Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ही दडपशाही आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीत ही दडपशाही कधीच खपवून घेतली गेली नाही, आणि घेतली जाणार नाही. पीडितेच्या वडिलांना कॉलरला पकडून उठवण्यात आलंय'आज अख्ख्या महाराष्ट्रा पहात आहे. ही कोणती न्याय व्यवस्था? आरोपीला VIP ट्रीटमेंट आणि पीडितेच्या बापाला गुन्हेगारासारखी वागणूक?

34,656 Aufrufe • vor 3 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ( #KDMC ) महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांशी कथित मारहाणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोप आहे की, शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की, मारहाण आणि अरेरावी केली. CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. सत्तेचा माज कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. #KalyanDombivli #Maharashtra #Mumbai CMO Maharashtra कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC

Mumbai Congress

56,581 Aufrufe • vor 1 Monat

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.

Supriya Sule

191,134 Aufrufe • vor 3 Jahren

नाशिकच्या दिंडोरीत शेतकऱ्यावर अन्याय करणारी घटना समोर आली आहे. शेतकऱ्याने OTS अंतर्गत कर्जाची परतफेड केली, तरीही कथितपणे चुकीची कागदपत्रे सादर करून अडीच कोटींची जमीन अवघ्या ७३ लाखांत लिलावात विकल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकाराला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांकडून मारहाण झाल्याचाही आरोप आहे. फडणवीस सरकारच्या काळात बँकांची मनमानी आणि पोलिसी दडपशाही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. बळीराजाला न्याय देण्याऐवजी त्यालाच धमकावलं जात असेल, तर ही लोकशाही नव्हे तर सत्तेची दडपशाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचे उत्तर द्यावं लागेल. फडणवीस, तुमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कधीही उभं नव्हतं आणि उभे नाही पण आता जमीन बळकावल्याचे आरोप असलेल्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार का ? महाराष्ट्राला याचं उत्तर हवं आहे.

Maharashtra Congress

13,015 Aufrufe • vor 18 Tagen

📍 Thane ठाणे येथील आनंदनगर मधील भारत गॅस एजन्सीत एका महिला कर्मचाऱ्याने ग्राहकाला उघडपणे सांगितले – “मराठीत बोलणार नाही, हिंदीतच बोलेन!” महाराष्ट्रात राहून मराठी माणसाशी अशी उर्मट भाषा? हा मराठीचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही! या घटनेची माहिती मिळताच मनसे ठाणे शहर उपाध्यक्षा मंजुळा डाकी, पालिका उमेदवार प्रतीक्षा डाकी आणि ठाणे प्रभाग अध्यक्ष निखिल आळशी यांनी तात्काळ एजन्सीत धाव घेतली आणि त्या मुजोरपणाला जागेवरच उत्तर दिले. मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना कडक इशारा देण्यात आला. मनसेच्या दणक्यानंतर एजन्सीकडून जाहीर माफी मागावी लागली आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. ही महाराष्ट्राची भूमी आहे! येथे मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही. मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणाऱ्यांना मनसे असा धडा शिकवत आली आहे आणि पुढेही शिकवत राहील. #MNS #Thane #Marathi #LPGCylinders #BharatGas

मनसे रिपोर्ट | MNS Report

11,916 Aufrufe • vor 5 Monaten

“बाबासाहेबांचं संविधान आणि छत्रपतींचा स्वाभिमान या देशात जिवंत राहायला हवा, यासाठी आजची ही लढाई आहे. ही निवडणूक नसून लढाई म्हणून आम्ही स्वीकारू.” बच्चू कडू साहेबांची ही भूमिका सर्वसामान्य जनतेची भावना बोलून दाखवणारी आहे. देशभरात निवडणूक ही आता निवडणूक राहिलेली नाही तर जनतेची लढाई झालेली आहे आणि जेंव्हा जनताच निवडणूक हातात घेते तेंव्हा काय निकाल येतो ते कसबा पोटनिवडणुकीत आपण बघितलंय. तसाच निकाल ४ जूनलाही येईल यात काही शंका नाही. मधला काही काळ बच्चू कडू साहेब भरकटले असले तरी उशिरा का होईना त्यांनी जागं होऊन जनतेची बाजू घेतली याबद्दल त्यांचे आभार. आता केवळ ‘सागर’ किंवा ‘वर्षा’वर बैठक होऊन तडजोडी करून त्यांनी झोपेचे सोंग घेऊ नये ही अपेक्षा! ते स्वाभिमानी आणि लढाऊ असल्याने देशाच्या संविधांनासाठी आणि छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी तरी ते इतरांप्रमाणे उपसलेली तलवारी म्यान करणार नाहीत, असा विश्वास वाटतो!

Rohit Pawar

28,834 Aufrufe • vor 2 Jahren

‘जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही,’ ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली.. या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करु शकत नाही. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पहात आहेत? उदया जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील. मुख्यमंत्री महोदय याकडं गांभीर्याने लक्ष द्या, ही विनंती! Devendra Fadnavis #Barshi #LawAndOrder #MaharashtraPolice

Rohit Pawar

23,218 Aufrufe • vor 1 Jahr