महाकाळ's banner
महाकाळ's profile picture

महाकाळ

@Hemant_mahakal25,496 subscribers

काळाचाही काळ मी, अनंताचाही पार मी, सृष्टीचा मी आदि-अंत, महाकाळ मी, महाकाळ मी... MTech IITian

Videos

Hemant_mahakal's profile picture

मातृत्व: समाजाच्या अपेक्षांच्या पलीकडचा एक प्रवास. १३ प्रदीर्घ वर्षे, तिनं केवळ स्वतःच्या स्वप्नांचाच नव्हे, तर समाजाच्या अथक अपेक्षांचाही भार वाहिला. समाजाचे निरनिराळे प्रश्न, कुजबुज आणि निर्णयांनी तिला अदृश्य ढगासारखे घेरलं, तिच्या आत्म्याला गुदमरलं. आई होण्याचा दबाव ही फक्त तिची इच्छाच नव्हती, तर ती जगाने केलेली मागणीही होती, जी स्त्रीची क्षमता नवजीव सहन करण्यावरून मोजते. ज्या दिवशी ती गरोदर राहिली, तिचे डोळे, लवचिकतेच्या अकथित कथांनी जड झाले, ते अश्रू रोखू शकले नाहीत. तीच काय, तोही त्याचे अश्रू रोखू शकला नाहीय... किती लोकांच्या आणि किती घाणेरड्या टीकाटिप्पणी झाल्या असतील त्या दोघांवर...??? ते केवळ आनंदाचे अश्रू नव्हते, तर सामाजिक न्यायाच्या बंधनातून सुटका करणारा निश्वास होता. हे केवळ एकाच स्त्रीबद्दल नाही, तर अश्या लाखो करोडो स्त्रियांबद्दल आहे... काही ठिकाणी तर, पुरुषांचं "पुरुषपण" देखील स्त्रीच्या मातृत्वावर अवलंबून असतं, नाही तर त्या पुरुषाला विविध "नावांनी"-दूषणांनी संबोधलं जातं... "आई होणं" हे समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणं आहे का? "मातृत्व" हा एक सखोल वैयक्तिक आणि भावनिक प्रवास आहे, जो जैविक टाइमलाइन आणि सामाजिक कालमर्यादा ओलांडतो. हे प्रेम, काळजी आणि निवडीचं पालनपोषण करण्याबद्दल आहे, सामाजिक बंधन नाही. तरीपण, महिलांवर होणाऱ्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करून, समाज अनेकदा त्यांच्यावर कठोर लिखितं लादतो. आपण स्वतःला विचारलं पाहिजे: "आई" या लेबलचे पालन करण्यासाठी आपण स्त्रियांवर इतका प्रचंड दबाव का ठेवतो? तिची स्वप्नं, आकांक्षा, संघर्ष याकडे दुर्लक्ष करून, जन्म देण्याच्या क्षमतेनुसार तिची ओळख करणं योग्य आहे का? मातृत्व खऱ्या अर्थानं साजरं करण्यासाठी, या प्रवासाला न जाण्याचा निर्णय घेणाऱ्या किंवा अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेणाऱ्यांच्या निवडींचाही, आपण आदर केला पाहिजे. मातृत्व ही शर्यत नाही; हा एक प्रवास आहे आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या मार्गावर, तिच्या गतीने चालण्याचं स्वातंत्र्य असले पाहिजे....!!!

