्हणणं आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी जे गावगाड्यांमध्ये गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत ती वीण उसवण्याचं पाप फडणवीसांनी करू नये. @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #आरक्षणलढा

SushmaTai Andhare

23,868 görüntüleme • 1 yıl önce

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना आज LAW ENFORCMENT AGENCY ने त्यांना त्यांच्या व्यंगचित्रांसाठी नोटीस बजावली. ही आता एक नवीन संस्था जन्माला आलेय, 'कायदा अंमलबजावणी संस्था!' म्हणजे, भारतात अद्याप कायद्याची अंमलबजावणी होतच नव्हती, असे या संस्थेच्या नावावरून दिसतेय. आल्या - आल्या त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच हल्ला केला. सतीश आचार्य यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र हे खूप बोलके असायचे. जसे म्हणतात ना, "जे ना देखे रवी, वे देखे कवी" तसेच आहे. एखादी गोष्ट अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचे साधन म्हणजेच व्यंगचित्र! पण, घाबरवणारी परिस्थिती निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव दिसतोय. कालच मी पत्रकार परिषद घेत असताना, माझ्या घरातच माझ्या समोर एक माणूस शूटींग करीत होता. कालांतराने मला समजले की तो माणूस पोलीस होता. त्या पोलिसाला मी विचारले तर त्याने सांगितले, मला वरिष्ठांनी शुटींग करायला पाठविले होते. एकूणच व्यक्त होणारे जे काही कायदेशीर मार्ग आहेत ते बंदच करून टाकायचे; हा प्रयत्न सरकारचा दिसतोय. त्यामध्ये, लेखक, कवी , पत्रकार या सर्वांचा समावेश केला आहे. आता तर पत्रकारांना मंत्रालयाच्या तळमजल्याच्या वर जाताच येणार नाही. किंबहुना, गेटमधूनच आत येणे मुश्कील होणार आहे. पत्रकारांपासून लपवण्यासारखे मंत्रालयात काय आहे? अशा कुठल्या गुप्त गोष्टी घडणार आहेत की त्या पत्रकारांपासून लपविल्या पाहिजेत. हे जरा अतीच होतंय, इतकी दहशतीची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करू नका. महाराष्ट्राने कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत स्वातंत्र्याला महत्व दिले आहे. संविधानाचा इथे नेहमीच सन्मान केला गेला आहे. या संविधानात समावेश असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा खातमा होईल , अशी कृती महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीला घातक असेल. कारण, सर्वात विद्रोही माणसे महाराष्ट्रात जन्माला आली आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जेव्हा जेव्हा हल्ला झाला तेव्हा तेव्हा क्रांतीची आग भडकली आहे.

Dr.Jitendra Awhad

25,110 görüntüleme • 1 yıl önce

भाटाललेला बहुजन समाज नीट शेवटपर्यंत वाचा…! गणपती बप्पा बुध्दी व ज्ञानाची देवता मानली जाते पन भक्तांना दोन्ही गोष्टी द्यायला बप्पा कमी पडतोय आसं एकंदरीत दिसंतय…! तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांचे विचार समजत नाही तुम्हाला संत गाडगेबाबा, महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे यांनी काय लिहून ठेवलंय ते खरं वाटत नाही पन आत्ताच्या बाबा पुरंदरे यांनी सोईनुसार लिहिलेला इतिहास खरा वाटतो हे दुर्दैव आहे…! खालच्या पोस्टमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी गणेशोत्सव कसा व कोणी कशासाठी चालू केला हे त्यांनी सांगितले आहे व छत्रपतींच्या काळात गणेशोत्सव होत नव्हता असे सांगितले आहे ना की गणपतीच नव्हता ते….! 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ पण आपले महान ज्ञानी भक्त आले पुरातन गणपती मुर्ती व शिवकालीन शिलालेख घेवून व लागले कोकलायला…! गणपतीचा पहिला उल्लेख हा ऋग्वेद ह्या प्राचीन संस्कृत ग्रंथात आहे हे पन 99.99 टक्के भक्तांना माहित नसेल तर 'अग्निमीळे पुरोहितम्' हा पहिला मंत्र त्याचा आहे तुम्हाला अलिकडच्या काळातील गाडगेबाबा व प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाचा अर्थ समजत नसेल तर प्राचीन वेद पुराण, गाथा, ज्ञानेश्वरी वगैरे काय घंटा समजणार…! ह्या पोस्टमुळे माझ्यावर सगळा बहुजन समाज टिकास्र घेवुन तुडून पडला होता पन एक पन सुशिक्षित बामन त्या पोस्टखाली आला नाही कारण त्यांना सत्य इतिहास माहित आहे त्यामुळे ही पोस्ट कोणीच खोडुन काढु शकले नाही कारण मी काय माझ्या मनाने लिहिले नाही माझ्या प्रत्येक लिखानाला आधार असतो हे समजुन घ्या..! मी सांगितले होते की पुण्यात गणपतीची पहिली मिरवणूक ही बामनांनी काढली होती व त्यात एका चांभाराच्या मुलाने गणपतीला हात लावला तेंव्हा टिळकांनी त्याचे विसर्जन केले तेव्हा ही प्रथा पडली..! तुम्हाला जर गाडगेबाबा व प्रबोधनकारांनी नेमकं काय सांगितलं आहे हेच कळाले नसेल तुम्ही किमान ज्यांचा इतिहासात अभ्यास आहे त्यांचे तरी ऐकावे नाहीतर गणेशोत्सवात काळात दहा दिवस इतिहास व साहित्यिक भाषेचा अभ्यास करावा …! 🤣🤣 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 #येड्याचा_बाजार #BoycottINDvPAK #INDvsPAK #आंधश्रध्दा

