Dr.Jitendra Awhad's banner
Dr.Jitendra Awhad's profile picture

Dr.Jitendra Awhad

@Awhadspeaks848,512 subscribers

Born Rebel

Shorts

हे खारघर सेक्टर 19 येथील व्हिडिओ आहेत. येथे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे चक्क SIR चे फॉर्म सापडले आहेत.खरतर या फॉर्मची कस्टडी केवळ BLO / संबंधित सरकारी अधिकाऱ्याकडेच असणे आवश्यक असताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे हे फॉर्म येतातच कसे? कुठल्या तोंडाने Election Commission of India महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या SIR प्रक्रियेला पारदर्शक आणि निष्पक्ष म्हणणार आहे..? यावर ChiefElectoralOffice काय कारवाई करणार..? करणार आहे की नाही..?

हे खारघर सेक्टर 19 येथील व्हिडिओ आहेत. येथे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे चक्क SIR चे फॉर्म सापडले आहेत.खरतर या फॉर्मची कस्टडी केवळ BLO / संबंधित सरकारी अधिकाऱ्याकडेच असणे आवश्यक असताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे हे फॉर्म येतातच कसे? कुठल्या तोंडाने Election Commission of India महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या SIR प्रक्रियेला पारदर्शक आणि निष्पक्ष म्हणणार आहे..? यावर ChiefElectoralOffice काय कारवाई करणार..? करणार आहे की नाही..?

28,410 views

Suspend this irresponsible officer immediately. Shameless… How can he slap our sister …

Suspend this irresponsible officer immediately. Shameless… How can he slap our sister …

108,627 views

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले की पोलिसांनी एखाद्याचं एन्काऊंटर करण्याआधी त्याची जात विचारली पाहिजे. एक मुख्यमंत्री इतक्या उघडपणे जातीभेद पसरवतो हे भयावह आहे.

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले की पोलिसांनी एखाद्याचं एन्काऊंटर करण्याआधी त्याची जात विचारली पाहिजे. एक मुख्यमंत्री इतक्या उघडपणे जातीभेद पसरवतो हे भयावह आहे.

49,081 views

हा कट कुठे रचला ह्याच्या मागे कोण? आवाज ओळखा … #गद्दार

हा कट कुठे रचला ह्याच्या मागे कोण? आवाज ओळखा … #गद्दार

201,447 views

उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला प्राणघातक हल्ला खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीवषजर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार , सभा उधळून लावण्याची धमकी देणार , माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही.

उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला प्राणघातक हल्ला खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीवषजर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार , सभा उधळून लावण्याची धमकी देणार , माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही.

98,771 views

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे आम्हांला बरोबर समजतंय. जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की," जितेंद्र साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही." मला वाटत नाही की,प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,"आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत." आम्ही मागेच सांगितल आहे की, "आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत." त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही. सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही.

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे आम्हांला बरोबर समजतंय. जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की," जितेंद्र साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही." मला वाटत नाही की,प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,"आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत." आम्ही मागेच सांगितल आहे की, "आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत." त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही. सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही.

124,457 views

छ्या....ही काय बातमी आहे का.. खरी बातमी तर ही आहे की अर्थव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट असून ती व्हेंटिलेटर वर आहे महागाईने मध्यमवर्गीय, शेतकरी ,कष्टकरी आणि सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे फक्त ते मीडियाला दिसत नाहीये

छ्या....ही काय बातमी आहे का.. खरी बातमी तर ही आहे की अर्थव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट असून ती व्हेंटिलेटर वर आहे महागाईने मध्यमवर्गीय, शेतकरी ,कष्टकरी आणि सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे फक्त ते मीडियाला दिसत नाहीये

17,638 views

स्टेज तुम्हारा जलवा हमारा.. #SharadPawar #baramati

स्टेज तुम्हारा जलवा हमारा.. #SharadPawar #baramati

77,297 views

Paper leaked in Water Conservation Department in Amaravati. This is happening on regular basis

Paper leaked in Water Conservation Department in Amaravati. This is happening on regular basis

75,977 views

शिंदे सरकारचा कार्यक्रम आणि रिकाम्या खुर्च्या हे एक नवीन कॉम्बिनेशन झालंय... राष्ट्रीय संस्कृती महोत्सव, आझाद मैदान, मुंबई टीप - हा केंद्राचा कार्यक्रम आहे याची कल्पना आहे.

