Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

नांदेड येथे विष्णुपुरी जवळ नवीन बांधलेला रस्ता पुलाचा भाग खचला आहे. नांदेडला पाऊस नाही.

140,905 Aufrufe • vor 1 Monat •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

बारसूमध्ये रिफायनरी आणली तर लोकांचे जीवन सुखावय होईल असं म्हणणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या ईमारती ह्या माहुल रिफायनरीच्या बाजूला उभ्या आहेत. रस्ता रुंदीकरण तसेच शासनाच्या इतर प्रकल्पामध्ये बाधित झालेल्यांना या ठिकाणी घरे देण्यात आली होती. आज या ठिकाणी ईमारती बांधून जवळ जवळ 15 वर्षे झाली आहेत. इथे कोणी राहत देखिल नाही आणि जे राहत होते ते देखिल इथून निघून गेले आहेत. कारण प्रत्येकाला छातीचा आजार, श्वसनाचा आजार, त्वचेचे आजार होऊन प्रचंड शारीरिक त्रास झाला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या ईमारतीमध्ये आज कोणिही राहत नाही. जे माहुल चे झालं तेच बारसू चे होईल.

Dr.Jitendra Awhad

56,657 Aufrufe • vor 3 Jahren

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभेचे उमेदवार श्री. अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) गेली अनेक वर्ष विदर्भात फिरतोय. १९८९ ला मी प्रत्यक्ष राजकारणात आलो. १९९३ साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढला होता. १९९२ ला बाबरी मस्जिद पडली, मुंबई आणि इतर ठिकाणी दंगली झाल्या, पुढे १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यावेळेस १९९३ च्या डिसेंबरमध्ये माझा मोर्चा झाला. १९९१ ते १९९३ माझा सगळ्यात जास्त वेळ माझा मराठवाड्यात आणि विदर्भात गेला. यवतमाळला यायचो, अमरावती तर माझं घर आहे. हा प्रदेश मला नवीन नाही, इथली माणसं मला नवीन नाही. २) १९९० ते २०२४ मी इथे येतोय, फक्त वाईट एकच वाटतं की प्रश्न तेच आहेत. प्रश्न बदलले नाहीत. हा जिल्हा पांढऱ्या सोन्याचा म्हणजे कापसाचा जिल्हा. खरंतर हा श्रीमंत जिल्हा हवा होता, पण राज्यकर्त्यांनी इथे योजनाच आणल्या नाहीत. हा जिल्हा ओळखला जातो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा. इतकी सरकारं आली गेली पण तरीही आत्महत्या थांबल्या नाहीत. तीच तीच लोकं निवडून येत आहेत आणि ती माणसं तुमच्यासाठी काहीही करत नाही. याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का ? ३) गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात जे झालं त्यात तुम्ही मतदार म्हणून कुठे आहात ? याचा विचार करताय कधी? आत्महत्या करणाऱ्यांच्या घरी परिस्थिती काय होत असेल याचा विचार करवत नाही. पण ही परिस्थिती ज्यांच्यामुळे येते अशा लोकांना शिक्षा देणार आहात का नाही ? ४) यवतमाळमधून वसंतराव नाईक ११ वर्ष मुख्यमंत्री होते तर सुधाकरराव नाईक अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तरीही हा जिल्हा आत्महत्यांचा जिल्हा ठरत असेल तर काय बोलायचं ? जोपर्यंत तुम्ही भाकरी पलटवत नाही, जोपर्यंत या लोकांना तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. ५) २०१४ ला महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा माझा पक्ष या देशातील एकमेव पक्ष आहे. यातून आमची महाराष्ट्राबद्दलची आस्था दिसून येते. आज महाराष्ट्राला जातीपातीत गुंतवून टाकलं जात आहे. जाती याआधी होत्या, जातीबद्दलच प्रेम या आधी होतं पण आता दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण झाला. आणि हा द्वेष शरदचंद्र पवारांनी पेरला. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या जातीपातीत पडू नका. माझ्या तरुण तरुणींना सक्षम करणं हे माझं स्वप्न आहे, त्याला तुम्ही बळ द्या. ६) पाच वर्षांनी पुन्हा एकदा मतदानाची संधी येत आहे, पाच पाच वर्ष तुमच्या आयुष्यातील जात आहेत आणि म्हणून तुम्हाला मतदानाकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. अशोक मेश्राम यांच्यासारखी व्यक्ती मी तुमच्यासमोर आणलं आहे, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं हे माझं आवाहन आहे. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

