
Sujat Ambedkar
@Sujat_Ambedkar • 35,396 subscribers
Learning the science of politics, resistance & assertion with @VBAforIndia; interests-strategy, communication. Alumnus @RoyalHolloway, @ACJIndia, @FergussonPune
Shorts
Videos

Dear Supriya Sule taai, Reservations are not a ‘garibi hatao programme’ nor are they a charity. It is an affirmative action to correct historical discrimination and injustice. You asked the audience for a show of hands to give their opinion and seemed very relieved that most shared your views. But this is happening in a very fancy exclusively English speaking Adani-NDTV newsroom. Considering this as representative of the entire country is like giving voting rights to just the elite 10% Lastly, if you are so headstrong against caste based reservations why did your father, Sharad Pawar, start a Mandal Yatra to protect the OBC reservations?
Sujat Ambedkar85,783 Aufrufe • vor 9 Monaten

ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी ? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हाथ होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले? बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते. जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे 'केम छो वरली' म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते. जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असतांना यांना मराठी माणूस आठवला नाही. 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता? जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान!
Sujat Ambedkar28,103 Aufrufe • vor 2 Monaten

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे राज्यात दुखावटा असताना कोणत्याही सभा-कार्यक्रमात फटाके फोडणे किंवा फुले उधळणे हे योग्य नाही, आणि मी त्याचा स्वीकारही करणार नाही. फुले उधळणे व फटाके फोडणे हे आपल्या फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीशी सुसंगत नाही. यापुढे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे की, वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमात हारतुरे, फुलांची उधळण किंवा फटाके वापरले गेल्यास संबंधित सभा तात्काळ रद्द करण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून जर कुठेही हारतुरे, फुलांची उधळण किंवा फटाके वापरले गेले, तर त्या ठिकाणची सभा पक्षाच्या आदेशानुसार रद्द करण्यात येईल. #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
Sujat Ambedkar11,712 Aufrufe • vor 4 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar