正在加载视频...

视频加载失败

सुरत मार्गे गुहाटीला पळून जाणारे आमदार भाजप नेत्याचा संपर्कात होते... 👇 हा नियोजित कट होता. 🙏

32,268 次观看 • 14 天前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

भाजपाच्या ह्या आमदार पिता पुत्राचा जल्लोष सगळे काही सांगून जातोय की 37 वर्ष दहशत करून विरोधी कोणालाच अर्ज न भरू देता नगरपालिका बिनविरोध करत होते पन त्यांच्या पुंग्या एका विधवा महिलेने कशा टाईट केल्या होत्या ते..! हे निवडणूक लढवून जिंकूच शकत नव्हते जर ह्यांच्यात खरच दम असता तर हे निवडणूकीला सामोरे गेले असते पन जनतेचा कौल राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उज्वला थिटेंच्या बाजुने होता म्हणून यांनी हा रडीचा डाव खेळला आहे….! मी जबाबदारीने सांगतो त्यांचा अर्ज स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष उमेश पाटीलांनी चार वकिल सोबत घेवुन भरला होता व सुचक म्हणून निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यांच्या समोरच सह्या करून घेतात व सुचक होता त्यांचा मुलगा मंग अर्ज बाद कसा केला गेला ह्यात खुप मोठे षडयंत्र आहे….! ह्या प्रकरणात लाज गेली आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांची हे लक्षात घ्या …!🙏🙏

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

48,018 次观看 • 9 个月前

📍नागपूर जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाद्वारे आयोजित जनजातीय गौरव दिन कार्यक्रमाला आज संबोधित केले. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे जी, मंत्री श्री अशोक उइके जी, राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक जी, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री रवींद्र चव्हाण जी, आमदार श्री आशिष देशमुख जी, मुख्य सचिव श्री राजेश कुमार जी व अन्य मान्यवर उपस्थित होते. जनजातीय गौरव दिन हा आपल्या देशाच्या इतिहासात एक पौराणिक महत्त्व याच्याशी नातं सांगणारा दिवस आहे. देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे. आदिवासी संस्कृती, इतिहास आणि वारसा यांची एक वेगळी छाप आहे. विविध क्षेत्रांशी निगडित लघुउद्योगांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. #जनजातीय_गौरव_दिवस #JanjatiyaGauravDivas Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Dr.Ashok Uike Indranil Naik Ravindra Chavan Dr. Ashishrao R. Deshmukh

Nitin Gadkari

16,128 次观看 • 9 个月前

निवडणूक मतदान घोटाळा अर्थात वोट चोरी या प्रकरणाची सुरूवात मुख्य निवडणूक आयोगाची निर्मिती कशी व्हावी, या मा. सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आताच्या सत्तारूढ पक्षाने लोकसभेत फिरवून घेतला. मा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, जर निर्वाचन आयोगाला पक्षाभिनिवेशापासून दूर ठेवायचे असेल, पक्षपाती कामापासून त्यांना रोखायचे असेल तर निवडणूक आयुक्तांची निवड करताना जी समिती नियुक्ती केली जाणार आहे; त्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असावा. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संविधानाला पायदळी तुडविणाऱ्या या सरकारने सदरचा निर्णय लोकसभेत बदलून घेतला अन् सरन्याधीशांना त्या समितीच्या बाहेर काढून त्या जागी आणखी एक मंत्री असावा, असा निर्णय करून घेतला. त्यामुळेच आपल्याला हवा तो निवडणूक आयुक्त आणता येईल, असा त्यांचा कट होता, अन् झालेही तसेच ! त्यानंतर जे पहिले निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आले त्यांचे नाव होते राजीव ! हे राजीव भाजपचे बोलके बाहुले म्हणूनच काम करीत होते. या नंतरच महाराष्ट्रातील सरकार पडले. सरकार पाडण्यास जबाबदार असलेल्या अन् पक्ष स्वतःचा असल्याचा दावा करणाऱ्यांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाने पार पाडली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जो घोटाळा झाला, त्यामध्येही निवडणूक आयोगाचाच त्यात सहभाग होता. याची खरी सुरूवात जेव्हा मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून घेतला, तेव्हाच झाली होती. याचाच अर्थ हे प्लॅनिंग कधीपासून झाले अन् हा वोट चोरीचा कट कधीपासून रचला होता, याचा विचार आता जनतेनेच करावा. #VoteChori #VoteChor #ECI #ECIVoteChor

