Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

माणसाची बातमी शोधू बातमीतला माणूस नाही ! आपली #लोकशाही ऐका..पाहा..जागरूक राहा..

94,535 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Experience पाटील Certainty
Experience पाटील Certaintyvor 3 Jahren

@LokshahiMarathi ते किरीट सोमय्याची पुढची बातमी चे काय झाले लोकांना कळाल्यास उत्तम अन्यथा आपण वर लिहिलेल व्यर्थ असून फक्त मांडवली साठी केलेली सोय होती असा समज होईल.

Profilbild von मुसाफिर❣️
मुसाफिर❣️vor 3 Jahren

@Pra_kamble14 @LokshahiMarathi Congratulations Kamlesh Sir for New journey ❣️

Profilbild von S R SUTHAR 🇮🇳♛{Modi Ka Parivar}
S R SUTHAR 🇮🇳♛{Modi Ka Parivar}vor 3 Jahren

@LokshahiMarathi Sir follow back plz 🙏🙏

Profilbild von OMKAR KANAL
OMKAR KANALvor 3 Jahren

@LokshahiMarathi Hi sir Omkar this side , i am a media student and i wanted to do intern in your media house.

Profilbild von Yuvraj Kadam
Yuvraj Kadamvor 3 Jahren

@LokshahiMarathi Good luck

Profilbild von Swapnil Pawar
Swapnil Pawarvor 3 Jahren

@LokshahiMarathi आपल्या बुलेटीनं /शो चा टायमिंग काय आहे?

Profilbild von Harshad
Harshadvor 3 Jahren

@LokshahiMarathi जबरदस्त सर....

Profilbild von गणेश घनघाव
गणेश घनघावvor 3 Jahren

@LokshahiMarathi साहेब, Dgar. In चे नजीब खान आणि कंपनी यांनी विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांची फसवणूक करून 19 लाख रुपये लुटले. मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार व FIR दाखल परंतु आरोपी अडीज महिन्यापासून फरार.तक्रारदारांना पोलीस न्याय देतील का?गेलेली रक्कम वापस मिळेल का?विद्यार्थी व पालक चिंतातूर.

Profilbild von Pankaj Joshi
Pankaj Joshivor 3 Jahren

@LokshahiMarathi

Profilbild von *Bagheera*
*Bagheera*vor 3 Jahren

@LokshahiMarathi साहेब आमच्या शहर (तालुका) तब्बल १३ वर्षे झाली पाणीपुरवठा योजना बंद आहे, तुमचा पत्रकार काय झोपा काढतोय का? #बार्शिटाकळी..... जिल्हा अकोला....

Ähnliche Videos

हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. प्रयोगातून हे सिद्ध झालेले आहे की जर तुम्ही तुमच्याबद्दल स्वतः मध्ये कमतरता आहे, आपण इतरांपेक्षा कमी आहोत, आपल्याला अमुक काम जमत नाही, जमणार नाही, आपली पात्रता नाही असा विचार करत राहिलात किंवा त्या धारणेतून जगासमोर गेलात तर आपोआप आपल्याला तसेच अनुभव येत जातात आणि त्यातून आपली धारणा आणखी पक्की होत जाते आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच अनुभवातून जात राहतो. त्यामुळे स्वतःबद्दल नेहमी आत्मविश्वास बाळगा, सकारात्मक विचार करा, आपण कार्यक्षम आहोत, प्रभावी आहोत, आपण परिस्थिती उत्तम रित्या हाताळू शकतो अशा मानसिकतेत राहा. आपल्याला तसेच अनुभव येत राहतील.....