शिंदे सरकारचा कार्यक्रम आणि रिकाम्या खुर्च्या हे एक नवीन कॉम्बिनेशन झालंय... राष्ट्रीय संस्कृती महोत्सव, आझाद मैदान, मुंबई टीप - हा केंद्राचा कार्यक्रम आहे याची कल्पना आहे.

92,434 views

ही चौथ्या महाविजयाची नांदी आहे..! आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव सोबत असुद्यात. #विधानसभा #NCPSP #MVA

ही चौथ्या महाविजयाची नांदी आहे..! आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव सोबत असुद्यात. #विधानसभा #NCPSP #MVA

49,449 views

हे चित्र आहे जगाची महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रमुख सल्लागार एलोन मस्क यांच्या धोरणाविरोधात... थोडक्यात काय... अती तिथे माती

हे चित्र आहे जगाची महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रमुख सल्लागार एलोन मस्क यांच्या धोरणाविरोधात... थोडक्यात काय... अती तिथे माती

40,022 views

मुंब्र्यामध्ये बळकवलेल्या शिवसेनेच्या शाखेच्या जागेवर इमारत बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. अनधिकृत इमारत बांधण्यासठी या ठिकाणी असलेले पूर्ण वाढ झालेले नारळाचे झाड देखील तोडण्यात आले. याबाबतचे ट्विट मी समाज माध्यंमावर केले होते. आज पण एक नारळाचे झाड तोडण्यात आलें परंतु सदरचे ट्विट अद्याप पर्यंत जिल्हाधिकारी प्रशासन, ठाणे महानगरपालिका प्रशासन तसेच ठाणे पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचलेलेच दिसत नाही. ही इमारत उभी करण्यासाठी केवळ नारळाचेच नाही तर इतर दोन मोठी झाडे देखील तोडण्यात आली आहेत. मुंब्रा-कौसा परिसरात कोठेही अनधिकृत इमारत उभी करा, कोणतीही झाडे तोडा, सरकारी जमिनीचा ताबा घ्या या गोष्टी राजरोस पणे सर्वांदेखत घडत आहेत. मुंबा-कौसा परिसरात कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. त्याच प्रमाणे याचे कुठलेही सोयर-सुतक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका प्रशासन तसेच ठाणे पोलीस आयुक्तालय यांना राहिलेले नाही. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Collectorate ठाणे पोलीस.. Thane Police Department of Environment, Forest & Climate Change Maneka Sanjay gandhi (मोदी का परिवार) Zee News English NDTV India ANI ABP माझा TV9 Marathi Environmental Justice Foundation Fan of Supreme Court India BBC News Hindi BBC News Marathi National Geographic TV महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Mataonline

मुंब्र्यामध्ये बळकवलेल्या शिवसेनेच्या शाखेच्या जागेवर इमारत बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. अनधिकृत इमारत बांधण्यासठी या ठिकाणी असलेले पूर्ण वाढ झालेले नारळाचे झाड देखील तोडण्यात आले. याबाबतचे ट्विट मी समाज माध्यंमावर केले होते. आज पण एक नारळाचे झाड तोडण्यात आलें परंतु सदरचे ट्विट अद्याप पर्यंत जिल्हाधिकारी प्रशासन, ठाणे महानगरपालिका प्रशासन तसेच ठाणे पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचलेलेच दिसत नाही. ही इमारत उभी करण्यासाठी केवळ नारळाचेच नाही तर इतर दोन मोठी झाडे देखील तोडण्यात आली आहेत. मुंब्रा-कौसा परिसरात कोठेही अनधिकृत इमारत उभी करा, कोणतीही झाडे तोडा, सरकारी जमिनीचा ताबा घ्या या गोष्टी राजरोस पणे सर्वांदेखत घडत आहेत. मुंबा-कौसा परिसरात कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. त्याच प्रमाणे याचे कुठलेही सोयर-सुतक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका प्रशासन तसेच ठाणे पोलीस आयुक्तालय यांना राहिलेले नाही. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Collectorate ठाणे पोलीस.. Thane Police Department of Environment, Forest & Climate Change Maneka Sanjay gandhi (मोदी का परिवार) Zee News English NDTV India ANI ABP माझा TV9 Marathi Environmental Justice Foundation Fan of Supreme Court India BBC News Hindi BBC News Marathi National Geographic TV महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Mataonline