Dr.Jitendra Awhad

12,421 次观看 • 1 年前

मुंबई महानगरपालिकेवर भाजपा- महायुतीचा भगवा झेंडा! एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे आज भव्य मुंबई भाजपा 'विजय संकल्प मेळाव्या'ला संबोधित केले. मुंबईमध्ये विजय संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जोश पाहिल्यानंतर, आपला विजय कोणीही थांबवू शकत नाही, हा विश्वास माझ्या मनात दृढ झाला आहे. गेल्यावेळी मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बनत असताना उद्धवजींसाठी एक पाऊल मागे येऊन महापौर पद सोडून दिले. परंतु त्याबदल्यात 2019 च्या विधानसभेला त्यांनी आम्हाला दगा दिला. 2019 ला आमच्याकडून सत्ता हिरावून घेतली गेली, 2022 मध्ये आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024 मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे सरकार आणून दाखवले. यावेळी मुंबई महानगरपालिकेवरही महायुतीचा भगवा झेंडा फडकवणार महायुतीचा; महापौर बसवल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. खरंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे 'ब्रँड' होते; हे ब्रँड नाहीत! भारतीय जनता पक्षामध्ये एक सामान्य कार्यकर्ता हा देखील मुंबई भाजपाचा अध्यक्ष होऊ शकतो, हीच या पक्षाची परंपरा आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातील सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे आणि त्यांचे नाव आहे मा. नरेंद्र दामोदरदास मोदी. मुंबई कोणाची, याचे उत्तर 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभेच्या निकालांनी दिले आहे. मुंबई ही भाजपाची, मुंबई ही भाजप–शिवसेना–महायुतीची! मुंबई महापालिकेला भ्रष्टाचारातून मुक्त करणारा सामान्य कार्यकर्ताच महापौर होणार हे नक्की! बीडीडी चाळीचा प्रकल्प हा संपूर्ण आशियातील सर्वात मोठा अर्बन रिन्युअल प्रकल्प आहे. अभ्युदय नगरमधील मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मेट्रो प्रकल्प बाधित गिरगावकरांना गिरगावातच पुनर्वसनाच्या इमारती आम्ही बांधून दिल्या. विरोधकांनी मुंबईकरांसाठी काय केले? याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावे लागेल. कोविड काळात मुंबईकरांच्या टाळूवरचे लोणी खाणारे, बॉडी बॅगमध्येही घोटाळा करणारे 'कफनचोर' कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर येतील, हा माझा प्रश्न आहे. धारावीतील 10 लाख लोकांना आम्ही धारावीतच घर देणार आहोत. लवकरच मुंबईकरांसाठी एसी लोकल गाड्या आणणार आहोत. मुंबईकरांसाठी असे अनेक विकास प्रकल्प राबवत आहोत. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मा. केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Ravindra Chavan Ameet Satam Piyush Goyal भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai #Maharashtra #Mumbai #BJP

Devendra Fadnavis

17,745 次观看 • 11 个月前

मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे #संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो #शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी. टीप : एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेलच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेल.🙏😊 Office of Uddhav Thackeray .Aaditya Thackeray Ambadas Danve Dr.Jitendra Awhad Maharashtra State Commission for Women CMO Maharashtra Devendra Fadnavis Commissioner of Police, Greater Mumbai महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Kedar Dighe Rajan Vichare - राजन विचारे Rupali Chakankar

Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.

183,747 次观看 • 3 年前

आई आई, तू गेल्यानंतर खूप गमावून बसलो.. नेमके काय हरवले..काय गमावले ती समज नाही मला आणि,शब्दही नाहीत ते सांगायला.. मी अपूर्ण आहे, तुझ्याविना..! आभाळाकडे पाहिले, ढग फिरत होते... कल्लोळ करत होते.. आसमंत भरून आला होता.. एक क्षण वाटले.. तू थेंब बनून परतशील.. आई,तू कायमची सोडून गेलीस.. तू सोबत असेपर्यंत, मी लहान होतो.. खरंच सांगतो, आता क्षणार्धात मोठा झालो... एक सांगू, मुलगा हा आयुष्यभर लहानच असावा.. त्याला आईची सोबत असावी.. तू अनंत हालअपेष्टा भोगल्या आम्हाला घडवले, घराला सावरले, संसार उभा केला.... ईश्वरेच्छेने तू आज अनंतात विलीन झालीस पण, ते काहीही असले, तरी तू कायम माझ्यासोबत आहेस... आजूबाजूला.. मायेची ऊब देत.. तुला देवाज्ञा नव्हे, आई, तूच देव झालीस..!! • चंद्रशेखर 🙏