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

11,615 görüntüleme • 11 ay önce

हे केवळ संसद भवन नाही. 140 कोटी लोकांच्या आस्थेचे मंदिर आहे. त्याच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणे म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखे आहे. मी त्यांना विचारतो - 🔻इंदिरा गांधीजींनी ज्यावेळी संसदेच्या ॲनेक्स बिल्डिंगचे उद्घाटन केले तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही घातला? 🔻इंदिराजींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचे उद्घाटन केले, तेव्हा ते राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही? 🔻राजीव गांधीजी यांनी संसदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन केले, तेव्हा राष्ट्रपतींची आठवण का नाही झाली? 🔻एवढेच नाही तर तामिळनाडूमध्ये तिथल्या विधानभवनाचे उद्घाटन करताना राज्यपाल नव्हते. सोनियाजी होत्या. 🔻नितिशकुमारजींनी बिहार विधानभवनाच्या सेंट्रल हॉलचे उद्घाटन केले. त्यावेळेस बहिष्कार का नाही घातला? त्यावेळी सांगायचे होते राज्यपालांनी उद्घाटन करावे, नितिशजींनी करू नये. 🔻किंवा यूपीएचे सरकार असताना मणिपूरच्या इम्फाळमध्ये मनमोहनसिंग आणि सोनीयांजींनी तिथल्या विधानभवनाचे उद्घाटन केले. तेव्हा ते तिथल्या राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही? 🔻तरूण गोगोईजींनी 2014 साली आसामच्या विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रितदेखील केले नाही. 🔻2014 मध्ये झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रित देखील केले नाही. 🔻2018 मध्ये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांच्या हस्ते का नाही केले? 🔻2020 मध्ये सोनियाजींनी छत्तीसगडच्या विधानभवनाचे भूमिपूजन केले. सोनियाजी त्यावेळी कोणत्याही वैधानिक पदावरच नव्हत्या. त्या केवळ एक संसद सदस्य होत्या. मग त्या वेळी या सगळ्या पक्षांनी बहिष्कार का टाकला नाही. 🔻ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या विधानसभेच्या ज्युबिली मेमोरियल बिल्डिंगचे उद्घाटन केले. राज्यपालांना साधे निमंत्रणही दिले नाही. 🔻अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले. उपराज्यपालांना साधे निमंत्रणदेखील दिले नाही. 🔻तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रण देखील दिले नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. ज्यावेळी हे लोक उद्घाटने करतात, त्यावेळी लोकतांत्रिक. आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी रेकॉर्ड वेळेत नवीन संसद भवन तयार केले, त्याचे उद्घाटन होत आहे. एक लक्षात आणून देतो. आत्ताचा जे संसद भवन आहे, तो कौन्सिल हॉल होता. पहिल्यांदा देशात पूर्ण क्षमतेचे संसद भवन तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मोदीजी करत आहेत तर त्याच्यावर बहिष्कार का? हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत. सत्तेचे सौदागर आहेत. मोदीजींचा मुकाबला करू शकत नाहीत, म्हणून सगळे एकत्र आले आहेत. पण माझा यांना सवाल आहे, एवढी उदाहरणे मी दिली. त्यावेळी बहिष्कार का टाकला नाही, याचे पहिल्यांदा उत्तर द्या. हे लोकशाहीविरोधी लोक आहेत ❗️❗️❗️ #MyParliamentMyPride #NewParliamantBuilding #NarendraModi Narendra Modi #SengolAtNewParliament

Devendra Fadnavis

115,862 görüntüleme • 3 yıl önce

बिल्डर मित्रासाठी Devendra Fadnavis आणि महापालिका आयुक्तांचा यू-टर्न महापालिका प्रश्नावर दबाव इतका मोठा होता की अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्याच खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर विरुद्ध भूमिका घेतली होती. याच महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाने २४ जून २०२२ रोजी आदेश जारी केले होते, ज्यात २००९ मध्ये दर्शन डेव्हलपर्सला दिलेली तीच एनओसी रद्द करण्याची मंजुरी दिली होती. तेव्हा जोरदार युक्तिवाद केला होता की ती एनओसी डीसी तरतुदींच्या विरोधात होती आणि सार्वजनिक हिताची नव्हती. त्यानंतर २७ जून २०२२ रोजी बीएमसीने एसआरएला एनओसी रद्द करण्याचे कळवले होते. बीएमसीनेच हे देखील निदर्शनास आणले होते की, या प्रकरणात, सुधार समितीची संमती आणि ठरावाशिवाय भूखंडाची विल्हेवाट लावण्यात आली होती, जे बेकायदेशीर आहे. बीएमसीच्या अंतर्गत दक्षता अहवालातही असे म्हटले होते की एसआरए प्रस्ताव ना बीएमसीच्या हिताचा आहे, ना व्यापक सार्वजनिक हिताचा. या प्रस्तावाबाबत केवळ आयुक्तांनीच नाही तर संबंधित प्रत्येक विभाग आणि अधिकाऱ्यांनी या भूखंडावर झोपडपट्टी योजनेला विरोध केला होता आणि एनओसी रद्द करण्याची मागणी केली होती. आयुक्त गगराणी किंवा उपायुक्त किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याने, आपली भूमिका १८० डिग्री मध्ये का बदलली याचे फाईलवर कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रश्न असा आहे की, यापूर्वी बीएमसी आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग, ज्याच्या मालकीची ही जमीन आहे, त्यांना जो प्रस्ताव अस्वीकार्य होता, तो रातोरात स्वीकारार्ह कसा झाला? 👉 काय खेळ झाला? 👉 बिल्डरच्या प्रस्तावासाठी कोणी दबाव आणला? 👉 आयुक्तांवर कोणी दबाव आणला? 👉 यामागे कोण आहे? मुख्यमंत्र्याच्या यू-टर्न महापालिकेच्या नोंदींवरून असे दिसून येते की खुद्द Devendra Fadnavis जी यांनी जानेवारी २०१३ मध्ये, म्हणजेच जेव्हा ते विरोधी पक्षातील आमदार होते तेव्हा त्यांनी बीएमसीकडे तक्रार केली होती, ज्यात हा एसआरए प्रकल्प रद्द करून भूखंडाचा विकास बीएमसीने स्वतःच करावा अशी मागणी केली होती. म्हणून, मी Devendra Fadnavis जी यांना थेट प्रश्न विचारते... २०१३ पासून आता काय बदलले आहे? तुमचे हृदयपरिवर्तन का झाले?माझी Mumbai, आपली BMC चा मोक्याचा भूखंड एका खाजगी बिल्डरच्या हातात का सोपवला जात आहे? यामध्ये असे ही दिसते की ४ डिसेंबर २०१४ रोजी, तत्कालीन सुधारणा समितीच्या अध्यक्षा, भाजपच्या उज्ज्वला मोडक ताई, यांनी Ashrafazmi यांच्या तक्रारीवर कारवाई करत, २००९ ची एनओसी रद्द करण्याच्या बाजूने निर्णय दिला होता. मग आता निर्णय का बदलला? #JuhuLandScam #MitrjiviSarkar #MumbaiLootExposed #MukhyamantriLadkaMitraYojana #LandScam