46,730 views

अंतरवली (जिल्हा - जालना) येथे मराठा आरक्षनासाठी स्थानिक मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता.यात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. परंतु एक आदेश येतो आणि या बांधवांवर पोलीस अमानुष लाठीहल्ला करतात.याची तीव्रता इतकी असते की,अनेक सामान्य नागरिक अक्षरशः रक्तबंबाळ होतात. राज्यातील एखादा समाज शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारच्या समोर ठेवत असताना,त्यांच्यावर असा अमानुष लाठीचार्ज करणे,हे सरकारला शोभत नाही.केंद्रात आणि राज्यात सरकार असताना देखील मराठा बांधवांना,आरक्षण देण्याची हमी देण्याचं सौजन्य सुद्धा हे सरकार दाखवत नाही.उलट त्यांच्यावरच लाठीचार्ज करून या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत.मराठा समाजावर झालेल्या या अमानुष हल्ल्याचा जाहीर निषेध.

अंतरवली (जिल्हा - जालना) येथे मराठा आरक्षनासाठी स्थानिक मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता.यात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. परंतु एक आदेश येतो आणि या बांधवांवर पोलीस अमानुष लाठीहल्ला करतात.याची तीव्रता इतकी असते की,अनेक सामान्य नागरिक अक्षरशः रक्तबंबाळ होतात. राज्यातील एखादा समाज शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारच्या समोर ठेवत असताना,त्यांच्यावर असा अमानुष लाठीचार्ज करणे,हे सरकारला शोभत नाही.केंद्रात आणि राज्यात सरकार असताना देखील मराठा बांधवांना,आरक्षण देण्याची हमी देण्याचं सौजन्य सुद्धा हे सरकार दाखवत नाही.उलट त्यांच्यावरच लाठीचार्ज करून या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत.मराठा समाजावर झालेल्या या अमानुष हल्ल्याचा जाहीर निषेध.

46,606 views

मुंब्र्याची जी शाखा पडली तिची पुनर्बांधणी दिवस रात्र चालू आहे आणि पोलिसांना माहीत आहे महापालिका कर्मचारी आंधळे झाले आहेत जागा गुरचरण आहे. सर्वोच्च न्यायालया निकाल स्पष्ट आहे गुर्rचरण जमिनी वर बांधकाम करता येणार नाही. अवैध बांधकाम जोरात सुरू आहे कोण काय करणार ? हा माज सत्तेचे @abhijitbangar आपण प्लॅन पास करणार का ठाणे पोलीस.. Thane Police Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका आपण हे रोखणार की असेच चालू ठेवणार. कोर्टात हे सगळे पुरावे सादर करू ...

मुंब्र्याची जी शाखा पडली तिची पुनर्बांधणी दिवस रात्र चालू आहे आणि पोलिसांना माहीत आहे महापालिका कर्मचारी आंधळे झाले आहेत जागा गुरचरण आहे. सर्वोच्च न्यायालया निकाल स्पष्ट आहे गुर्rचरण जमिनी वर बांधकाम करता येणार नाही. अवैध बांधकाम जोरात सुरू आहे कोण काय करणार ? हा माज सत्तेचे @abhijitbangar आपण प्लॅन पास करणार का ठाणे पोलीस.. Thane Police Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका आपण हे रोखणार की असेच चालू ठेवणार. कोर्टात हे सगळे पुरावे सादर करू ...

