Rohit Pawar's banner
Rohit Pawar's profile picture

Rohit Pawar

@RRPSpeaks779,587 subscribers

Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS

Shorts

हा व्हिडिओ एखाद्या पार्किंगचा नाही तर तो आहे पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे भागातील. हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणारे हजारो IT Professionals या आणि आसपासच्या भागात राहतात. याच भागातील विविध IT कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला, मात्र गेल्या काही वर्षांपासून हा भाग पूर्णतः वाहतूक कोंडीत अडकलाय. परिणामी अनेक कंपन्यांनी स्थलांतर केलं असून काही कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत. या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर स्थानिकांना रोजगार देणाऱ्या आणि इथल्या आर्थिक प्रगतीला चालना देणाऱ्या अनेक कंपन्या बाहेर जातील आणि त्याची जबर किंमत इथला युवा आणि स्थानिकांना मोजावी लागेल. त्यामुळं सरकारने प्राधान्याने ही वाहतूक कोंडी सोडवावी. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar #वाहतूककोंडी #Traffic #Hinjewadi #ITPark

हा व्हिडिओ एखाद्या पार्किंगचा नाही तर तो आहे पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे भागातील. हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणारे हजारो IT Professionals या आणि आसपासच्या भागात राहतात. याच भागातील विविध IT कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला, मात्र गेल्या काही वर्षांपासून हा भाग पूर्णतः वाहतूक कोंडीत अडकलाय. परिणामी अनेक कंपन्यांनी स्थलांतर केलं असून काही कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत. या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर स्थानिकांना रोजगार देणाऱ्या आणि इथल्या आर्थिक प्रगतीला चालना देणाऱ्या अनेक कंपन्या बाहेर जातील आणि त्याची जबर किंमत इथला युवा आणि स्थानिकांना मोजावी लागेल. त्यामुळं सरकारने प्राधान्याने ही वाहतूक कोंडी सोडवावी. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar #वाहतूककोंडी #Traffic #Hinjewadi #ITPark

33,854 просмотров

तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…! पण निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध..! #WestBengalLegislativeAssemblyelection2026

तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…! पण निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध..! #WestBengalLegislativeAssemblyelection2026

54,199 просмотров

लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी रात्री अभिवादन करण्यासाठी गेलो असता विरोधकांचं अत्यंत किळसवाणं आणि शरम वाटावी असं वर्तन बघायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीच्या नावाने स्वतःचाच उदोउदो करुन घेण्याची हौस भागवली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विराट कर्तृत्त्वाचे, उत्तुंग नेतृत्त्वाचे, समाजाप्रतीच्या निष्ठेचे गोडवे गाण्याऐवजी ‘रामभाऊ तुमचं काम एक नंबर’ अशी स्वतःचीच आरती गाणारी ओंगाळवाणी गाणी ऐकावी लागत होती… हे ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे की विरोधकांच्या वाढदिवसाची पार्टी आहे, असा प्रश्न पडला. तिथंच मिरवणुकीसारखं वातावरण दिसलं.. वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक असावी, पण ती मिरवणूक नव्हती तर दुसऱ्या एका आमदाराला काहीजण खांद्यावर घेऊन आत्मस्तुती करणाऱ्या ‘नाद करायचा नाय’ गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे हे सगळं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ घडत होतं आणि यावरही कळस म्हणजे या स्थळाचं पावित्र भंग करणारी शिविगाळही इथं ऐकायला मिळाली.. हे सगळं संतापजनक आहे. किमान कुठं कसं वागायचं याचं तरी भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे..! #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #जयंती #चोंडी #महाराष्ट्राचा_अभिमान

लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी रात्री अभिवादन करण्यासाठी गेलो असता विरोधकांचं अत्यंत किळसवाणं आणि शरम वाटावी असं वर्तन बघायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीच्या नावाने स्वतःचाच उदोउदो करुन घेण्याची हौस भागवली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विराट कर्तृत्त्वाचे, उत्तुंग नेतृत्त्वाचे, समाजाप्रतीच्या निष्ठेचे गोडवे गाण्याऐवजी ‘रामभाऊ तुमचं काम एक नंबर’ अशी स्वतःचीच आरती गाणारी ओंगाळवाणी गाणी ऐकावी लागत होती… हे ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे की विरोधकांच्या वाढदिवसाची पार्टी आहे, असा प्रश्न पडला. तिथंच मिरवणुकीसारखं वातावरण दिसलं.. वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक असावी, पण ती मिरवणूक नव्हती तर दुसऱ्या एका आमदाराला काहीजण खांद्यावर घेऊन आत्मस्तुती करणाऱ्या ‘नाद करायचा नाय’ गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे हे सगळं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ घडत होतं आणि यावरही कळस म्हणजे या स्थळाचं पावित्र भंग करणारी शिविगाळही इथं ऐकायला मिळाली.. हे सगळं संतापजनक आहे. किमान कुठं कसं वागायचं याचं तरी भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे..! #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #जयंती #चोंडी #महाराष्ट्राचा_अभिमान

