Harshwardhan Sapkal's banner
Harshwardhan Sapkal's profile picture

Harshwardhan Sapkal

@INCHarshsapkal13,853 subscribers

President, Maharashtra Pradesh Congress Committee. A patriot with the stern resolve: Never leave the field until victory is secured.

Shorts

हाच अहंकार होता कौरवांचा, हाच अहंकार होता रावणाचा, आणि हो हाच अहंकार होता औरंगजेबाचा! आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे, हे सत्याचं, न्यायाचं आणि स्वाभिमानाचं युद्ध आहे. आणि विजय अखेरीस महाराष्ट्राचाच होणार, कारण… सत्यमेव जयते!

हाच अहंकार होता कौरवांचा, हाच अहंकार होता रावणाचा, आणि हो हाच अहंकार होता औरंगजेबाचा! आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे, हे सत्याचं, न्यायाचं आणि स्वाभिमानाचं युद्ध आहे. आणि विजय अखेरीस महाराष्ट्राचाच होणार, कारण… सत्यमेव जयते!

62,814 просмотров

उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या आवारात अधिकारी कर्मचारी दिवसाढवळ्या भ्रष्टाचाराच्या पैशातून दारू पार्ट्या करत आहेत. सत्ताधा-यांच्या आशिर्वादाने ठाण्यात भ्रष्टाचार आणि अनैतिकतेचा नंगानाच सुरु आहे. नागरिकांना पाणी स्वच्छता रस्ते शिक्षण या सुविधा पुरवण्याची जबाबदारी असणारे अधिकारी कर्मचारी नशेत काम करत आहेत त्यामुळे भ्रष्टाचार सुसाट आणि प्रशासन सैराट अशी ठाणे शहराची अवस्था झाली आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या आवारात अधिकारी कर्मचारी दिवसाढवळ्या भ्रष्टाचाराच्या पैशातून दारू पार्ट्या करत आहेत. सत्ताधा-यांच्या आशिर्वादाने ठाण्यात भ्रष्टाचार आणि अनैतिकतेचा नंगानाच सुरु आहे. नागरिकांना पाणी स्वच्छता रस्ते शिक्षण या सुविधा पुरवण्याची जबाबदारी असणारे अधिकारी कर्मचारी नशेत काम करत आहेत त्यामुळे भ्रष्टाचार सुसाट आणि प्रशासन सैराट अशी ठाणे शहराची अवस्था झाली आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

29,317 просмотров

"एवढा अहंकार रावणालाही नव्हता!" मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मला ओळखता का नाही — त्याने काहीही फरक पडणार नाही ! पण शेतकऱ्यांच्या वेदना तरी ओळखा! राजकारणाची गणितं थोडी बाजूला ठेवा आणि आधी सरसकट हेक्टरी 50हजार रुपये मदतीचा निर्णय घ्या. ओबीसी रस्त्यावर आलेत, आदिवासी आलेत, धनगर-बंजारा सुद्धा उठलेत, आणि मराठा तर सुरुवातीपासूनच रस्त्यावर आहेत. या सगळ्यांमध्ये तुम्हीच भांडणं पेटवलीत — आणि आता ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच अंगाखांद्यावर घेत फिरता! ही तुमची “राजकीय ओळख” आता महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचली आहे. मी मातीशी जोडलेला आणि परत याच मातीत जाणारा आडवळणाच्या गावचा सामान्य माणूस — “बायोलॉजिकल” म्हणूनच नव्हे, तर विचारांनी आणि निष्ठेनेचा आणि हाडामासाचा माणूस आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची माझी परंपरा नाही. तुम्ही मला ओळखलंत नाही तरी चालेल, पण ओला-दुष्काळ पहीले करा! शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या! आणि हो — हे माझं स्टेटमेंट नाही, तर शेतकऱ्याच्या जखमांमधून निघालेला आवाज आहे आणि त्याचे हे उत्तर नाही. कृपया चिडू नका मुख्यमंत्री महोदय, फक्त एकच गोष्ट आठवा — आपण दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या वचनाचे तेवढे पहा!

