Rohit Pawar's banner
Rohit Pawar's profile picture

Rohit Pawar

@RRPSpeaks782,942 subscribers

Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS

Shorts

मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कथित विकासासाठी शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेल्या खालापूरच्या लोकप्रतिनिधींचा गोव्यातील हॉटेलमध्ये टेबलवर उभं राहून नाचतानाचा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल… त्यांच्याच खालापूर मतदारसंघातील हा 'विकास' बघा.. रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीतून खांद्यावर नेण्याची वेळ आली.. हा यांचा 'विकास'. शिवाय राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यासुद्धा रायगड जिल्ह्यातील आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यातच महिलांची ही अवस्था असेल तर इतर जिल्ह्यांबाबत न बोललेलंच बरं! #खालापूर #रायगड #विकासाचे_वास्तव #जनतेचे_प्रश्न #महाराष्ट्र

मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कथित विकासासाठी शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेल्या खालापूरच्या लोकप्रतिनिधींचा गोव्यातील हॉटेलमध्ये टेबलवर उभं राहून नाचतानाचा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल… त्यांच्याच खालापूर मतदारसंघातील हा 'विकास' बघा.. रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीतून खांद्यावर नेण्याची वेळ आली.. हा यांचा 'विकास'. शिवाय राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यासुद्धा रायगड जिल्ह्यातील आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यातच महिलांची ही अवस्था असेल तर इतर जिल्ह्यांबाबत न बोललेलंच बरं! #खालापूर #रायगड #विकासाचे_वास्तव #जनतेचे_प्रश्न #महाराष्ट्र

94,522 Aufrufe

मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का? मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार! #MissingLink #MissingSuraksha #जनतेच्याजीवाशीखेळ #SafetyFirst #InfrastructureFailure

मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का? मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार! #MissingLink #MissingSuraksha #जनतेच्याजीवाशीखेळ #SafetyFirst #InfrastructureFailure

74,105 Aufrufe

मुंबईत महानायकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलं तरीही नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प आहेत.. आज राज्यात भाजप व्यतिरिक्त महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आज सत्तेत असलेल्या कित्येकांनी रस्त्यावरच्या पाण्यात अक्षरशः डुबकी घेऊन नको ती नौटंकी केली असती आणि अनेक कलाकारांनीही वेगवेगळे डायलॉग मारले असते.. पण आज तसं कुणीही दिसत नाही.. याला काय म्हणावं? #mumbaiRain #दुटप्पीभूमिका #सोयीचंमौन #जबाबदारकोण

मुंबईत महानायकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलं तरीही नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प आहेत.. आज राज्यात भाजप व्यतिरिक्त महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आज सत्तेत असलेल्या कित्येकांनी रस्त्यावरच्या पाण्यात अक्षरशः डुबकी घेऊन नको ती नौटंकी केली असती आणि अनेक कलाकारांनीही वेगवेगळे डायलॉग मारले असते.. पण आज तसं कुणीही दिसत नाही.. याला काय म्हणावं? #mumbaiRain #दुटप्पीभूमिका #सोयीचंमौन #जबाबदारकोण

44,470 Aufrufe

आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपल्याविषयी आदर आहे, पण सत्य सांगणं देखील गरजेचं आहे. आपला नेहमीच आदर राहिलेला आहे आणि आपला मनमोकळा स्वभाव देखील नेहमीच आवडतो परंतु जावळी भागात सद्यस्थितीला जे चाललंय ते कदापि योग्य नाही. सोसायट्याच्या ठरावासाठी बाहेरून गुंड बोलवून स्थानिकांवर दहशत निर्माण करणं हे अंत्यंत खेदजनक आहे. आपण भाजपमध्ये असलात, वरून दबाव असेलही किंवा चुकीच्या नेत्यांची सोबत असेलही परंतु आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात हे आपण विसरु नये. आपण योग्य माणसासाठी आदेश दिलात तर एकच काय जावळीतील शेकडो गावे ठराव देतील, पण अशाप्रकारची दहशत जनतेला आवडणारी नाही. यासंदर्भात आपण गांभीर्याने विचार कराल, ही अपेक्षा वजा विंनती..! Shivendrasinh A Bhonsle #जावळी #जनतेचा_आवाज #महाराष्ट्र

आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपल्याविषयी आदर आहे, पण सत्य सांगणं देखील गरजेचं आहे. आपला नेहमीच आदर राहिलेला आहे आणि आपला मनमोकळा स्वभाव देखील नेहमीच आवडतो परंतु जावळी भागात सद्यस्थितीला जे चाललंय ते कदापि योग्य नाही. सोसायट्याच्या ठरावासाठी बाहेरून गुंड बोलवून स्थानिकांवर दहशत निर्माण करणं हे अंत्यंत खेदजनक आहे. आपण भाजपमध्ये असलात, वरून दबाव असेलही किंवा चुकीच्या नेत्यांची सोबत असेलही परंतु आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात हे आपण विसरु नये. आपण योग्य माणसासाठी आदेश दिलात तर एकच काय जावळीतील शेकडो गावे ठराव देतील, पण अशाप्रकारची दहशत जनतेला आवडणारी नाही. यासंदर्भात आपण गांभीर्याने विचार कराल, ही अपेक्षा वजा विंनती..! Shivendrasinh A Bhonsle #जावळी #जनतेचा_आवाज #महाराष्ट्र

24,010 Aufrufe

हा आहे मुंबईतील 'वांद्रे-वरळी सी-लिंक' आज १६ वर्षांनंतरही तो भक्कमपणे उभा आहे आणि त्यावर साधी डागडुजीही करावी लागली असेल असं वाटत नाही.. आणि हा पूल कुणी बांधलाय आठवतंय का? हा पूल काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने बांधला. त्यावेळी पंतप्रधान होते स्व. डॉ. मनमोहन सिंग साहेब, मुख्यमंत्री होते स्व. विलासराव देशमुख साहेब आणि संबंधित खात्याचे मंत्री होते ज्यांच्यावर भाजपाने खोटे आरोप केले ते मा. अनिल देशमुख साहेब. इथं क्वालिटी असते, मिसिंग लिंकप्रमाणे पहिल्याच पावसात खड्डे पडत नाहीत..! #वांद्रे_वरळी_सी_लिंक #Infrastructure #QualityInfrastructure

हा आहे मुंबईतील 'वांद्रे-वरळी सी-लिंक' आज १६ वर्षांनंतरही तो भक्कमपणे उभा आहे आणि त्यावर साधी डागडुजीही करावी लागली असेल असं वाटत नाही.. आणि हा पूल कुणी बांधलाय आठवतंय का? हा पूल काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने बांधला. त्यावेळी पंतप्रधान होते स्व. डॉ. मनमोहन सिंग साहेब, मुख्यमंत्री होते स्व. विलासराव देशमुख साहेब आणि संबंधित खात्याचे मंत्री होते ज्यांच्यावर भाजपाने खोटे आरोप केले ते मा. अनिल देशमुख साहेब. इथं क्वालिटी असते, मिसिंग लिंकप्रमाणे पहिल्याच पावसात खड्डे पडत नाहीत..! #वांद्रे_वरळी_सी_लिंक #Infrastructure #QualityInfrastructure

40,442 Aufrufe

सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही #दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं! #Maharashtra | #Election2024 |

सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही #दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं! #Maharashtra | #Election2024 |

266,655 Aufrufe

लढवय्या विद्यार्थ्यांना सर्व विरोधकांची साथ… साहेबही मैदानात..! आता विरोधकांची मोळी बांधल्याने जनरल डायर सरकारची गोळीही इथं चालणार नाही..! Sonam Wangchuk Abhijeet Dipke Cockroach Janta Party #CJPProtest #JantarMantar #SonamWangchuk #AbhijeetDipke #DharmendraPradhanResign