16,275 просмотров

सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही #दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं! #Maharashtra | #Election2024 |

सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही #दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं! #Maharashtra | #Election2024 |

266,622 просмотров

“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? #कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या

“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? #कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या

153,836 просмотров

suggestion for action दादा..! #AjitdadaPawar

suggestion for action दादा..! #AjitdadaPawar

54,248 просмотров

#राजीनामा_द्यावाच_लागेल! सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? #खोटं_बोल_पण_रेटून_बोल |#शेतकऱ्यांवर_अन्याय_नको | #विधिमंडळाचा_अपमान | #राजीनामा_द्या |

#राजीनामा_द्यावाच_लागेल! सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? #खोटं_बोल_पण_रेटून_बोल |#शेतकऱ्यांवर_अन्याय_नको | #विधिमंडळाचा_अपमान | #राजीनामा_द्या |

63,202 просмотров

#मारकडवाडीत पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने दडपशाही करून सरकारने चाचणी मतदान थांबवलं असलं तरी यातच गावकऱ्यांचा विजय आहे. दडपशाहीने हा लढा संपलेला नाही तर आमदार जानकर साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आतातर फक्त वात पेटलीय आणि पुढील काळात सगळीकडे जनतेकडूनच #EVM चा पर्दाफाश केला जाईल. आज ३५०-४०० उंबऱ्यांच्या मारकडवाडीत सरकारने SRPF च्या तुकड्यांसह २५०-३०० पोलीस तैनात करण्याची खरंच गरज होती का? चाचणी मतदान रोखण्याची गरज होती का? सत्य समोर येण्याची भीती सरकारला होती का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्याची उत्तरं सरकार आणि आयोगाला द्यावी लागणार.

#मारकडवाडीत पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने दडपशाही करून सरकारने चाचणी मतदान थांबवलं असलं तरी यातच गावकऱ्यांचा विजय आहे. दडपशाहीने हा लढा संपलेला नाही तर आमदार जानकर साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आतातर फक्त वात पेटलीय आणि पुढील काळात सगळीकडे जनतेकडूनच #EVM चा पर्दाफाश केला जाईल. आज ३५०-४०० उंबऱ्यांच्या मारकडवाडीत सरकारने SRPF च्या तुकड्यांसह २५०-३०० पोलीस तैनात करण्याची खरंच गरज होती का? चाचणी मतदान रोखण्याची गरज होती का? सत्य समोर येण्याची भीती सरकारला होती का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्याची उत्तरं सरकार आणि आयोगाला द्यावी लागणार.

54,300 просмотров

गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर आम्ही शंका घेतली असता अनेक लोक #VVPAT मशीन दाखवून तुम्ही हवे तेव्हा VVPAT चिठ्ठ्या तपासू शकता असे सांगतात, मात्र गुजरातमध्ये बनलेल्या या मशीनमध्ये चिठ्ठी फक्त दिसते खाली पडत नाही. म्हणजेच VVPAT मशीनसोबत देखील छेडछाड करण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रतील जनतेच्या मनातील अशा सर्व शंकांचे निरसन निवडणूक आयोगाकडून होणे गरजेचे आहे. Election Commission of India #MaharashtraElection2024

Sensitive content

गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर आम्ही शंका घेतली असता अनेक लोक #VVPAT मशीन दाखवून तुम्ही हवे तेव्हा VVPAT चिठ्ठ्या तपासू शकता असे सांगतात, मात्र गुजरातमध्ये बनलेल्या या मशीनमध्ये चिठ्ठी फक्त दिसते खाली पडत नाही. म्हणजेच VVPAT मशीनसोबत देखील छेडछाड करण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रतील जनतेच्या मनातील अशा सर्व शंकांचे निरसन निवडणूक आयोगाकडून होणे गरजेचे आहे. Election Commission of India #MaharashtraElection2024

52,835 просмотров

‘जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही,’ ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली.. या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करु शकत नाही. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पहात आहेत? उदया जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील. मुख्यमंत्री महोदय याकडं गांभीर्याने लक्ष द्या, ही विनंती! Devendra Fadnavis #Barshi #LawAndOrder #MaharashtraPolice

