Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

कावळा राहिला चुकून जरी तरी खोपा सुगरणीचा असतो #महाराष्ट्र #राजकारण

31,083 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

कुठे पांढऱ्या पट्टया मारून, कुठे मैदानांवर झोपून हा महाराष्ट्र बळकवू पाहणारे आत्ता “जो उखाडना है उखाडो म्हणत” थेट रस्ता चोरत भूमिपुत्रांना त्यांच्या घरातूनचं हकलून लावतायत! त्यांनी एकच लक्षात ठेवावं मिरा-भाईंदर आगरी कोळ्यांचं-मराठी माणसाच, नाही कुणाच्या बापाचं! देवा भाऊ, जरा जरी मराठी माणसाबद्दल प्रेम तुमच्या मनात असेल तर ह्या व्हिडिओतील बिल्डरचा माज बघा आणि आत्तातरी सततचे मराठी माणसावरचे अन्याय थांबवा! बाकी ह्याची किंमत आम्हाला राजकारण सोडून मोजावी लागली तरी चालेल मात्र महाराष्ट्रात मराठी माणसावरचा अन्याय खपवून घेणार नाही! 🆘 विनंती- व्हिडिओ मोठा आहे परंतू त्यातील मराठी माणसाचा संघर्ष त्याहून मोठा आहे जो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, त्यांना टॅग करा! #मराठी #मराठीमाणूस #MiraBhayandar #आगरी #कोळी #maharashtra #SPR

Siddhesh Prakash Rane

12,203 görüntüleme • 2 ay önce

मुख्यमंत्री महोदयांनी निर्वाणीचा इशारा दिला तरी राज्याच्या मंत्र्यांची वादग्रस्त विधाने थांबत नाहीत आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणतायत की - 'सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय' शासनाचा पैसा हा जनतेचा पैसा असतो. सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातून तो सरकारी तिजोरीत जमा होतो. या देशातील प्रत्येक नागरीकाचा त्या पैशावर अधिकार आहे. कोणतेही शासन व राज्यकर्ते त्या पैशाचे मालक नाही तर पाच वर्षांसाठी जनतेने निवडून दिलेले विश्वस्त असतात. या विश्वस्तांनी हा पैसा जपून, काटकसरीने केवळ जनतेच्या हितासाठी वापरायचा असतो, यांचे भान मंत्रीमहोदयांना असायला हवे. पण आता त्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री महोदय त्यांच्यावर कोणती कारवाई करतील? एकंदर मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्र्यांवर वचक राहिला नाही असे म्हणावे लागेल. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Supriya Sule

22,777 görüntüleme • 1 yıl önce

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा जेंव्हा मंगल कलश मुंबईत आणला गेला, तेंव्हा शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजातील, कवी राजा बढे यांच्या लेखणीतून अवतरलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे महाराष्ट्र गीत... जगाच्या कोपऱ्यात मराठी मनांवर रोमांच उठवणारं हे गीत. 'भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा' असं म्हणत दिल्लीच्या तख्तावर मराठी मनगटांनी गाजवलेली हुकूमत आठवून देणारं हे महाराष्ट्र गीत. इतर दहीहंडीच्या सणांमध्ये अश्लील हावभाव, नृत्य करण्याची परंपरा पडलेली असताना, ठाण्यात मात्र पक्षाचे नेते श्री. अविनाश जाधव, आमदार श्री. राजू पाटील यांनी जमलेल्या गर्दीसोबत महाराष्ट्र गीत म्हणलं. 'दरीदरीतून नाद गुंजला, जय महाराष्ट्र माझा' याचा अनुभव काल तिथे जमलेल्या गर्दीला आला. हा अनुभव जरी प्रत्यक्ष नाही तरी चित्रफितीतून अनुभवण्यासाठी, ही चित्रफीत नक्की पहा. #MNSAdhikrut #दहीहंडी

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

28,268 görüntüleme • 1 yıl önce

"भाषा बोलणे, ऐकणे, समजणे इतपर्यंत मर्यादित नाही. भाषा तुमची ओळख आहे, संस्कृती आणि इतिहासाशी त्याच नातं असतं. जगाशी संपर्क ठेवण्यासाठी इंग्रजी येणं जरी आवश्यक असलं तरी स्वतःची ओळख आणि पाळंमुळं घट्ट फक्त मातृभाषाच ठेवू शकते." २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरमराठी पुस्तक प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्या प्रदर्शनाच्या उदघाट्न सोहळ्याच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पटकथा लेखक श्री. जावेद अख्तर यांनी मातृभाषा का जपली पाहिजे, वृद्धिंगत केली पाहिजे हे विशद करणारं एक अप्रतिम भाषण केलं. #अभिजात_पुस्तक_प्रदर्शन२०२५