Chandrashekhar Bawankule

129,692 次观看 • 2 年前

आज विधानसभेत आक्रमक झालेले विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. विधानसभाध्यक्षांच्या आसनाजवळ गेले हा त्यांचा गुन्हा होता. परंतु, विधानसभाध्यक्षांच्या आसनाजवळ जाणारे ते पहिलेच विधानसभा सदस्य आहेत का? आता सत्तेत असलेले आणि काही वर्षांपूर्वी विरोधात असलेले तसेच आता मंत्री असलेले अनेकजण आसनाकडे धावून गेलेले आहेत अन् अध्यक्षांशी हुज्जतदेखील घातलेली आहे. जोपर्यंत राजदंड पळविला जात नाही किंवा राजदंडाला हात लावत नाहीत. तोपर्यंत आसनाजवळ उभे राहणे हे काही गुन्हा नाही. हा लोकशाहीमध्ये आमदारांना विधानसभेत प्रदान केलेला एक अधिकार आहे आणि तो मर्यादित स्वरूपातच वापरला जातो. लोणीकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे, अशी सार्वत्रिक भावना असताना ते आक्रमक होऊन नाना पटोले आसनाजवळ गेले. पण, त्याला राजकीय रंग देत, त्याचा वेगळाच अर्थ काढत त्यांना एकदिवसासाठी निलंबित करण्यात आले. मला वाटते, ज्यांनी ज्यांनी विधानसभेत काम केले आहे; ज्यांनी इतिहास पाहिला आहे, त्यांना माहित आहे की, कोण कोण आसनाच्या शेजारी जाऊन उभे राहिले आहे; आसनाशेजारी आंदोलन केले आहे. अशी अनेक नावे घेता येतील. मात्र, कारवाई फक्त नाना पटोले यांच्यावरच का केली, याबाबत आमच्यासारखे सदस्य अनभिज्ञ आहेत. Nana Patole

Dr.Jitendra Awhad

17,979 次观看 • 1 年前

आता कळली का शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका.... आजची सुप्रीम कोर्टाची टिप्पणी स्पष्ट करते की आम्ही मांडलेले मुद्दे तर्कशुद्ध आणि योग्य होते. सर्वोच्च न्यायालयाने विचारलेला हाच प्रश्न मी लोकसभेत उपस्थित केला होता, परंतु नेहमीप्रमाणे भाजपने ह्या महत्त्वपूर्ण मुद्द्याला बगल दिली. प्रश्न टाळणे म्हणजे त्याचे निराकरण नाही, तो समोर येणारच आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वक्फ संशोधन विधेयकास पूर्ण विरोध नाही परंतु उपरोक्त मुद्द्याप्रमाणे काही निर्णय भविष्यात सर्वांनाच धोकादायक आहेत, त्यात स्पष्टता येणे, पारदर्शकता येणे आवश्यक आहे. भाजप शासित केंद्र सरकारने वक्फ संशोधन बिल हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे आणि मित्रांसाठी प्रॉपर्टी हस्तगत करण्याचे आयुध न मानता दुरगामी परिणामांचा अभ्यास करून ते आणणे आवश्यक होते. पण विरोधकांचे रास्त मुद्दे सुद्धा दुर्लक्षित करायचे आणि धार्मिक तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची हा भाजपाचा अजेंडा....आता सर्वोच्च न्यायालय यावर शिक्कामोर्तब करतेय... #ArvindSawant #ShivsenaUBT #WaqfAmendmentBill Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

Arvind Sawant

12,786 次观看 • 1 年前

ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी ? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हाथ होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले? बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते. जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे 'केम छो वरली' म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते. जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असतांना यांना मराठी माणूस आठवला नाही. 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता? जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान!

