正在加载视频...

视频加载失败

मा. गृहमंत्री Devendra Fadnavis आपण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाढणारे परप्रांतीय लोंढे थांबवणारच नाही का? हे लोक स्वतःच्या राज्याची गुन्हेगारी संस्कृती इकडे दाखवत आहेत. मुंबई पोलीस Mumbai Police यांची भिती सुद्धा या परप्रांतीयांना राहिली नाही. व्हायरल व्हिडीओ - लोखंडवाला अंधेरी मुंबई

54,108 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

10 条评论

Ganesh Kale - गणेश काळे 的头像
Ganesh Kale - गणेश काळे2 年前

@Dev_Fadnavis @MumbaiPolice @MumbaiPolice पोलीस स्टेशन मधला next व्हिडिओ येवुद्या लवकर...😀

Rukesh Girolla Adhikrut रुकेश गिरोल्ला अधिकृत 的头像
Rukesh Girolla Adhikrut रुकेश गिरोल्ला अधिकृत2 年前

@Dev_Fadnavis @MumbaiPolice पर्याय आहे येणाऱ्या निवडणूक मध्ये @RajThackeray साहेब यांना एक हाती सत्ता द्या सगळ्यांना दिलं ना काय भेटल जाती जातीत भांडण , रेप , बेरोजगारी , शेतकरी आत्महत्या 5 वर्ष मनसे ला देऊन बगा

राजाधिराज महाराज 的头像
राजाधिराज महाराज2 年前

@Dev_Fadnavis @MumbaiPolice हे परप्रांतीय उत्तर भारतीय बिहारी भैय्या गुजराती लोक माजलेत यांना भाजप फडणवीस ने डोक्यावर घेतले आहे भाजप हा परप्रांतीय गुजराती पक्ष आहे मराठी माणसाने भाजपला बिलकुल मतदान करू नये आणि कोंग्रेसला पण करू नये तो पण एक परप्रांतीय पक्ष आहे

BM Santosh (Santya) 的头像
BM Santosh (Santya)2 年前

@Dev_Fadnavis @MumbaiPolice याला उलटा टाकून चोप दिला पाहिजे तेव्हा याची नशा उतरेल....

Aditya ⚡ 的头像
Aditya ⚡2 年前

@Dev_Fadnavis @MumbaiPolice एका मराठी माणसाने असे पाहिल्यावर पहिले संताप येतो....हे लोकं इथे काम करायला येतात आणि आपल्याच पोलिसांना अश्या खालच्या भाषेत बोलतात...ह्या लोकांचा चांगलं बंदोबस्त केला पाहिजे ..💯💯💯 @RajThackeray @Dev_Fadnavis आपण लक्ष घालून ह्या माजोरी परप्रांतीय लोकांना धडा शिकवा..

सागर पाटील | Sagar Patil 的头像
सागर पाटील | Sagar Patil2 年前

@Dev_Fadnavis @MumbaiPolice महाराष्ट्र या शब्दाला जागा! @Dev_Fadnavis @mieknathshinde आचार्य अत्रे आणि एस एम जोशी यांचा ट्विटर आयडी असल्यास द्यावा; त्यांच्या कार्याची परतफेड सध्याची भ्रष्ट व्यवस्था आणि तुमच्या सारखे नीतिमत्ता सोडलेले राजकारणी करीत आहे.

शिवा काणोळे 的头像
शिवा काणोळे2 年前

@Dev_Fadnavis @MumbaiPolice हेच पोलिस ट्विटर वर काही पोस्ट केली की नोटीस पाठवतात....आणि इथे काही बोलत नाही....

