Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

ओमराजे का हसत असतील...? त्यासाठी संपूर्ण व्हिडीओ बघा...😭🤣 #भैया_गायकवाड_पॅटर्न

22,273 просмотров • 1 месяц назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

निर्बुद्ध कलाकार बघा...नीट फुलफॉर्म माहित नाही तर आंदोलनात जाऊन अर्थ काय म्हणे! मग जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो,त्यासाठी आंदोलन करणारे सगळे शेतकरी असतात का? बलात्कार पीडितेसाठी आवाज उठवणाऱ्यानवर बलात्कार झालेले असतात का? दुसऱ्याच्या व्यथा, वेदना ,अन्याय बघून तुम्हाला वाटल त्यांच्यासाठी आवाज उठवावा तर त्यात गैर काय? हा माणुसधर्म आहे ना! एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ संत तुकारामांची शिकवण आहे ना! तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी,शेतकऱ्यांसाठी किंवा अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवायचा नाही तर उठवू नका...दुसऱ्यांना कशाला अक्कल शिकवता? यांनी पाकातली नाटक करावी, सरकारची हाजी हाजी करावी, जे उत्तम जमते ते करावे.

Rashmi Puranik

130,564 просмотров • 12 дней назад

हे २३ एप्रिल २०१३ चं भाषण. जी तळमळ विरोधी बाकांवर बसताना असते तीच तळमळ सत्तेत आल्यावर कुठे जाते? मणिपूरमधील महिलांवर अत्याचार होतात आणि ज्या केंद्र सरकारकडे माहिती मिळविण्याची सर्व संसाधनं असतात तरीही त्यांना ६०-६५ दिवसांनंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटते हे किती खेदजनक आहे. अशा घटना घडत आहेत हे केंद्र सरकारला माहित नव्हतं ? त्यावर केंद्र सरकारने काय उपाय योजना केल्या ? मणिपूर अजून शांत का होत नाही ? हा निष्काळजीपणा देशाच्या विभाजनकारी विचारांना खतपाणी घालणारा नाही का? एकीकडे भारतमातेचा जयजयकार करायचा आणि दुसरीकडे भारतीय महिलेवर अनन्वित अत्याचार होत असताना भारतीयांनी निमूठपणे सहन करायचे का ? हि एक घटना समोर आली अशा किती घटना होत असतील? देशाचा इतका ज्वलंत प्रश्न जर भारत सरकारतर्फे सुटत नसेल तर सर्वपक्षीय किंवा अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना का ऐकल्या जात नाहीत? प्रश्न अनेक आहेत पण उत्तरं का मिळत नाहीत? #मणिपुर #ManipurViolence #ManipurCrisis

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

60,901 просмотров • 3 лет назад

काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे. आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !

Raj Thackeray

41,981 просмотров • 5 месяцев назад