Raj Thackeray

83,265 görüntüleme • 1 yıl önce

पुणे जिल्ह्यातील देवाची उरुळी येथील हे गरीब कुटुंब आपल्या मुली साठी विनविण्या करत आहे. ... मुलगी अगदी 13 वर्ष्याची आहे. ..24 दिवस झालेत पोलीस केवळ तपास चालू आहे. ..एवढच सांगत आहेत, असही कुटुंब सांगत आहे. .!! सोबत ते त्यांना कोणाकडून माहिती मिळाली हे पण सांगत आहेत. ..!! पहिली गोष्ट जरी मुलगी 18 वर्ष वयाच्या पुढे असती तरी एकदा कुटुंबाची तक्रार आली म्हणल्यावर. ..योग्य तपास करून मुलगी कुटुंबियासामोर आणणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. .. इथे तर मुलगी अगदीच 13 वर्ष्याची आहे. ..तेव्हा तिच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय, गरीब कुटुंब हतबल आहे. ..दिवसा मागून दिवस जात आहेत. .. तेव्हा प्रशासनाने आता तरी तात्काळ सदरील प्रकरणात तपास करून. ..मुलगी आई वडीला कडे पोहचवावी. ..पुणे शहर पोलीस punecommissioner महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Amita Chate

26,222 görüntüleme • 9 ay önce

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावात शाळकरी मुलींनी छत्रीचा माईक करून रस्त्याच्या दुरावस्थेचे रिपोर्टिंग केले आणि त्यांच्या रिपोर्टिंगला यश आले! या विद्यार्थिनींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, दुसरीकडे प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या व्यवस्थेत किमान रस्त्यांसाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतोय. सोबतच या विद्यार्थिनींनी त्यांनाही चपराक मारलेली आहे जे नेहमी म्हणत असतात "आपल्याला राजकारणाशी काय घेण देणं आहे?" राजकारण हे आपलं क्षेत्र नाही. राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कितीही तुच्छ असला तरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशीच निगडीत आहे. या विद्यार्थिनींना भले राजकारण माहीत नसेल पण आपल्या भागात रस्ता खराब आहे आणि याला प्रशासन जबाबदार आहे आणि त्यासाठी प्रशासनाला जाब विचारायचा असतो हे मात्र या विद्यार्थिनींना कळले आणि तेच आवश्यक आहे. पैसे घेऊन सरकारच्या चुका झाकणाऱ्या आयटी सेलच्या टोणग्यांपेक्षा हे विद्यार्थी अधिक प्रगल्भ आहेत. #रायगड

राष्ट्रभाषा | National Language

16,227 görüntüleme • 4 gün önce

मराठ्याशी वाकड मग नदीवर लाकड ... भावपुर्ण श्रद्धांजली भाजप 💐🙏. हा महाराष्ट्र आमचा आहे, महारष्ट्र द्रोहीचा चा नाही.... भामटा बाबा तूच राहिला होतास आता करून घे प्रयत्न जितके मराठ्यांना डीचविणा रतितकाच मराठा पेटून उठणार #सुपडासाफच जरांगे पाटील तुमचा काळ आहे ... तुमचा या जन्मी तरी मुख्यमंत्री होणार नाही. मराठयांना हिंदुत्व तुम्ही शिकवण म्हणजे साक्षात अट्टल दरोडेखोरांनी पोलीसांना कायदा शिकवण्या सारख आहे 🤭🤫 लढंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩 जय जिजाऊ, जय शिवराय! 🚩 Like comnt repost ✅✅ 🙏🏻 #संघर्ष_जारी_रहेगा 💪🏻 #मराठा_आरक्षण Mission #सुपडासाफ सुरू आहे एक मराठा कोटी मराठा🚩🚩 जरांगे फॅक्टर 2.O💪🏻💪🏻 #मतदान_करताना_हे_विसरू_नका #विधानसभा_निवडणूक_२०२४ #मनोज_जरांगे_पाटील #Maratha #मराठायोद्धा #मराठा_विरोधी_महायुतीसरकार #मराठा #MarathaVirodhiMVA #विधानसभा_निवडणूक_२०२४ #निवडणूक२०२४ #MarathaReservation #devabhau #Team_Devendra

मराठा Empire🚩

29,297 görüntüleme • 1 yıl önce

ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी ? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हाथ होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले? बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते. जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे 'केम छो वरली' म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते. जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असतांना यांना मराठी माणूस आठवला नाही. 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता? जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान!

