
SushmaTai Andhare
@andharesushama • 56,839 subscribers
ShivsenaUBT l Deputy Leader l Spokesperson l Founder- Ganrajya Sangh l Feminist Writer l Orator l Believe in Constitutionalism
Shorts
Videos

ओम दादा, तुम्ही तानाजी सावंत सोबत काल दिल्लीला जाऊन आलात याची आम्हाला कल्पना आहे. पण आजच्या बैठकीला तुम्ही उपस्थित रहाल अशी अपेक्षा आहे... फक्त खासदार म्हणून नाही आमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून आमचा भाऊ म्हणून आम्ही आपल्यावर जीव लावलाय... क्यों की, सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भूला नहीं कहते... Omprakash Rajenimbalkar
SushmaTai Andhare71,561 views • 18 days ago

या राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आहेत अमर्याद सत्ता आहे. वडील एका पक्षाचे अघोषित बादशहा आहेत. त्या स्वतः मंत्री आहेत त्यामुळे रहदारीत अडकल्यास इतरांची वाहने फेकून द्या असा हुकूम सहज करू शकतात. मात्र याच रहदारीमध्ये रोज कित्येक लोक अडकलेले असतात. गरोदर माता.. नवजात अर्भके.. अत्यावस्थ रुग्ण.. वयोवृद्ध... परीक्षेला जाणारे विद्यार्थी मात्र ते असा वाहने फेकून देण्याचा हुकूम करू शकत नाही. त्यांचा राग लूळा पांगळा आहे. त्यांचा आवाज शासन दरबारी पोचू शकत नाही कारण तिथे मी मोठा इन्फ्रा मॅन की तू मोठा इन्फ्रा मॅन याची एक जीवघेणी स्पर्धा चालू आहे. जनता बिचारी मुकी जनावरे कितीही आणि कशीही हाकला...
SushmaTai Andhare66,052 views • 2 months ago

आम्ही एसआयटी ला भेटायला गेलो होतो एस आय टी या मुख्य इमारती पासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पस मध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डी मध्ये हे प्रिवीलेज का मिळाले ? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय... १. जर दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांच म्हणणं आहे तर अजून पर्यंत दमानिया ला अटक का केली नाही? २. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी ? ३. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ? ४. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियाने सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर मध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही? ५. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ? ६. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एस आय टी ला ? दमानिया महाराष्ट्राला ? SIT पीडित महिलांना ? _ कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे... !
SushmaTai Andhare69,076 views • 2 months ago

चाकणकरांचा कार्यकर्ता सांगत आहे की ताईंच्या दरवाज्यात बोट अडकून जखम झाली. ताई आमच्याकडे त्यादिवशी आरतीला आल्या होत्या पण काय गंमत आहे की चाकणकर स्वतः सांगतात दोन तारखेला त्या अजितदादांच्या दौऱ्यामध्ये होत्या काय खरं काय खोटं ईशान्येश्वराला आणि खरातांनाच माहिती .. पण हा किती मोठा योगायोग आहे की तटकरेंच्या बोटाला झालेली जखम सुद्धा दरवाजात अडकूनच झाली.
SushmaTai Andhare52,114 views • 3 months ago

राजीनामाचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील तर स्वागताचा आहे मात्र एक खंत आहे की हीच भूमिका राज्याचे खमके नेतृत्व म्हणून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि या पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी घेणं जास्त अपेक्षित होतं... दुर्दैवाने त्यांनी ही संधी गमावली.. असो, आमचा लढा चालूच राहील. चाकणकरांना सहआरोपी करून अटक करा.
SushmaTai Andhare35,698 views • 3 months ago