Prof. Varsha Eknath Gaikwad

28,044 görüntüleme • 11 ay önce

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार श्री. राजू पाटील यांच्या प्रचारार्थ मी आज शुभारंभाची सभा घेतली. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे- १) आज आमचे आमदार श्री. राजू पाटील यांच्या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. आज व्यासपीठावर आमचे उल्हास भोईर, भगवान भालेराव आणि संगीताताई चेंदवणकर उपस्थित आहेत. संगीताताईनी बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यामुळे ती भयानक घटना महाराष्ट्राच्या समोर आली, आख्ख प्रशासन हललं. त्यांनी जे काम केलं त्याची शाबासकी म्हणून त्यांना मी विधानसभेची उमेदवारी दिली. २) मी तुमच्याकडून हमी घ्यायला आलोय की जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही विजयी कराल. हे सगळं कशासाठी तर महाराष्ट्राची आज जी अवस्था आहे ती बदलण्यासाठी. २०१९ ला युतीत कोण होतं, आघडीत कोण होतं आता युतीत कोण आहे आघाडीत कोण आहे काहीच कळत नाहीये. गेल्या ५ वर्षात जे घडलं त्याची मतदारांनी उजळणी केली पाहिजे. कोणी कुठेही गेलं, पण आमचा राजू विधानसभेत एकटा होता, आणि मला राजुचा अभिमान आहे की माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. ३) २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजप यांच्यासमोर कोण तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मग निकाल लागले, मग सकाळी एक शपथविधी झाला, ते लग्न १५ मिनिटांत तुटलं, कारण काकांनी डोळे वटारले मग हे आले घरी काका मला माफ करा म्हणत. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोरबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. कारण काय तर अमित शाह यांनी मला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. तुमच्यासमोर जर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मग तेंव्हाच का नाही आक्षेप घेतलात ? २०१९ चा निकाल लागेपर्यंत गप्प बसले आणि जेंव्हा लक्षात आलं की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही तेंव्हा यांनी अडीच वर्षांचा मुद्दा बाहेर काढला. ४) उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यावर त्यांनी सन्माननीय बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट करणं बंद केलं. होर्डिंगवर पण हिंदुहृदय सम्राट असा उल्लेख करणं बंद केलं. काही ठिकाणी होर्डिंगवर तर उर्दूत त्यांनी चक्क जनाब बाळासाहेब ठाकरे पण लिहिलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतके खाली गेलात तुम्ही ? ५) मग हे गेले काँग्रेसबरोबर, यांची अडीच वर्ष संपली आणि यांना यांचे चाळीस कुठे गेले हे कळलंच नाही. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. त्यांच्याकडे गुप्तचर विभाग रोज काय चाललं आहे हे सांगत असतात तरी मुख्यमंत्र्यांना कळलं नाही. या चाळीस जणांना घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणि त्यातल्या त्यात अजित पवारांबरोबर बसताना आमचा श्वास कोंडतो. मग पुढे अचानक अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून बाहेर पडले आणि इथे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. काय राजकारण सुरु आहे ? महाराष्ट्रात इतके ज्वलंत प्रश्न सुरु असताना हे सगळे हवं तसं वागतात कारण तुम्ही चिडत नाही, शांत लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असतात. महाराष्ट्रातील जनता आम्ही कसेही वागलो तरी आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची खात्री आहे त्यांना. ६) पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता काही वाटत नाही या लोकांना. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तरीही तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला... ७) फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती सन्माननीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही ? माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीये. महाराष्ट्राची किती वैचारिक घसरण झाली आहे ? देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा ? ८) आत्ता मी एक क्लिप पाहिली... मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावरती एक बाई भोजपुरी गाण्यावर लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून नाचत आहे... ही लाडकी बहीण योजना ? व्यासपीठावर बायका आणून नाचवणं हे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये व्हायचं, हे आपल्याकडे कधीपासून सुरु झालं ? ९) महाराष्ट्रातले प्रश्न प्रलंबित असताना आपल्याकडे चेष्टा सुरु आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रासाठी जागा रहा. आपल्याकडे त्या ओळी आहेत ना महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले।अनेकांचा डोळा आहे हे राज्य मारण्यासाठी. महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी सुरु आहेत त्या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत. मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून माझ्या हाती सत्ता द्या. १०) राजू पाटील यांनी कोव्हीड काळात खूप काम केलं. तुमच्या सगळ्यांसाठी झगडणारा राजू आहे, त्याला भरघोस मतांनी निवडून द्या. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

51,754 görüntüleme • 1 yıl önce

विदर्भाचा कुणबी न्याय मराठवाड्याला द्या —-विश्वास पाटील भारताचे पहिले कृषिमंत्री आणि विदर्भाचे भाग्यविधाते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन वऱ्हाडातील सर्व मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून करून घेतल्या. त्यांच्या या आग्रहासाठी त्यानी मुख्यत: ब्रिटिश इंडियामध्ये झालेल्या 1881, 1891, 1901, 1922 पर्यंतच्या सलग नोंदींचा व महसुली पत्रकातील काही पुराव्यांचा आधार घेऊन मोठ्या प्रमाणात सातबारा सदरी नोंदी करून घेतल्या. 1901 ची ब्रिटिशांनी जी जनगणना केली. त्यानुसार विदर्भामध्ये एकूण कुणब्यांची संख्या आठ लाख 28 000 होती. मराठ्यांची वेगळी संख्या चांदा म्हणजे आजच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधराशे आणि नागपूर जिल्ह्यात 11000 अशी एकूण साडे पंधरा हजार होती. तर तेव्हाच्या सीपी बेरर भागातील जिल्ह्यातील कुणब्यांची 1901 च्या जनगणनेनुसार व ब्रिटिश इंडिया गव्हर्मेंटने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या अनेक गॅजेटिअरयांचा आढावा घेता व पडताळणी करता ती कुणब्यांची संख्या खालील प्रमाणे येते. बुलढाणा जिल्हा एक लाख 62 हजार, नागपूर एक लाख 52 हजार, वर्धा 76000, चांदा 95 हजार, अमरावती एक लाख 59 हजार , भंडारा 79 हजार, यवतमाळ एक लाख पाच हजार. म्हणजेच तेव्हाच्या विदर्भातील 39 लाखापैकी आठ लाख कुणबी होते. ज्यांचे वंशज आज आरक्षणाचा फायदा घेत आहेत. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख हे राज्यघटनेच्या घटना समितीचे सन्माननीय सदस्य होते. त्यांनी22 नोव्हेंबर 1949 या दिवशी #पंडित_जवाहरलाल_नेहरू आणि डॉक्टर #बाबासाहेब_आंबेडकर यांच्या साक्षीने त्या कॉन्स्टिट्यूट असेंबली मध्ये असे म्हटले होते की, “ I would say that it would be very desirable that the sympathy which we show towards the scheduled castes and scheduled Tribes should also in a measure be extended to these people who have yet to see any benefits accruing from the freedom that we have achieved.” हाच समाज उपयोगी दृष्टिकोन पंजाबरावांनी पुढे जन्मभर सांभाळला. 19 57 मध्ये आमच्या कोल्हापूरच्या जुना राजवाडा पाठीमागच्या भवानी मंडपच्या पटांगणावर अखिल भारतीय मराठा परिषद भरली होती. त्या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव होते. तेव्हा पंजाबरावांनी अलीकडे मराठ्यांनी लग्नाच्या बाजारात उठाठेव करण्यासाठी आपल्या कागदपत्रातील #कुणबी या नोंदी ज्या कमी करण्याचा उद्योग चालवलेला आहे तो तात्काळ बंद करावा असा मुद्दा मांडला. त्या महासभेचे आयोजन कोल्हापुरात तेव्हा राजश्री शाहूंचे वंशज शहाजी महाराज यांनी केले होते. या सभेमध्ये तेलंगणाकडील सोनडूरचे संस्थानिक व जतचे महाराज या दोघांनी या कल्पनेला विरोध केला. तेव्हा भाऊसाहेबांनी मराठा समाजाला कळकळीने जाणीव करून दिलेली होती की, “वेळेत जर तुम्ही तुमच्या नोंदी जपल्या नाहीत तर एक दिवस कुणबी मराठ्यांना भिकेचे दिवस लागतील.” पण दुर्दैव आमचे #मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचे, इथे सहकाराचा गजर करत साखरेचे आणि दारूचे मोठमोठे कारखाने उभे करणारे हरिहर जन्माला आले. परंतु पंजाबरावांसारखा दृष्टा नेता व विचारी कल्पवृक्ष आम्हाला मिळाला नाही, हे आमचे दुःख आहे. आमच्या राजकारण्यांच्या सोबतीला पुरोगामी महाराष्ट्राचा डफ वाजवणारे अनेक साहित्यिक व विचारवंत राजकारभारात पुढे पुढे करत. पण याच विचारवंतांनी व साहित्यिकांनी गरीब कुणबी मराठ्यांचे जे अतोनात नुकसान केले आहे, तो संशोधनाचा वेगळा भाग जितका मनोरंजक तितकाच गरिबांच्या काळजाला डागण्या देणारा भयंकर प्रकार होता , हे मी पुरेशा जबाबदारीने सांगतो आहे. —#विश्वास_पाटील. The Times Of India Pudhari News SaamTV News TV9 Marathi @News18lokmat ABP Majha Live #vishwaspatil #PanjabraoDeshmukh #KumbhiMarathas #VidarbhaHistory #MarathaRights #AgriculturalJustice #MarathaCommunity #SocialJustice #HistoricalInjustice #MarathaUnity #RuralDevelopment #VidarbhaVoices #MarathaStruggles #IndianAgriculture