Sujat Ambedkar

28,236 görüntüleme • 4 ay önce

आजच्या दिवसात कितीदा तरी पाहिला असेल हा व्हिडिओ.. वर्षा देशपांडे जेव्हा इंग्रजीत बोलतात - " मला इंग्रजी येतं पण मी माझ्या मातृभाषेत बोलू इच्छिते..तेव्हा मागच्या महिलेच्या चेहऱ्यावर हसू उमटतं..तो क्षण निव्वळ सुंदर आहे..❤️‍🔥 " शेवटी मातृभाषा..आईची भाषा आहे हो..मग ती कोणतीही असो..जगात सर्वांना तिचा अभिमान ठेवणे भारी वाटतेच..❤️‍🔥 पण..दुःख याचे आहे , महाराष्ट्र हा जगाच्या पाठीवर असा कदाचित एकुलता एक भाग असेल जिथे राजकारण आणि धर्मापायी लोक आपल्या आईच्या भाषेची अवहेलना करून दुसऱ्याच्या आईच्या भाषेचा उदो उदो करतात..😑 अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांना पुन्हा सांगतो..आमचा कोणत्या भाषेला विरोध नाही..पण त्यासोबत होणाऱ्या वसाहतवादाला..आमच्या भाषेच्या अपमानाला विरोध आहे..आमची भाषा मारून परकी भाषा मोठं करण्याच्या कारस्थानाला तर कडाडून विरोध आहे..😑 #महाराष्ट्रात_मराठीच

Ajay

15,908 görüntüleme • 1 yıl önce

आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स्टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही चूक नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच. १) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या काही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. २) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत. ३) राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्याला राजकारण म्हणलं असतं तर कोणी ? ४) २००५ ला मुंबईत प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ? ५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.

Raj Thackeray

74,921 görüntüleme • 1 ay önce

तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालं आहे, तरीही सरकार निवड याद्या लाऊन नियुक्त्या देणार आहे. तर आता ही तलाठी भरती रद्द होऊ शकते का? याचंच उत्तर महाराष्ट्र आपचे नेते धनंजय जी शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमांतून दिलं आहे. @Dhananjay_AAP सरकारकडून भ्रष्ट तलाठी भरती रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवड याद्या लावल्याने उमेदवार नाउमेद झाले आहेत की आत्ता ही तलाठी भरती रद्दच होऊ शकणार नाही, त्या सर्वाँना आज आम्ही सांगू इच्छितो निवड याद्या लागल्यानंतरच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने २०२१ ची आरोग्य भरती रद्द करून दाखविली होती. तसेच जर महसूल विभागाने तलाठ्यांना नियुक्त्या जरी दिल्या पण नंतर न्यायालयामार्फत, नवीन राज्य सरकारमार्फत याची SIT चौकशी होऊन घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाल्यास ही पदभरती काहीही रद्द होऊ शकते. नियुक्ती दिल्यानंतरही पदभरती रद्द झाल्याचे उदाहरणे अनेक राज्यात आहेत. त्यामुळे सरकारने तलाठी भरती रेटून नेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी न्यायालयामार्फत आणि संविधनिक मार्गाने आंदोलने करून ही भरती रद्द करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. Radhakrishna Vikhe Patil Revenue Department, Government of Maharashtra Devendra Fadnavis Vijay Wadettiwar Rohit Pawar Sanjay Raut Dr.Jitendra Awhad Nana Patole Ambadas Danve Kailas Patil Raju Shetti Prakash Ambedkar