लढवय्या विद्यार्थ्यांना सर्व विरोधकांची साथ… साहेबही मैदानात..! आता विरोधकांची मोळी बांधल्याने जनरल डायर सरकारची गोळीही इथं चालणार नाही..! Sonam Wangchuk Abhijeet Dipke Cockroach Janta Party #CJPProtest #JantarMantar #SonamWangchuk #AbhijeetDipke #DharmendraPradhanResign

21,173 Aufrufe

तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…! पण निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध..! #WestBengalLegislativeAssemblyelection2026

तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…! पण निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध..! #WestBengalLegislativeAssemblyelection2026

54,273 Aufrufe

“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? #कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या

“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? #कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या

153,940 Aufrufe

हा व्हिडिओ एखाद्या पार्किंगचा नाही तर तो आहे पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे भागातील. हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणारे हजारो IT Professionals या आणि आसपासच्या भागात राहतात. याच भागातील विविध IT कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला, मात्र गेल्या काही वर्षांपासून हा भाग पूर्णतः वाहतूक कोंडीत अडकलाय. परिणामी अनेक कंपन्यांनी स्थलांतर केलं असून काही कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत. या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर स्थानिकांना रोजगार देणाऱ्या आणि इथल्या आर्थिक प्रगतीला चालना देणाऱ्या अनेक कंपन्या बाहेर जातील आणि त्याची जबर किंमत इथला युवा आणि स्थानिकांना मोजावी लागेल. त्यामुळं सरकारने प्राधान्याने ही वाहतूक कोंडी सोडवावी. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar #वाहतूककोंडी #Traffic #Hinjewadi #ITPark

हा व्हिडिओ एखाद्या पार्किंगचा नाही तर तो आहे पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे भागातील. हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणारे हजारो IT Professionals या आणि आसपासच्या भागात राहतात. याच भागातील विविध IT कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला, मात्र गेल्या काही वर्षांपासून हा भाग पूर्णतः वाहतूक कोंडीत अडकलाय. परिणामी अनेक कंपन्यांनी स्थलांतर केलं असून काही कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत. या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर स्थानिकांना रोजगार देणाऱ्या आणि इथल्या आर्थिक प्रगतीला चालना देणाऱ्या अनेक कंपन्या बाहेर जातील आणि त्याची जबर किंमत इथला युवा आणि स्थानिकांना मोजावी लागेल. त्यामुळं सरकारने प्राधान्याने ही वाहतूक कोंडी सोडवावी. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar #वाहतूककोंडी #Traffic #Hinjewadi #ITPark

34,221 Aufrufe

धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी चार वर्षांपासून गणित आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक नसल्याने थेट शाळेलाच कुलूप ठोकून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. Gen-Alpha च्या या दणक्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाची नियुक्ती केली, पण एकीकडं शिक्षक भरतीसाठी हजारो पात्र उमेदवार उपलब्ध असूनही भरती केली जात नाही तर दुसरीकडं चार-चार वर्षे विज्ञान आणि गणितासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षक नाहीत, ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे इथले आमदार तानाजी सावंत हे स्वतः मोठे शिक्षण सम्राट आहेत, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी याच महाशयांनी दीडशे बैठका घेतल्या होत्या म्हणे…! मग आपल्याच मतदारसंघातील सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी एकही बैठक का घेतली नाही, हा प्रश्नच आहे. सरकारलाही विनंती आहे की, जंतरमंतरवरुन काहीतरी धडा घ्या आणि विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष करायचं बंद करा..! Devendra Fadnavis Dadaji Bhuse #GenAlpha #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या #शिक्षण_वाचवा #धाराशिव #StudentProtest

धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी चार वर्षांपासून गणित आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक नसल्याने थेट शाळेलाच कुलूप ठोकून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. Gen-Alpha च्या या दणक्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाची नियुक्ती केली, पण एकीकडं शिक्षक भरतीसाठी हजारो पात्र उमेदवार उपलब्ध असूनही भरती केली जात नाही तर दुसरीकडं चार-चार वर्षे विज्ञान आणि गणितासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षक नाहीत, ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे इथले आमदार तानाजी सावंत हे स्वतः मोठे शिक्षण सम्राट आहेत, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी याच महाशयांनी दीडशे बैठका घेतल्या होत्या म्हणे…! मग आपल्याच मतदारसंघातील सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी एकही बैठक का घेतली नाही, हा प्रश्नच आहे. सरकारलाही विनंती आहे की, जंतरमंतरवरुन काहीतरी धडा घ्या आणि विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष करायचं बंद करा..! Devendra Fadnavis Dadaji Bhuse #GenAlpha #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या #शिक्षण_वाचवा #धाराशिव #StudentProtest

12,976 Aufrufe

suggestion for action दादा..! #AjitdadaPawar

suggestion for action दादा..! #AjitdadaPawar

54,262 Aufrufe

#राजीनामा_द्यावाच_लागेल! सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? #खोटं_बोल_पण_रेटून_बोल |#शेतकऱ्यांवर_अन्याय_नको | #विधिमंडळाचा_अपमान | #राजीनामा_द्या |

#राजीनामा_द्यावाच_लागेल! सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? #खोटं_बोल_पण_रेटून_बोल |#शेतकऱ्यांवर_अन्याय_नको | #विधिमंडळाचा_अपमान | #राजीनामा_द्या |

63,210 Aufrufe

लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी रात्री अभिवादन करण्यासाठी गेलो असता विरोधकांचं अत्यंत किळसवाणं आणि शरम वाटावी असं वर्तन बघायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीच्या नावाने स्वतःचाच उदोउदो करुन घेण्याची हौस भागवली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विराट कर्तृत्त्वाचे, उत्तुंग नेतृत्त्वाचे, समाजाप्रतीच्या निष्ठेचे गोडवे गाण्याऐवजी ‘रामभाऊ तुमचं काम एक नंबर’ अशी स्वतःचीच आरती गाणारी ओंगाळवाणी गाणी ऐकावी लागत होती… हे ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे की विरोधकांच्या वाढदिवसाची पार्टी आहे, असा प्रश्न पडला. तिथंच मिरवणुकीसारखं वातावरण दिसलं.. वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक असावी, पण ती मिरवणूक नव्हती तर दुसऱ्या एका आमदाराला काहीजण खांद्यावर घेऊन आत्मस्तुती करणाऱ्या ‘नाद करायचा नाय’ गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे हे सगळं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ घडत होतं आणि यावरही कळस म्हणजे या स्थळाचं पावित्र भंग करणारी शिविगाळही इथं ऐकायला मिळाली.. हे सगळं संतापजनक आहे. किमान कुठं कसं वागायचं याचं तरी भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे..! #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #जयंती #चोंडी #महाराष्ट्राचा_अभिमान

लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी रात्री अभिवादन करण्यासाठी गेलो असता विरोधकांचं अत्यंत किळसवाणं आणि शरम वाटावी असं वर्तन बघायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीच्या नावाने स्वतःचाच उदोउदो करुन घेण्याची हौस भागवली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विराट कर्तृत्त्वाचे, उत्तुंग नेतृत्त्वाचे, समाजाप्रतीच्या निष्ठेचे गोडवे गाण्याऐवजी ‘रामभाऊ तुमचं काम एक नंबर’ अशी स्वतःचीच आरती गाणारी ओंगाळवाणी गाणी ऐकावी लागत होती… हे ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे की विरोधकांच्या वाढदिवसाची पार्टी आहे, असा प्रश्न पडला. तिथंच मिरवणुकीसारखं वातावरण दिसलं.. वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक असावी, पण ती मिरवणूक नव्हती तर दुसऱ्या एका आमदाराला काहीजण खांद्यावर घेऊन आत्मस्तुती करणाऱ्या ‘नाद करायचा नाय’ गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे हे सगळं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ घडत होतं आणि यावरही कळस म्हणजे या स्थळाचं पावित्र भंग करणारी शिविगाळही इथं ऐकायला मिळाली.. हे सगळं संतापजनक आहे. किमान कुठं कसं वागायचं याचं तरी भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे..! #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #जयंती #चोंडी #महाराष्ट्राचा_अभिमान