44,446 views

लेडी डॉन च्या सांगण्यावरुन पोकलेन मशीन अख्खा सिमेंटचा रस्ता खराब करीत साईटवर पोहचली. तेवढ्यात लेडी डॉनला 25 ची कमिटमेंट झाली. आणि पोहचलेली पोकलेन मशीन लगेचच मागे फिरली. ही आहे प्रशासनाची कमाल. प्रशासनातीलच अधिकारी हे लेडी डॉनला मांडीवर घेऊन बसले आहेत. ते आणि ती मिळून हा हैदोस मुंब्रा, शीळ तसेच आजूबाच्या भागात घालत आहेत. सगळ्यांना सगळं माहित आहे. परंतु ठाणे महानगरपालिकेतील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. मी स्वत: आपल्याकडे हा पुरावा सादर करीत आहे. अजून आपल्याला काय हवं ते सांगा ठाणे महानगरपालिका आयुक्त @abhijitbangar महोदय. ते सुद्धा आणून देतो. आता एवढा पुरावा दिल्यानंतर तरी कारवाई होणार की नाही. हे तुम्हीच ठरवा. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

लेडी डॉन च्या सांगण्यावरुन पोकलेन मशीन अख्खा सिमेंटचा रस्ता खराब करीत साईटवर पोहचली. तेवढ्यात लेडी डॉनला 25 ची कमिटमेंट झाली. आणि पोहचलेली पोकलेन मशीन लगेचच मागे फिरली. ही आहे प्रशासनाची कमाल. प्रशासनातीलच अधिकारी हे लेडी डॉनला मांडीवर घेऊन बसले आहेत. ते आणि ती मिळून हा हैदोस मुंब्रा, शीळ तसेच आजूबाच्या भागात घालत आहेत. सगळ्यांना सगळं माहित आहे. परंतु ठाणे महानगरपालिकेतील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. मी स्वत: आपल्याकडे हा पुरावा सादर करीत आहे. अजून आपल्याला काय हवं ते सांगा ठाणे महानगरपालिका आयुक्त @abhijitbangar महोदय. ते सुद्धा आणून देतो. आता एवढा पुरावा दिल्यानंतर तरी कारवाई होणार की नाही. हे तुम्हीच ठरवा. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

42,494 views

निर्लज्ज पणाची हद्द पार केली “माफी मागा”

निर्लज्ज पणाची हद्द पार केली “माफी मागा”

26,596 views

Videos

Awhadspeaks's profile picture

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खाडी किनाऱ्यावर एका व्यावसायिकाकडून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. अनधिकृतपणे तेथील मौल्यवान कांदळवन नष्ट करून संबंधित जागेवर भरणी करण्यात येत होती आणि त्या जागेवर बेकायदेशीररित्या मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात होता. कांदळवन हे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा आव्हाड आणि नगरसेविका मनीषा भगत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेले सर्व बेकायदेशीर प्रकार त्वरित थांबवण्याची सक्त ताकीद संबंधितांना दिली. तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी आग्रही आणि स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. यावेळी मुंब्रा परिसरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील नैसर्गिक संपत्ती आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Dr.Jitendra Awhad

57,796 views • 4 months ago

Awhadspeaks's profile picture

एल्विश यादव सारख्या कृप्रसिद्ध युट्युबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर ला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी,गणेश आरतीसाठी बोलवत असतील,तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे. महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक स्टेटमेंट दिले आहेत.याच्या मते,स्त्रियांना मेंदू कमी असतो,बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते.तिने तेवढंच करावं. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराच जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे.पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.