"एवढा अहंकार रावणालाही नव्हता!" मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मला ओळखता का नाही — त्याने काहीही फरक पडणार नाही ! पण शेतकऱ्यांच्या वेदना तरी ओळखा! राजकारणाची गणितं थोडी बाजूला ठेवा आणि आधी सरसकट हेक्टरी 50हजार रुपये मदतीचा निर्णय घ्या. ओबीसी रस्त्यावर आलेत, आदिवासी आलेत, धनगर-बंजारा सुद्धा उठलेत, आणि मराठा तर सुरुवातीपासूनच रस्त्यावर आहेत. या सगळ्यांमध्ये तुम्हीच भांडणं पेटवलीत — आणि आता ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच अंगाखांद्यावर घेत फिरता! ही तुमची “राजकीय ओळख” आता महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचली आहे. मी मातीशी जोडलेला आणि परत याच मातीत जाणारा आडवळणाच्या गावचा सामान्य माणूस — “बायोलॉजिकल” म्हणूनच नव्हे, तर विचारांनी आणि निष्ठेनेचा आणि हाडामासाचा माणूस आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची माझी परंपरा नाही. तुम्ही मला ओळखलंत नाही तरी चालेल, पण ओला-दुष्काळ पहीले करा! शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या! आणि हो — हे माझं स्टेटमेंट नाही, तर शेतकऱ्याच्या जखमांमधून निघालेला आवाज आहे आणि त्याचे हे उत्तर नाही. कृपया चिडू नका मुख्यमंत्री महोदय, फक्त एकच गोष्ट आठवा — आपण दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या वचनाचे तेवढे पहा!

31,836 просмотров

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे, आणि बहुजन समाजासाठी झटणाऱ्या शिवश्री प्रविणदादा गायकवाडांवर भाजपच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध. मुख्यमंत्री फडणवीस “महाराष्ट्र आता थांबणार नाही”म्हणाला होतात, आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का? या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या झुंडीवर जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करणेची काही तरतूद आहे का? असेल तर त्याअंतर्गत कारवाई करून आदर्श घालून द्या! महाराष्ट्र पाहतोय.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे, आणि बहुजन समाजासाठी झटणाऱ्या शिवश्री प्रविणदादा गायकवाडांवर भाजपच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध. मुख्यमंत्री फडणवीस “महाराष्ट्र आता थांबणार नाही”म्हणाला होतात, आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का? या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या झुंडीवर जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करणेची काही तरतूद आहे का? असेल तर त्याअंतर्गत कारवाई करून आदर्श घालून द्या! महाराष्ट्र पाहतोय.

38,339 просмотров

Videos

INCHarshsapkal's profile picture

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा अंतर्गत कलह आणि जातीय मानसिकता महाराष्ट्रासमोर उघडी पडली! यूपीएससी-एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चर्चा होण्याऐवजी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद झाला. त्यानंतर "हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे" असा आरोप-प्रत्यारोप झाल्याने कार्यक्रमाचे गांभीर्यच संपले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडत असताना त्यांनी यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. हा भाजपचा "सबका साथ, सबका विकास" आहे की "खुर्चीसाठी भांडा आणि जातीत समाजाला विभागा" हा नवा मंत्र? यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्याऐवजी भाजपच्या नेत्यांनी स्वतःच्या अहंकाराचा आणि अंतर्गत गटबाजीचा देखावा केला. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला हे शोभणारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर मौन सोडून महाराष्ट्राला उत्तर द्यावे. भाजपमध्ये खुर्ची मोठी की संविधान आणि समानतेची मूल्ये?

Harshwardhan Sapkal

28,317 просмотров • 1 месяц назад

INCHarshsapkal's profile picture

राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी. #नरहरीझिरवाळ_राजीनामा_द्या #NarhariZirwalResign #महाराष्ट्र_नैतिकता_वाचवा #ResignNarhariZirwal

Harshwardhan Sapkal

57,082 просмотров • 4 месяцев назад

INCHarshsapkal's profile picture

विरोधकांवर टीका करणं, शेरोशायरी करणं आणि "प्रशासनावर जबरदस्त पकड" असल्याचा PR करणं खरंच सोपं आहे. पण वास्तव इतकं भयानक आहे की, विधानसभा अध्यक्षांनी वारंवार बोलावूनही संबंधित मंत्री आणि अधिकारी सभागृहात फिरकत नाहीत! अध्यक्षांच्या निर्देशांनाही जुमानलं जात नसेल, तर राज्यात प्रशासन चालतंय की बेबंदशाही? इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांनाच सभागृहात याबद्दल नाराजी व्यक्त करावी लागते, यापेक्षा सरकारच्या प्रशासनावरील नियंत्रणाचं मोठं अपयश कोणतं? ज्या मुख्यमंत्र्यांना स्वतःचे मंत्री आणि अधिकारीच जुमानत नाहीत, त्यांनी प्रशासनावरील पकडीच्या गप्पा मारू नयेत. महाराष्ट्राने असा बेफिकीर आणि बेशिस्त कारभार यापूर्वी कधी पाहिला नव्हता. #हतबल_विधानसभा_अध्यक्ष #दलिंदर_सरकार