Sameer Bamne 的头像
Sameer Bamne2 年前

@Dev_Fadnavis @MumbaiPolice Mumbai police ni hyachi dad ghevi ani tanga todun videos viral karawa bahar cha lokana dokyawar ghevoona ka hei udhya apli maan kaplyashive rahnaar nahi

कृणाल मनोज पवार 🚩krunal manoj pawar 的头像
कृणाल मनोज पवार 🚩krunal manoj pawar2 年前

@suktabombil @Dev_Fadnavis @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @CMOMaharashtra @Dev_Fadnavis भाग दुसरा येणार कधी ?? आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.😅

मराठी दरबार 的头像
मराठी दरबार2 年前

@Dev_Fadnavis @MumbaiPolice मुंबई पोलीस आपल्या कर्तव्याचं पालन करताना अशा असभ्य वर्तनाचा सामना करणं हे दुर्दैवी आहे. अशा परप्रांतीय गुन्हेगारी वृत्तीला अजिबात थारा नसावा. मुंबई पोलीस आपलं काम इमानेइतबारे करत असताना अशा घटनांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.

相关视频

मुंबईच्या लोकल डब्यात हे चाललं आहे तरी काय?? हे बाहेरून आलेले परप्रांतीय लोक महाराष्ट्राचे वाटोळं करत आहेत आणि मराठी माणूस डोळे मिटून शांत झोपला आहे.👆👆👆 #मराठीएकीकरणसमिती याविरोधात आमची तक्रार आहे सदर व्हिडीओ #Gollu445321 या इंस्टा सार्वजनिक खात्यावर प्रसारित केलेला आहे मुंबई पश्चिम रेल्वे पोलीस बळ कुठे आहेत RPF Mumbai Division GRP Mumbai DRM - Mumbai Central, WR कृपया कारवाई करावी सार्वजनिक ठिकाणी रेल्वेत डब्यात हे सुरू आहे स्थलांतरित झालेलं या उत्तरेतील लोकांमुळे महाराष्ट्राचे नाव धुळीस जातेय, आपल्या राज्याच्या अब्रूचा प्रश्न आहे रेल्वे डबा यासाठी असतो का? प्रवासासाठी असतो? Western Railway मुंबई पोलीस Mumbai Police

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

22,324 次观看 • 16 天前

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज हा सातारा कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे रील्स लाईव्ह स्वतःच्या सोशल मीडियावर टाकून अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात आहे.सदर बाईकला नंबर प्लेटसुद्धा नाही.. कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का? सर्व सामान्य व्यक्तीने असे कृत्ये केले तर त्याची गाडी जप्त करून मोठा दंड ते 3 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा केली जाते.. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police Devendra Fadnavis Transport Department (RTO), Maharashtra

Bhaiya Patil

51,112 次观看 • 1 年前

माझ्या एका राजकीय उपहासात्मक बॅनरबद्दल माझ्यावर १४ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला... कोणत्या कायद्याखाली तर म्हणे 'महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्यान्वये' मग माझी Mumbai, आपली BMC हे जे शहरभर मोदी-फडणवीसांचे बॅनर लागलेत ते आपल्या शहराचं सौंदर्य वाढवत आहेत का? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ह्याच कलमाखाली गुन्हा दाखल होणार का ? मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMCWardHW असली अघोरी बॅनरबाजी मुंबईला विद्रुप करत नाही का? सत्ताधाऱ्यांनी काहीही केलं, कितीही उन्माद घातला तरी माफ आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेली साधी टीकाही सहन होत नाही तर आपण एकपक्षीय 'हुकूमशाही'कडे वेगाने चाललोय इतकं निश्चित !