Dr prashant bhamare

18,815 Aufrufe • vor 4 Monaten

हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले.साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस,प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला.साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते.साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही...पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही आंबेगाव धडा शिकवेल

Dr.Jitendra Awhad

95,679 Aufrufe • vor 3 Jahren

माननीय Raj Thackeray साहेब, महाराष्ट्रातून तामिळनाडू व बंगळूरूला नोकरीसाठी गेलेला मध्यमवर्गीय सर्वसामान्य “मराठी माणूस” तमिळ आणि कन्नड समजू बोलू शकत नाही म्हणून तुडवल्या गेला तर तुम्ही व तुमचे महाराष्ट्र सैनिक तिथे त्यांना वाचवायला जाणार का? भरपूर इंजिनिअर्स आणि MBA केलेले आहेत आपले तिकडे.. मराठी माणसं.. आता म्हणाल महाराष्ट्रात का काम करत नाही.. तर तो विषय तुमच्या समजण्या बाहेरचा आहे.. करियर, मेहनत, संधी, प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्स याचा आणि तुमचा काडीमात्र संबंध नाही. भोळा भाबडा प्रश्न.. उत्तर मिळेल अशी अपेक्षा नाहीच तशी पण तरी.. ट्रोल मात्र नक्की होईन.. तुम्ही सोडालंच पिल्लं.. कोण येतंय मला कानफडायला ते या.. तुमचं स्वागत सत्कार मराठीसह ४ भाषेत करण्यात येईल आणि थेट पोलिसांत नेण्यात येईल. असो, तुमचं मराठी साहित्यावर प्रचंड प्रेम आहे आणि वाचन अतिशय तगडं आहे, पू. लं. देशपांडे भाषेवर काय बोललेत ते एकदा ऐका. तुमचे प्रिय आहेत आणि आदर्शही. तुमच्या भाषणांची फॅन असल्याने इतकं तर नक्कीच माहिती आहे मला. ~ आपली छोटी मराठी भैय्यीण. नागपूरकर, पुणेकर, लंडनकर, मुंबईकर, नवी मुंबईकर, अंतिम मुक्काम पुणे… म्हणून पुणेकर..

Sunaina Holey

85,666 Aufrufe • vor 1 Jahr

म्हणूनच युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हायला हवं.! समाजात बदल घडवायचा असेल, तर प्रश्न विचारणारी आणि भूमिका मांडणारी तरुण पिढी पुढे येणं गरजेचं आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ती सक्रिय राजकारणाचा भाग झाली पाहिजे. अलीनगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मैथिली ठाकूर यांनी निर्भीडपणे आणि स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली पाहून समाधान वाटलं. धैर्य आणि ठाम भूमिका असेल, तर कोणताही मुद्दा स्पष्टपणे मांडता येतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. लोकप्रतिनिधी असणं म्हणजे केवळ पद मिळवणं नाही, तर समाजासाठी जबाबदारी स्वीकारणं आहे. चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर त्यावर आवाज उठवणं आणि लोकांचे प्रश्न विधिमंडळात मांडणं हीच लोकप्रतिनिधीची खरी भूमिका आहे. युवकांचा सहभाग वाढला, तर लोकशाही अधिक मजबूत होते. म्हणूनच युवकांनी राजकारणात पुढे यावं, हीच अपेक्षा. #Youth #Politics #Government #leaders #RaiseYourVoice Maithili Thakur

Satyajeet Tambe

24,517 Aufrufe • vor 6 Monaten

अब्दालीपासून देश वाचवला त्यासाठी मराठ्यांचे कुणी आभार मानले का? - Deepak Pawar वैयक्तिक: मराठी माणसाला मांसाहार च्या नावाखाली घरं नाकारणं हे फक्त द्यायचं कारण आहे खरंतर त्यांना मुंबईतुन आपल्याला हद्दपार करायचं आहे, त्यांना मुंबई हवी आहे त्याही पुढे मुंबईला वीज पाणीपुरवठा होतो अश्या भूभागावर सुद्धा ताबा हवा आहे मग तो रायगड रत्नागिरी किंवा संपूर्ण कोंकण पट्टा का असेना, कोंकणात काही हरामखोर स्वतंत्र कोंकण राज्य च्या नावाखाली गुजरात्यांची भांडी घासत आहेत त्यांना पहिले सरळ करण्याची गरज आहे. गमतीची गोष्ट म्हणजे हे सर्व लोकशाही मार्गाने सुरु आहे, आपल्याला भारतीय आहोत एक आहोत भांडणं नको असल्या गुळगुळीत गोळ्या देऊन हे सुमडीत आपला गेम करत आहेत. मराठी माणूस फक्त लाचार सारखा जाऊदे त्यांना नाही चालत वास येतो खात नाहीत ते असं म्हणून विषय सोडून पळ काढतात ते आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरले आहेत. त्यांनी थोडा डोक्याला ताण देण्याची गरज आहे गुजर मारवाडी जैन भल्या मोठ्या संख्येने अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा युरोप अश्या गोऱ्यांच्या रोज मास खाणाऱ्या लोकांच्या देशात राहत आहेत, तिथले स्थानिक गोरे ह्यांची शाकाहार कबुतर कुत्रे मांजरी असली नाटकं खपवून घेतील का? मग त्यांचा हा माज आपणच का सहन करतोय? शाकाहार च्या नावाखाली लॉबिंग करता येणार नाही हे सरकार ला खडसावून सांगण्याची ताकद आपल्यात नाही आहे का? Source: Saam TV