ही वर्षा आगवणे.. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या क्रूर कहाण्यांपैकी एक कहाणी... दिगंबर आगवणे वर सध्या एक दोन तीन नाही तब्बल 24 गुन्हे दाखल आहेत. विशेष या शाळकरी मुलीवर मकोका सारखे गंभीर गुन्हे निंबाळकरांच्या कृपेने लागले आहेत. पोलिसांनी निंबाळकरांचे कार्यकर्ते यांच्या जाच्याला कंटाळून याही मुलीने आपल्या जुळ्या बहिणी सकट आत्महत्येचा प्रयत्न केला सुदैवाने ती वाचली. फलटण पोलीस स्टेशन ही छळ छावणी झाली आहे का? #संपदामुंडे #संस्थात्मकहत्या
SushmaTai Andhare58,850 views • 8 months ago

ज्या सर्वेचा आधार घेऊन सांगितलं जातंय की, देवेंद्रजींची लोकप्रियता 40% आहे त्या सर्वे बद्दल जर कोणाला फोन आला असेल... कुणाची मुलाखत झाली असेल... त्यांच्याकडे एखादी प्रश्नावली आली असेल...तर इथे शेअर करू शकाल का...? म्हणजे मग आम्हाला हे कळेल की हे सर्व किती खरे किती खोटे ? #fakalogy
SushmaTai Andhare49,584 views • 7 months ago

संग्राम जगताप नितेश राणे या लोकांना निवडून देणाऱ्या मतदारांनो पुढच्या वेळी नुसते निवडून देऊ नका तर अधिकाधिक मताधिक्य द्या. म्हणजे सत्तेच्या जोरावर ते कुणालाही झोडपून काढू शकतील. स्वतः करणे जमले नाही तर इतरांकरवी ते काम करून घेऊ शकतील. राज्यात अखंड एकता न ठेवण्यासाठी जाती-जातीमध्ये धर्माधर्मांमध्ये दुही पसरवण्यासाठी आणि स्वतःलाच गुलाम करून घेण्यासाठी आपण राणे जगताप सारख्या लोकांना खरेच निवडून दिले पाहिजे. देवेंद्रजी फक्त एवढेच लक्षात ठेवा की शाई जरी लवांडे वर पडली असली तरी तोंड मात्र सरकारच काळं झाल आहे...! Devendra Fadnavis #bravho
SushmaTai Andhare17,218 views • 1 month ago

महाराष्ट्रात आज दोन तारखेला बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे आणि उद्या 3 तारखेला देशभरातील विद्यार्थ्यांसाठी असणारी नीट ची परीक्षा आहे. या परीक्षेची तारीख किमान चार सहा महिने आधी जाहीर होते देशभरातील सर्व राज्यांचे निकाल आधी लागले तर महाराष्ट्रातील निकालाला इतका उशीर का लागला आज निकाल उद्या परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणाची शिक्षण मंत्री दादा भुसे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या प्रश्नांची उत्तरे देतील का ?
SushmaTai Andhare18,556 views • 2 months ago

फडणवीस चाणक्य असते तर आतापर्यंत महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून टाकला असता पण ते तसे करू शकत नाहीत. कारण फडणवीसांना अजूनही एकहाती शतक मुंबईत गाठता आलं नाही. ही अश्वत्थाम्याची न भरणारी जखम आहे. 84 ची संख्या फक्त पाच ने वाढली. पण त्यातही 35 बाहेरून आलेले आहेत. 37 अ मराठी आहेत. आणि जे दहा-बारा आहेत ते आमदार खासदारांचे नात्यागोत्यातले आहेत. फडणवीसांनी स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या असुरी सत्ताकांक्षासाठी ठाकरेंना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंचे पक्ष, चिन्ह, ज्यांना घडवलं ते आमदार, खासदार , नगरसेवक सगळं गेल्यानंतर पुन्हा एकदा लोकसभेत ९ खासदार, विधानसभेत २० आमदार, मुंबई महापालिकेत 65 नगरसेवक निवडून आणलेत. ठाकरेंनी मैदान सोडलं नाही. ठाकरे कुठेही ईडीसीबीआय इलेक्शन कमिशन च्या मागे लपले नाही. ठाकरेंनी कुणाचेही उमेदवार विकत घेतले नाही. ठाकरे निधड्या छातीने लढले..! #ठाकरेब्रँड #कालआजउद्या
SushmaTai Andhare33,347 views • 5 months ago