Akhil Chitre अखिल चित्रे

21,566 次观看 • 6 个月前

मुंबईतील दादर येथे एका महिला आंदोलनकर्त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ बघा. साध्या पोशाखातील ही व्यक्ती पोलीस कर्मचारी आहे. मुंबई पोलीसांबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण अशा पद्धतीने महिलांना असभ्य वागणूक देणारे पोलीस जर या दलात आहेत ही खेदाची बाब आहे. आंदोलनकर्ते हे गुन्हेगार नाहीत, लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानले जाते पण जेंव्हा सत्ताधाऱ्यांना लोकशाहीची मूल्येच मान्य नसतात तेंव्हा अशा पद्धतीने असभ्य वागणाऱ्यांना बळ मिळते. महिलांचा अवमान करणाऱ्यांचा चौरंग करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. येथे अशा अपप्रवृत्तींना अभय मिळता कामा नये, सदर कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. Devendra Fadnavis मुंबई पोलीस Mumbai Police

Supriya Sule

31,334 次观看 • 1 个月前

भाजप सरकार ठराविक पोलिसांचा वापर स्वतःची राजकीय भांडी घासण्यासाठी करतंय, याची शंका होतीच आणि त्याला दुजोरा देणारी भाजप पदाधिकाऱ्याची ही ऑडिओ क्लिपही आता बाहेर आली. या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून हे खरं असेल, तर भाजपचं बॅक ऑफिस सांभाळणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील या 'मॅडम' म्हणजे मा. संजय राऊत साहेब, पटोले साहेब, खडसे साहेब या विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करणाऱ्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाच आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अंगावर पोलिसांची वर्दी घालून निष्ठा मात्र भाजपच्या चरणी वाहणाऱ्या या अधिकाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत कायद्याच्या कचाट्यातून सुटका होताच कामा नये..! एखादा पोलीस अधिकारी गैरवर्तन करतो म्हणून संपूर्ण पोलीस दलावरील आमचा विश्वास कमी होईल, असं नाही. अनेक अधिकारी हे वर्दीशी निष्ठा ठेवून काम करणारे आहेत. पण मोजक्या अधिकाऱ्यांमुळं पोलीस दलाची प्रतिमा खराब होते, याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. (भाजप पदाधिकारी आणि नंदूरबारचे तत्कालीन एसपी यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं जातं.) Devendra Fadnavis #AudioClip #ForensicInvestigation #चौकशी_झालीच_पाहिजे #महाराष्ट्र

Rohit Pawar

15,040 次观看 • 1 个月前

प्रश्न हा मान्य करायचाच नाही, मग त्याचे उत्तर द्यावा लागत नाही. असच सध्या Devendra Fadnavis साहेब यांच आहे. पेपरफुटी मान्यच करायची नाही मग तपास कसला करायचा ना. ते म्हणताय पेपरफुटी झालीच नाही मग आम्हाला सांगा मुंबई पोलीस भरतीचा फुटलेला पेपर आमच्याकडे कसा. पेपर सुरू असतानाच पेपर बाहेर गेला आणि हजारो मुलांना त्याची उत्तरे मिळाली. तपासात सापडली फक्त 100, 150 बाकी बोगस मुले जॉईन झाली. फडणवीस साहेब यांच्या गृह विभागाचा मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला होताच तसेच त्यांच्या mahagenco विभागाचा सुद्धा पेपर फुटला होता तरी हे मान्य करत नाही म्हंटल्यावर अजून काय बोलावे. असले गृहमंत्री असल्यावर पेपर तर मग फुटणारच ना. फडणवीस साहेब तुम्हाला वाटते ना पेपर फुटले नाही मग मला सांगा लातूर मधील गुरू ऑनलाईन सेंटर हे तलाठी भरती नंतर रद्द का केले गेले. पूर्ण सेंटरच मॅनेज केले गेले होते. मग यांना पेपर फोडायची गरजच काय. पेपर घेणारेच घोटाळे करत आहेत. Tcs चे कित्येक कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हीच का तुमची पारदर्शकता. एका एका बोगस सेंटर वरून किती बोगस विद्यार्थी लावले हे लातूरच्या गुरू ऑनलाईन सेंटर वरून समजते. तिथे 100 प्लस बोगस तलाठी निवडले गेले. सेंटर वर काम करणारी सेंटर मालकाच्या गावची जवळपास 10 एक मूल तसेच त्याची सख्खी बहीण, तसेच कित्येक नातेवाईक त्या गुरू ऑनलाईन सेंटर वरून लावली गेली तरी तुम्ही म्हणताय परीक्षा पारदर्शक झाली. लाज वाटते आम्हाला असले गृहमंत्री भेटले आहेत महाराष्ट्राला. तुम्हाला काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आहेत ते करा कारण तुम्ही ज्यांनी पेपर फोडले त्यांचावर गुन्हे दाखल करू शकत नाहीत कमीत कमी आमच्यावर तर करा. CMO Maharashtra Nana Patole Vijay Wadettiwar Rohit Pawar Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Abhimanyu Pawar @News18lokmat LoksattaLive nikhil wagle @Dhananjay_AAP Devesh Gondane SakalMedia Radhakrishna Vikhe Patil महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