32,795 Aufrufe • vor 1 Jahr

यंदाच्या फुटबॉलच्या महाकुंभात अर्थात ‘फिफा वर्ल्ड कप- २०२६’मध्ये आमचा मित्र व ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण याच्या रूपात मराठी पत्रकारितेचा सन्मान झालाय... मेक्सिको, कॅनडा व अमेरिका या तीन देशांमध्ये पार पडणाऱ्या फिफा विश्वचषकाचे तिथूनच एकमेव अधिकृत मराठी भाषिक क्रीडा समीक्षक म्हणून संदीप चव्हाण कव्हरेज करतोय.. थेट मेक्सिकोहून संदीपने हा ब्लॅाग लिहिलाय… त्यात तो लिहितोय, फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून हे शब्द मी लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; हा फुटबॉलच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी अजूनही या शहराच्या हवेत तरंगताना जाणवतात. आज, त्याच मेक्सिको सिटीत, त्या इतिहासाच्या सावलीत उभा राहून, दै. मुंबई तरुण भारतचा क्रीडा प्रतिनिधी म्हणून अधिकृत मान्यता घेऊन विश्वचषकाच्या प्रेस बॉक्समधून वार्तांकन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. हा केवळ माझा वैयक्तिक प्रवास नाही; हा मराठी पत्रकारितेच्या स्वप्नांचा, जिद्दीचा आणि अस्मितेचा प्रवास आहे. जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. अब्जावधी चाहत्यांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, अशा या महाकुंभासाठी अधिकृत मान्यता मिळवणे हे कोणत्याही माध्यमासाठी अभिमानाचे असते. पण यावेळी अभिमानाची गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच दै. मुंबई तरुण भारतला विश्वचषकाचे अधिकृत अ‍ॅक्रिडिटेशन मिळाले आहे. आणि त्या इतिहासाचा पहिला साक्षीदार, पहिला प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे. हा क्षण केवळ एका पत्रकाराचा नाही. हा प्रत्येक मराठी वाचकाचा आहे. हा त्या मातृभाषेचा आहे, जिच्या शब्दांमध्ये आपण जग पाहतो, स्वप्ने रंगवतो आणि भावना व्यक्त करतो. अनेक दशकांपासून इंग्रजी आणि इतर भाषांच्या माध्यमांनी गाजवलेल्या या जागतिक व्यासपीठावर आज मराठीचा आवाजही तितक्याच अभिमानाने घुमत आहे. मेक्सिको सिटीच्या रंगीबेरंगी रस्त्यांवर, स्टेडियममधील गगनभेदी जल्लोषात, चाहत्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये आणि विजयानंतरच्या आनंदोत्सवात मला जगभरातील भावनांचा महासागर दिसतो आहे. पुढील महिनाभर संपूर्ण जग हसू आणि आसू यांच्या हिंदोळ्यावर झुलणार आहे. कुणाचे स्वप्न साकार होईल, कुणाचे तुटेल; कुणी इतिहास घडवेल, तर कुणी इतिहासाचा भाग बनेल. त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक थराराचा, प्रत्येक भावनेचा साक्षीदार म्हणून मी येथे आहे. आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या माझ्या मराठी वाचकांपर्यंत त्या प्रत्येक क्षणाची धडधड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, या फुटबॉलच्या महाकुंभात आपण सर्वजण सहभागी होऊया. मेक्सिकोच्या या ऐतिहासिक भूमीवरून, मराठी मनांपर्यंत पोहोचणाऱ्या या प्रवासाचे सहप्रवासी होऊया. कारण हा केवळ विश्वचषक नाही; हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. [email protected]

ashish jadhao

11,702 Aufrufe • vor 1 Monat

#भाग-1 सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात सायंकाळी 6 वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान CWPRS गेट समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असताना नांदेड सिटी वाहतूक विभागाचे हे पोलीस कर्मचारी ते सोडून बाहेर निघाले. जवळच उभ्या असलेल्या:एकाला' ते सारखा काहितरी इशारा करत होते. बाजूला आल्यानंतर वर्दी झाकण्यासाठी त्यांनी अगोदर जर्कीन घातले. 'त्या' एकाशी 'चर्चा' करत राहिले. त्यानंतर बराच वेळ फोनवर बोलत राहिले. वाहतूक कोंडी होती परंतु यांचे दुसरे 'महत्त्वाचे काम' सुरू होते.(वाहतूक पोलीसांची लाज राखण्यासाठी एकच व्हिडिओ टाकत आहे. यावरुनच संबंधित वाहतूक पोलीसावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. पुढचा व्हिडिओ टाकण्याची वेळ येणार नाही अशी आशा आहे.) CP Pune City Police पुणे शहर वाहतूक पोलीस पुणे शहर पोलीस महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis CMO Maharashtra Ajit Pawar Supriya Sule Rupali Chakankar Murlidhar Mohol Kirkatwadi Development Forum The Investigation Express

Nilesh Borude निलेश बोरुडे

14,304 Aufrufe • vor 1 Jahr

⚠️ महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटदारांचा महा-भ्रष्टाचार उघड! बोरिवलीत नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रात्री बाहेरून दगड-माती नाल्यात टाकली जाते आणि सकाळी त्याच दगड-मातीला “नालेसफाई” दाखवत पैसे गंडवले जात आहेत. जनतेच्या पैशावर उघडपणे डाका टाकण्याचा हा प्रकार आहे! ही बाब तात्काळ आर/मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री तांबे यांच्या निदर्शनास आणून दिली असून, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बोरिवलीत अशा भ्रष्टाचाराला कोणतीही मुभा केली जाणार नाही. 📍 पी.एल. देशपांडे गार्डन जवळ, लिंक व्ह्यू हॉटेल समोर, लिंक रोड, नवीन एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (प) #SanjayUpadhyay #Borivali #BJP #BorivaliPattern #CorruptionFree #PublicSafety #ZeroTolerance #mybmc #BMCCommissioner #cpmumbaipolice Ashwini Bhide Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardRC

Sanjay Upadhyay

11,424 Aufrufe • vor 4 Monaten

हडपसर विधानसभेचे उमेदवार श्री. साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे आज जाहीर सभा घेतली, त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) २००९ ला हडपसर मतदारसंघ तयार झाला. इथली गावं महापालिकेत आली. आज कित्येक लोकं म्हणतात की आमची गावं होती ती बरी होती, विनाकारण महापालिकेत आलो. या संपूर्ण भागाचा विचका ट्रॅफिकने झाला आहे. आज महाराष्ट्रात मी असे अनेक भाग बघतो, त्याची अवस्था अशी आहे की मरण येत नाही म्हणून जिवंत आहोत. रोजच्या जगण्यातील स्वस्थता गेली आहे, लहान मुलांना बाहेर पाठवताना माता-भगिनींना धाकधूक होते. आणि या मूळ प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये म्हणून तुम्हाला नको त्या प्रश्नांमध्ये गुंतवलं जातं. २) महाराष्ट्राच्या राजकारणाचा जातींनी झालेला विचका मोठा आहे. जातीपातीत तुम्ही गुंतून पडावं आणि तुमचं मतदान काढून घ्यायचं असं सुरु आहे. ३) मराठवाड्यातील दुर्दैवी घटना सांगतो. एका गावातील घरात निधन झालं, घरात तीन माणसं, मृत व्यक्तीला खांदा द्यायला माणूस नव्हता, नातेवाईक यायला सहा तास लागले, म्हणून अंत्यसंस्कार थांबले. दुसऱ्या जातीची माणसं बहुसंख्य माणसं शांतपणे बघत राहिली पण कोणी पुढे आलं नाही. याहून दुर्दवी घटना काय असू शकते ? हे सगळं विष पेरलं गेलं ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर. ४) आज महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की महापुरुषांना आपण जातीत विभागलं आहे. महाराष्ट्रात जातीबद्दलचं प्रेम होतं, पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष कधीच नव्हता. आपल्याकडे आत्ता काय पसरतंय याचा विचार केलाय का ? इथल्या मोहल्ल्यांमध्ये सिमी, आयसिसचे अतिरेकी सापडलेत. बरं जे सापडले ते सापडले पण जे नाही सापडले ते काय करतील ? ५) शहरांचा सत्यानाश झाला आहे, इथे रोजगार मिळत नाहीयेत, इथे महिला सुरक्षित नाहीयेत, लोकांना घरं परवडत नाहीयेत, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत आणि तरीही या सगळ्याची चिंता करायची सोडून सत्ताधारी आणि विरोधक तुम्हाला जातीत गुंतवतात... ६) इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अहवलेंना केली गेली, त्यावेळेला फक्त आमचा साईनाथ रस्त्यावर उतरला होता. त्यावेळेला आमदार आणि इतर पक्षांचे नेते कुठे होते ? अशा माणसांच्या हातात सत्ता देणार का तुमच्यासाठी धावून येणारा साईनाथ सत्तेत हवा ? विचार करा साईनाथ आमदार झाले तर तुमच्यासाठी रात्रीअपरात्री धावून येतील. ७) तुम्ही कुठल्याही पुण्यातील असो की मुंबईतील किंवा ठाण्यातील किंवा अगदी कुठल्याही शहरातील जुन्या माणसाला विचारून बघा की तुम्हाला तुमचं जुनं शहर हवं का नवं तर लोकं उत्तर देतात जुनं शहर. पण दुबईत विचारून बघा तिथल्या लोकांना, कुठलं शहर आवडतं तर म्हणतील आत्ताची दुबई आवडते, का तर तिथल्या माणसांची गरज लक्षात ठेवून दुबई घडवली आहे. ८) ५ वर्षात मी तुम्हाला सगळं बदलून दाखवेन असं सांगणार नाही, पण या ५ वर्षात असं काम करून दाखवेन की ज्याने तुम्हाला पुढची ५ वर्ष आम्हाला सत्तेत परत आणावं असं वाटेल, इतकं सुंदर आणि मनापासून काम करून दाखवेन, ९) महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज्यातील नाहीतर देशातील एकमेव पक्ष आहे ज्याने राज्याचा विकास आराखडा मांडला. मला खुर्चीचा सोस नाही. मी शिवछ्त्रपतींच्या राज्यात जन्माला आलो आहे, त्या राज्याचं गतवैभव मला परत आणायचं आहे. १०) आज माझी मुलाखत घ्यायला येणारे पत्रकार मला फक्त यांनी असं म्हणलं त्यांनी तसं म्हणलं यावरच प्रश्न विचारतात. पण कोणी महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विसरू नका हे महाराष्ट्र राजय आहे, कोणतं लेचापेचं राज्य नाही. या राज्याला इतिहासाला भूगोल पण आहे आणि इतिहास पण आहे. अशा राज्याच्या विकासाबद्दल तळमळीने बोलणाऱ्या माझ्या पक्षाला, माझ्या उमेदवारांना निवडून द्या. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, यासाठी मला तुमची साथ हवी आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या राज्यात तमाशा करणाऱ्यांना एकदा धडा शिकवा, आणि तुम्ही जर धडा नाही शिकवलात तर या सगळ्यांची खात्री पटेल की तुम्ही काहीही केलंत तरी सगळं चालून जातं. ११) मला आणि माझ्या उमेदवारांना एकदा संधी देऊन बघा. माझा साईनाथ तर आहेच पण जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्या प्रत्येकाला मतदान करा. मी सगळ्या मतदारसंघात पोहचूच शकत नाही, त्यामुळे मी इथून प्रत्येकाला आवाहन करतो की माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