Sujat Ambedkar

28,236 次观看 • 5 个月前

बिल्डर मित्रासाठी Devendra Fadnavis आणि महापालिका आयुक्तांचा यू-टर्न महापालिका प्रश्नावर दबाव इतका मोठा होता की अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्याच खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर विरुद्ध भूमिका घेतली होती. याच महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाने २४ जून २०२२ रोजी आदेश जारी केले होते, ज्यात २००९ मध्ये दर्शन डेव्हलपर्सला दिलेली तीच एनओसी रद्द करण्याची मंजुरी दिली होती. तेव्हा जोरदार युक्तिवाद केला होता की ती एनओसी डीसी तरतुदींच्या विरोधात होती आणि सार्वजनिक हिताची नव्हती. त्यानंतर २७ जून २०२२ रोजी बीएमसीने एसआरएला एनओसी रद्द करण्याचे कळवले होते. बीएमसीनेच हे देखील निदर्शनास आणले होते की, या प्रकरणात, सुधार समितीची संमती आणि ठरावाशिवाय भूखंडाची विल्हेवाट लावण्यात आली होती, जे बेकायदेशीर आहे. बीएमसीच्या अंतर्गत दक्षता अहवालातही असे म्हटले होते की एसआरए प्रस्ताव ना बीएमसीच्या हिताचा आहे, ना व्यापक सार्वजनिक हिताचा. या प्रस्तावाबाबत केवळ आयुक्तांनीच नाही तर संबंधित प्रत्येक विभाग आणि अधिकाऱ्यांनी या भूखंडावर झोपडपट्टी योजनेला विरोध केला होता आणि एनओसी रद्द करण्याची मागणी केली होती. आयुक्त गगराणी किंवा उपायुक्त किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याने, आपली भूमिका १८० डिग्री मध्ये का बदलली याचे फाईलवर कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रश्न असा आहे की, यापूर्वी बीएमसी आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग, ज्याच्या मालकीची ही जमीन आहे, त्यांना जो प्रस्ताव अस्वीकार्य होता, तो रातोरात स्वीकारार्ह कसा झाला? 👉 काय खेळ झाला? 👉 बिल्डरच्या प्रस्तावासाठी कोणी दबाव आणला? 👉 आयुक्तांवर कोणी दबाव आणला? 👉 यामागे कोण आहे? मुख्यमंत्र्याच्या यू-टर्न महापालिकेच्या नोंदींवरून असे दिसून येते की खुद्द Devendra Fadnavis जी यांनी जानेवारी २०१३ मध्ये, म्हणजेच जेव्हा ते विरोधी पक्षातील आमदार होते तेव्हा त्यांनी बीएमसीकडे तक्रार केली होती, ज्यात हा एसआरए प्रकल्प रद्द करून भूखंडाचा विकास बीएमसीने स्वतःच करावा अशी मागणी केली होती. म्हणून, मी Devendra Fadnavis जी यांना थेट प्रश्न विचारते... २०१३ पासून आता काय बदलले आहे? तुमचे हृदयपरिवर्तन का झाले?माझी Mumbai, आपली BMC चा मोक्याचा भूखंड एका खाजगी बिल्डरच्या हातात का सोपवला जात आहे? यामध्ये असे ही दिसते की ४ डिसेंबर २०१४ रोजी, तत्कालीन सुधारणा समितीच्या अध्यक्षा, भाजपच्या उज्ज्वला मोडक ताई, यांनी Ashrafazmi यांच्या तक्रारीवर कारवाई करत, २००९ ची एनओसी रद्द करण्याच्या बाजूने निर्णय दिला होता. मग आता निर्णय का बदलला? #JuhuLandScam #MitrjiviSarkar #MumbaiLootExposed #MukhyamantriLadkaMitraYojana #LandScam

Prof. Varsha Eknath Gaikwad

28,044 次观看 • 11 个月前

आज पुन्हा हलून निघाले. डोकं पुन्हा सुन्न झालं. ३२ वर्षीय रत्नाशील निंबाळकर, राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा १२ मार्चला क्रूर पद्धतीने खून केला गेला. आईवडील, विधवा बहीण, तिची २ मुलं, तो व त्याची पत्नी व २ मुलं या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा मिलिटरी मधे होता, तिथून त्याला काढून टाकण्यात आले होते असे त्या गावाची लोकं सांगतात. ह्या माणसाचे लग्न झाले नव्हते व त्याचा एक स्त्री बरोबर संबंध होते. ह्या माणसाला पूर्ण गाव “काका” म्हणायचं. रत्नाशील नी माझी गावात बदनामी केली या मुळे त्याने मनात राग घेऊन दत्तात्रय नी त्याच्याच आडनावाच्या व्यक्तीचा निर्दयी पणे खून केला. १२ मार्चला बहिणीचा मुलाची १० वी ची परीक्षेला त्याला रत्नशील सोडायला गेला, तिथून घरी येताना, दत्तात्रय नी त्याला गाडीने उडवला आणि खाली पडल्यावर कोयत्याने त्याला अनेकदा मारले. हा अजून फरार आहे. तिथल्या पत्रकारांनी बातमी देखील केली नाही कारण त्याच्यावर “दबाव” आहे. कसला दबाव ? काय हे ? ह्या आरोपी दत्तात्रयचा सख्खा भाऊ हा भाजप चा फलटण चा सरचिटणीस आहे. त्यांना हात जोडून विनंती, कृपया ह्या कुटुंबाला मदत करा आणि न्याय होऊ द्या . मी SP समीर शेख अतिशय चांगले अधिकारी आहेत. मी यांच्याशी बोलले. ते स्वतः लक्ष घालून या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर नक्कीच मिळवून देतील. फोटो इतके भयाण आहेत की ते मी नाही पाठवू शकत. पण त्या आरोपी दत्तात्रय निंबाळकर चा फोटो मी ट्वीट करत आहे. गृह मंत्री Devendra Fadnavis ह्यात न्याय होईल ह्यासाठी आपण निर्देश द्यावेत.

