Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

धर्मांध आणि धर्मवेड्या लोकांसाठी....

10,480 просмотров • 7 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

गरिब नगर येथील कारवाई ही मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न नेमका कुणाकडून झाला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. काल कारवाई शांततेत पार पडल्यानंतर काही राजकीय कार्यकर्ते तेथे जाऊन सोशल मीडियासाठी रील्स बनवत नागरिकांना प्रवृत्त करत होते, ही बाबही गंभीर असून तिची देखील चौकशी झाली पाहिजे. प्रत्येक विषयाला धार्मिक आणि राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. पण माझे लक्ष फक्त आणि फक्त वांद्रे पूर्वच्या विकासावर आहे. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसर सुशोभित आणि आधुनिक झालाच पाहिजे. स्कायवॉकचे काम पूर्ण होऊन लोकांसाठी खुला झाला आहे आणि आता ‘सॅटीस’ प्रकल्पही राबवायचा आहे. संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपांपेक्षा वांद्रे पूर्वचा विकास माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे.

Varun Sardesai

23,358 просмотров • 3 месяцев назад

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी परवा नोकरीतून निवृत्त होत असताना आपल्या स्टाफला भेट म्हणून त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तके वाटली. तर त्यातील काही धर्मांध नर्स की ज्यांना प्रबोधनकार, जोतिबा, सावित्रीबाई कोण हेच ठाऊक नाही, त्यांना राग आला. ती पुस्तके त्यांना हिंदु धर्माची बदनामी वाटली आणि त्यांनी त्या राजेंद्र कदम यांचा अपमान करुन ती पुस्तके त्यांच्या अंगावर फेकली.. काय म्हणायचं या मुर्ख बायांना..? 😡 इथे तो संतापजनक व्हिडीओ पहा आणि मग याच विषयावर आपल्या अभिव्यक्ती चा आजचा व्हिडीओ आहे. त्याची लिंक खाली कमेंट बॉक्स मध्ये देतो. तोही अवश्य पहा..

Ravindra Pokharkar

29,831 просмотров • 11 месяцев назад

मी कोणाची खिल्ली उडवत नाही पण, आज देशभरात आरक्षण आणि मेरिट या मुद्द्यावर बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भाषणावर बोलावसे वाटते. आंबेडकरवादी चळवळीतून व्याख्याने ऐकणारा, चळवळीचे कार्यक्रम, उपक्रम आपल्या गाव-खेड्यात, गल्लीत राबवणारा एक कार्यकर्ता अगदी स्पष्टपणे, निर्भीडपणे, सामाजिक भान जपत अन्याय-अत्याचाराविरुद्ध आणि समाज परिवर्तनावर परखड मत मांडू शकतो. बहुजनवादी, आदिवासी, कामगार, डाव्या चळवळीतील विद्यार्थी त्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडतात. आताच CJP च्या आंदोलनातील मुले अत्यंत प्रभावीपणे बोलताना, सरकारला जाब विचारताना दिसले. ही सर्व मुले अमित ठाकरे यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे मुद्दे मांडताना दिसली आहेत. त्यांना कोणी लिहून देईल, मग ते बोलतील, मग ते मांडतील, अशी वेळ त्यांच्यावर कधीही येत नाही. प्रश्नांचे आकलन, मते निर्भीडपणे मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अभ्यास चळवळीतील कार्यकर्त्यांना आहे. तथाकथित मेनस्ट्रीम मीडिया विसरलेली भाषणे, मांडता न आलेले मुद्दे कव्हर करणे आणि त्याला महत्त्व देण्याचे काम करतात. पण याच्यापेक्षा कित्येक पटीने सक्षम असलेल्या चळवळीतील आणि आंदोलनातील लोकांना दाखवण्याची हिंमत का करत नाही? त्यांच्या योग्यतेचे श्रेय त्यांना कधीच दिले जात नाही. आरक्षण आणि मेरिटवर बोलणाऱ्यांना हे का दिसत नाही? अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो आणि मांडत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, जरी या मुलांकडे खूप जास्त टॅलेंट, क्षमता आणि मेरिट असलं तरी मीडिया स्पेस काहीच लोकांसाठी ‘Reserved’ असते.

Sujat Ambedkar

71,599 просмотров • 1 месяц назад