56,039 Aufrufe • vor 1 Jahr

उत्तर महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाशी थेट जोडणारा कनेक्टर का रद्द केला? हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे, असं माझं ठाम मत आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिककरांच्या बाबतीत मात्र चित्र वेगळंच दिसतं. समृद्धी महामार्ग नकाशावर जवळ असला तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा मिळवण्यासाठी नाशिककरांना इगतपुरीपर्यंत प्रवास, खराब रस्ते आणि दुहेरी टोलचा भार सहन करावा लागत आहे. या संदर्भात पुढील प्रश्न सभागृहासमोर मांडले: 📌 नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत प्रवास करावा लागतो, खराब रस्त्यांचा सामना करावा लागतो आणि राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी या दोन्ही ठिकाणी टोल भरावा लागतो यावर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत? 📌 धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा, कळवण या भागांतील नागरिकही प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत याबाबत शासन काय प्रयत्न करत आहे? 📌 नाशिकसाठी मंजूर 500 कोटी रुपयांचा कनेक्टर प्रकल्प रद्द का करण्यात आला? संपादित जमीन वापरात का आणली जात नाही? तसेच नाशिककरांना टोल सवलत देणार का? वरील प्रश्नांवर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी डबल टोलचा दावा फेटाळत समृद्धीवर इंटरचेंजपासून प्रतिकिलोमीटर दरानेच टोल आकारला जात असल्याचे सांगितले. नाशिककरांना 30-50 किमी प्रवास हा मोठा अडथळा नसल्याचे त्यांनी नमूद केले तसेच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडण्यासाठी पाच इंटरचेंज उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. खानदेशासाठी छत्रपती संभाजीनगर-जळगाव “खानदेश एक्सप्रेस” मार्गाचा DPR तयार असून लवकरच काम सुरू होईल, तसेच नाशिक-इगतपुरी कनेक्टरऐवजी भरवीरमार्गे नवीन अ‍ॅक्सेस कंट्रोल रस्ता विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे उत्तर सत्य परिस्थितीपासून दूर आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करत, नाशिककरांना न्याय मिळावा यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली. उत्तर महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाशी थेट जोडणारा कनेक्टर का रद्द केला? हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे, असं माझं ठाम मत आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिककरांच्या बाबतीत मात्र चित्र वेगळंच दिसतं. समृद्धी महामार्ग नकाशावर जवळ असला तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा मिळवण्यासाठी नाशिककरांना इगतपुरीपर्यंत प्रवास, खराब रस्ते आणि दुहेरी टोलचा भार सहन करावा लागत आहे. या संदर्भात पुढील प्रश्न सभागृहासमोर मांडले: 📌 नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत प्रवास करावा लागतो, खराब रस्त्यांचा सामना करावा लागतो आणि राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी या दोन्ही ठिकाणी टोल भरावा लागतो यावर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत? 📌 धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा, कळवण या भागांतील नागरिकही प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत याबाबत शासन काय प्रयत्न करत आहे? 📌 नाशिकसाठी मंजूर 500 कोटी रुपयांचा कनेक्टर प्रकल्प रद्द का करण्यात आला? संपादित जमीन वापरात का आणली जात नाही? तसेच नाशिककरांना टोल सवलत देणार का? वरील प्रश्नांवर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी डबल टोलचा दावा फेटाळत समृद्धीवर इंटरचेंजपासून प्रतिकिलोमीटर दरानेच टोल आकारला जात असल्याचे सांगितले. नाशिककरांना 30-50 किमी प्रवास हा मोठा अडथळा नसल्याचे त्यांनी नमूद केले तसेच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडण्यासाठी पाच इंटरचेंज उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. खानदेशासाठी छत्रपती संभाजीनगर-जळगाव “खानदेश एक्सप्रेस” मार्गाचा DPR तयार असून लवकरच काम सुरू होईल, तसेच नाशिक-इगतपुरी कनेक्टरऐवजी भरवीरमार्गे नवीन अ‍ॅक्सेस कंट्रोल रस्ता विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे उत्तर सत्य परिस्थितीपासून दूर आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करत, नाशिककरांना न्याय मिळावा यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली. #BudgetSession #Maharashtra #Nashik #SamruddhiMahamarg #Benefit Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar CMO Maharashtra Meghna Sakore Bordikar

Satyajeet Tambe

14,613 Aufrufe • vor 5 Monaten

बेलापूर विधानसभेचे उमेदवार श्री. गजानन काळे आणि ऐरोली मतदारसंघाचे उमेदवार श्री. निलेश बाणखेले यांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) या भागाला नवी मुंबई म्हणतात कारण त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा विचार व्यापक होता. मुंबई आणि त्याला लागून नवी मुंबई उभी करावी हा विचार वसंतराव नाईकांच्या डोक्यात आला. कारण त्यांच्या लक्षात आलं की १९५० ते १९७० या २० वर्षात मुंबईची लोकसंख्या दुपटीने वाढली. आणि आता यापुढे मुंबई माणसं घेऊ शकणार नाही म्हणून नवी मुंबईला आकार देण्यात आला. पुढे मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स उभं राहिलं. हे सगळं उभं करताना शहर कसं उभं करायचं याचा विचार केला गेलाच नाही. ब्रिटिशांनी मुंबई उभी करताना खूप विचार केला. आपल्याकडे शहराचा विकास आराखडा बनवला जातो पण इथे शहर नियोजन आराखडा बनवला जात नाही. २) ब्रिटिशांनी मुंबई उभारताना अनेक मैदानं उभी केली. पण त्यानंतर जी शहरं उभी राहिली त्यात कुठे मैदानं दिसत नाहीत. आज नवी मुंबईत खाजगी क्रीडासंकुल आहे पण सरकारी क्रीडासंकुल का नाही ? नवी मुंबईत फक्त एक नाट्यगृह का आहे ? हेच मुंबईत बघा तर किती नाट्यगृहं आहेत. नवी मुंबईत शिवाजी पार्कसारखं किंवा आझाद मैदानासारखं मैदान आहे? नाहीये... ३) ब्रिटिशांनी अनेक हॉस्पिटल्स एकत्र करणारा एक भाग बनवला. थोडक्यात लोकसंख्येला काय काय लागेल याचा केवढा विचार ब्रिटिशांनी केला ? पण नवी मुंबईत समजा एखाद्या कुटुंबाला कुठे जायचं असेल तर कुठे जायचं ? मॉलमध्ये ? थोडक्यात काय शहराच्या कुठल्याच गरजांचा विचार केला जात नाही. ४) गेली ६०-७० वर्ष निवडणुका होत आहे, पण तेच प्रश्न, तीच आश्वासनं हेच सुरु आहे आणि जगणं तसंच सुरु आहे. याला काय अर्थ आहे ? आपल्याकडे प्रगती म्हणजे विविध उपकरणं येणं, गाड्या येणं इतकं नसतं. मला विकासाचा विचार इतका तोकड्या पद्धतीने करता येत नाही. महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता. बरं तो जाहीरनामा होता, तर प्रत्येक प्रश्नावरच उत्तर आम्ही त्यात दिलं. ५) आज नवी मुंबईत एकाच घरातील २,२ जणं वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत, दिवसभर वेगवेगळ्या पक्षातून फिरतात रात्री घरी पुन्हा एकत्र येतात. काय चाललं आहे नवी मुंबईत ? ६) नाशिकमध्ये ५ वर्ष आमची सत्ता होती, त्या ५ वर्षाच्या काळात आम्ही मुकणे धरणांतून थेट पाईपलाईन टाकून नाशिकमध्ये पाणी आणलं, आणि नाशिक शहराचा ५० वर्षांचा प्रश्न सोडवला. असा विचार इतर कोणी करतं का हो तुमच्यासाठी ? ७) रतन टाटा गेल्यावर संपूर्ण भारत हळहळला. एक सज्जन आणि सरळ उद्योगपती गेला म्हणून लोकं दुखी झाले. का दुःखी झाले ? कारण लोकांना सरळ, सज्जन माणसं आवडतात जर सरळ, सज्जन माणसं लोकांना आवडतात, तर मग लोकांना सरळ विचार करणारे राजकारणी का नाही आवडत ? तिथेच नेमकी वेडावाकडा विचार करणारी आणि कृती करणारी माणसं का निवडता तुम्ही ? ८) महाराष्ट्रात दुकानांवर मराठी मध्ये पाट्या लागत नव्हत्या, मी साधंसोपं पत्र लिहिलं आणि त्यात त्यांना लिहिलं की तुम्ही ठरवाव की दुकानाची पाटी महाग आहे का दुकान महाग आहे ? आणि पुढे त्या पत्रात लिहीलं की जर तुम्ही पाट्या नाही केलात तर माझे महाराष्ट् सैनिक तुम्हाला भेटीला येतील. आणि पाट्या झाल्या. आम्ही सत्तेत नसताना कामं करून दाखवत असू तर सत्तेत आल्यावर किती कामं करू याचा विचार करा. ९) माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रातील माझ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