‘जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही,’ ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली.. या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करु शकत नाही. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पहात आहेत? उदया जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील. मुख्यमंत्री महोदय याकडं गांभीर्याने लक्ष द्या, ही विनंती! Devendra Fadnavis #Barshi #LawAndOrder #MaharashtraPolice

23,218 просмотров

भाजपचे तथाकथित #संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती! बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा! दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा. #गुंडांना_जामीन_नेत्यांना_जमीन_नेत्यांच्या_कुटुंबियांना_नगरपरिषदांचे_इनाम #भाजपची_बिनविरोध_कुटुंब_कल्याण_योजना In Jamner city, the so-called “Sankatmochak” of the BJP, Girish Mahajan, has allegedly used pressure tactics and misused his position to force candidates from the Vanchit Bahujan Aghadi and like-minded parties to withdraw their nomination forms. This exposes the true face of these so-called “unopposed” elections. Why this desperation for an unopposed victory? A corrupt system and a spineless Election Commission will, of course, remain silent—but isn’t our democracy gasping its final breaths? Common people must now seriously reflect on this situation. By demanding the resignation of a minister like Girish Mahajan who attempts to undermine democracy, Chief Minister Devendra Fadnavis should send a clear message that such tactics will not be tolerated. #BailForGoons_LandForLeaders_MunicipalJackpotsForLeadersFamilies #BJPs_Unopposed_Family_Welfare_Scheme Devendra Fadnavis Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi

भाजपचे तथाकथित #संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती! बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा! दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा. #गुंडांना_जामीन_नेत्यांना_जमीन_नेत्यांच्या_कुटुंबियांना_नगरपरिषदांचे_इनाम #भाजपची_बिनविरोध_कुटुंब_कल्याण_योजना In Jamner city, the so-called “Sankatmochak” of the BJP, Girish Mahajan, has allegedly used pressure tactics and misused his position to force candidates from the Vanchit Bahujan Aghadi and like-minded parties to withdraw their nomination forms. This exposes the true face of these so-called “unopposed” elections. Why this desperation for an unopposed victory? A corrupt system and a spineless Election Commission will, of course, remain silent—but isn’t our democracy gasping its final breaths? Common people must now seriously reflect on this situation. By demanding the resignation of a minister like Girish Mahajan who attempts to undermine democracy, Chief Minister Devendra Fadnavis should send a clear message that such tactics will not be tolerated. #BailForGoons_LandForLeaders_MunicipalJackpotsForLeadersFamilies #BJPs_Unopposed_Family_Welfare_Scheme Devendra Fadnavis Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi

14,521 просмотров

अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का? आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? एकतर चुका करायच्या आणि पुन्हा चुका दाखवून देणाऱ्यांवरच कारवाई करायची हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. सरकारने आणि #MPSC ने विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षेबाबत असलेल्या सर्व आक्षेपांवर योग्य निर्णय घ्यावा आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरीत सुटका करावी, ही विनंती! Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission

अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का? आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? एकतर चुका करायच्या आणि पुन्हा चुका दाखवून देणाऱ्यांवरच कारवाई करायची हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. सरकारने आणि #MPSC ने विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षेबाबत असलेल्या सर्व आक्षेपांवर योग्य निर्णय घ्यावा आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरीत सुटका करावी, ही विनंती! Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission

22,489 просмотров

"मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापुन काढू" हे शब्द कुण्या नक्षलवाद्याचे नाहीत तर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी जाहीर व्यासपीठावरून विरोधकांना दिलेली ही धमकी आहे. राजकीय विरोध असावा पण विरोधकांना थेट कापून टाकण्याची ही मानसिकता भाजप नेत्यांमध्ये येते कुठून? पाशवी सत्तेच्या बळावर विरोधकांना मारून टाकण्याची भाषा होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. सदा सर्वकाळ सार्वजनिक व्यासपीठावरून सज्जनतेचे धडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना विरोधकांचे एन्काऊंटर करायची परवानगी दिलीय का? मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या आमदारांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं अन्यथा मुख्यमंत्र्यांचाही आशिष देशमुखांच्या या भाषेला पाठिंबा आहे, असाच त्याचा अर्थ होईल..! Devendra Fadnavis

"मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापुन काढू" हे शब्द कुण्या नक्षलवाद्याचे नाहीत तर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी जाहीर व्यासपीठावरून विरोधकांना दिलेली ही धमकी आहे. राजकीय विरोध असावा पण विरोधकांना थेट कापून टाकण्याची ही मानसिकता भाजप नेत्यांमध्ये येते कुठून? पाशवी सत्तेच्या बळावर विरोधकांना मारून टाकण्याची भाषा होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. सदा सर्वकाळ सार्वजनिक व्यासपीठावरून सज्जनतेचे धडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना विरोधकांचे एन्काऊंटर करायची परवानगी दिलीय का? मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या आमदारांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं अन्यथा मुख्यमंत्र्यांचाही आशिष देशमुखांच्या या भाषेला पाठिंबा आहे, असाच त्याचा अर्थ होईल..! Devendra Fadnavis

10,576 просмотров

Videos

RRPSpeaks's profile picture

जळगाव जिल्ह्यातील रावेर भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उध्वस्त झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्याचा हा आक्रोश हृदय पिळून टाकणारा आहे. अवकाळी पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या कठीण समयी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. निवडणुकीची धामधूम असल्याने जळगावमधील दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नसेल त्यामुळे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतः त्या भागात पाहणी दौरा करावा, ही विनंती! राज्य सरकारने स्वतः किंवा केंद्र सरकारच्या मदतीने केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज देण्याबाबत विचार करायला हवा ! Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Dattatray Bharane #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग #केळी_उत्पादक_शेतकरी #गारपीट #पीक_नुकसान #सरसकट_कर्जमाफी

Rohit Pawar

12,676 просмотров • 4 дней назад

RRPSpeaks's profile picture

तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…! पण निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध..! #WestBengalLegislativeAssemblyelection2026

Rohit Pawar

54,199 просмотров • 1 месяц назад

RRPSpeaks's profile picture

लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी रात्री अभिवादन करण्यासाठी गेलो असता विरोधकांचं अत्यंत किळसवाणं आणि शरम वाटावी असं वर्तन बघायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीच्या नावाने स्वतःचाच उदोउदो करुन घेण्याची हौस भागवली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विराट कर्तृत्त्वाचे, उत्तुंग नेतृत्त्वाचे, समाजाप्रतीच्या निष्ठेचे गोडवे गाण्याऐवजी ‘रामभाऊ तुमचं काम एक नंबर’ अशी स्वतःचीच आरती गाणारी ओंगाळवाणी गाणी ऐकावी लागत होती… हे ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे की विरोधकांच्या वाढदिवसाची पार्टी आहे, असा प्रश्न पडला. तिथंच मिरवणुकीसारखं वातावरण दिसलं.. वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक असावी, पण ती मिरवणूक नव्हती तर दुसऱ्या एका आमदाराला काहीजण खांद्यावर घेऊन आत्मस्तुती करणाऱ्या ‘नाद करायचा नाय’ गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे हे सगळं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ घडत होतं आणि यावरही कळस म्हणजे या स्थळाचं पावित्र भंग करणारी शिविगाळही इथं ऐकायला मिळाली.. हे सगळं संतापजनक आहे. किमान कुठं कसं वागायचं याचं तरी भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे..! #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #जयंती #चोंडी #महाराष्ट्राचा_अभिमान

Rohit Pawar

16,275 просмотров • 10 дней назад

RRPSpeaks's profile picture

अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीची दोन-चार विमाने ग्राऊंड केली असली तरी बहुतांश विमाने अजूनही सुरूच आहेत. रोहित सिंगच्या लग्नात गाणारा, डान्स करणारा हनी सिंग VSR कंपनीच्याच विमानात बसून मुंबईत येत असल्याचा व्हिडिओ शूट करून पुन्हा महाराष्ट्र सरकारलाच हिणवत नाही का? “मेरी पहुंच बहोत ऊपर तक है, कोई मेरा कुछ नहीं उखाड सकता” अशी भाषा वापरणाऱ्या V. K. सिंग याची ही गुर्मी का उतरवली जात नाही? एक मराठी नेता, महाराष्ट्राचा लोकनेता गेला तरी सरकार आरोपी कंपनीवर कारवाई करण्यापेक्षा त्याच कंपनीचे विमान वापरण्यावर भर देत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव नाही का? Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar

Rohit Pawar

75,224 просмотров • 2 месяцев назад

RRPSpeaks's profile picture

हाच तो #VSR कंपनीचा मालक रोहित सिंग… आज तो जणूकाय राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झालाय आणि याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रीपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते… म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडूनच प्रयत्न होताना दिसतोय.. विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा त्याचा माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला हाच तो व्हिडिओ..! #DGCA ची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्यांच्याकडून यावर कारवाई होईल की नाही, याबाबत आमच्या मनात शंका आहे. पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सो..ड…णा….र….. नाही. #justice_for_AJIT_DADA

Rohit Pawar

54,118 просмотров • 3 месяцев назад