11,117 次观看 • 2 年前

या पेपरफुटी मध्ये पूर्ण सेंटर सहभागी आहे यात Tata Consultancy Services चे कर्मचारी पासून ते सेंटर मालक सहभागी आहेत. प्रत्येकाने जागा वाटून घेतलेल्या असतात. असले सेंटर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कारण जलसंपदा विभागाच्या परीक्षा मध्ये वाशिम मध्ये सुध्दा असाच प्रकार घडला होता पण कोणतीही चौकशी झाली नाही की पुढे कोण आरोपी होते हे समजले नाही. तसेच लातूर येथे पण असाच प्रकार झाला होता तिथे tcs च्या कर्मचारी वर गुन्हा नोंद झाला पण खरे आरोपी पकडले गेले नाही. यात सेंटर मालक सुद्धा सहभागी असतात. या तिन्ही ठिकाणी उत्तरे पुरवली गेली होती. म्हणजे पेपर आधीच बाहेर आला होता. यात कोण कोण सहभागी आहेत हे कोणालाच समजत नाही. यात आपले लाडके गृहमंत्री सहभागी आहेत की अजून कोण की त्यामुळे पोलीस अर्थपूर्ण शांत बसलेत का अशी शंका सर्व मुलांना आहे. कारण पुढे काहीच होत नाही होतात ते फक्त पेपरफुटी. 2016 पासून ते आता पर्यंत सरळसेवाचा एकही पेपर व्यवस्थित झाला नाही. प्रत्येक पेपर फुटत आहेत, गुन्हे नोंद पण होतात पण पुढे काहीच नाही. आरोपी खोट चरित्र प्रमाणपत्र काढतो आणि परत घोटाळा करून नोकरीस लागतो. हेच सुरू आहे महाराष्ट्र मध्ये. याला जबाबदार फक्त हे सरकार आहे आणि निष्क्रिय गृहमंत्री. यांना फक्त फोडाफोडीच जमते बाकी इकडे काही झाला तरी काही फरक पडत नाही. Tata Consultancy Services ला काळ्या यादीत टाका Devendra Fadnavis @OfficeOfDevendra CMO Maharashtra Vijay Wadettiwar Rohit Pawar Sharad Pawar Dr.Jitendra Awhad महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police लातूर पोलीस-Latur police AAP महाराष्ट्र ABP माझा @Dhananjay_AAP Ambadas Danve Kunal Raut LoksattaLive Nana Patole Kailas Patil ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivaani Wadettiwar 🇮🇳 TV9 Marathi Aaditya Thackeray Conquer

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

26,833 次观看 • 2 年前

महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई…..Supriya Sule छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 कोटींचे ड्रग्ज जप्त, सोलापुरातील ड्रग्जचे कारखाने उद्धवस्त, मुंबई पोलिसांकडून हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त, या बातम्या महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष गृहमंत्र्यांच्या कामाला पावती देणार्‍या आहेत, हे तुम्हाला कळतेय. पण, तुमच्यातील कुटिल राजकारणी ते कधीही तुम्हाला पटवू देणार नाही, आणि म्हणूनच तुमची अस्वस्थता अधिक आहे. जरा आठवा, सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्यावेळीही महाराष्ट्रात ड्रग्जची कारवाई मोठ्या प्रमाणात झाली होती. एनसीबीला महाराष्ट्रात यावे लागले होते. तेव्हा तुम्ही ड्रग्जवर कारवाई करणार्‍या यंत्रणांना विरोध करत होतात त्यांना नावे ठेवत होतात. आज देवेंद्र फडणवीसांच्या Devendra Fadnavis जी नेतृत्त्वात महाराष्ट्रातील पोलिस दल बिनधास्त कारवाई करते आहे आणि त्यांना कुणीही अडवत नाही. फक्त भाषणात महाराष्ट्राची अस्मिता सांगून उपयोग नाही, तर आज आपले पोलिस दल ड्रग्जवर प्रहार करते, याचा अभिमान वाटायला हवा. ड्रग्जवर प्रहार होत असताना तुम्हाला अस्वस्थ वाटतय ???? पोलिस परिषदेत देवेंद्रजी फडणवीस यांनी ड्रग्जवर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते, त्याचेच परिणाम आज दिसताहेत. असो, तुम्हाला अस्वस्थ रहायचे असेल तर रहा. फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या, मुंबईत प्रवेश करताच 3 ते 4 सिगारेट ओढल्यासारखे प्रदूषण आहे, याचे मोजमाप तुम्ही नक्की कसे केले? एकरी 100 कोटींच्या वांग्याचे रहस्य तर अजून समजले नाही, जरा हे सिगारेटचे तरी सांगाल का? महाराष्ट्राला हा प्रश्न पडला आहे... Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai

Chitra Kishor Wagh

29,486 次观看 • 2 年前

आज मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये. मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही. आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये. आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत — हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. माध्यमं हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहेत का? कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे. आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का? मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – तिथून काही शिकून येतात का? परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही. #मुंबईलोकल #MumbaiLocal

Raj Thackeray

105,280 次观看 • 1 年前

.Devendra Fadnavis साहेब उध्दव ठाकरे यांच्या काळात झालेली पेपर फूट कोणी बाहेर काढली होती हे पण पहा. ते सर्व घोटाळे आम्हीच बाहेर काढले होते पण अजून एक सांगतो त्या घोटाळ्यांचा तपास पहा आणि तुमच्या काळात झालेल्या पेपरफुटी चा तपास पहा यात स्पष्ट समजते की गृहमंत्री पद तुम्हाला झेपलेले नाहीये आपण एक निष्क्रिय गृहमंत्री आहात कारण सर्व पुरावे देऊन सुद्धा पोलीस काहीच कारवाई करत नाही. कसलाच तपास झाला नाही. Office of Uddhav Thackeray साहेब मुख्यमंत्री असताना एक सचिव, जिल्हाधिकारी, 2 आयुक्त आणि इतर असे मोठ मोठे मासे पेपरफुटी मध्ये पकडुन त्यांना अटक झाली होती,फुटलेले पेपर रद्द केले होते. पण तुम्ही काय केले काहीच नाही न तपास केला न फुटलेले पेपर रद्द केले फक्त गोरगरिबांच्या पोरांच्या आयुष्याची बरबादी केली. फडणवीस साहेब तुमच्या कडे जे खाते आहे त्यांचे पेपर सुद्धा फुटले ते सुद्धा आम्हीच पुरावे सकट बाहेर काढले पण तुम्हाला साधा तपास करता आला नाही. अजून हि mahagenco चे बोगस मुले बाहेर काढले नाहीत. मुंबई पोलीस भरती मध्ये आरोपी पकडले गेले नाहीत. कित्येक बोगस पोर आज पोलीस शिपाई म्हणून मुंबई मध्ये काम करताय हे तुम्हाला नाही दिसणार. महाराष्ट्र मधील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना माहित आहे स्पर्धा परीक्षांचे वाटोळे कोणी केले ते याची परतफेड आम्ही नक्की करू. CMO Maharashtra Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dr.Jitendra Awhad Rohit Pawar MAHARASHTRA DGIPR ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Nana Patole Vijay Wadettiwar Shivaani Wadettiwar 🇮🇳 Mohasin @Dhananjay_AAP LoksattaLive ABP माझा TV9 Marathi SakalMedia Sanjay Raut Satyajeet Tambe Devesh Gondane Lokmat