42,727 Aufrufe • vor 1 Jahr

अटकेनंतर सिया गोयलची भावनिक पोस्ट चर्चेत . . लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले गेलेल्या केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. केतनचा मृत्यू ट्रेकिंगदरम्यान अपघातीरीत्या दरीत पडल्यामुळे झाल्याचे सुरुवातीला मानले जात होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सिया गोयलने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केतनसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि चॅट्सचा समावेश होता. या पोस्टमध्ये सियाने, “तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास... आपण लग्नाच्या इतके जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्ने होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतके प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास? Rest in Peace,” असे भावनिक शब्दांत लिहिले होते. त्या वेळी अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र, पोलिस तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार केतनचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असू शकतो. केतनला जाणूनबुजून दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून त्याच दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, सियाची जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी दुःख व्यक्त करणारी ही पोस्ट आता तपासाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्याच नजरेतून पाहिली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व पुरावे, मोबाईल डेटा आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून आगामी तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #LohagadCase #SiyaGoyal #KetanAgrawal #PuneCrime #SocialMediaExposed #PimpriChinchwad #MarathiNews #CrimeUpdate

थोडक्यात

121,236 Aufrufe • vor 1 Monat

आधुनिकता येत असताना पार्लेकरांनी परंपरा जपल्या मुंबईतील विले पार्ले येथे आयोजित 24व्या पार्ले महोत्सवाला आज उपस्थित राहिलो. यावेळी उपस्थितांना संबोधित केले. पुन्हा एकदा पार्ले महोत्सावत आल्याचा आनंद झाला. मागच्या वेळेस याच महोत्सवात मी पुन्हा येईन असे सांगितले होते. त्यानंतर विले पार्ले येथील लोकांनी, महाराष्ट्रातील लोकांनी असा आशीर्वाद दिला की, आलो तर आलो छप्पर फाड के आलो. क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या गुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणून, पार्लेकरांचा हक्काचा महोत्सव म्हणून पार्ले महोत्सवाकडे पाहिले जाते. गेल्या 24-25 वर्षांत या महोत्सवात वेगवेगळ्या लोकांनी भाग घेतला. त्यातल्या अनेक जणांनी विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले आहे. मात्र, त्यांची सुरुवात इथून झाली, या व्यासपीठाने, मैदानाने, त्या त्या क्षेत्रात त्यांना नामवंत केले. म्हणूनच पार्लेकरांकरता हा महत्त्वाचा महोत्सव आहे. पार्ले महोत्सव आणि पार्लेकर असे आहेत की, इथे वारंवार यायची इच्छा होते. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, तर पार्ले सांस्कृतिक उपराजधानी आहे, असे म्हटले जाते. मला तर एकाने असेही सांगितले की, पार्लेकर गुप्त वेशातले पुणेकर आहेत. मला असे वाटते की, पार्लेकरांची संस्कृती खरोखर सुंदर संस्कृती आहे. आधुनिकता येत असताना पार्लेकरांनी परंपरा जपल्या. सांस्कृतिक, क्रीडा, खाद्य, नाट्य, विचारवंत असा सर्व प्रकारच्या नररत्नांची खाण म्हणून पार्ल्याकडे पाहतो. पार्लेकरांनी हे सगळे टिकवून ठेवले, हे महत्त्वाचे आहे. हे यापुढेही टिकवून ठेवायचे असेल तर पार्ले महोत्सव त्यासाठीचे एक व्यासपीठ आहे. म्हणूनच मला आनंद आहे की, मी जरी उद्घाटनाला येऊ शकलो नाही तरी मध्ये मी एक दिवस नक्की येणार आहे. पुढच्या वर्षी पार्ले महोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे, त्याचे एक भव्य-दिव्य नियोजन आपल्या सर्वांच्या मनात असेल. त्यात राज्य सरकार म्हणून हातभार लावून अधिक मोठा महोत्सव साजरा करता येईल, हा प्रयत्न करायचा आहे. शेवटी क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र या क्षेत्राकडे नवी पिढी वळली तर समाज, देश तयार करणारी पिढी तयार होते. इतर गोष्टीत तरुणाई गुरफटत नाही. दिशा, अनुशासन, संवेदनशीलता, खिलाडू वृत्ती या क्षेत्रातून प्राप्त होते, म्हणून हे क्षेत्र महत्त्वाचे आहे, यासाठी आम्हीदेखील हातभार लावू. मेट्रो मार्गिकेच्या एका स्थानकाला डाॅ. रमेश प्रभु यांचे आणि विले पार्ले येथील महामार्गावरील उड्डाणपुलाला डाॅ. नितू मांडके यांचे नाव देण्याची आमदार पराग आळवणी यांनी केलेली मागणी अतिशय चांगली आहे. ही दोन्ही मोठी माणसे होती, त्यांचे नाव देणे नक्कीच समर्पक असेल. यासंबंधीचे नियम पाहून, प्रसंगी नियम बदलून नाव देण्याचा प्रयत्न करु. पुन्हा एकदा पार्ले महोत्सवाला, खेळाडू, कलावंत यांना सहा महिन्याच्या कन्येला आणि ७५ वर्षांच्या आजींनाही मनापासून शुभेच्छा… parag alavani #Maharashtra #ParleMahotsav