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

12,424 görüntüleme • 2 yıl önce

सिंगापूरातील सुजाण नागरिक आणि वाहतूक व्यवस्था. मागच्या काही दिवसांखाली सिंगापूरला गेलेलो, सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टवर आम्ही उतरलो आणि उतरल्या क्षणीच हे एअरपोर्ट जगातील सर्वोत्कृष्ट का मानले जाते, याचा अनुभव आला. उतरल्यानंतर आम्हाला आमचे सिंगापूरमधील मित्र भेटले. त्यांनी आमच्यासाठी आधीच काही कार्ड्स घेतली होती – बस-रेल्वेचं कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी. तिथे MRT म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी एकच कार्ड असतं. ते कार्ड टॅप करूनच तुम्हाला मेट्रो किंवा बसमध्ये प्रवेश मिळतो. आम्ही सिंगापूरमध्ये पहिल्यांदाच मेट्रोने प्रवास केला आणि मित्राच्या घरी पोहोचलो. सिंगापूरची वाहतूक व्यवस्था माझ्यासारख्या भारतीयासाठी अचंबित करणारी होती. संपूर्ण देश तुम्ही फक्त बस आणि मेट्रोने फिरू शकता, इतकं सुसज्ज आणि नीटनेटकं वाहतुकीचं जाळं तिथं पसरलेलं आहे. बसमध्ये बसताना तुम्हाला कुठे जायचं आहे ते गुगल मॅपवर टाका, मग मॅपवर तुम्हाला योग्य बस क्रमांक आणि वेळ कळते. बस स्टॉपवर डिजिटल बोर्ड असतात, ज्यावर वेळेप्रमाणे कोणती बस कधी येईल हे दाखवलं जातं आणि ती अगदी वेळेतच येते! उदा. 10:01 ला बस येणार आहे, तर ती 10:01 ला नक्कीच येईल. बसमध्ये चढताना समोरच्या दरवाजाने चढायचं आणि मागच्या दरवाजाने उतरायचं. चढताना कार्ड टॅप करायचं, उतरताना पुन्हा टॅप करायचं. जर तुम्ही टॅप करायचं विसरलात, तर जिथे $1 लागला असता तिथे $4–5 दंड होतो. एकदा चुकून टॅप करायचं विसरलेलं तरी फाईन लागतो. बसमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, जरी बस माणसांनी भरलेली असली तरी कोणी कोणाशी मोठ्याने बोलत नाही. सगळीकडे शांतता असते. आपल्याकडे बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये लोक मोठ्याने बोलतात, पण इथे अगदी गर्दी असली तरी लोक शांत असतात आणि एकमेकांमध्ये अंतर ठेवतात. मेट्रोमध्येही हेच शिस्तीचं चित्र दिसतं. मेट्रो किंवा बसमध्ये चढताना, रस्ता ओलांडताना लोक रांगेत उभे राहतात. एस्कलेटरवर डाव्या बाजूला लोक उभं राहतात आणि उजवी बाजू घाई असलेल्यांसाठी मोकळी ठेवतात. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातात, रस्त्यावर सायकल कोणी चालवत असेल तर त्याला प्राधान्य दिले जाते, तुम्हाला रस्ते प्रचंड स्वच्छ दिसतील. इतकं शिस्तबद्ध वागणं पाहून एक भारतीय म्हणून मी थक्क झालो. रस्त्यांवरून बस जाताना कुठेही भाऊ, दादा, साहेबांचे बॅनर, पोस्टर्स दिसले नाहीत. कुठल्याही चौकात “संकल्पना – अमुक तमुक” असं काही नाही. आपल्याकडे एखाद्या चौकात चित्र रंगवलं किंवा फुलपाखरू उभारलं की त्यावर ‘संकल्पना – अमुक तमुक’ लिहिलेलं असतं, जणू काही त्यानेच त्याचा शोध लावला! सिंगापूर हा पूर्णपणे मानवनिर्मित देश आहे, पण तिथं एकाही राजकारणी व्यक्तीचा फोटो दिसला नाही, अगदी पंतप्रधानांचाही नाही ! आपल्याकडे शौचालयालाही ‘अमुक तमुक यांच्या निधीतून’ असं लिहिलेलं असतं. सिंगापूरमध्ये शौचालय व्यवस्था अतिशय दर्जेदार आहे. अगदी शेवटच्या टोकाला गेलात तरी सरकारी टॉयलेट्स पाचतारांकित हॉटेलसारखी स्वच्छ आणि आधुनिक असतात. मागे मी महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो होतो, तिथं जिल्हा ठिकाणीही शौचालय व्यवस्था धड नव्हती! कोणी म्हणेल सिंगापूर छोटा देश आहे, लोकसंख्या कमी आहे म्हणून त्यांची प्रगती झाली पण मग आपण एवढ्या मोठ्या भारतात एकही सर्वसुविधायुक्त शहर तयार का करू शकलो नाही ? इथली माध्यमं आपल्याला ‘विश्वगुरू’ म्हणतात, पण परदेशात गेल्यावर आपण कुठं आहोत याची खरी जाणीव होते. खरं तर हे लिहायचं नव्हतं, पण तिथं पाहून बोलावंसं वाटलं. अजून खूप काही सिंगापूरमध्ये अनुभवायला मिळालं आहे… हळूहळू सगळं लिहीनच.