Vishwas patil

13,771 görüntüleme • 1 yıl önce

एक चूक आणि तिचे आयुष्य उद्धवसत.. मी हादरुन गेलो... #सातारा पाटण, सोनवडे : सौ. गौतमी शशिकांत पाटील यांची कुटुंबं नियोजन शस्त्रक्रिया चुकीची झाली. तिला त्रास होतोय हे ओरडून सांगत असताना डॉक्टरांनी हात पाय बांधून तोंडात बोळा घालून निर्दयी पणे अनेक तास ऑपरेशन केले. ऑपेरेशन झाल्यावर ती शुद्धीवर आल्यावर पुन्हा जोरात पोटात दुखायला लागले. डॉक्टरांनी सलाईन मधून पेनकिलर दिले आणि दोन दिवसाने तिला डिस्चार्ज सुद्धा दिला, पुन्हा दुखायला लागलं पुन्हा आणलं पुन्हा तेच सलाईन दिले. हे सगळं घडलं सोनवडे सरकारी रुग्णालय येते, डॉ. ननावरे, डॉ. डुबल यांच्या हलगर्जीपणामुळे जे घडलं ते ऐकून मी स्तब्ध झालो. आता त्यांच्या लक्ष्यात आलं कि काही खरं नाही तेव्हा सरकारी ऍम्ब्युलन्स मधून पाटण ला सोनोग्राफी साठी आणलं. तेथील डॉक्टरने पोट फुगलेले पाहून कराड गाटायला लावले. त्याच गाडीतून पेशन्ट नर्स सोबत सहित कराड येथील कॉटेज कुटीर हास्पिटल ला घेऊन गेले तिथेही केवळ पेनकिलर दिले. आता फरक कशाचाच पडत नव्हता, असाहाय वेदना वाढतच गेल्या, ज्यामुळे त्यांचं ऑक्सिजन लेव्हल कमी झालं आता गरज पडली व्हेंटिलेटरची तेव्हा सातारा सिव्हिल ला भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सोनवडे सरकारी रुग्णालय ते सातारा सिव्हिल रुग्णालय इथपर्यँतचा प्रवास झाल्यावर कुटुंब समजून गेले कि हे कुणीच सोनोग्राफी करत नाहीत तेव्हा त्यांनी खाजगी दवाखान्याचा सहारा घेतला सह्याद्री हॉस्पिटल कराड येते नेलं. त्या हॉस्पिटलने परिस्तिथी पाहून पेशन्ट सिरीयस आहे म्हणत त्यांना कृष्णा हॉस्पिटल ला नेण्याचा सल्ला दिला. आता तेथेही पेशन्टची गंभीर स्तिथी पाहता सांगलीला भारती हॉस्पिटल ला नेले. तिथे पेशन्ट ऍडमिट केल आणि इलाज करणायास सुरवात झाली. यात दोन तिला जाणवत होतं कि माझ्यासोबत काही तरी चुकीच घडलंय. तिला पोटात पुन्हा वेदना सुरु झाल्या आणि आता तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रवास सुरु झाला. यात दोन दिवसाचा कालावधी गेला. या हॉस्पिटलला पेशन्टचे तपासणी केले. या तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली. पोटात आताड्याला भोक पडून सगळीकडे इन्फेकशन झालं आणि त्यामुळे किडनी आणि लिव्हर ला मोठे इन्फेकशन झालं आहे. त्यामुळं या डाक्टरांनी ऑपेरेशन करण्याचा निर्णय घेऊन ऑपरेशन केले. डॉक्टरांनी स्पष्टपने सांगितले कि कुटुंबं नियोजन ऑपरेशन चुकीचे झाले म्हणून तिच्या पोटातली ट्यूब काढून टाकली. त्यानंतर सुद्धा त्रास थांबलेला नाही. ही घटना चिमूटपणे 20 मे ते आजपर्यँत कुटुंबं सहन करत आहे. डॉक्टरांनी तीन महिन्याने पुन्हा दुसरे ऑपरेशन करन्याचा सल्ला दिला आहे. हा अन्याय माझ्या कानावर आला मी तात्काळ सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांना हे प्रकरण समजून सांगितलं. या जिगरबाज वाघाने तात्काळ पीडित कुटूंबाची भेट घेतली आणि आंदोलन सुरु केले. गेली पाच दिवस आंदोलन सुरु होते, पाऊस येत होता पण हे वाघ पाण्या पावसात बसून राहिले. उपोषण सुरूच ठेवले,हि घटना खूप गंभीर होती म्हणून अतिशय मोठा संघर्ष केला. आदित्य गायकवाड यांनी अखेर आज एक जणांच्या निलंबनाची लढाई जिंकली आणि दोन जणांचे निलंबनसाठी चौकशी लावली. गौतमी शशिकांत पाटिल अखेरच्या घटका मोजत आहे. इन्फेकशन एवढं वाढलं कि तिला मी जगणार नाहि अशी खात्री झाली. लेकरं, नवरा ती रडत असतात. आणि इकडे तिचे आयुष्य एका क्षणात उद्धवस्त करणारे आरोपी मोकाट आहेत. ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. तात्काळ आरोपी निलंबीत करावे, राज्यसरकारने आरोग्य मंत्र्यांनी दखल घेऊन या मुलीला मोठ्या दवाखान्यात इलाज करून वाचवणयाचे प्रयत्न करावेत. पीडित कुटुंबंला शासकीय 25लाख रुपये शासकी य मदत द्यावी. पावसात लढून एक जणांचे निलंबन करायला भाग लढणाऱ्या वाघाना जयभिम! ताई तू खचू नको, तुझा भाऊ तुझ्यासोबत आहे... फक्त तू खचू नको CMO Maharashtra Devendra Fadnavis Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Rupali Chakankar #JusticeForGautami