Devendra Fadnavis

15,951 Aufrufe • vor 1 Jahr

लवासा प्रोजेक्ट बंद पडून १४ वर्षे झाली. आज तिथे फक्त पहिल्या फेज मधील काही बांधकामे पूर्ण दिसत असली तरी एकंदरीत वापर फारच मर्यादित आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील विकसन, बांधकामे हे सगळे अर्धवट सोडून दिलेले असून केवळ कच्चे रस्ते, इमारतींचे गंजून काळवंडलेले सांगाडे असे भेसूर दृश्य आहे. जुलै २०२३ मध्ये ज्या डार्विन रिऍलिटीने हा प्रकल्प NCLT च्या रिसोल्युशन प्लॅन नुसार विकत घेतला त्यांना पूर्तता करता आलेली नाही. डार्विनला हा प्रकल्प १८१४ कोटी रुपयांना मिळाला होता. हे पैसे पुढील आठ वर्षात भरायचे होते. तसेच सदनिका आणि बंगलेधारकांना वाढीव दराने पैसे घेऊन बांधकाम करून द्यायचे होते. सुरुवातीला भरायचे काही कोट रुपये देखील भरण्यात आले नाहीत. त्यामुळे सप्टेंबर २०२४ मध्ये NCLT ने त्या व्यवहाराला स्थगिती दिली असून अनेक नवीन बिडर लिलावात आले आहेत. वालोर इस्टेट ची सर्वात मोठी बोली (केवळ) ७७१ कोटीची आहे. बोली मागवण्यासाठी बँकांनी मुदतवाढ घेतली आहे. लवासा दिवाळखोरीत गेल्यामुळे बँकांचे तब्बल ५,७१३ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. म्हणजेच भारतीय नागरिकांचे एवढे पैसे हजामतीमध्ये गायब झालेले आहेत (haircut). हे जे नुकसान झाले ते कोणाचे? अजित गुलाबचंद यांचे? पर्यावरणवाद्यांचे की जनतेचे? एक जागतिक दर्जाची लेक सिटी वेळेत होऊ शकले नाही, हे नुकसान कोणाचे? ते असो .. पण लवासा बंद पाडण्यामागे तेथील आदिवासी आणि गरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या जनआंदोलनाचा आणि पर्यावरणवाद्यांचा मोठाच सहभाग आहे. लवासा कंपनीने हम करे सो कायदा या न्यायाने महसूल, नगर नियोजन, कमाल जमीन धारण कायदा आणि पर्यावरण विषयक कायद्यांचे उघड उघड उल्लंघन केले. लवासासाठी चार पदरी रस्ता बांधून त्याचा भुर्दंड सामान्य प्रवासी नागरिकांना पडू लागला. या सगळ्या प्रकारांमुळे या प्रकल्पाविरुद्ध तीव्र जनमानस तयार झालं. तसेच विविध कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायालयाने हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. कालांतराने कंपनी नुकसानीत आणि नंतर दिवाळखोरीत गेली. नादारी आणि दिवाळखोरी IBC कायदा तर सरळ सरळ कर्जबुडव्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच बनवलेला आहे. कंपनी कायदा न्यायाधीकरण NCLT, प्रकल्पाची मालमत्ता लिलावाने विकून, येतील तेवढे पैसे घेऊन नवीन कंपनीला प्रकल्प हस्तांतरित करण्यासाठीच काम करते. बँका त्यांच्याकडची थकीत कर्ज तिसऱ्याच कंपनीकडे हस्तांतरित करून स्वतःचे ताळेबंद स्वच्छ करतात. यामध्ये कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्त संस्थांचे करोडो रुपयांचे नुकसान होते ज्याला हेअर कट असा चकचकीत शब्द वापरला जातो. हे नुकसान देशातल्या जनतेचे आणि सामान्य नागरिकांचे असते कारण त्यांचा कष्टाचा पैसा सर्वांच्या संगनमतने बुडालेला असतो. प्रकल्प आला की त्याला विरोध. जनआंदोलन हा लोकशाही हक्क आहेच पण ज्याप्रमाणे पर्यावरणवादी कोणत्याही प्रकल्पाला विरोध करताना सोशल अँड इकॉलॉजिकल इम्पॅक्ट असेसमेंट ची मागणी करतात तसे इकॉनॉमिक इम्पॅक्ट असेसमेंट त्यांनी स्वतःच्या आंदोलनाचेही केले पाहिजे. आंदोलन केल्यानंतर नक्की काय होईल, त्याचा एकंदरीत अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, काय फायदा होईल याचा विचार करून विरोध केला पाहिजे. केवळ हे बंद पाडा, ते बंद पाडा यामुळे काहीच साध्य होणार नाही. चळवळींनी आणि पर्यावरणवाद्यांनी पर्यायी विकास नीती काय याची सुद्धा मांडणी केली पाहिजे. त्याशिवाय आंदोलन करून प्रकल्प बंद पाडण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. #लवासा #LAVASA #पर्यायी_विकास_नीती ॲड. संदीप ताम्हनकर. पुणे.

