Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

ही दुसरी सिया गोयल फुल प्लॅनिंग ने काम केलं या बाईने डायरेक्ट खेळ खल्लास

186,434 görüntüleme • 2 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

आमच्यातलाच "तो" एक... मी जरी भाजपा महायुती समर्थक असलो तरी हे लिहितो... बरोबर दीड एक वर्षांपूर्वी काल एन्काउंटर झालेल्या रोहित आर्य ने पुण्यात एक महिना उपोषण केले होते... थकलेल्या पैश्यासाठी. त्याच्याकडे तेव्हा कुणाच लक्ष नाही गेले...शेवटी तो फिट येऊन पडला...दीपक केसरकर यांनी पैसे थकवले म्हणून ही झालं होतं अस त्याचा बायकोच म्हणणं आहे...व्हिडिओ पाहा. कालच्या गोष्टी मधे त्याची मेथड नक्कीच चुकली...पण त्याच्यावर ही वेळ का आली? म्हणजे दीड वर्षे त्याने कसे सहन केले असेल?? काल देखील त्याला डायरेक्ट यमसदनी पाठवण्याची गरज का पडली?? पायांवर गोळी मारून देखील त्याला जेरबंद केलं जाऊ शकलं असतं.. असो.. एवढच सांगेन.. खूप काही गोष्टी तो त्याच्यासोबत घेऊन गेला... इथून पुढे तरी सर्वसामान्यांवर ही वेळ येऊ नये याची काळजी सरकार ने घ्यावी🙏...आणि घटनेची सखोल चौकशी करावी.

यदुनाथ जवळकर🔥

66,456 görüntüleme • 9 ay önce

अटकेनंतर सिया गोयलची भावनिक पोस्ट चर्चेत . . लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले गेलेल्या केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. केतनचा मृत्यू ट्रेकिंगदरम्यान अपघातीरीत्या दरीत पडल्यामुळे झाल्याचे सुरुवातीला मानले जात होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सिया गोयलने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केतनसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि चॅट्सचा समावेश होता. या पोस्टमध्ये सियाने, “तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास... आपण लग्नाच्या इतके जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्ने होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतके प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास? Rest in Peace,” असे भावनिक शब्दांत लिहिले होते. त्या वेळी अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र, पोलिस तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार केतनचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असू शकतो. केतनला जाणूनबुजून दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून त्याच दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, सियाची जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी दुःख व्यक्त करणारी ही पोस्ट आता तपासाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्याच नजरेतून पाहिली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व पुरावे, मोबाईल डेटा आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून आगामी तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #LohagadCase #SiyaGoyal #KetanAgrawal #PuneCrime #SocialMediaExposed #PimpriChinchwad #MarathiNews #CrimeUpdate

थोडक्यात

121,236 görüntüleme • 2 ay önce

बातमी आहे एबीपी माझामुळे आपल परदेशात शिक्षण घेण्याच स्वप्न पूर्ण करणाऱ्या आदिवासी टॅक्सी ड्रायव्हर तरुणीची. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यापासून जवळपास ७० किलोमीटर दूर असलेल्या रेगुंठा गावात टॅक्सी ड्राईव्हर म्हणून काम करणाऱ्या किरण कुर्मावार हीची दोन वर्षापूर्वी एबीपी माझाने बातमी दाखवली होती. किरण दररोज अनेक आव्हानांचा सामना करत रेगुंठा ते सिरोंचा या आदिवासीं भागात टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढत होती. आशा ही परिस्थितीत आपलं परदेशात शिकण्याच स्वप्न पूर्ण व्हाव यासाठी किरण प्रयत्न करत होती. अनेक प्रयत्न केल्यानंतर किरणला लंडन येथील लीड्स युनिव्हर्सिटीत एमएससी इन मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळाला मात्र जायच कस हा प्रश्न उभा राहिला. एबीपी माझाने किरणची उच्च शिक्षण घेण्याची धडपड दाखवली आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विशेष अधिकारातून ४० लाख रुपयांची रक्कम किरणसाठी उपलब्ध करून दिली. या शिष्यवृत्ती मुळे किरणने आपलं उच्च शिक्षण घेण्याच स्वप्न पूर्ण केलं. नुकतीच तिचा पदवीप्रधान समारंभ लीड्स युनिव्हर्सिटी लंडन येथे पार पडला. यासाठी प्रामुख्याने मदत झाली ती एबीपी माझा संपूर्ण टीम, आमदार सचिन अहिर, पत्रकार राजेश कोचरेकर, प्रा. सुषमा अंधारे, वैशाली जाधव, विशाल ठाकरे, प्रवीण निकम तुम्हा सर्वांचे मनपुर्वक आभार. Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Sachin Ahir SushmaTai Andhare University of Leeds

Nilesh Budhawale

21,440 görüntüleme • 1 yıl önce

काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे. आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !

Raj Thackeray

41,986 görüntüleme • 5 ay önce