Vaibhav Kokat

22,124 görüntüleme • 1 yıl önce

कालच्या माझ्या भाषणानंतर जे काही मला फोन आले; त्यातील ९९% फोन हे माझे समर्थन करणारे होते. पण, महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती किती प्रबळपणे उभारल्या गेल्यात हे प्रत्येक फोनमधून ध्वनित होत होते. यातील एक वाक्य मला खूपच खटकले, "साहेब, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात." मी माझ्या भाषणातच सांगितले होते की, ' मी वंजारी आहे. मी वाल्मिक कराडच्या विरोधात बोलतोय. तो पण वंजारीच आहे.' यामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आहे. जिथे अन्याय- अत्याचार होतो; त्याविरोधात उभे ठाकलेच पाहिजे.अन्याय करणाऱ्याला जात नसते आणि ज्याच्यावर अन्याय होतो, त्यालाही जात नसते आणि अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यानेही जात तपासू नये. मी भुसावळच्या प्रकरणात मणियार चाचाची बाजू घेतली. तेव्हा अनेकांनी माझे कौतूक केले आणि अनेकांनी माझ्यावर टीकाही केली. पण त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली की, जर मणियार चाचाच्या जागी माझा बाप असता तर मी काय केले असते किंवा तुम्ही काय केले असते? तिथे धर्म आड आला. अनेकवेळा मी दीन-दलित, शोषित- पीडितांची बाजू घेत असतो. तेव्हाही जातीपातीचे राजकारण आड येत असते. वर्षानुवर्ष ज्या समाजावर अन्याय होत असतो; त्या समाजासाठी आपण बोललेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही भूमिका शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतूनच येते. शोषक हा वेगळा आणि शोषित हा वेगळा समाज आहे. आपण कुठल्याही समाजाचे असू पण शोषितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हेच महाराष्ट्राची माती कायम शिकवत आली आहे अन् ही शिकवण मी तरी कधी विसरणार नाही. मी जे काल बोलायला विसरलो ते खाली लिहितोय... * वाल्मिक कराड चप्पल का घालत नाही? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राने जरूर विचारावे. * २०० च्या वर एफआयआर नोंदवणारा वाल्मिक कराड हा एफआयआर नोंदवायला पोलीस स्टेशनला किती वाजता जातो की पोलीस त्याच्या घरी येऊन सह्या घेतात? याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. * प्राजक्ता धस या भगिनीवर अन्याय होतो. न्याय मिळविण्यासाठी त्या वेगवेगळे दरवाजे ठोठावतात.आजही त्या प्राजक्ता धस यांना न्याय मिळत नाही. त्यांना न्याय कोण देणार? आणखी खूप प्रश्न आहेत. बीडमधील खुनांची मालिका ही एखाद्या सिरियल किलरने केलेल्या खुनांप्रमाणे आहे. एखाद्या पुस्तकात जे आपण वाचले असते की, एकाने ४० खून केले; ५० खून केले, नंतर ते उघडकीस आले. असाच एक सिरियल किलर आपणाला ठेचायचा आहे अन् त्या सिरियल किलरचे नाव आहे, वाल्मिक कराड!