Deepak Kedar

109,441 görüntüleme • 2 yıl önce

साक्षात वाघिणींशी कुस्ती खेळणाऱ्या मुली आणि वाघिणीचं बाळंतपण पार पाडणारी सातारची बहाद्दर माणसं! अमीर खानच्या “दंगल” सिनेमाच्या आधीही 100 वर्षांपूर्वी भारतीय मातीतील बहाद्दर मुलींनी उडवलेली ‘अपूर्व दंगल’! — विश्वास पाटील “साहेब, बाळंतपणाच्या बाजल्यावर तडफडणाऱ्या लेकीची काळजी घेताना जसा तिच्या आईच्या पोटात गोळा उठतो, अगदी तसंच बघा लेकुरवाळ्या होणाऱ्या वाघिणींना जीव लावत आम्ही बाळ-बाळंतिणीचा जीव वाचवत होतो बघा,” असा विलक्षण थरारक जीवनानुभव घेणारी माणसं जेव्हा भेटतात, तेव्हा माझ्या “द ग्रेट कांचना सर्कस” सारख्या कलाकृतीचं आपोआप मोल वाढतं. म्हणूनच ह्या सह्याद्रीच्या बहाद्दर स्त्री-पुरुषांचा साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजांच्या हस्ते मी सत्कार करायचा मुद्दाम घाट घातला होता. तो सुंदर सोहळा अनेकांच्या मनावर ठसून गेला आहे. गेल्या शतकाच्या सुरुवातीला खडकलाटच्या गुलाब शिंदे या नावाच्या शेतकऱ्याची मुलगी तारा शिंदे ही चक्क वाघाशी कुस्ती खेळायची. शाहू महाराजांनी तिला हत्ती आणि घोडी देऊन तिचा सत्कार केला होता. तेव्हा तिची सर्कस सिंगापूर, जपान, जर्मनीपर्यंत खेळून आली होती. याशिवाय लाहोरची रेवा रखी, जी ए. सर्कस ऑफ बॉम्बेमध्ये काम करणारी जमेला, तासगावच्या जगप्रसिद्ध परशुराम लायन सर्कसमध्ये वाघिणीच्या जबड्यात डोकं देणारी छबुताई, कागवाडच्या ग्रेट कर्नाटक सर्कसमध्ये वाघिणींशी खेळणारी बिबा या साऱ्या सर्कसबालांनी इतिहास निर्माण केला आहे. नुकताच मी चाळीसगावला जाऊन सुमन या श्रेष्ठ सर्कसबालेला भेटून आलो. सुमनजींनी आपल्या आयुष्याची साठ वर्षं सर्कशीला वाहिली होती. मनुष्यप्राणी आणि जंगलातले प्राणी यांच्या गहिऱ्या नात्याचा वेध मी माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “ग्रेट कांचना सर्कस” या कादंबरीमध्ये घेतलेला आहे. भारतीय साहित्यात या आधी असा प्रयत्न “जंगल बुक” मध्ये झाला होता, पण “जंगल बुक”मधले प्राणी हे कल्पित होते. माझ्या सुदैवाने लेखक या नात्याने मला ही आगीशी आणि जीवनातील भयानक संकटांशी, जीवघेण्या खेळात रमलेली माणसं प्रत्यक्ष भेटली. गेली अनेक वर्षं ती भेटत होती. त्यांचं ते मुलखावेगळं आयुष्य मी माझ्या “कांचना”मध्ये मांडलेलं आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावं. श्रेष्ठ भारतीय कादंबरीकार मृदुला गर्ग यांनी “कांचना” ही भारतीय साहित्यातील अपूर्व कलाकृती असल्याचं या आधीच लिहिलं आहे. मराठीत येण्यापूर्वी “ग्रेट कांचना सर्कस” दिल्लीच्या वाणी प्रकाशनमार्फत दहा महिन्यांपूर्वीच प्रकाशित झाली होती. वाचकांनी तिचा जरूर लाभ घ्यावा. आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबद्दल नुकताच साताऱ्यात माझा जो सत्कार झाला, त्या परिसरातील 80 ते 90 च्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्व बहाद्दर सर्कसवीरांना मी माझ्यासोबतच सत्कारासाठी बोलावलं होतं. वाचकांना “ग्रेट कांचना सर्कस” ही मॅजेस्टिकच्या साइटवर तसेच अक्षरधारा बूक गॅलरीच्या सांकेतिक स्थळावर उपलब्ध आहे. ती वाचून मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. Akshardhara Vani Prakashan #Vishwaspatil #akshardharabookgallery #vaniprakashan #GreatKanchanaCircus #LegendaryPerformers #BraveWomen #CircusHistory #IndianCircus #FearlessGirls #TaraShinde #SumanCircus #SatyaraHeroes #MustReadBook #CircusLegends

Vishwas patil

13,974 görüntüleme • 10 ay önce

कसबा विधानसभेचे उमेदवार श्री. गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ पुण्यात कसबा पेठेत सभा घेतली. त्यात मांडलेले मुद्दे १) माझ्यासाठी कसब्याचं वेगळं महत्व आहे. मी जेंव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो आणि महाराष्ट्राचा दौरा केला आणि पक्षाची स्थापना केली, त्यावेळी कसबा गणपतीची पूजा करून पक्षाची स्थापना केली होती. याचं कारण या जागेचं महात्म्य. या जागेचं महत्व काय आहे समजून घ्यायला हवं. शहाजी राजांनी जेंव्हा बंड केलं ते बंड मोडण्यासाठी संपूर्ण पुणे उध्वस्त केलं. मग शहाजीराजे आदिलशाहीकडे गेले आणि नंतर कित्येक वर्ष शाहजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब बंगलोरला राहिले. पुढे जेंव्हा महाराज आणि जिजाऊ महाराज इकडे परत आले. इथे लाल महाल बांधला गेला. तेंव्हा इकडे आपलं देऊळ नव्हतं. जिजाऊ महाराजा २) या भागाने अख्ख्या हिंदवी प्रांतावर जवळपास एक शतक राज्य केलं. पण आपण आपला इतका दैदिप्यमान इतिहास विसरलो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्यांच्या जयंतीलाच आठवतात. परदेशात बघा लहान लहान मुलांना कसा त्यांचा इतिहास शिकवला जातो. ३) ज्या कस्ब्याचा इतिहास इतका दैदिप्यमान आहे आज त्या कसब्याची परिस्थिती किती भीषण आहे. इतक्या छोट्या गल्ल्या, कशीही पसरलेली वस्ती. पण तुम्हाला काहीच वाटत नाही. ४) आज मी उमरखेडला गेलो, तिकडे मी बोललो की या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या उमरखेडला झाली त्यावर लोकांनी टाळया वाजवल्या. काय झालंय लोकांना ? आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाबद्दल पण आपल्याला सहानभूती नाही वाटत. काय झालं आहे या महाराष्ट्राला? ५) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची कारकीर्द संपायच्या आधी १० दिवस असताना एक कायदा केला, की युद्धावरती जे कुत्रे बॉम्बचा शोध घेण्यासाठी पाठवले जातात त्या कुत्र्यांना युद्धाच्या ठिकाणी जखमा झाल्या किंवा तो अपंग झाला तरी त्याला अमेरिकन भूमीत परत आणलं पाहिजे, कारण काय तर तो कुत्रा पण अमेरिकन नागरिक आहे. कुत्र्यांचा पण जगभरात सन्मान होतो आणि भारतात नागरिकांना पण किंमत दिली जात नाही. काय अवस्था झाली आहे आपली ? ६) आज पुण्यात मेट्रो, फ्लायओव्हर बनत आहेत, पण ही प्रगती नाही. पुणे शहर आतून पोखरले जातंय. आज पुण्यात हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, बागा नाहीत, चालायला धड रस्ता नाही, मला सांगा तरीही तुम्ही कसं म्हणू शकाल की पुण्याची प्रगती झाली म्हणून ? ७) २०१९ ला आधी अजित पवारांचा शपथविधी झाला, पण ते लग्न पंधरा मिनिटं नाही टिकलं, काकांनी डोळे वटारले आणि अजित पवार परत आले. पुढे उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसले. मग शिंदेंना म्हणे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना घुसमट होते म्हणून शिंदे ४० आमदार घेऊन गेले, बरं हे जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला नकोसं वाटत होतं तेच अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यायच्या आधी १० दिवस नरेंद्र मोदी म्हणाले होते की ७०,००० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकू, पण पुढे १० दिवसांत जेलमध्ये टाकायच्या ऐवजी त्यांना उपमुख्यमंत्री केलं. ८) माझ्या पक्षाने जितकी आंदोलनं केली तितकी आंदोलनं कोणी केली ते सांगा? मोबाईलवर जे मराठी ऐकू येतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कानफटीमुळे सुरु झालं. मी मोबाईल कंपन्यांना सांगितलं की ४८ तासाच्या आत मोबाईलवरमराठी ऐकू यायला पाहिजे आणि ते करून घेतलं. हे का नाही इतर कुठल्या पक्षांना सुचलं ? ९) मी मराठीपण सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. मी जितका कडवट हिंदुत्ववादी आहे तितका कडवट मराठी आहे. इतर भाषिक लोकं किती कडवट असतात. मी सिंगापूरला गेलो होतो तेंव्हा एका दुकानात एक तामिळ बाई तमिळ रेडिओ ऐकत होती. आपण असं करू कधी ? महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो देशात कुठल्याही प्रांताला नाही. आपण भाषेबद्दल कडवट नाही, इतिहासाबद्दल आपल्याला प्रेम नाही. १०) काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत मी फोटो पाहिले की रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेश, बिहार मधून आलेली मुलं झोपली आहेत. मग जरा चौकशी केली तेंव्हा कळलं की ती रेल्वेभरतीसाठी आली आहेत. बरं रेल्वेभरती महाराष्ट्रातील पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्राच्या बाहेर. मग असं का म्हणून आम्ही संघर्ष केला, त्या संघर्षानंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या परीक्षा मराठीत घ्यायला सुरुवात झाली आणि हजारो मराठी मुलांना रेल्वेत नोकरी मिळाल्या. ११) मराठी पाट्या होत नव्हत्या, आमच्या आंदोलनामुळे त्या झाल्या. मी त्या आंदोलनाच्या वेळेस त्यांना एक पत्र लिहिलं, त्यात लिहिलं की दुकान महाग आहे का पाटी महाग आहे का हे ठरवावे आणि शेवटची ओळ लिहिली की तरी पण तुम्ही पाट्या मराठीत नाही केल्या तर माझे महाराष्ट्र सैनिक त्यांना भेटायला येतील. पाट्या झाल्या मराठीत. १२) मशिदींवरचे भोंगे उतरवले पाहिजेत म्हणून मी आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मी सरकारला समज दिली की मशिदींवरचे भोंगे नाही उतरवलेत तर माझे महाराष्ट्र सैनिक मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा लावतील. त्यावर उद्धव ठाकरेंनी भोंगे उतरवायच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मशिदींवरचे भोंगे उतरवायचा ऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर केसेस टाकतो ? १३) राहुल गांधींना एका सभेत खासदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत होत्या तर राहुल गांधी सरळ दुर्लक्ष करून निघून गेले. आपल्या महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही निवडून देणार ? १४) महाराष्ट्राच्या राजकारणाची पार रया घालवली ती संत शरद पवारांनी. इतर संतांनी जातीभेद विसरा म्हणून सांगितलं तर शरद पवार नावाच्या संताने मात्र जाती जातीत भांडण लावणे, एकमेकांना शिव्या द्यायची शिकवण देत आहेत. १५) या महाराष्ट्राला आकार देण्याचं माझं स्वप्न आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं माझं स्वप्न आहे, इथल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळायला हवी, इथल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, शेतकरी सुखी व्हायला हवेत ही माझी इच्छा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, इतरांना संधी दिलीत मला एकदा संधी देऊन बघा. #विधानसभ_२०२४