16,339 Aufrufe

जेंव्हा राजकारण मूलभूत मुद्द्यांना वरचढ होतं, संस्थामध्येही राजकारणाचा शिरकाव होतो, तेंव्हा विकास मात्र हरवतो. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ST महामंडळाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय गतिमान आणि महाराष्ट्र वेगवान’ अशी केवळ जाहीरातबाजी करण्यापुरताच या सरकारकडून ST चा वापर केला जात असल्याने मूलभूत प्रश्नांकडं मात्र दुर्लक्ष होत असल्याचंच या फोटोवरुन दिसत आहे.

जेंव्हा राजकारण मूलभूत मुद्द्यांना वरचढ होतं, संस्थामध्येही राजकारणाचा शिरकाव होतो, तेंव्हा विकास मात्र हरवतो. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ST महामंडळाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय गतिमान आणि महाराष्ट्र वेगवान’ अशी केवळ जाहीरातबाजी करण्यापुरताच या सरकारकडून ST चा वापर केला जात असल्याने मूलभूत प्रश्नांकडं मात्र दुर्लक्ष होत असल्याचंच या फोटोवरुन दिसत आहे.

108,040 Aufrufe

#मारकडवाडीत पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने दडपशाही करून सरकारने चाचणी मतदान थांबवलं असलं तरी यातच गावकऱ्यांचा विजय आहे. दडपशाहीने हा लढा संपलेला नाही तर आमदार जानकर साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आतातर फक्त वात पेटलीय आणि पुढील काळात सगळीकडे जनतेकडूनच #EVM चा पर्दाफाश केला जाईल. आज ३५०-४०० उंबऱ्यांच्या मारकडवाडीत सरकारने SRPF च्या तुकड्यांसह २५०-३०० पोलीस तैनात करण्याची खरंच गरज होती का? चाचणी मतदान रोखण्याची गरज होती का? सत्य समोर येण्याची भीती सरकारला होती का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्याची उत्तरं सरकार आणि आयोगाला द्यावी लागणार.

#मारकडवाडीत पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने दडपशाही करून सरकारने चाचणी मतदान थांबवलं असलं तरी यातच गावकऱ्यांचा विजय आहे. दडपशाहीने हा लढा संपलेला नाही तर आमदार जानकर साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आतातर फक्त वात पेटलीय आणि पुढील काळात सगळीकडे जनतेकडूनच #EVM चा पर्दाफाश केला जाईल. आज ३५०-४०० उंबऱ्यांच्या मारकडवाडीत सरकारने SRPF च्या तुकड्यांसह २५०-३०० पोलीस तैनात करण्याची खरंच गरज होती का? चाचणी मतदान रोखण्याची गरज होती का? सत्य समोर येण्याची भीती सरकारला होती का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्याची उत्तरं सरकार आणि आयोगाला द्यावी लागणार.

54,309 Aufrufe

गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर आम्ही शंका घेतली असता अनेक लोक #VVPAT मशीन दाखवून तुम्ही हवे तेव्हा VVPAT चिठ्ठ्या तपासू शकता असे सांगतात, मात्र गुजरातमध्ये बनलेल्या या मशीनमध्ये चिठ्ठी फक्त दिसते खाली पडत नाही. म्हणजेच VVPAT मशीनसोबत देखील छेडछाड करण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रतील जनतेच्या मनातील अशा सर्व शंकांचे निरसन निवडणूक आयोगाकडून होणे गरजेचे आहे. Election Commission of India #MaharashtraElection2024

गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर आम्ही शंका घेतली असता अनेक लोक #VVPAT मशीन दाखवून तुम्ही हवे तेव्हा VVPAT चिठ्ठ्या तपासू शकता असे सांगतात, मात्र गुजरातमध्ये बनलेल्या या मशीनमध्ये चिठ्ठी फक्त दिसते खाली पडत नाही. म्हणजेच VVPAT मशीनसोबत देखील छेडछाड करण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रतील जनतेच्या मनातील अशा सर्व शंकांचे निरसन निवडणूक आयोगाकडून होणे गरजेचे आहे. Election Commission of India #MaharashtraElection2024

52,879 Aufrufe

पैशाने कधीही विकत घेता न येणारं प्रेम! दुसऱ्यांचे नेते आणि आमदारांची पळवापळवी करणारे लोकांचं हे असं उदंड प्रेम कसं पळवून घेऊन जाणार? #येवला

पैशाने कधीही विकत घेता न येणारं प्रेम! दुसऱ्यांचे नेते आणि आमदारांची पळवापळवी करणारे लोकांचं हे असं उदंड प्रेम कसं पळवून घेऊन जाणार? #येवला

66,705 Aufrufe

‘जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही,’ ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली.. या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करु शकत नाही. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पहात आहेत? उदया जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील. मुख्यमंत्री महोदय याकडं गांभीर्याने लक्ष द्या, ही विनंती! Devendra Fadnavis #Barshi #LawAndOrder #MaharashtraPolice

‘जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही,’ ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली.. या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करु शकत नाही. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पहात आहेत? उदया जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील. मुख्यमंत्री महोदय याकडं गांभीर्याने लक्ष द्या, ही विनंती! Devendra Fadnavis #Barshi #LawAndOrder #MaharashtraPolice

23,218 Aufrufe

अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का? आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? एकतर चुका करायच्या आणि पुन्हा चुका दाखवून देणाऱ्यांवरच कारवाई करायची हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. सरकारने आणि #MPSC ने विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षेबाबत असलेल्या सर्व आक्षेपांवर योग्य निर्णय घ्यावा आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरीत सुटका करावी, ही विनंती! Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission

अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का? आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? एकतर चुका करायच्या आणि पुन्हा चुका दाखवून देणाऱ्यांवरच कारवाई करायची हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. सरकारने आणि #MPSC ने विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षेबाबत असलेल्या सर्व आक्षेपांवर योग्य निर्णय घ्यावा आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरीत सुटका करावी, ही विनंती! Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission

22,561 Aufrufe

Videos

RRPSpeaks's profile picture

अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार म्हणून देण्यात येणारा वाटाणा आणि भरडा शिजत नसल्याची तक्रार करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांचंच निलंबन करण्याचा तुघलकी निर्णय या सरकारने घेतला. चोर सोडून सन्याशाला फाशी देणारं वाह रे सरकार! व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार काय लपवतंय? अंगणवाडीतील बालकांच्या ताटातही आडवा हात मारणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी. गैरप्रकारावर आवाज उठवाल तर कारवाई करू, हा मेसेज या सरकारला या कारवाईतून द्यायचाय का? तातडीने रेश्मा पारधी यांचं निलंबन रद्द करून निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्यांची पुढील दहा दिवसांत चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. Devendra Fadnavis