महाकाळ

47,348 просмотров • 1 год назад

Hemant_mahakal's profile picture

"बहुतेक पुरुषांना त्यांचं पहिलं फूल शेवटी त्यांच्या अंत्यविधीलाच मिळतं"... आणि, जर का त्यांना त्याआधी कोणाकडून फुल दिलं गेलं, तर ते अक्षरशः रडकुंडीस येतात... ते म्हणतात ना, "तो शांतपणे ओझी वाहत राहिला, कौतुकाची अपेक्षा न करता. आणि जेव्हा तो निःशब्द झाला, तेव्हा त्याच्यावर फुलांचा वर्षाव झाला —आणि जे तो कधी पाहू शकला नाही"... समाज अनेकदा पुरूष जिवंत असताना त्याच्याबद्दल कौतुक, प्रेम किंवा मान्यता देण्यास टाळाटाळ करतो. कारण आपण कधीच त्याला वेळेवर बोलत नाही— ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, ‘तू खूप काही केलंस आमच्यासाठी’, ‘आम्ही तुझे आभारी आहोत.’ अनेक पुरुष स्वतःसाठी आपुलकी किंवा मान्यता मिळवण्याची इच्छाच दडपून टाकतात किंबहुना त्यांना ते जबरदस्तीने करावं लागतं. महिलांना वाढदिवस, वर्धापनदिन किंवा कामगिरीवर फुलं मिळू शकतात, परंतु पुरूषांसाठी कोणतेही उत्सव साजरे केले जात नाही. पुरुषांमधील भावनिक दुर्लक्ष किंवा उदासीनतेच्या अपेक्षेमुळे त्यांच्यात एक प्रकारचा शांत-एकटेपणा येतो. परिणामी, त्यांना दैनंदिन जीवनात प्रेम किंवा प्रशंसा मिळू शकत नाही. अहो, फुलं तेव्हाच द्या, जेव्हा समोरचा त्याचा सुगंध घेऊ शकतो. शब्द तेव्हाच बोला, जेव्हा तो ऐकू शकतो. शांततेची वाट पाहू नका, प्रेम आजच व्यक्त करा. म्हणजे, लोक जिवंत असताना त्यांचं भरभरून कौतुक करा. पुरुषत्व आणि भावनिक अभिव्यक्तीभोवतीच्या रूढीवादी कल्पनांना तोडून टाका. तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या प्रयत्नांची प्रशंसा करा, दयाळू शब्द बोला आणि त्यांच्या प्रयत्नांची ओळख पटवा - विशेषतः जे कधीही ते मागत नाहीत. बहुतेक पुरुष जातात नजरेआड, हातात श्रम, मनात वाद... ना गुलाब-ना एक मिठी, शेवटच्या फुलांनीच होतात भेटी. श्वास असतानाच द्या की फुलं, नाही तर नंतर राहील फक्त एक खंत ...!!!

महाकाळ

34,240 просмотров • 1 год назад

Hemant_mahakal's profile picture

'शारीरिकदृष्ट्या आकर्षक असणं' हा लक्ष वेधण्याचा एक उत्तम मार्ग आहे. 'मानसिकदृष्ट्या आकर्षक असणं' हा स्वतःला टिकवून ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. स्वतःला शिक्षित करा, तुमच्या मनात वारंवार येणाऱ्या विषारी विचारांकडे लक्ष द्या, तुमच्या असुरक्षिततेचा सामना करा आणि इतर कोणाशिवाय ही आनंदी राहायला शिका. १५ ते ३० वयोगट हा तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ असतो. तुम्ही मित्र बनवता-गमावता. तुम्ही चुका करता, त्या सुधारताही. तुम्ही पडता, अपयशी ठरता, शिकता, जाणीव होते, वास्तवाला सामोरे जाता, प्रेमात पडता आणि तुम्हाला प्रेमभंग देखील होतो. तुम्ही स्वतःला गमावता आणि शेवटी तुम्ही अधिक मजबूत बनता. लक्षात ठेवा... ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे आहेत. तुम्हाला एन्जॉय करणं आणि वाया घालवणं यातला फरक समजून घेतला पाहिजे. तुम्हाला जर एखादी गोष्ट अयोग्य वाटत असेल तर, इतरांना जास्त स्पष्टीकरण न देता "नाही" म्हणायला शिका..जर कोणी तुमच्या मर्यादांमुळे नाराज असेल तर ती त्यांची समस्या आहे, तुमची नाही. तुम्ही कधीही कमी करू शकता असं वजन म्हणजे इतरांच्या तुमच्याबद्दलच्या मतांचं वजन. इतरांचं तुमच्या बद्दल काय मत आहे ह्याचं वजन बाळगू नका. इतरांना वाटणारी मज्जा, ही तुमचीही मज्जा असावी, असं काहीही नाहीय. मजा याचा अर्थ : • मद्यपान करणं • पार्टी करणं • एवढाच नाहीय. मजा म्हणजे रात्रभर एकटं राहणं, पुस्तकात हरवून जाणं, खोल संभाषण करणं, फिरणं, कलाकृती तयार करणं, वाद्य वाजवणं किंवा आपलं काम उत्कृष्टपणे करणं हे देखील आहेच की. तुमची मज्जा, तुमचं तुम्ही परिभाषित केलं पाहिजे. लग्न करण्यापूर्वी बिल्स, होम लोन, पालकत्व, बालपणीचे आघात, लैंगिक अपेक्षा, आर्थिक अपेक्षा, कौटुंबिक आरोग्य, करिअर आणि शिक्षण यावर चर्चा करा. आयुष्यात फक्त प्रेमच पुरेसं नाहीय. तुमच्या मनावर असलेले आघात, कौटुंबिक वाद वगैरे वगैरे, मुलं होण्यापूर्वीच बरं करा-मिटवा. जेणेकरून तुमच्या मुलांना 'तुम्ही पालक म्हणून असण्याचे' भोग भोगावे लागणार नाहीत...!!!

