Loading video...

Video Failed to Load

Go Home

कधी काळी हातावर टॅटू काढला, आज तर गडी राजीनाम्यावर आला..

20,586 views • 18 days ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

मा. Pratap Baburao Sarnaik दादा, तुम्ही तसे पुर्वाश्रमीचे डोंबिवलीकर ! आज तुम्ही ठाणेकर झाला असलात तरी मला खात्री आहे की आपल्या डोंबिवलीकरांप्रती तुमचे जुने प्रेम आजही तसेच आहे. कधी काळी डोंबिवलीत रिक्षा चालवून व हलाकीचे दिवस सोसून आज आपण स्वकतृत्वाने कष्ट करून मोठे झालात,परिवहन मंत्री पण झालात याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आपल्या डोंबिवली व कल्याणचे परिवहन व्यवस्थापन व नियोजन अत्यंत ‘थर्ड क्लास’ आहे.इथल्या राजकीय ‘भाई-दादा’ यांच्या रिक्षा युनियनचे सदस्य असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी तर एवढी वाढली आहे की विचारून सोय नाही.तरी कृपया तुम्ही एकदा कल्याण-डोंबिवलीत येऊन इथल्या वाहतूक व परिवहन व्यवस्थेची तुमच्या पद्धतीने झाडाझडती घ्यावी ही विनंती.

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

14,030 views • 4 months ago

संघर्षाने थकली नाही, संकटांसमोर झुकली नाही, लोकसेवा तुझी कधी रुकली नाही! खरच बाबांच्या आदर्शांप्रमाणे तू कधी थकली नाही, कधी रुकली नाही आणि कोणासमोर झुकली नाही. संघर्षाचा त्रागा नाही आणि विजयचा उन्माद नाही. समाजातल्या नकारत्मकतेला सात्विकतेने दूर करण्याचा प्रयत्न करणारी तू, लोकनेत्याची संघर्षकन्या ते महाराष्ट्राची वाघीण पर्यंत सर्व बिरुद पेललीस पण मला वाटतं सगळ्यांत योग्य शीर्षक “ताईसाहेब” हे आहे कारण सर्व जाती धर्म पंथांच्या मर्यादा ओलांडून हे पद महाराष्ट्रातल्या Mass नी दिलं आणि class ला देखील ते मान्य झालं! आज तुझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एवढच म्हणेल शतायुषी तर होच पण त्याच सोबत तुझ्या माध्यमातून आज जेवढ्या वंचितांच ; उपेक्षितांच भलं होत आहे त्यापेक्षा ते शत नाही तर सहस्त्र पटीने जास्त करण्याची शक्ती आणि बळ परमेश्वर तुला देवो. Wish you a very happy birthday Maa😘🥳

Dr. Pritam Munde

20,689 views • 2 years ago

गोड बोलून केसाने गळा कापणारे “देवेंद्र फडणवीस” किती सहज बोलताहेत मी माझ्या विरोधकांना माफ केलं. माननीय देवेंद्र फडणवीस आज जो काही राजकारणाचा चिखल झालाय तो मागच्या दहा वर्षात झालाय हे आपण विसरताय. सोशल मिडीयावर तुम्हाला ट्रोल केलं यांचे विक्टिम कार्ड खेळताय तर तुमच्या माहितीसाठी सांगतो जी “टीम देवेंद्र” सोशल मिडीयावर नंगानाच करतेय ती कोणाच्या वरदहस्ताने करतेय सांगाल का? आम्ही तर मागच्या दोन वर्षात सोशल मिडीयावर वर ट्रोलिंग सुरू केली. पण मागच्या १२-१५ वर्षांपासून जी भाजप आयटी सेल विरोधी नेत्यांचे विकृतीकरण करत आहे त्यावर तर तुमच्या कधी भावना दुखावल्या गेल्या नाहीत. आज जेव्हा तुमची ट्रेनिंग सुरू झाली तर तुम्हाला विरोधक आणि ट्रोलर दिसायला लागले. खूप जास्त साळसुदपणाचा आव आणला म्हणजे माणूस खूप चांगला होतो असं बिलकुल नाही. मागच्या दहा वर्षात तुम्ही काय थराचे घाणेरडे राजकारण खेळताय ते जाणून आहोत आम्ही. आम्ही शांत तेव्हाच बसू जेव्हा तुमची आयटीसेल शांत बसेल तसं जर होणार नसेल तर मागच्यापेक्षा जास्त ट्रोलिंग केली जाईल.

गजाभाऊ

70,010 views • 1 year ago

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून दोषींवर कारवाई कधी पासून होऊ लागली आहे ??? सगळे भामटे तर मोकाट आहेत … त्या दिवशी तो अरिहंत बिल्डर महिलांच्या अंगावर गाडी टाकतो तरी गुन्हा दाखल नाही … खासदार संजय दिना पाटील उघडपणे ५ खून केले बोलतायत काय कारवाई झाली ??? राजकारण थोडं बाजूला ठेऊ … उबाठाचे लोक जे काही आता टिका करु लागले आहेत , त्यांच्याकडे दिना पाटील असते ते तर योद्धे झाले असते … पत्रकारांना बोलताना तुम्हाला खाऊ जेवू घालतो असं संजय दिना पाटील म्हणतायत, म्हणजे समोर जो पत्रकार होता तो लाचारासारखा त्यांच्यासमोर अनेकदा हात पसरत असेल … एखादा नेता एवढ्या टोकाचं बोलतो तेव्हा थेट जाब विचारता पत्रकाराला आला असता … अनेकदा पत्रकार देखील आपली मर्यादा सोडतात म्हणून हा अपमान त्यांना सहन करावा लागतो … बाकी खासदार संजय दिना पाटलांना कसलंच भय नाही .. कारण आपला कायदाच तेवढा तकलादू आहे … एवढचं काय तर इकडे दोषी बाहेर असतात आणि पीडितांना जेलमध्ये टाकलं जातं… त्यामुळे गृहमंत्र्यांबद्दल तर न बोललेलं बरं … !!! #संजयदिनापाटील #खासदार #शिवसेना

Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)

37,045 views • 2 months ago

महाराष्ट्रात कुठल्याही आकाराचा उद्योग असू दे छोटा, मोठा किंवा अतिमोठा त्यात ८०% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळालाच पाहिजे असा कायदा महाराष्ट्र सरकारने २००८ लाच काढला आहे. अर्थात हा कायदा तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूमिपुत्रांसाठी जे तीव्र आंदोलन केलं होतं त्या आंदोलनांच्या नंतर जनमताचा रेटा पाहून केला होता. पण पुढे नेहमीप्रमाणे जा कायदा कागदावरच राहिला आहे आणि मराठी मुला-मुलींना नोकरीच्या संधी नाकारल्या जात आहेत. त्यामुळे आपण मराठी मुलामुलींच्या बेरोजगारीबद्दल जर खरंच चिंतेत असाल तर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सरकार कधी करणार ? इतकी वर्ष याची अंमलबजावणी का नाही झाली ? CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Uday Samant या विषयवार तात्काळ कार्यवाहीसाठी आपला आराखडा महाराष्ट्राला कळेल का ? #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,337 views • 1 year ago

आज मान. राहुलजी गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारताना आपसूकच पादत्राणे बाजूला काढतानाचं चित्र माझ्यासह तमाम शिवशंभु भक्तांना अनामिक समाधान देणारं आहे. एक कलाकार व शिवशंभू भक्त या दोन्ही भूमिका निभावताना माझ्याकडूनही वैयक्तिक व सामाजिक जीवनात काही पथ्ये आपसूकच पाळली गेली आहेत. छत्रपतींची प्रतिमा स्वीकारताना पादत्राणे काढून वंदन करणे, छत्रपतींचा पेहराव नसताना जिरेटोप न घालणे, पेहराव नसताना महाराजांचे संवाद न म्हणणे, जिरेटोप व कवड्यांची माळ घालताना नतमस्तक होणे... या गोष्टी कुणी सांगितल्या नाहीत किंवा मीही कधी आवर्जून ठरवलं नाही.. हे सगळं आपसुकच घडलं. आज मान. राहुलजी गांधी Rahul Gandhi यांची कृती पाहून 'मनात खरी श्रद्धा असेल तर काही कृती आपल्याकडून आपसूकच घडतात' ही भावना दृढ झाली.

Dr.Amol Kolhe

62,625 views • 1 year ago

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासातील अत्यंत काळा दिवस आज आपण अनुभवत आहोत. चांदा ते बांदा, शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी आपल्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले. “दादा… यावेळी वेळ चुकली…” असे शब्द ओठांवर येऊनही ते स्वीकारायला मन तयार होत नाही. अजितदादा सत्तेत असताना मी विरोधी पक्षात काम केले, मी सत्ताधारी पक्षात असताना काही काळ अजितदादा विरोधी पक्षात राहिले, तर अनेक वर्षे आम्ही दोघांनी एकत्र सत्तेतही काम केले. या संपूर्ण वाटचालीत जनतेचे हित हेच अजितदादांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचे केंद्रस्थान राहिले. कोणताही निर्णय घेताना महाराष्ट्रातील सामान्य माणसाला त्याचा कसा लाभ होईल, याची ते नेहमीच काटेकोर काळजी घेत. कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही अनेक विषयांवर दीर्घ आणि कधी कधी तीव्र चर्चा केल्या. या चर्चांमधून “कर्तव्यकठोर” या प्रतिमेच्या आड दडलेले अजितदादांचे हळवे, आपुलकीचे व्यक्तिमत्त्व मी जवळून अनुभवले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची सततची धावपळ सुरूच असायची… आणि आज ती धावपळ कायमची थांबली आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. माझे मित्र, राजकारणातील रांगडे पण तितकेच प्रामाणिक व्यक्तिमत्त्व अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज केवळ एक नेता नाही, तर माझा दमदार, दिलदार मित्र आणि एक खंबीर साथीदार हरपला आहे. “काम करणारा माणूस” ही प्रतिमा कुणी दिलेली नव्हे, ती दादांनी त्यांच्या कृतीतून स्वतः निर्माण केली होती. राजकारणापलीकडे संबंध जपणारा, स्पष्टवक्तेपणा, बोलण्यातली मिश्कीली आणि राजकारणातील अस्सल “नमुना” आज आपण गमावला आहे. काल कॅबिनेटमध्ये आमच्यासोबत असलेले दादा आज आपल्यात नाहीत… यापुढे ते समोर दिसणार नाहीत, बोलणार नाहीत, खांद्याला खांदा लावून उभे राहणार नाहीत… हे वास्तव स्वीकारायला मन तयार होत नाही. “कामाचा माणूस” म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणारे अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या कार्यातून, निर्णयांतून आणि असंख्य आठवणींतून ते सदैव आपल्या मनात चिरायू राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली! #AjitPawar #Ajitdada #अजितपवार

Girish Mahajan

11,597 views • 7 months ago