
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
@rajupatilmanase • 74,505 subscribers
Leader-Maharashtra Navnirman Sena | Former Member of the Legislative Assembly - Kalyan Rural, Maharashtra.
Shorts
Videos

कल्याण-शीळ रस्ता व शिळफाटा भाग MMRDA व MSRDC ने नालेसफाई न केल्यामुळे तसेच जुने नैसर्गिक नाले व त्यावर झालेली अनधिकृत बांधकामं यावर निर्णय न घेतल्याने ठाणे महानगरपालिकेच्या कृपेने पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. एकंदरीतच संपुर्ण MMR मध्ये कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे त्यामुळे लोकांची ‘राजाने मारले व पावसाने झोडले ‘अशी गत झाली आहे.
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )52,893 views • 5 days ago

पुण्याच्या जंगली महाराज रस्त्याला गेल्या ४६ वर्षांमध्ये एकही खड्डा पडला नाही हा एक विक्रम आहे.हा रस्ता ज्या रिकांडो नावाच्या पारसी कंपनीने १९७२/७३ मध्ये केला त्याची ही रहस्य कथा ऐका. ४६ वर्षात एकही खड्डा नाही याचे मुख्य कारण हा रस्ता ज्या रिकांडो नावाच्या पारसी कंपनीने केला त्यांनी या कामात कोणालाही टक्केवारी दिली नव्हती.नाहीतर आमचे रस्ते बघा ! एका एका कामात ३/३ हजार कोटींचा भ्रष्टाचार होतोय. बरोबर बोलतोय ना ? MMRDA Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )71,891 views • 1 year ago

डोंबिवलीत प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपाचे गांधी प्रेम …….! सर्रास पैसे वाटप सुरू आहे. कालचा रेट ३०००/- होता, हे प्रकरण उघडकीस आल्यावर रेट ५०००/- प्रति मत केल्याचे ऐकायला येत आहे. डोंबिवलीत पैसा व गुंडगीरीचा वापर सुरूच आहे.सत्तेचा माज ओसाढून वाहत आहे.
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )34,782 views • 5 months ago

मराठा समाजाचा चेहरा असलेले श्री.एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पद उपभोगले, दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देणारच हे शिवरायांची शपथ घेऊन ठामपणे सांगितले, त्यानंतर नवी मुंबईत श्री.मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मसुदा देऊन लोकसभा निवडणूकी आधी वेळ मारून नेली व आपले खासदार निवडून आणले. तरीही त्यानंतर ते मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकले नाही ? आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समाज बांधव भर पावसात तिथे आंदोलनाला बसले आहेत, त्यांना धड साध्या पाण्याचीही सोय महायुती सरकारने केली नाही. असे असताना विद्यमान उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री इकडे हरभजन सोबत गप्पा मारत आहेत ? हे बरोबर नाही ! #मराठा_आरक्षण
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )50,247 views • 10 months ago

या आहेत पुण्यातील खासदार, नाहीतर आमचे….! गरब्याला ( दांडिया ) आमचाही विरोध नाही, मात्र सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी गरब्याचा ( दांडिया ) इव्हेंट करून टाकला आहे त्यामुळे डिजे च्या गोंगाटाचा व वाहतुककोंडीचा समस्त डोंबिवलीकरांना प्रचंड त्रास होऊ लागलाय.असाच प्रकार पुण्यात घडल्याने सत्ताधारी पक्षातील खासदार डॅा.मेधाताई कुलकर्णी यांनी समाचार घेत खरी परिस्थिती मांडली. डोंबिवलीकरांना या दांडिया इव्हेंटचा त्रास होत असला तरी आमचे नशीबवान सत्ताधारी नेते थंड आहेत,कारण तेच आयोजक आहेत ! त्यामुळे सध्या तरी डोंबिवलीकरांची या गोंगाटातून व वाहतुक कोंडीतून सुटका होईल असे दिसत नाही . असो ! मेधाताई आपण लोकांसाठी प्रामाणिकपणे व ठाम भुमिका घेतली त्याबद्दल आपले मनसे आभार ! Dr. Medha Kulkarni #डोंबिवलीकर
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )39,843 views • 9 months ago

मा. Pratap Baburao Sarnaik दादा, तुम्ही तसे पुर्वाश्रमीचे डोंबिवलीकर ! आज तुम्ही ठाणेकर झाला असलात तरी मला खात्री आहे की आपल्या डोंबिवलीकरांप्रती तुमचे जुने प्रेम आजही तसेच आहे. कधी काळी डोंबिवलीत रिक्षा चालवून व हलाकीचे दिवस सोसून आज आपण स्वकतृत्वाने कष्ट करून मोठे झालात,परिवहन मंत्री पण झालात याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आपल्या डोंबिवली व कल्याणचे परिवहन व्यवस्थापन व नियोजन अत्यंत ‘थर्ड क्लास’ आहे.इथल्या राजकीय ‘भाई-दादा’ यांच्या रिक्षा युनियनचे सदस्य असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी तर एवढी वाढली आहे की विचारून सोय नाही.तरी कृपया तुम्ही एकदा कल्याण-डोंबिवलीत येऊन इथल्या वाहतूक व परिवहन व्यवस्थेची तुमच्या पद्धतीने झाडाझडती घ्यावी ही विनंती.
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )14,022 views • 2 months ago

मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहिहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा नीच राजकारण केले होते. आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकाने ‘त्यांच्या’ इथे पहिल्यांदा १० थर लावले, त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला. आज त्याच जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा १० थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडूळांना माती दाखवली. जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे ? #मनसे #मराठी_मनांसाठी_मराठी_सणांसाठी #दहिहंडी
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )31,607 views • 10 months ago

हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मराठी माणसांकडून विविध पद्धतीनं जल्लोष साजरा करण्यात येत आहे.अशातच मुंबईच्या लोकलमध्येही तरुणाईनं "मराठी बोला" म्हणत आनंद साजरा केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. #LokmatMumbai #आपलीमराठी #marathi #महाराष्ट्रात_मराठीच
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )29,612 views • 1 year ago

उद्या मा.पालकमंत्री श्री. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब खोणी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला अखेर काटई-निळजे-देसाई ( पलावा पुलावरून ) मार्गक्रमण करणार ! त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी असेच वारंवार या रस्त्यावरून येत रहा ,किमान आपल्या धाकाने आमचे रस्ते व वाहतुककोंडीची समस्या आपणांस कळेल व त्यात सुधारणा होईल( हा टोमणा नाही तर आपणांस विनंती आहे ). आपण असेच जर दर पंधरा दिवसांनी येणार असाल तर आम्ही आपल्या स्वागताचे बॅनर पण लावू ! ( हा टोमणा आहे बरं ! ) #पलावा_पुल #palava
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )20,305 views • 9 months ago

आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला.हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे.हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे, प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे.बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे,मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे ? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता करता त्याच पैश्यातून #वोटचोरी करून आमदार ही झाले….अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ? #मिंधे #भ्रष्ट #आमदार #खाजदार #KDयमC #डोंबिवलीकर
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )16,603 views • 8 months ago

कल्याण-शीळ रस्त्यावर ही वाहतूक कोंडी रोजचीच आहे. अनेकदा ॲम्बुलन्स या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने लोकांचे जीव जात आहेत.फक्त कल्याण फाट्यावरील व महापे कडे जाणाऱ्या टेकडीवरचे खड्डे भरले तरी थोडा फरक पडेल , पण या कडे कोणाचे लक्ष नाही, ……आणि आमचा बबड्या तिकडे दुसऱ्या राज्यात चेंगराचेंगरी का झाली ते बघायला गेलाय म्हणे ! कठीण आहे ! #कल्याण_शीळ_रस्ता #पलावा #शिळफाटा #कल्याण_मेट्रो
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )16,580 views • 9 months ago

आजचे डोंबिवली रेल्वे स्थानकावरचे हे चित्र ! हे रोजचेच आहे. राज्य सरकारला रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची जबाबदारी वाटते. फार फार एखादी दुर्घटना झाली की ५ लाखाचा चेक घेऊन सत्ताधारी कॅमेऱ्यासहीत तयारही असतात, पण कोणालाही मुंबईकडे जाणाऱ्या या चाकरमान्यांच्या रोजच्या व्यथा दिसत नाहीत. निव्वळ टक्केवारी काढण्यासाठी पटापट होणारे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यापेक्षा मुंबई लोकलचे महाराष्ट्राचे स्वायत्त रेल्वेबोर्ड स्थापन करून लोकलसेवा कशी सुधारता येईल यासाठी एक योजना हाती घेणे आवश्यक आहे.उत्तरेकडून येणाऱ्या व उत्तरेकडे जाणाऱ्या काही बिनकामाच्या मेल-एक्सप्रेस मुंबई बाहेरून सोडल्यास लोकलच्या अधिक फेऱ्या वाढवता येतील.वंदे भारतला दिलेली प्राथमिकता या गोंधळात अधिक भर टाकत आहे अश्याही तक्रारी प्रवासी करत आहेत. या लोकलने प्रवास करणारे चाकरमनी मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांची काळजी सरकारने घ्यायलाच हवी. आपण ज्या मुंबईच्या जीवावर देशभरात नंबर एकची जी टीमकी वाजवतो त्या मुंबईला संपन्न करण्यासाठी आपले जीव रोजच धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी ही राज्य सरकारची पण आहे. सरकारने केंद्राकडे याबाबत पाठपुरावा करावा. सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे तिकडे जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पण याबाबत आवाज उठवावा. Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )18,927 views • 11 months ago