Mrs Anjali Damania

30,784 次观看 • 1 年前

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार. 2014 ते 2019 या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांति 🙏🏽 #GirishBapat

Devendra Fadnavis

238,654 次观看 • 3 年前

उरण ची आमची मुलगी यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करणाऱ्या हरामखोर दाऊद शेखला फाशीच होणार…! आज नवी मुंबईतील उरण येथे आमदार महेश बालदी यांच्यासह जाऊन मयत यशश्री शिंदे हिच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उरण पोलीस ठाण्यात जाऊन डीसीपी पानसरे यांचीही भेट घेतली आणि या घटनेसंदर्भातील सविस्तर माहिती घेतली. नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हरचं काम करत होता. त्याची इथेच मयत यशश्रीशी भेट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन परवाची ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीच्या जवळच्या सहकाऱ्यांना व परिवारातील लोकांना ताब्यात घेतले असून तीन टीम बंगळूरूला रवाना केल्या आहेत. लवकरच आरोपीला अटक होईल, याची पोलिसांना आणि आम्हालाही खात्री आहे… दि. २६ जुलैला रात्री आठ वाजता ही युवती हरवल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी दाखल केली आहे, त्याच दिवशी रात्री साडेबारा वाजता या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांनी सॅटॅलाइटच्या मदतीने लोकेशन घेत त्या दृष्टीने तपास सुरू केला. CCTV फुटेजच्या माध्यमातून कोण कुठून किती वाजता निघाले याचाही शोध पोलिसांनी घेतला… झालेली घटना अतिशय अमानवी व आत्यंतिक वेदना देणारी आहे. राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून असून नवी मुंबई पोलीस आयुक्त व अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश आणि सूचना देताहेत. आमदार महेश बालदी हे कालपासून घटनास्थळापासून ते हॉस्पिटल पोस्टमार्टेम या सगळ्या प्रक्रियेत परिवाराच्या सोबत आहेत… या प्रकरणांमध्ये चांगल्यात चांगले वकील सरकारकडून दिले जातील आणि या हरामखोर आरोपीला फाशीची शिक्षा होईलच यात तीळमात्र शंका नाही .. घटनेनंतर सरकार, प्रशासन आणि पोलीस त्यांचे काम करतील, पण आपल्याला पुन्हा कुठल्या मुलीसाठी असे मोर्चे काढण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी आपण सगळेच घेऊ या. आई-वडिलांनाही माझं सांगण आहे, मुलींशी संवाद ठेवा, तिच्यावर लक्ष द्या. तसेच भावांनीही बहिणीवर लक्ष देणे आवश्यक आहे.आपल्या मुलीच्या /बहिणीच्या संपर्कात कोण आहेत, याची माहिती आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे. अशा घटना कशा टाळता येतील, यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न हवेत आणि समाजाने सुद्धा जागरूकतेने यात लक्ष द्यायला हवे, असं एक आई म्हणून मला वाटतयं BJP भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार मुंबई पोलीस Mumbai Police #MaheshBaldiMLA Commissioner of Police, Greater Mumbai Bhupender Yadav Ashwini Vaishnaw #Uran #YashshriShinde #JusticeforYashshri #Results #Parents #Girlsprotection #भक्कमसरकार #महायुती