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

59,167 次观看 • 2 年前

गॅस वितरकाची दादागिरी मराठी बोलणार नाही, गॅस देणार नाही ही दादागिरी सुरू झाली.. नागरिक त्रस्त शासन मस्त. CMO Maharashtra Naresh Mhaske Eknath Shinde - एकनाथ शिंदे राज्यात सिलिंडर'साठी हे वाद वाढले आहेत इतका माज फक्त राज्यात कायदा सुव्यस्था तीन तेरा वाजल्यामुळे सुरू झालाय, आमचे कोण काय वाकडे करणार? गृहमंत्री शांत मराठी भाषा मंत्री शांत म्हणून मराठी बोलणार नाही हा मज राज्य वाढतोय. Devendra Fadnavis Uday Samant सारकारची एजन्सी घेतली म्हणजे आम्ही ग्राहकाचे बाप लागतो या मुजोरीत सर्व कारभार असतो. #ठाणे साई शुभम गॅस सर्व्हिस, आनंद नगर असल्या माजोरड्या बाईचा माज फक्त कडवट मराठी महिलाच उतरवू शकतात. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी आलेल्या सामान्य ग्राहकांवर दादागिरी केली जाते आणि व्यवस्थित उत्तरही दिले जात नाही. जनता सेवा घेण्यासाठी येते, अपमान सहन करण्यासाठी नाही. या महिलेवर व एजन्सी वर कारवाई होईल का Bharat Petroleum ठाणे पोलीस.. Thane Police Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका DISTRICT INFORMATION OFFICE, THANE #thane #SaiShubhamGas #AnandNagar #Thane Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

16,691 次观看 • 5 个月前

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 次观看 • 1 年前

स्वर्गीय अभिषेक घोसाळकरांना भावपुर्ण श्रद्धांजली….🙏 स्वर्गीय अभिषेक घोसाळकरांच्या धक्कादायक मृत्यूचे उबाठा गटाकडून होणारे राजकारण दुर्दैवी आहे. कारण, सकृतदर्शनी या भयंकर घटनेत राजकारणाचा दुरान्वयानेही संबंध नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात दिसून येतंय. मॅारिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे चांगले संबंध होते. 2024 ला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दोघेजण एकत्र होते. ते दोघेही सोबत काम करत होते. मग घोसाळकरांसोबत स्वतःचाही जीव घेणाऱ्या मॉरिस नरोन्हाकडून कुठल्या गोष्टीवरून इतकं टोकाचं पाऊल उचलण्यात आलं, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र पिस्तुल कुठून आलं, लायसन्स मिळालं आहे का? या सर्व गोष्टी तपासून कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी दिलंय…Devendra Fadnavis पण, सर्वज्ञानी संजय राऊत Sanjay Raut आणि उबाठा गटाचे नेते हीन राजकारण करून आणि पराकोटीची गलिच्छ भाषा वापरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत..Uddhav Thackeray तत्कालीन उबाठा सरकारची लक्तरेही आम्हाला वेशीवर मांडता येतील. त्यांच्या वसुलीबहाद्दर गृहमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करता येईल. पण, ही ती वेळ नाही. राज्याची कायदा-सुव्यवस्था देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पोलीस चोखपणे सांभाळताहेत, म्हणून तर मोहोळ प्रकरणातील आरोपी ताबडतोब गजाआड झाले. परवाच पुण्यात सर्व गुंडांची झाडाझडती घेऊन त्यांना कठोर समज देण्यात आलीय. कायदा हातात घेणाऱ्या स्वपक्षाच्या आमदारालाही त्यांनी तुरूंगाचे दरवाजे दाखवलेत. त्याच निःपक्षपाती भूमिकेतून घोसाळकर प्रकरणाचाही तपास होईल आणि सत्य जनतेसमोर येईल. परंतु, स्वतःच्याच पक्षाच्या एका होतकरू तरूणाच्या मृत्यूचे स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या राऊत आणि उबाठा गँगला काय म्हणावे, हा खरा प्रश्न आहे… Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai #श्रद्धांजली #अभिषेकघोसाळकर #मुंबई