Saurabh Koratkar

31,702 Aufrufe • vor 9 Monaten

जीवन अनमोल हिरा, ज्यास कर्माने पैलू पडतो । तो सत्कर्माने उजळतो, आणि दुष्कर्माने सडतो ।। जेवढं हे जीवन अनमोल, त्यापेक्षा कर्म अनमोल आहे. म्हणून कर्म करताना अत्यंत दक्ष असायला हवे. कर्म म्हणजे फक्त दैनंदिन जीवनातील व्यवहारिक कामच नव्हे, तर आपल्याकडून होणारी प्रत्येक शारीरिक व मानसिक कृती म्हणजे कर्म... आपलं चालणं, बोलणं, पाहणं, ऐकणं, विचार करणं वगैरे प्रत्येक हालचाल ही ह्या कर्मातच येते. कर्माविना मनुष्य थांबुच शकत नाही. इच्छा असो की नसो, आपल्याकडून कर्म घडतच राहतात.आणि ती कर्मे त्यांचा परिणाम आपल्याला भोगायला भाग पाडतातच. कर्म घडलं की कर्मफळ समोर पडलंच म्हणून समजा... एखाद वेळेस कर्मातून सुटका होईल, परंतु कर्मफळातून सुटका होणे अशक्य आहे. सुखाने जगण्यासाठी आपण धडपडून कर्मे करतो, नाना खटपटी करतो व ती जशी झाली, तशीच कर्मगती आपणास लाभते... पण कर्म व कर्मफळाची गंमत अशी आहे की आपण सुखासाठी कर्म करतो व कर्मफळ मात्र दुःखमय मिळतं. असं का होतं ? मर्म असे आहे की, आपले कर्म आपल्या पेक्षा इतरांनाही सुखकारक झाले, तर कर्मफळ शतपट चांगलं मिळतं. पण आपण फक्त आपल्याच पुरता विचार करून कर्म केलं, तर शुद्ध सुख मिळूच शकत नाही. उलट आपली कर्मे इतरांना त्रासदायक, दुःखदायक ठरली, तर त्याच्या शतपटीने दुःख आपल्या वाट्याला नक्कीच येतं. वाईट कर्माचा प्रारंभच तुम्हाला दुःखाच्या दरीत लोटतो. म्हणून यत्किंचितही इतरांना त्रास होणारे कसलेच चुकीचे कर्म आपल्याकडून घडू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कर्मसिद्धांत इशारा देतो की,आपण दुसऱ्या बद्दल केवळ वाईट विचार जरी केला, तरी त्याचे शतपट वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि इतरांबद्दल केलेली कणभर वाईट कृती आपल्याला शतपट वाईट फळं भोगायला भाग पाडतात. हे जसं दुष्कर्म फळाबद्दल आहे, तद्ववतच इतरांबद्दलचा एक चांगला विचार आपल्याला शतपट चांगलं बनवितो. एक छोटं-इतरांसाठी केलेले सत्कर्म आपल्याला शतपट चांगलं फळ देते... महाभारतात, द्रौपदीचे दुर्योधनावर कुत्सितपणे क्षणिक हसण्याने किती भयंकर परिणामांचे कर्म झालं, पण त्याच द्रौपदीने लहानपणी नदीवर अंध ऋषींना स्नान करताना, त्यांचे वस्त्र हरवले, म्हणून स्वतःजवळचे एक वस्त्र दिले. द्रौपदीच्या संकट समयी त्या सत्कर्मामुळे अनंत वस्त्रे तिला मिळाली... म्हणून दक्षतेने सत्कर्म पाळावे, दक्षतेने दुष्कर्म टाळावे. यासाठी विचारपूर्वक कर्म करायला हवेत. आपण आज अविचाराने वागलो, तर उशिरा का होईना, त्याची कर्मफळे पुढे वाट्याला येणारच... उन्हाळ्यात रखरखीत जमिनीत पडलेली गवताची बीजं तेव्हां दिसत नाहीत, परंतु काही काळानंतर पाऊस पडला की सारं गवत उगवून येते व शतपटीने बीज प्रसार करतं... कर्म गती ही गहन आहे. ती कुणीही चुकवू शकत नाही. धनवंतातील धनवान, सर्व सत्ताधीश व प्रचंड बलवानही कर्म गती टाळू शकत नाहीत. नाना उपद्व्याप केले, अनंत खटपटी केल्या तरी कर्मफळ बदलू शकत नाही... जगाचा इतिहास हा कर्म फळाचा इतिहास आहे. प्रत्येक लहान थोर व्यक्ती, त्याच्या कर्माचा परिपाक असते. सुखदुःख हे त्या कर्माचे प्रतिध्वनी आहेत. म्हणून स्वतःच्या भल्यासाठी तरी कर्म विचारपूर्वक करा... कर्मगतीतून भल्या भल्यांची सुटका होत नाही, मग आपल्यासारखे क्षुद्र जीव कसे सुटतील...??? कर्म जाणून-बुजून करा किंवा अजाणतेपणी करा, कर्म फळ भोगावंच लागतं... चुकून नकळत अजाणतेपणी विस्तवावर पाय पडला तर विस्तव पोळतोच ना? अजाणतेपणाने विष शरीरात गेलं, तर मरणारच ना? म्हणून असे घडत नाही की, अजाणतेपणी सत्कर्म वा दुष्कर्म केले, तर त्याचे कर्मफळ मिळत नाही. कळत नकळत कसेही कर्म घडो, त्याचे कर्म फळ मिळणारच... म्हणूनच एक विनंती आहे... कर्म से डरिये, ईश्वर से नही । ईश्वर तो माफ कर सकता है, कर्म कभी नही ।। लोक विनोदाने म्हणतात, की पूर्वी चित्रगुप्त मनुष्याची कर्मगती हाताने लिहून नोंदवित होता, म्हणून कर्मफळ पुढच्या जन्मी भोगावं लागत असे, परंतु आता चित्रगुप्त लॅपटॉप घेऊन कर्मगतीची नोंद करतो म्हणून कर्म फळे याच जन्मी भोगावी लागतात... संत कबीर म्हणतात--- " पहिले करणे करे, बाद मे क्यूँ पछताये । पेढ बोया बबुल का, आम कहांसे खाये ।। " खरंय ना? WAF