Raj Thackeray

62,399 görüntüleme • 1 yıl önce

सिंगापूरातील सुजाण नागरिक आणि वाहतूक व्यवस्था. मागच्या काही दिवसांखाली सिंगापूरला गेलेलो, सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टवर आम्ही उतरलो आणि उतरल्या क्षणीच हे एअरपोर्ट जगातील सर्वोत्कृष्ट का मानले जाते, याचा अनुभव आला. उतरल्यानंतर आम्हाला आमचे सिंगापूरमधील मित्र भेटले. त्यांनी आमच्यासाठी आधीच काही कार्ड्स घेतली होती – बस-रेल्वेचं कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी. तिथे MRT म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी एकच कार्ड असतं. ते कार्ड टॅप करूनच तुम्हाला मेट्रो किंवा बसमध्ये प्रवेश मिळतो. आम्ही सिंगापूरमध्ये पहिल्यांदाच मेट्रोने प्रवास केला आणि मित्राच्या घरी पोहोचलो. सिंगापूरची वाहतूक व्यवस्था माझ्यासारख्या भारतीयासाठी अचंबित करणारी होती. संपूर्ण देश तुम्ही फक्त बस आणि मेट्रोने फिरू शकता, इतकं सुसज्ज आणि नीटनेटकं वाहतुकीचं जाळं तिथं पसरलेलं आहे. बसमध्ये बसताना तुम्हाला कुठे जायचं आहे ते गुगल मॅपवर टाका, मग मॅपवर तुम्हाला योग्य बस क्रमांक आणि वेळ कळते. बस स्टॉपवर डिजिटल बोर्ड असतात, ज्यावर वेळेप्रमाणे कोणती बस कधी येईल हे दाखवलं जातं आणि ती अगदी वेळेतच येते! उदा. 10:01 ला बस येणार आहे, तर ती 10:01 ला नक्कीच येईल. बसमध्ये चढताना समोरच्या दरवाजाने चढायचं आणि मागच्या दरवाजाने उतरायचं. चढताना कार्ड टॅप करायचं, उतरताना पुन्हा टॅप करायचं. जर तुम्ही टॅप करायचं विसरलात, तर जिथे $1 लागला असता तिथे $4–5 दंड होतो. एकदा चुकून टॅप करायचं विसरलेलं तरी फाईन लागतो. बसमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, जरी बस माणसांनी भरलेली असली तरी कोणी कोणाशी मोठ्याने बोलत नाही. सगळीकडे शांतता असते. आपल्याकडे बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये लोक मोठ्याने बोलतात, पण इथे अगदी गर्दी असली तरी लोक शांत असतात आणि एकमेकांमध्ये अंतर ठेवतात. मेट्रोमध्येही हेच शिस्तीचं चित्र दिसतं. मेट्रो किंवा बसमध्ये चढताना, रस्ता ओलांडताना लोक रांगेत उभे राहतात. एस्कलेटरवर डाव्या बाजूला लोक उभं राहतात आणि उजवी बाजू घाई असलेल्यांसाठी मोकळी ठेवतात. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातात, रस्त्यावर सायकल कोणी चालवत असेल तर त्याला प्राधान्य दिले जाते, तुम्हाला रस्ते प्रचंड स्वच्छ दिसतील. इतकं शिस्तबद्ध वागणं पाहून एक भारतीय म्हणून मी थक्क झालो. रस्त्यांवरून बस जाताना कुठेही भाऊ, दादा, साहेबांचे बॅनर, पोस्टर्स दिसले नाहीत. कुठल्याही चौकात “संकल्पना – अमुक तमुक” असं काही नाही. आपल्याकडे एखाद्या चौकात चित्र रंगवलं किंवा फुलपाखरू उभारलं की त्यावर ‘संकल्पना – अमुक तमुक’ लिहिलेलं असतं, जणू काही त्यानेच त्याचा शोध लावला! सिंगापूर हा पूर्णपणे मानवनिर्मित देश आहे, पण तिथं एकाही राजकारणी व्यक्तीचा फोटो दिसला नाही, अगदी पंतप्रधानांचाही नाही ! आपल्याकडे शौचालयालाही ‘अमुक तमुक यांच्या निधीतून’ असं लिहिलेलं असतं. सिंगापूरमध्ये शौचालय व्यवस्था अतिशय दर्जेदार आहे. अगदी शेवटच्या टोकाला गेलात तरी सरकारी टॉयलेट्स पाचतारांकित हॉटेलसारखी स्वच्छ आणि आधुनिक असतात. मागे मी महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो होतो, तिथं जिल्हा ठिकाणीही शौचालय व्यवस्था धड नव्हती! कोणी म्हणेल सिंगापूर छोटा देश आहे, लोकसंख्या कमी आहे म्हणून त्यांची प्रगती झाली पण मग आपण एवढ्या मोठ्या भारतात एकही सर्वसुविधायुक्त शहर तयार का करू शकलो नाही ? इथली माध्यमं आपल्याला ‘विश्वगुरू’ म्हणतात, पण परदेशात गेल्यावर आपण कुठं आहोत याची खरी जाणीव होते. खरं तर हे लिहायचं नव्हतं, पण तिथं पाहून बोलावंसं वाटलं. अजून खूप काही सिंगापूरमध्ये अनुभवायला मिळालं आहे… हळूहळू सगळं लिहीनच.