महाकाळ

16,253 просмотров • 1 год назад

Hemant_mahakal's profile picture

जीवन अनमोल हिरा, ज्यास कर्माने पैलू पडतो । तो सत्कर्माने उजळतो, आणि दुष्कर्माने सडतो ।। जेवढं हे जीवन अनमोल, त्यापेक्षा कर्म अनमोल आहे. म्हणून कर्म करताना अत्यंत दक्ष असायला हवे. कर्म म्हणजे फक्त दैनंदिन जीवनातील व्यवहारिक कामच नव्हे, तर आपल्याकडून होणारी प्रत्येक शारीरिक व मानसिक कृती म्हणजे कर्म... आपलं चालणं, बोलणं, पाहणं, ऐकणं, विचार करणं वगैरे प्रत्येक हालचाल ही ह्या कर्मातच येते. कर्माविना मनुष्य थांबुच शकत नाही. इच्छा असो की नसो, आपल्याकडून कर्म घडतच राहतात.आणि ती कर्मे त्यांचा परिणाम आपल्याला भोगायला भाग पाडतातच. कर्म घडलं की कर्मफळ समोर पडलंच म्हणून समजा... एखाद वेळेस कर्मातून सुटका होईल, परंतु कर्मफळातून सुटका होणे अशक्य आहे. सुखाने जगण्यासाठी आपण धडपडून कर्मे करतो, नाना खटपटी करतो व ती जशी झाली, तशीच कर्मगती आपणास लाभते... पण कर्म व कर्मफळाची गंमत अशी आहे की आपण सुखासाठी कर्म करतो व कर्मफळ मात्र दुःखमय मिळतं. असं का होतं ? मर्म असे आहे की, आपले कर्म आपल्या पेक्षा इतरांनाही सुखकारक झाले, तर कर्मफळ शतपट चांगलं मिळतं. पण आपण फक्त आपल्याच पुरता विचार करून कर्म केलं, तर शुद्ध सुख मिळूच शकत नाही. उलट आपली कर्मे इतरांना त्रासदायक, दुःखदायक ठरली, तर त्याच्या शतपटीने दुःख आपल्या वाट्याला नक्कीच येतं. वाईट कर्माचा प्रारंभच तुम्हाला दुःखाच्या दरीत लोटतो. म्हणून यत्किंचितही इतरांना त्रास होणारे कसलेच चुकीचे कर्म आपल्याकडून घडू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कर्मसिद्धांत इशारा देतो की,आपण दुसऱ्या बद्दल केवळ वाईट विचार जरी केला, तरी त्याचे शतपट वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि इतरांबद्दल केलेली कणभर वाईट कृती आपल्याला शतपट वाईट फळं भोगायला भाग पाडतात. हे जसं दुष्कर्म फळाबद्दल आहे, तद्ववतच इतरांबद्दलचा एक चांगला विचार आपल्याला शतपट चांगलं बनवितो. एक छोटं-इतरांसाठी केलेले सत्कर्म आपल्याला शतपट चांगलं फळ देते... महाभारतात, द्रौपदीचे दुर्योधनावर कुत्सितपणे क्षणिक हसण्याने किती