Dr.Jitendra Awhad

101,417 görüntüleme • 1 yıl önce

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार श्री. राजू पाटील यांच्या प्रचारार्थ मी आज शुभारंभाची सभा घेतली. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे- १) आज आमचे आमदार श्री. राजू पाटील यांच्या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. आज व्यासपीठावर आमचे उल्हास भोईर, भगवान भालेराव आणि संगीताताई चेंदवणकर उपस्थित आहेत. संगीताताईनी बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यामुळे ती भयानक घटना महाराष्ट्राच्या समोर आली, आख्ख प्रशासन हललं. त्यांनी जे काम केलं त्याची शाबासकी म्हणून त्यांना मी विधानसभेची उमेदवारी दिली. २) मी तुमच्याकडून हमी घ्यायला आलोय की जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही विजयी कराल. हे सगळं कशासाठी तर महाराष्ट्राची आज जी अवस्था आहे ती बदलण्यासाठी. २०१९ ला युतीत कोण होतं, आघडीत कोण होतं आता युतीत कोण आहे आघाडीत कोण आहे काहीच कळत नाहीये. गेल्या ५ वर्षात जे घडलं त्याची मतदारांनी उजळणी केली पाहिजे. कोणी कुठेही गेलं, पण आमचा राजू विधानसभेत एकटा होता, आणि मला राजुचा अभिमान आहे की माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. ३) २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजप यांच्यासमोर कोण तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मग निकाल लागले, मग सकाळी एक शपथविधी झाला, ते लग्न १५ मिनिटांत तुटलं, कारण काकांनी डोळे वटारले मग हे आले घरी काका मला माफ करा म्हणत. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोरबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. कारण काय तर अमित शाह यांनी मला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. तुमच्यासमोर जर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मग तेंव्हाच का नाही आक्षेप घेतलात ? २०१९ चा निकाल लागेपर्यंत गप्प बसले आणि जेंव्हा लक्षात आलं की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही तेंव्हा यांनी अडीच वर्षांचा मुद्दा बाहेर काढला. ४) उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यावर त्यांनी सन्माननीय बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट करणं बंद केलं. होर्डिंगवर पण हिंदुहृदय सम्राट असा उल्लेख करणं बंद केलं. काही ठिकाणी होर्डिंगवर तर उर्दूत त्यांनी चक्क जनाब बाळासाहेब ठाकरे पण लिहिलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतके खाली गेलात तुम्ही ? ५) मग हे गेले काँग्रेसबरोबर, यांची अडीच वर्ष संपली आणि यांना यांचे चाळीस कुठे गेले हे कळलंच नाही. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. त्यांच्याकडे गुप्तचर विभाग रोज काय चाललं आहे हे सांगत असतात तरी मुख्यमंत्र्यांना कळलं नाही. या चाळीस जणांना घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणि त्यातल्या त्यात अजित पवारांबरोबर बसताना आमचा श्वास कोंडतो. मग पुढे अचानक अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून बाहेर पडले आणि इथे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. काय राजकारण सुरु आहे ? महाराष्ट्रात इतके ज्वलंत प्रश्न सुरु असताना हे सगळे हवं तसं वागतात कारण तुम्ही चिडत नाही, शांत लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असतात. महाराष्ट्रातील जनता आम्ही कसेही वागलो तरी आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची खात्री आहे त्यांना. ६) पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता काही वाटत नाही या लोकांना. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तरीही तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला... ७) फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती सन्माननीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही ? माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीये. महाराष्ट्राची किती वैचारिक घसरण झाली आहे ? देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा ? ८) आत्ता मी एक क्लिप पाहिली... मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावरती एक बाई भोजपुरी गाण्यावर लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून नाचत आहे... ही लाडकी बहीण योजना ? व्यासपीठावर बायका आणून नाचवणं हे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये व्हायचं, हे आपल्याकडे कधीपासून सुरु झालं ? ९) महाराष्ट्रातले प्रश्न प्रलंबित असताना आपल्याकडे चेष्टा सुरु आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रासाठी जागा रहा. आपल्याकडे त्या ओळी आहेत ना महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले।अनेकांचा डोळा आहे हे राज्य मारण्यासाठी. महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी सुरु आहेत त्या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत. मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून माझ्या हाती सत्ता द्या. १०) राजू पाटील यांनी कोव्हीड काळात खूप काम केलं. तुमच्या सगळ्यांसाठी झगडणारा राजू आहे, त्याला भरघोस मतांनी निवडून द्या. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

51,666 görüntüleme • 1 yıl önce