स्वराज्य । Self Rule

22,325 Aufrufe • vor 1 Jahr

🚨 हे काम की फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक? सत्य जाणून घ्या! "नालेसफाईतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही सर्व कामे सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी पहिल्याच पावसात पाणी साचल्यामुळे महानगरपालिका swd विभागाचे AE श्री राम टेके साहेब आणि सब-इंजिनिअर श्री अडसूल साहेब यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी काही तांत्रिक अडचणी निदर्शनास आल्या आणि त्यानुसार काम सुरू करण्यात आले. सुरुवातीला नाल्यातील पाणी मोटरच्या सहाय्याने पाईपद्वारे मुख्य रस्त्यावरील चेंबरमध्ये सोडण्यात येत होते. मात्र तेथून पाणी पुढे वाहून जात नसल्याने ते रिव्हर्स होऊन पुन्हा नागरिकांच्या घरांमध्ये शिरत होते. त्यामुळे आता तो पाईप रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या नाल्यात सोडण्याचे काम सुरू आहे. मात्र, सध्या घटनास्थळी एकही संबंधित अधिकारी उपस्थित नाही. केवळ कामगारांच्या भरवशावर हे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदाराच्या सुपरवायझरने स्पष्टपणे सांगितले की, फ्लो जास्त झाला तर हा ताडपत्रीचा पाईप टिकणार नाही. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी "तू असं का सांगितलंस?" अशी विचारणा केल्याचे या लाईव्ह व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येते. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, ही कामे खरोखर कायमस्वरूपी उपाय म्हणून केली जात आहेत की फक्त जनतेला दाखवण्यासाठी काहीतरी काम सुरू असल्याचा आभास निर्माण केला जात आहे? जनतेच्या करातून येणारा पैसा योग्य आणि टिकाऊ कामांवर खर्च झाला पाहिजे. तात्पुरते उपाय करून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे थांबले पाहिजे. संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray माझी Mumbai, आपली BMC Ashwini Bhide माझी Mumbai, आपली BMCInfra माझी Mumbai, आपली BMCWardL MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Repost Thackeray