Dr.Jitendra Awhad

318,417 views • 2 years ago

Awhadspeaks's profile picture

येऊरच्या मध्यभागी वनखात्याकडून एक भिंत बांधली जात आहे. सर्व अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, एकाही अधिकाऱ्याने व्यवस्थित माहिती देऊ शकला नाही. उजवीकडे, डावीकडे किंवा त्या भिंतीच्या शेवटी कोणाची जमीन आहे, याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही. आमच्या नावावर जमीन आहे. पण, इतर हक्कांमध्ये इतरांची नावे आहेत. इतर हक्कांमध्ये इतरांची नावे असलेल्या जमिनींमध्ये इतरांची नावे सुरक्षित करण्यासाठी भिंत बांधण्यात येत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतो. जंगलामध्ये सीसी बाऊंड्री... पूर्ण सिमेंटचे बांधकाम ही जरा धक्कादायक बाब आहे. येऊरमध्ये जमिनींचा वाटप कार्यक्रम वनखात्याने सुरू केला आहे की काय? सोबत एक व्हिडिओदेखील पाठवत आहे अन् एक मोठे झाड स्वतः वनखात्यानेच भिंत बांधताना तोडले आहे. वाह रे... वा! मजेशीर आहे, सगळं! गणेश नाईक साहेब, काय चालू आहे हे.

Dr.Jitendra Awhad

31,194 views • 2 months ago

Awhadspeaks's profile picture

जय भीम, भारत देशातील शोषणाविरोधातील लढ्याचा आवाज म्हणून जर कोणाकडे पाहिले जात असेल तर ते फक्त आणि फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच ! जेव्हा एका ठराविक समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते... जेव्हा शूद्रांना पाण्याजवळही जाऊ दिले जात नव्हते. तेव्हा त्यांनी अख्खा तलावच संघर्ष करून उघडा करून दिला. ज्या मनुस्मृतीचा पगडा अनेक शतके या देशाच्या मानगुटीवर होता.ती मनुस्मृतीच त्यांनी जाळून टाकली. रूपयाचे महत्व काय आणि त्यासमोरील समस्या काय, हे त्यांनी पुस्तकात वर्णन करून इथल्या रिझर्व्ह बॅंकेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी शिक्षणातील जेवढ्या पदव्या घेतल्या; तेवढ्या पदव्या या देशात आजपर्यंत कोणीही घेऊ शकलेले नाही. त्याही साध्यासुध्या विद्यापीठातील नाही तर कोलंबिया, हार्वर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगातील नंबर एकवर असलेल्या विद्यापीठातून घेतल्या. हे यासाठी महत्वाचे आहे की आहे की, जेव्हा ते व्यवस्थेविरुद्ध उभे राहिले तेव्हा त्यांच्या डोक्यात होते की, "मला स्वतःला वर्गात न बसताच शिक्षण घ्यावे लागले." कदाचित अनेकांना हे माहित नसेल की त्याकाळातील जातीव्यवस्थेमुळे त्यांना वर्गातही बसू दिले नव्हते. वर्गाबाहेर बसून त्यांना अभ्यास करावा लागला होता. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या संविधान समितीमध्ये त्यांना स्थान मिळाले. ते घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाले अन् भारताचे संपूर्ण संविधान त्यांनी हाताने लिहिले; ते लिहित असताना त्यांनी जगातील सर्व देशांची संविधाने अभ्यासली, जगातील सर्व धर्मांचा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि भारताला अनेक युगे कामाला येईल, भारताला एकसंघ ठेवेल, असे संविधान त्यांनी तयार केले. पण, हे लिहिताना त्यांनी सर्वांना सांगितले की, "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा !" आधी शिका... शिक्षणाला अभूतपूर्व महत्व आहे, हे त्यांनी आधीच ओळखले होते. म्हणून त्यांनी स्वतःच्या ताकदीवर पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. सिद्धार्थ महाविद्यालय आणि छत्रपती संभाजी नगरचे मिलींद काॅलेज ही त्यांचीच अपत्ये ! म्हणून जेव्हा कुठल्याही व्यवस्थेविरुद्ध, कुठल्याही अन्याय - अत्याचाराविरूद्ध घोषणा द्यायची असते तेव्हा मनातूनच एक घोषणा येते, ती असते ... जय भीम !!

Dr.Jitendra Awhad

19,711 views • 1 month ago