Chitra Kishor Wagh

41,756 次观看 • 2 年前

अटकेनंतर सिया गोयलची भावनिक पोस्ट चर्चेत . . लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले गेलेल्या केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. केतनचा मृत्यू ट्रेकिंगदरम्यान अपघातीरीत्या दरीत पडल्यामुळे झाल्याचे सुरुवातीला मानले जात होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सिया गोयलने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केतनसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि चॅट्सचा समावेश होता. या पोस्टमध्ये सियाने, “तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास... आपण लग्नाच्या इतके जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्ने होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतके प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास? Rest in Peace,” असे भावनिक शब्दांत लिहिले होते. त्या वेळी अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र, पोलिस तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार केतनचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असू शकतो. केतनला जाणूनबुजून दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून त्याच दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, सियाची जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी दुःख व्यक्त करणारी ही पोस्ट आता तपासाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्याच नजरेतून पाहिली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व पुरावे, मोबाईल डेटा आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून आगामी तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #LohagadCase #SiyaGoyal #KetanAgrawal #PuneCrime #SocialMediaExposed #PimpriChinchwad #MarathiNews #CrimeUpdate

थोडक्यात

121,236 次观看 • 2 个月前

लवासा प्रोजेक्ट बंद पडून १४ वर्षे झाली. आज तिथे फक्त पहिल्या फेज मधील काही बांधकामे पूर्ण दिसत असली तरी एकंदरीत वापर फारच मर्यादित आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील विकसन, बांधकामे हे सगळे अर्धवट सोडून दिलेले असून केवळ कच्चे रस्ते, इमारतींचे गंजून काळवंडलेले सांगाडे असे भेसूर दृश्य आहे. जुलै २०२३ मध्ये ज्या डार्विन रिऍलिटीने हा प्रकल्प NCLT च्या रिसोल्युशन प्लॅन नुसार विकत घेतला त्यांना पूर्तता करता आलेली नाही. डार्विनला हा प्रकल्प १८१४ कोटी रुपयांना मिळाला होता. हे पैसे पुढील आठ वर्षात भरायचे होते. तसेच सदनिका आणि बंगलेधारकांना वाढीव दराने पैसे घेऊन बांधकाम करून द्यायचे होते. सुरुवातीला भरायचे काही कोट रुपये देखील भरण्यात आले नाहीत. त्यामुळे सप्टेंबर २०२४ मध्ये NCLT ने त्या व्यवहाराला स्थगिती दिली असून अनेक नवीन बिडर लिलावात आले आहेत. वालोर इस्टेट ची सर्वात मोठी बोली (केवळ) ७७१ कोटीची आहे. बोली मागवण्यासाठी बँकांनी मुदतवाढ घेतली आहे. लवासा दिवाळखोरीत गेल्यामुळे बँकांचे तब्बल ५,७१३ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. म्हणजेच भारतीय नागरिकांचे एवढे पैसे हजामतीमध्ये गायब झालेले आहेत (haircut). हे जे नुकसान झाले ते कोणाचे? अजित गुलाबचंद यांचे? पर्यावरणवाद्यांचे की जनतेचे? एक जागतिक दर्जाची लेक सिटी वेळेत होऊ शकले नाही, हे नुकसान कोणाचे? ते असो .. पण लवासा बंद पाडण्यामागे तेथील आदिवासी आणि गरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या जनआंदोलनाचा आणि पर्यावरणवाद्यांचा मोठाच सहभाग आहे. लवासा कंपनीने हम करे सो कायदा या न्यायाने महसूल, नगर नियोजन, कमाल जमीन धारण कायदा आणि पर्यावरण विषयक कायद्यांचे उघड उघड उल्लंघन केले. लवासासाठी चार पदरी रस्ता बांधून त्याचा भुर्दंड सामान्य प्रवासी नागरिकांना पडू लागला. या सगळ्या प्रकारांमुळे या प्रकल्पाविरुद्ध तीव्र जनमानस तयार झालं. तसेच विविध कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायालयाने हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. कालांतराने कंपनी नुकसानीत आणि नंतर दिवाळखोरीत गेली. नादारी आणि दिवाळखोरी IBC कायदा तर सरळ सरळ कर्जबुडव्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच बनवलेला आहे. कंपनी कायदा न्यायाधीकरण NCLT, प्रकल्पाची मालमत्ता लिलावाने विकून, येतील तेवढे पैसे घेऊन नवीन कंपनीला प्रकल्प हस्तांतरित करण्यासाठीच काम करते. बँका त्यांच्याकडची थकीत कर्ज तिसऱ्याच कंपनीकडे हस्तांतरित करून स्वतःचे ताळेबंद स्वच्छ करतात. यामध्ये कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्त संस्थांचे करोडो रुपयांचे नुकसान होते ज्याला हेअर कट असा चकचकीत शब्द वापरला जातो. हे नुकसान देशातल्या जनतेचे आणि सामान्य नागरिकांचे असते कारण त्यांचा कष्टाचा पैसा सर्वांच्या संगनमतने बुडालेला असतो. प्रकल्प आला की त्याला विरोध. जनआंदोलन हा लोकशाही हक्क आहेच पण ज्याप्रमाणे पर्यावरणवादी कोणत्याही प्रकल्पाला विरोध करताना सोशल अँड इकॉलॉजिकल इम्पॅक्ट असेसमेंट ची मागणी करतात तसे इकॉनॉमिक इम्पॅक्ट असेसमेंट त्यांनी स्वतःच्या आंदोलनाचेही केले पाहिजे. आंदोलन केल्यानंतर नक्की काय होईल, त्याचा एकंदरीत अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, काय फायदा होईल याचा विचार करून विरोध केला पाहिजे. केवळ हे बंद पाडा, ते बंद पाडा यामुळे काहीच साध्य होणार नाही. चळवळींनी आणि पर्यावरणवाद्यांनी पर्यायी विकास नीती काय याची सुद्धा मांडणी केली पाहिजे. त्याशिवाय आंदोलन करून प्रकल्प बंद पाडण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. #लवासा #LAVASA #पर्यायी_विकास_नीती ॲड. संदीप ताम्हनकर. पुणे.