भयंकर परिणामांचे कर्म झालं, पण त्याच द्रौपदीने लहानपणी नदीवर अंध ऋषींना स्नान करताना, त्यांचे वस्त्र हरवले, म्हणून स्वतःजवळचे एक वस्त्र दिले. द्रौपदीच्या संकट समयी त्या सत्कर्मामुळे अनंत वस्त्रे तिला मिळाली... म्हणून दक्षतेने सत्कर्म पाळावे, दक्षतेने दुष्कर्म टाळावे. यासाठी विचारपूर्वक कर्म करायला हवेत. आपण आज अविचाराने वागलो, तर उशिरा का होईना, त्याची कर्मफळे पुढे वाट्याला येणारच... उन्हाळ्यात रखरखीत जमिनीत पडलेली गवताची बीजं तेव्हां दिसत नाहीत, परंतु काही काळानंतर पाऊस पडला की सारं गवत उगवून येते व शतपटीने बीज प्रसार करतं... कर्म गती ही गहन आहे. ती कुणीही चुकवू शकत नाही. धनवंतातील धनवान, सर्व सत्ताधीश व प्रचंड बलवानही कर्म गती टाळू शकत नाहीत. नाना उपद्व्याप केले, अनंत खटपटी केल्या तरी कर्मफळ बदलू शकत नाही... जगाचा इतिहास हा कर्म फळाचा इतिहास आहे. प्रत्येक लहान थोर व्यक्ती, त्याच्या कर्माचा परिपाक असते. सुखदुःख हे त्या कर्माचे प्रतिध्वनी आहेत. म्हणून स्वतःच्या भल्यासाठी तरी कर्म विचारपूर्वक करा... कर्मगतीतून भल्या भल्यांची सुटका होत नाही, मग आपल्यासारखे क्षुद्र जीव कसे सुटतील...??? कर्म जाणून-बुजून करा किंवा अजाणतेपणी करा, कर्म फळ भोगावंच लागतं... चुकून नकळत अजाणतेपणी विस्तवावर पाय पडला तर विस्तव पोळतोच ना? अजाणतेपणाने विष शरीरात गेलं, तर मरणारच ना? म्हणून असे घडत नाही की, अजाणतेपणी सत्कर्म वा दुष्कर्म केले, तर त्याचे कर्मफळ मिळत नाही. कळत नकळत कसेही कर्म घडो, त्याचे कर्म फळ मिळणारच... म्हणूनच एक विनंती आहे... कर्म से डरिये, ईश्वर से नही । ईश्वर तो माफ कर सकता है, कर्म कभी नही ।। लोक विनोदाने म्हणतात, की पूर्वी चित्रगुप्त मनुष्याची कर्मगती हाताने लिहून नोंदवित होता, म्हणून कर्मफळ पुढच्या जन्मी भोगावं लागत असे, परंतु आता चित्रगुप्त लॅपटॉप घेऊन कर्मगतीची नोंद करतो म्हणून कर्म फळे याच जन्मी भोगावी लागतात... संत कबीर म्हणतात--- " पहिले करणे करे, बाद मे क्यूँ पछताये । पेढ बोया बबुल का, आम कहांसे खाये ।। " खरंय ना? WAF

महाकाळ

13,946 просмотров • 1 год назад

Больше нет контента для загрузки