Harshwardhan Sapkal

14,533 просмотров • 1 месяц назад

INCHarshsapkal's profile picture

‘मुंबई तक’ ने डिलीट केलेला व्हिडिओ… निर्भीड पत्रकार ओंकार वाबळे यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ३०० कोटींच्या जमीन घोटाळ्याविषयी केलेला व्हिडिओ, मुंबई तकने अचानक काढून टाकला. ह्यात काय आहे ते पाहा! व्हिडिओ का डिलीट केला हे सांगायची गरज नाही… शेवटी प्रत्येकाला आपले कुटुंब आणि जीव प्रिय आहे. परंतु फडणवीस सरकार दोषींना आधार देत आहे आणि माध्यमांना दडपून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रीतीने पत्रकारितेची गळचेपी होत असल्यामुळेच भारताचे पत्रकारिता निर्देशांकामधील स्थान घसरत तळाशी पोचले आहे. . . Congress Rahul Gandhi Devendra Fadnavis Murlidhar Mohol #मुंबईतक #CMOMaharashtra #पत्रकारिता

Harshwardhan Sapkal

75,822 просмотров • 9 месяцев назад

INCHarshsapkal's profile picture

महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे संपली असून राज्यात जंगलराज आणले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत हे दर्शवणारे आहे. खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढणा-यांना अटक होत नाही म्हणून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत. गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. सुरक्षारक्षक असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. राज्यात माता भगिणी सुरक्षित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदीचा राजीनामा देऊन राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्री द्यावा. CMO Maharashtra

Harshwardhan Sapkal

73,597 просмотров • 1 год назад

INCHarshsapkal's profile picture

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा फॉर्म आज अ‍ॅडव्होकेट आकाश मोरे काँग्रेसच्या वतीने भरणार आहेत, पण त्या संदर्भात बरीच खलबतं सुरू आहेत, टीकाटिप्पणी सुरू आहेत की काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी अशी परंपरा राहिलेली आहे. मग नांदेडच्या वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? अशी अनेक उदाहरणं जी आहे ती देता येईल, भाजपने सोईने आपलं राजकारण केलेलं आहे. दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अजितदादांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर घरच्या लोकांना वाटतं की त्याची एन्क्वायरी झाली पाहिजे म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सीबीआयची एन्क्वायरी मागितली. रिमाइंडर दिलं काय झालं त्याचं? रोहित पवार पिलर टू पोस्ट एफआयआर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करत होते शेवटी कर्नाटक मध्ये त्यांचा प्रयत्न सफल झाला. ही तुमची संवेदनशीलता आहे का? आजही आमच्या उमेदवाराचं आणि काँग्रेस पक्षाचं हे म्हणणं आहे की तुम्ही एफआयआर दाखल करा महाराष्ट्रामध्ये, बारामतीमध्ये. मग त्याचा विचार करता येईल, मग लक्षात येईल की खरी तुमची भूमिका काय आहे. मा.श्री अतुल लोंढे वरिष्ठ प्रवक्ते - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳

Harshwardhan Sapkal

21,434 просмотров • 4 месяцев назад

INCHarshsapkal's profile picture

विकृत बलात्कारी अशोक खरात याच्या मुलीच्या लग्नात करवलीसारखे वावरणारे, रुपाली चाकणकर यांचे (राजकीय) गुरू खासदार श्री. सुनील तटकरे यांना संबंधित प्रकरणावरून पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांची भंबेरी उडाली, त त प प करत त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. याअगोदरच्या प्रत्येक प्रकरणात रुपाली चाकणकर यांना तुम्हीच वाचवलं असं म्हणतात. आता या भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यात तुमचेही हात काळे झाले असतील, त्यामुळेच कदाचित आता तुम्ही चाकणकर बाईंना वाचवू शकणार नाहीत. या प्रकरणात विस्तृत चौकशी होऊन समाज नासवणारे सगळे काळे चेहरे बाहेर यायलाच हवेत. Sunil Tatkare

Harshwardhan Sapkal

22,426 просмотров • 4 месяцев назад