Saurabh Koratkar

31,702 次观看 • 10 个月前

आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत पार पडलेल्या येवला येथील 'संवाद' सभेला उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. येवल्याला आल्यानंतर दोन गोष्टी जिव्हाळ्याच्या वाटतात एक म्हणजे कांद्याचा सुगंध आणि दुसरी म्हणजे पैठणी साडी... येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावेळी मोठे नुकसान झाले याला केवळ भाजपाचे आयात निर्यात विषयीचे धोरण कारणीभूत असल्याची भूमिका मांडली. कोणत्याही शेतीमालाला आज योग्य भाव नाही. शहरात टोमॅटो महाग विकला जात आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. मग मधला पैसा जातोय कुठे असा सवाल उपस्थित केला. मध्यंतरी केंद्र सरकारने परदेशातून दूध आयात करण्याचा निर्णय घेतला होता पण पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत परदेशातून एक लिटरही दूध भारतात येऊ देणार नाही. त्यानंतर हा निर्णय मागे घेत सरकारने त्याची जबाबदारी राज्यांवर टाकली. एकीकडे कांदा आयात निर्यातीचे धरसोडीचे धोरण आणि दुसरीकडे दूध आयातीचा निर्णय अशी विचित्र भूमिका केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप केला. तुमच्यासाठी इथले स्थानिक का लढले नाही हे माहित नाही. पण ही तुमची भगिनी, तुमची ताई ही हक्काची ताई आहे. तुम्ही म्हणाल ते काम करून न्याय मिळवून देईन, असा शब्द यावेळी दिला. आपल्यातील काहीजण भाजपाकडे गेले आहेत. त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण आज महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. युपीएचे सरकार असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रु होता. तो आज ११५० रुपये झाला आहे. हे बघता पुढच्या निवडणूकीत कोणाला मतदान करणार असा सवाल उपस्थित केला. मागील १५ वर्षात येवल्यात एकही मोठा प्रकल्प आला नाही. पण जर येवलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आणि पवार साहेबांवर ठाम विश्वास असणारा उमेदवार निवडून दिला तर तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळू शकेल. या भागात उद्योग येऊन रोजगार उपलब्ध होतील असे आश्वासन दिले. येथे येत असताना रस्त्यावर असंख्य प्रेम करणारे नागरिक भेटत होते. प्रत्येकजण म्हणत होता, ताई तु घाबरू नकोस लढ, त्यांचे हे प्रेमच आमच्यासाठी ताकत असल्याचे आवर्जून सांगितले. पण मी घाबरत नाही मी जर घाबरले असते तर आज तिकडे गेले नसते का? शोले चित्रपटात एक डायलाॅग आहे जो डर गया वो मर गया आणि आज सत्ताधारी विरोधकांना lCE चा धाक दाखवला जात आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय, आणि ईडी याची भीती दाखवली जाते. कोणी घाबरून तिकडे गेले की वाँशिंग पवाडर वापरून त्याला क्लिन केले जाते. त्यामुळे या प्रवृत्तीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. ही लढाई सोपी नाही, पण निष्ठेने आणि एकीने लढलो तर विजय आपलाच होईल. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीपुढे कधीही झुकला नाही आणि झुकणार नाही हे दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिला हळव्या असतात पण जर कोणी तिच्यावर घात केला तर तीच महिला मा जिजाऊ, ताराराणी आणि अहिल्याबाई होते. माझ्यावर पद मागितल्याचा आरोप केला जात आहे. पण एक लोकसभेचे तिकिट सोडले तर मी पक्षाकडे कोणतही पद मागितले नाही. मी मागितल्यावर मला पद मिळाले असते पण माझी विचारावर निष्ठा आहे. पद मिळाले नाही तरी चालेल पण मी माझा विचार कधीही सोडणार नाही असे ठामपणे सांगितले. सत्ता येत जात असते. केंद्रात सत्तर मंत्री आहेत पण देशाला आज कृषी मंत्री कोण आहे हे माहित नाही. येवल्यात आमदार निवडून आल्यास मांजरा पाडा कॅनाॅल, उणेगाव वरतवाडी कॅनाॅलचा विषय पूर्ण करु असे आश्वासन दिले. महाराष्ट्राविरोधात एक षडयंत्र केले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, आज पवार साहेबांचा पक्ष फोडलाय. पण आज दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारे कोण असतील तर ते पवार साहेब आहेत. म्हणून हे षडयंत्र करत महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. रोजगार बाहेर जात आहेत. यासाठी एक अदृश्य हात काम करत आहे. पण मला महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची आन बान शान टिकवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे असे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तत्वावर काम करणारा आहे. त्यामुळे येवल्यातून सुरु झालेल्या लढाईचा शेवट जनताच करेल आणि महाराष्ट्राविरोधात कट कारस्थान करणाऱ्याला सोडणार नाही असे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. #Live #Nashik #Yeola