Chitra Kishor Wagh

18,282 次观看 • 2 年前

उरण ची आमची मुलगी यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करणाऱ्या हरामखोर दाऊद शेखला फाशीच होणार…! आज नवी मुंबईतील उरण येथे आमदार महेश बालदी यांच्यासह जाऊन मयत यशश्री शिंदे हिच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उरण पोलीस ठाण्यात जाऊन डीसीपी पानसरे यांचीही भेट घेतली आणि या घटनेसंदर्भातील सविस्तर माहिती घेतली. नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हरचं काम करत होता. त्याची इथेच मयत यशश्रीशी भेट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन परवाची ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीच्या जवळच्या सहकाऱ्यांना व परिवारातील लोकांना ताब्यात घेतले असून तीन टीम बंगळूरूला रवाना केल्या आहेत. लवकरच आरोपीला अटक होईल, याची पोलिसांना आणि आम्हालाही खात्री आहे… दि. २६ जुलैला रात्री आठ वाजता ही युवती हरवल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी दाखल केली आहे, त्याच दिवशी रात्री साडेबारा वाजता या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांनी सॅटॅलाइटच्या मदतीने लोकेशन घेत त्या दृष्टीने तपास सुरू केला. CCTV फुटेजच्या माध्यमातून कोण कुठून किती वाजता निघाले याचाही शोध पोलिसांनी घेतला… झालेली घटना अतिशय अमानवी व आत्यंतिक वेदना देणारी आहे. राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून असून नवी मुंबई पोलीस आयुक्त व अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश आणि सूचना देताहेत. आमदार महेश बालदी हे कालपासून घटनास्थळापासून ते हॉस्पिटल पोस्टमार्टेम या सगळ्या प्रक्रियेत परिवाराच्या सोबत आहेत… या प्रकरणांमध्ये चांगल्यात चांगले वकील सरकारकडून दिले जातील आणि या हरामखोर आरोपीला फाशीची शिक्षा होईलच यात तीळमात्र शंका नाही .. घटनेनंतर सरकार, प्रशासन आणि पोलीस त्यांचे काम करतील, पण आपल्याला पुन्हा कुठल्या मुलीसाठी असे मोर्चे काढण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी आपण सगळेच घेऊ या. आई-वडिलांनाही माझं सांगण आहे, मुलींशी संवाद ठेवा, तिच्यावर लक्ष द्या. तसेच भावांनीही बहिणीवर लक्ष देणे आवश्यक आहे.आपल्या मुलीच्या /बहिणीच्या संपर्कात कोण आहेत, याची माहिती आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे. अशा घटना कशा टाळता येतील, यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न हवेत आणि समाजाने सुद्धा जागरूकतेने यात लक्ष द्यायला हवे, असं एक आई म्हणून मला वाटतयं BJP भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार मुंबई पोलीस Mumbai Police #MaheshBaldiMLA Commissioner of Police, Greater Mumbai Bhupender Yadav Ashwini Vaishnaw #Uran #YashshriShinde #JusticeforYashshri #Results #Parents #Girlsprotection #भक्कमसरकार #महायुती

Chitra Kishor Wagh

41,756 次观看 • 2 年前