Vaibhav Kokat

22,124 görüntüleme • 1 yıl önce

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत. २) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. ३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो. ४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही. ५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. ६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे... ७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ? ८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ? ९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू. १०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे. ११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत... १२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ १३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल... १४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे... १५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?

Raj Thackeray

33,713 görüntüleme • 1 yıl önce

आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स्टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही चूक नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच. १) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या काही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. २) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत. ३) राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्याला राजकारण म्हणलं असतं तर कोणी ? ४) २००५ ला मुंबईत प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ? ५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.

Raj Thackeray

75,210 görüntüleme • 1 ay önce

हैदराबाद निजाम सरकारने तत्कालीन मुंबई प्रांतिक सरकारला नोव्हेंबर 1956 मध्येच सर्व रेकॉर्ड ऑफिशिअली दिल्याच्या नोंदी आहेत. काखेत कळसा आणि गावाला वळसा ! पाच निवृत्त न्यायाधीशांची कमिटी पाठवली तरी हैदराबादमध्ये काय मिळणार ? इथे रेकॉर्ड पोचल्याच्या दोन्ही सरकारने नोटिफिकेशन सुद्धा काढल्या होत्या. मग गरीब शेतकऱ्यांचे रेकॉर्ड गेले कुठे ? आज रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर त्या परिस्थितीला किती मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री जबाबदार ? विश्वास पाटील . याबाबतीतले माझे नम्र निवेदन माझ्या यूट्यूब चैनल वर या संकेतस्थळावर आपण मुद्दाम ऐका. तत्कालीन हैदराबादच्या चीफ सेक्रेटरीनी आपल्या अखत्यारीतील सर्व District Collectors ना निजामाच्या हद्दीतील मराठवाड्याचे रेकॉर्ड तात्काळ मुंबई सरकारकडे व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे सर्क्युलर ऑक्टोबर 1956 मध्ये काढले होते. त्यानुसार एक नोव्हेंबर 1956 च्या दरम्यानच सर्व रिव्ह्यून्यू, ट्रेझरी, पोलीस आणि त्यानंतर काही महिन्यात न्यायालयीन रेकॉर्ड मुंबई सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते. तशी नोटिफिकेशन्स हैदराबाद आणि मुंबई सरकार या दोघांनीही काढली होती. तर ते रेकॉर्ड गेले कुठे ? गेली दोन वर्ष आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. भारत सरकारच्या स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 च्या सेक्शन 76 तसेच 77 व इतर संबंधित कलमानुसार नवीन राज्य किंवा त्याची पुनर्रचना झाली झाल्यावर तात्काळ संबंधित रेकॉर्ड ज्या त्या सरकारकडे देण्याचे आदेश पारित झाले होते. त्यानुसार किती तारखेपर्यंत कुठले रेकॉर्ड हस्तांतर झालेच पाहिजे अशा “डेडलाईन” सुद्धा ठरवणारे आदेश काढले गेले होते. त्यानुसार महसूल व जमाबंदी दप्तर हे डिसेंबर 1956, ट्रेझरी लेजर्स 31 डिसेंबर 1956 आणि हैदराबादच्या सचिवालयातील संबंधित सर्व सेक्रेटरीएट फाईल ह्या फेब्रुवारी 1957 पर्यंत द्यावयाच्या डेडलाईन्स ठरवून गेल्या दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार संबंधित हस्तांतरण त्यावेळीच्या उत्तम प्रशासकीय यंत्रणेने विनाविलंब पार पाडले होते. मग मग ते दिलेले सर्व रेकॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी कोणाची ? कायद्याच्या भाषेत हू इज कस्टस्टोडीयन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स ? 18 91 मध्ये “इम्पेरियल रेकॉर्डस कीपर” नावाची पोस्ट निर्माण झाली होती. आता भारत सरकारने 1993 मध्ये पब्लिक रेकॉर्डस Act निर्माण केला आहे. कायद्यानुसार महसुली रेकॉर्डसाठी डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि त्या विभागाचे जे प्रमुख असतात ते कस्टोडियन ऑफ गव्हर्मेंट रेकॉर्ड असतात. त्यानुसार एक नोव्हेंबर 1956 च्या दरम्यान औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बिदर लातूर, नळदुर्ग ह्या सीमेवरील जिल्ह्यांचे हस्तांतरण तीन राज्यांमध्ये विधिवतरीत्या पार पाडले गेले आहे. जेव्हा एखादे नवीन राज्य किंवा देश निर्माण होतो. तेव्हा सैन्य किंवा सुरक्षा घुसवण्याच्या आधीही त्या प्रांतातले जमिनींचे नकाशे आणि मालकी हक्कपत्रक ही सर्व रेकॉर्ड्स महत्वाची असतात. हा बाळबोध नियम आमच्या प्रशासकांना माहित नाही का ? तसेच मौर्य काळापासून संबंधित कास्तकार किंवा शेतकरी याच्या मालकीचे कोणते क्षेत्र आहे अशा कागदपत्रांच्या दुय्यम सत्यप्रती राजाने आपल्या दप्तरांमध्ये सांभाळून ठेवायच्या असतात. तशीच कागदपत्रे ब्रिटिश आणि निजामाच्या किंवा तेव्हाच्या मुंबई राज्यांमध्ये सुद्धा सांभाळली गेली होती. समजा गाव पातळीवरचे तलाठ्याचे दप्तर हरवले, शेतकऱ्याकडचे जरी हरवले तरी राजाकडे म्हणजे सरकारकडे त्याच्या दुहेरी प्रती ठेवणे बंधनकारक असते. त्यानुसार व्हिलेज रेकॉर्डच्या नोंदी, त्यामध्ये काही जिल्हा पत्रके तसेच मुख्य तहशील पत्रके ही सांभाळली जात. त्यानुसार निजाम सरकारने तत्कालीन मुंबई सरकारला प्रत्येक जिल्ह्यातील कोणती पत्रके हस्तांतरित केली होती ? 