Rohit Pawar

41,287 Aufrufe • vor 6 Tagen

RRPSpeaks's profile picture

सोशल मिडियात व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप अत्यंत धक्कादायक असून त्यांच्या सत्यतेबाबत शहानिशा झाली पाहिजे. या क्लिपमधील चर्चेनुसार आपल्याच पक्षाच्या एका माजी खासदार राहिलेल्या महिलेबाबत भाजपचे लोक किती ‘सुसंस्कृत’ भाषा वापरतात हे स्पष्ट दिसतं. पुरोगामी महाराष्ट्रात लाडकी बहिण असलेल्या आपल्याच पक्षाच्या एका महिलेबाबतची ही भाषा भाजपाची लाज वेशीवर टांगणारी आहे. आपल्याच मित्र पक्षांच्या बाबतीत कटकारस्थान रचून त्यांना गिळंकृत करण्यात भाजप माहीर आहे, पण स्वपक्षाच्या महिला नेत्याबाबतही कसं कटकारस्थान रचलं जातं, याचाही हा एक उत्तम नमुना आहे. याशिवाय संबंधित महिला मा. खासदाराच्या घरात पैसे ठेवायलाही जागा नाही आणि अगदी पिंपातही पैसे भरून ठेवल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकायला मिळतं. एका माजी खासदाराच्या घरात इतके पैसे असतील तर मंत्र्यांच्या घरात किती घबाड असेल, याचा विचारही करु शकत नाही. आता ED च्या अधिकाऱ्यांनी भाजप विरोधकांवरील कारवायांतून थोडा वेळ काढून इकडंही लक्ष द्यायला हरकत नाही. (सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्याकडं आलेल्या या ऑडिओ क्लिप जशाच्या तशा शेअर करत असून केवळ यावरील नावे ब्लर करत आहे. यामध्ये एक नाव हे खान्देशातील भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याचं तर दुसरं नाव हे भाजप संघटनेच्या महामंत्र्याचं आहे.)

Rohit Pawar

29,553 Aufrufe • vor 29 Tagen

RRPSpeaks's profile picture

आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपल्याविषयी आदर आहे, पण सत्य सांगणं देखील गरजेचं आहे. आपला नेहमीच आदर राहिलेला आहे आणि आपला मनमोकळा स्वभाव देखील नेहमीच आवडतो परंतु जावळी भागात सद्यस्थितीला जे चाललंय ते कदापि योग्य नाही. सोसायट्याच्या ठरावासाठी बाहेरून गुंड बोलवून स्थानिकांवर दहशत निर्माण करणं हे अंत्यंत खेदजनक आहे. आपण भाजपमध्ये असलात, वरून दबाव असेलही किंवा चुकीच्या नेत्यांची सोबत असेलही परंतु आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात हे आपण विसरु नये. आपण योग्य माणसासाठी आदेश दिलात तर एकच काय जावळीतील शेकडो गावे ठराव देतील, पण अशाप्रकारची दहशत जनतेला आवडणारी नाही. यासंदर्भात आपण गांभीर्याने विचार कराल, ही अपेक्षा वजा विंनती..! Shivendrasinh A Bhonsle #जावळी #जनतेचा_आवाज #महाराष्ट्र

Rohit Pawar

24,010 Aufrufe • vor 27 Tagen

RRPSpeaks's profile picture

दिल्लीत विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाचं यश हे पूर्णपणे विद्यार्थी आणि युवा एकजुटीचं आहे… तसंच सत्तेच्या दहशतीला न घाबरता राज्यातील अनेक मराठी पत्रकारांनीही थेट दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन हा विषय महाराष्ट्रासह देशभरातील मराठी माणूस आणि देशवासियांसाठी कव्हर केला. या सगळ्यांचेच आभार मानायला हवेत. काही पत्रकारांना ‘गोदी मिडिया’ म्हणून आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असलं तरी ही आंदोलकांची चूक नाही आणि पत्रकारांनीही ही बाब मनावर घेतली नाही, हा त्यांच्यातील समजूतदारपणा आहे. चॅनेल किंवा वर्तमानपत्राचे मालक हे जरी सरकारच्या दबावाखाली असले तरी ग्राऊंडवर रिपोर्टींग करणारे पत्रकार हे नेहमी सत्याच्याच बाजूने असतात.. हे सत्य दाखवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतल्याचं मी स्वतः अनुभवलंय. यासोबतचत हजारो सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि छोट्या माध्यमांचे पत्रकार यांनीही खूप प्रभावी कामगिरी केली. या सर्वांचीच नावं घेणं शक्य नसलं तरी त्यांचंही योगदान मुख्य माध्यमातील पत्रकारांइतकंच महत्त्वाचं आहे, हे मान्य करतो. या सगळ्यांचेच मनापासून आभार..!

Rohit Pawar

24,939 Aufrufe • vor 1 Monat