Supriya Sule

44,909 次观看 • 3 年前

भाटाललेला बहुजन समाज नीट शेवटपर्यंत वाचा…! गणपती बप्पा बुध्दी व ज्ञानाची देवता मानली जाते पन भक्तांना दोन्ही गोष्टी द्यायला बप्पा कमी पडतोय आसं एकंदरीत दिसंतय…! तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांचे विचार समजत नाही तुम्हाला संत गाडगेबाबा, महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे यांनी काय लिहून ठेवलंय ते खरं वाटत नाही पन आत्ताच्या बाबा पुरंदरे यांनी सोईनुसार लिहिलेला इतिहास खरा वाटतो हे दुर्दैव आहे…! खालच्या पोस्टमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी गणेशोत्सव कसा व कोणी कशासाठी चालू केला हे त्यांनी सांगितले आहे व छत्रपतींच्या काळात गणेशोत्सव होत नव्हता असे सांगितले आहे ना की गणपतीच नव्हता ते….! 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ पण आपले महान ज्ञानी भक्त आले पुरातन गणपती मुर्ती व शिवकालीन शिलालेख घेवून व लागले कोकलायला…! गणपतीचा पहिला उल्लेख हा ऋग्वेद ह्या प्राचीन संस्कृत ग्रंथात आहे हे पन 99.99 टक्के भक्तांना माहित नसेल तर 'अग्निमीळे पुरोहितम्' हा पहिला मंत्र त्याचा आहे तुम्हाला अलिकडच्या काळातील गाडगेबाबा व प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाचा अर्थ समजत नसेल तर प्राचीन वेद पुराण, गाथा, ज्ञानेश्वरी वगैरे काय घंटा समजणार…! ह्या पोस्टमुळे माझ्यावर सगळा बहुजन समाज टिकास्र घेवुन तुडून पडला होता पन एक पन सुशिक्षित बामन त्या पोस्टखाली आला नाही कारण त्यांना सत्य इतिहास माहित आहे त्यामुळे ही पोस्ट कोणीच खोडुन काढु शकले नाही कारण मी काय माझ्या मनाने लिहिले नाही माझ्या प्रत्येक लिखानाला आधार असतो हे समजुन घ्या..! मी सांगितले होते की पुण्यात गणपतीची पहिली मिरवणूक ही बामनांनी काढली होती व त्यात एका चांभाराच्या मुलाने गणपतीला हात लावला तेंव्हा टिळकांनी त्याचे विसर्जन केले तेव्हा ही प्रथा पडली..! तुम्हाला जर गाडगेबाबा व प्रबोधनकारांनी नेमकं काय सांगितलं आहे हेच कळाले नसेल तुम्ही किमान ज्यांचा इतिहासात अभ्यास आहे त्यांचे तरी ऐकावे नाहीतर गणेशोत्सवात काळात दहा दिवस इतिहास व साहित्यिक भाषेचा अभ्यास करावा …! 🤣🤣 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 #येड्याचा_बाजार #BoycottINDvPAK #INDvsPAK #आंधश्रध्दा

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

11,615 次观看 • 11 个月前