1 खसरा पत्रक __ज्यामध्ये त्या तालुक्यातील प्रत्येक सर्वे नंबर, खातेदाराचे नाव, फसल अशी पूर्ण माहिती असायची 2 खतौनि पत्रक. ज्याची आजच्या सात बाऱ्याशी तुलना करता येईल. हू इज ओनर अँड हू इस कल्टीवेटर ? 3. जमाबंदी तथा सालाना पत्रक. ज्यामध्ये लगान , मागणी आणि बकाया म्हणजे राहिलेली बाकी याच्या नोंदी असतात. 4. लाल किताब. दिल्लीच्या मुघल प्रशासनापासून ते हैदराबादच्या निजामापर्यंत सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. ते तांबड्या वेस्टर्नमध्ये बांधले जायचे. एक प्रकारे हे गाव पातळीवरचे गॅझेट होते. त्याच्यामध्ये गाव, गावातील माणसे, तळी, पाण्याची साधने, वसूल, जहागिरीचे क्षेत्र सर्व काही असायचे. हे दरवर्षी तलाठ्याकडून प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाऊन त्याचे अवलोकन होऊन पुन्हा गावात परत यायचे. प्रत्येक गावात हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. 5 शजरा ( खेतो का नक्शा) प्रत्येक शेतकऱ्याच्या शेती क्षेत्राचा सरकारमार्फत नकाशा काढला असायचा. त्यासाठी नक्शाणवीस नावाचे खास अधिकारी नेमलेले असायचे. हे पत्रक सुद्धा प्रत्येक गावात होते. 6 माल वसुली रजिस्टर, डिमांड अँड कलेक्शन 7 तहसील दप्तरी रजिस्टर 8 इक्रारनामा आणि सनद रजिस्टर. ज्यामध्ये गावातील इनामे जहागीर तसेच व पुढच्या वफ जमिनीच्या नोंदी असत. अशी सर्व रजिस्टर्स ही जा त्या िल्हाधिकार्‍याकडे निजाम सरकारने सुपूर्त केली होती. ती सुपूर्त करताना स्पष्टपणे “हँड ओव्हर लिस्ट” म्हणजे हस्तांतरणाची यादी सुद्धा तयार केली गेली होती. हे सर्व रजिस्टर्स आज तालुका दप्तर मध्ये किंवा डिस्टिक कलेक्टर दप्तरमध्ये मिळत नसतील तर त्याबाबत गरीब शेतकऱ्यांचा काय दोष ? लोकांकडे जे डॉक्युमेंट्स असतील ते तपासण्यासाठी जर कायदेशीररित्या पर्यायी दप्तर जे पर्मनंट रेकॉर्ड म्हणून कस्टोस्डियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्डने मेंटेन करायला हवे, ते नसेल तर त्यात लोकांचा काय दोष. ? मी चांद्यापासून ते बांधापर्यंतच्या सर्व ब्रिटिश गॅजेटीयारअसचा अभ्यास गेली दोन वर्ष करतो आहे. दिल्लीचे पार्लमेंट लायब्ररी रेकॉर्ड, जनगणना कार्यालय, हैदराबादचे तीन नाक्यावरचे कार्यालय व इतर कार्यालय सारी धुंडाळून झाली आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मराठा हे कुणबी होते असे ब्रिटिशांची गॅझेट सुद्धा सांगत नाहीत. मात्र शेती करणारा बहुतांशी 85% मराठा वर्ग हा कुणबी होता हे या रेकॉर्डवरून आढळून येते. तशा अनेक ठिकाणी नोंदी आहेत. निजामाच्या पिरेड मध्ये सुद्धा कोर्टात, हायकोर्टात केसेस जाऊन तसे डिसिजनही झालेले आहेत. आता तत्कालीन जिल्ह्यांचा वानगी दाखल विचार करायचा तर तेव्हाचा रत्नागिरी जिल्हा व सावंतवाडी संस्थान यांची 1881 ची जनगणना लक्षात घेता एकूण संख्या 9 लाख 41 हजार 49 होती. पैकी दोन लाख तीन हजार चारशे सहा हे मराठा होते. तर दोन लाख 84 हजार 267 हे कुणबी होते. जिल्ह्यात धनगर अठरा हजार पाचशे पाच, ब्राह्मण 66 हजार ०४६ महार समाज 85 हजार 513 तर भटक्यांची संख्या 6553 होती. ठाणे आणि मुंबई मध्ये कुणब्यांची संख्या अधिक आहे. तर सोलापूर मध्ये मराठा एक लाख ऐंशी हजार आणि मराठा कुणबी एक लाख 78 हजार 938, माळी 23898 वंजारी 3508 धनगर 57 04 ब्राह्मण 26979 महार समाज 44001 तर मातंग 1923 अशी संख्या आहे. साधारणता माझ्या माहितीप्रमाणे 1985/ 86 पर्यंत महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही सर्व रेकॉर्ड्स उपलब्ध होती. त्याचे महत्व न जाणता रेकॉर्डरुम कोणाच्या आदेशाने आणि कुणी खाली केल्या ? हे अविवेकी आदेश कोणी दिले. गेल्या पंचवीस तीस वर्षात ज्यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून कामे केली त्यांना त्याची उत्तरे द्यावे लागतील. तरच मग महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य वगैरे मैदानातली भाषा शोभून दिसेल. सद्यस्थितीत आता जे रेकॉर्ड आहे त्यातून संबंधित शेतकरी वर्गाला कसा फायदा देता येईल, याचाही विचार व्हावा. माझ्या आजोबांचे आणि पंजोबांच्या नावे मोडीमध्ये कुणबी नावाची नोंद आहे. पण मला इथल्या जटील प्रशासकीय व्यवस्थेने तेव्हा तो दाखला मिळू दिला नाही. आज खानदानाच्या नावाने जे मोठ्या मोठ्या थापा मारतात त्यांचेही रेकॉर्ड माझ्याकडे आहे. संपूर्ण मराठा समाज जरी कुणबी ठरत नसला तरी ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याकडे तरी संशयाने पाहू नका. ब्रिटिशांनी दिलेल्या वर्गवारीनुसार साधारण प्रत्येक तालुक्यात कुठल्या समाजाचे किती लोक होते याची आकडेवारी आहे. त्या सरासरीचा विचार करून लोकांना काही फायदे देता येतील. जे ब्रिटिश रिकॉर्ड पहिले प्लॅनिंग कमिशन आणि शेड्युल्ड कास्ट कमिशन वगैरे रचताना आधारभूत ठरवले गेले होते. ते रेकॉर्ड पूर्णता या प्रश्नावर नाकारण्यात काय अर्थ आहे ? या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हावा आणि उनापावसामध्ये, शेतामध्ये राबणाऱ्या लोकांना न्याय मिळावा आणि तो सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळावं. आपली लोकशाही, प्रत्येक राजकीय पक्षाची लोकशाही ही आज “स्वकुटुंबकल्याणशाही” झालेली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळेच सार्वजनिक हिताच्या गोष्टींकडे सर्वांनीच ध्यान द्यायला हवे. नेत्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अविवेकामुळे लोकांचे हाल होऊ नयेत असेच मला वाटते. विश्वास पाटील #vishwaspatil #author #HistoricalTruth #MissingRecords #FarmersRights #LandOwnership #RevenueRecords #HyderabadNizam #hyderabad #StateReorganization1956 #PublicRecords #CustodianOfRecords #Maratha #AccountabilityInGovernance #LostDocuments

Vishwas patil

16,535 görüntüleme • 1 yıl önce