Mahendra Bhanushali

23,365 Aufrufe • vor 1 Monat

आज, १२ जानेवारी २०२६ रोजी ठाणे येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - भाजपचे लोकं पैसे वाटतायेत आणि शिंदेंचे लोकं पकडतायेत. काय चालुये सरकारमध्ये तेच कळत नाहीये. - आज घराघरामध्ये पाच-पाच हजार रुपये वाटतायेत. एका बाजूला म्हणतायेत आम्ही विकास केला आणि मग पैसे वाटतायेत. नक्की काय सुरू आहे? - कल्याण-डोंबिवलीत गुलामांचा बाजार मांडलाय. महाराष्ट्रात ६६ ठिकाणी पैसे वाटून फॉर्म मागे घ्यायला लावले. - सोलापूरात फॉर्म मागे घेण्यासाठी आमच्या विद्यार्थी सेनेच्या शहरअध्यक्षाचा खून करण्यात आला. इथपर्यंत सरकार चाललंय? - डोंबिवलीत शैलेश धात्रक, पूजा धात्रक आणि मनिषा धात्रक या एका कुटुंबातील तीन उमेदवारांना १५ कोटींची ऑफर देण्यात आली. पण ती ऑफर नाकारून ते तिघेही निवडणूक लढवत आहेत. - सौ. राजश्री नाईक यांना ५ कोटी रुपयांची ऑफर दिली. ती ऑफर नाकारून त्या निवडणूक लढवत आहेत. आणि तुम्ही ५ हजारांमध्ये मतं विकताय? - सुशील आवटे यांना १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली अशी अनेक लोकं आहेत. कुठून येतो हा पैसा? - बदलापूरात एका लहान मुलीवर अत्याचार झाला त्यातील आरोपीला एन्काऊंटरमध्ये ठार मारला. आणि त्यातल्या सहआरोपीला स्विकृत नगरसेवक केला. हिंमत कशी होते यांची? - रसमलाई (के. अण्णामलाई) सांगतोय मुंबईचा आणि महाराष्ट्राचा संबंध नाही. आणि फडणवीस म्हणतायेत तो असं बोललाच नाही. मला वाटलं होतं फडणवीसांना कळतं. किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा? कोणासाठी करताय हे सगळं? - माझ्या घरी गौतम अदाणीही येऊन गेले, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेले, अंबानी, आनंद महिंद्राही येऊन गेले. म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी? - ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येईल, ज्यावेळी मुंबई-ठाणे यांसारख्या आमच्या शहरांवर संकट येईल. राज ठाकरे दोस्ती वगैरे बघणार नाही - आमचं आणि गुजराती समाजाचं भांडण नाहीये. खरंतर जो डाव सुरू आहे त्याच्याविरोधात इथल्याही गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे. - एक विमानतळ आणि एक पोर्टसोडून अदाणींचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव आणि मोदींचं नाव याच्या जोरावर हा माणूस देशभर पसरत गेलाय. - इंडिगोच्या मालकाकडे या देशाची ६५ टक्के हवाई वाहतूक दिली आहे. त्यानंतर एक दिवस त्या मालकाने वाहतूक बंद केल्यानंतर वाहतूक ठप्प झाली. मग जर, एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते तर अदाणी काय करू शकतो? - या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत पण सगळे व्हावेत एकच नाही. - मी उद्योगपतींच्या विरोधातला माणूस नाहीये. पण एकाच उद्योगपतीवर इतकी मेहरबानी का? हे विचारणारा माणूस आहे. - प्रत्येकाची एक भाषा असते, प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला तुम्ही नख लावताय? - गौतम अदाणीने मुंबई विमानतळ ताब्यात घेतलं त्यानंतर विमानतळावर गरबा खेळवण्यात आला. यातून तुम्हाला काय सांगायचं होतं? वाजवायचे असतील तर फक्त ढोल -लेझिमचं वाजलं पाहिजे मुंबई विमानतळावर बाकी काहीच नाही. - घोडबंदरची नॅशनल पार्कची जमीन एका उद्योगपतीला विकत आहेत. त्याला गणेश नाईकांनी विरोध केला त्यांचं अभिनंदन. - ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे याचा आपण नीट विचार केला पाहिजे. ठाण्याचे अनेक प्रश्न आहेत जशी इथं लोकसंख्या वाढत आहे तसेच प्रश्न सुद्धा वाढतायेत. - हे संकट सध्या तुमच्या उंबरठ्यावर उभं आहे. कोणत्याही क्षणी दरवाजा ठोठावेल. त्यामुळे आज जर चुकाल तर फसाल. - हे ठाणं आपलं आहे. हे ठाणं टिकवणं, यांनी जो आराखडा आखला आहे तो उध्वस्त करणं तुमच्या हातात आहे. - तुमचे जे मित्रपरिवारातील लोकं असतील, नातेवाईक असतील त्या सगळ्यांना सांगा शिवसेनेची मशाल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन जोरात धावलं पाहिजे. - आम्हाला सत्तेचा हव्यास नाहीये वाईट या गोष्टीचं वाटतं डोळ्यादेखत ही शहरं जाऊ नये. डोळ्यादेखत इतरांनी ही शहरं घेऊ नयेत एवढ्यासाठीचं हे युद्ध सुरू आहे. - येत्या १५ तारखेला आपण सर्व सतर्क राहा, कुठेही गाफील राहू नका. जर दुबार मतदार मतदान करायला कोणी आले तर तिथेच कानफडवायचे.

Raj Thackeray

40,578 Aufrufe • vor 7 Monaten