महाकाळ

13,946 Aufrufe • vor 1 Jahr

📍संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 🛣️ पालखी मार्ग निरीक्षण दर वर्षी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि विना अडथळ्यांची व्हावी या उद्देशाने श्रद्धा व आधुनिकतेचा प्रभावी संगम साकारत पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) कामाचे आज राज्याचे कृषीमंत्री श्री Dattatray Bharane जी, आमदार श्री Rahul Subhash Kool जी, माजी आमदार श्री Harshvarrdhan Patil जी यांच्यासह निरीक्षण केले. भारत भूमीच्या सनातन परंपरेत वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजेच ‘वारी’ ही श्रद्धा, तपस्या आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. दर वर्षी आषाढी एकादशीच्या पर्वावर लाखो वारकरी पालखी समवेत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मात्र अनेक वर्षे ही वारी विविध आव्हानांना, अडचणींना सामोरे जात होती. या समस्यांवर उपाय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) या मार्गांचा व्यापक पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला, जो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांची वारी आता सुखकर व आल्हाददायक होणार आहे. देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) हा पाटस ते पंढरपूर असा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. ४,४१६ रुपयांच्या तरतुदीतून उभारण्यात येत असलेला हा मार्ग वारकऱ्यांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवून विकसित करण्यात येत आहे. पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा ३ पॅकेजमध्ये या मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून इंदापूर ते तोंडले भागाचे काम ९६% आणि बारामती ते इंदापूर भागाचे काम ८४% पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण केले जाईल. हा महामार्ग बारामती, भिगवण, अकलूज आणि श्रीपूर यांसारख्या भागांना बायपास करून जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाप्रमाणेच या मार्गावरही स्वतंत्र पदयात्रा मार्ग, आधुनिक पूल, अंडरपास आणि बायपास मार्गांच्या सहाय्याने यात्रा अधिक सुरक्षित आणि वेळेवर होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पालखी मार्गांचा विकास केवळ रस्ते बांधकामापुरता मर्यादित नसून, तो एक समग्र विकास मॉडेल म्हणून साकार झाला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सदर पालखी मार्गावर पॅकेज क्र. २ व ३ वर सुमारे ४०० वृक्षांचे पुनर्स्थापन (ट्रान्सप्लांटेशन) यशस्वीरीत्या करून त्यांचे संगोपन केले गेले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बारामती, निमगाव केतकी, भवानीनगर, बावडा, अकलूज व श्रीपूर/बोरगाव याठिकाणी बायपास रस्ते प्रस्तावित केले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल आणि वाहतूक जलद गतीने होईल. महामार्गाच्या परिसरातील जलसंधारण क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जवळपास २५ तलावांचे खोलीकरण करून अतिरिक्त जलसाठी निर्माण करण्यात आला आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या २५ गावांना याचा फायदा झाला आहे. याठिकाणी आवर्जून स्व. अजितदादा पवार यांची आठवण येते. त्यांनी बारामतीच्या बायपासवर कान्हेरी गावाजवळ तलावाचे खोलीकरण करून घेतले होते. यामध्ये महामार्गाच्या कामासाठी जवळपास २ लाख क्युबिक मटेरियल काढून वापरण्यात आले. पुढे याचे खोलीकरण झाल्यावर तलावाच्या इरिगेशन मधून कॉंक्रीटचा सांडवा तयार करून घेतला. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूने हिंगणगडा व कान्हेरी येथे वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्ग निर्माण करून वन्य प्राण्यांचे अधिवास जतन केले आहेत. त्यामुळे प्राणी व वाहनांच्या अपघाताला आळा बसला आहे. #Palkhi_Marg_Inspection #SantTukaramMaharajPalkhiMarg #PalkhiMarg #पालखीमार्ग #PragatiKaHighway #GatiShakti

Nitin Gadkari

12,039 Aufrufe • vor 2 Monaten

आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते. - गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार! - मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट. - अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली. - भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत. - तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून? - सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. - जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल. सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का? - वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार. - आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल. - एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे. - देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? - काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली? - तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे. - मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत. - माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू. - हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते. - ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. - माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा. - ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते. - जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो. - 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.

Raj Thackeray

75,874 Aufrufe • vor 7 Monaten

🛫Navi Mumbai airport will start functioning next year. 🛫Nanded, Latur airport works have come to a standstill. The company that was given the work hasn't paid the dues. AG's opinion will be taken and we will expedite this work. 🛫An authority will be formed for proper airport management, and decision will be taken within 3 months. 🛫We are constructing a ₹650 crore terminal building at Shirdi airport. 🛫नवी मुंबई विमानतळ पुढच्यावर्षी सुरू होतो आहे. 🛫नांदेड, लातूर विमानतळांचे काम खोळंबले आहे. ज्यांना काम दिले, त्यांनी बकाया रक्कम भरलेली नाही. त्यावर राज्याच्या महाधिवक्ता यांचे मत घेण्यात येईल, आणि या कामाला गती देण्यात येईल. 🛫विमानतळ व्यवस्थापनासाठी एक संस्था तयार करण्यात येईल, याचा निर्णय 3 महिन्यात करण्यात येईल. 🛫शिर्डी येथे ₹650 कोटी रुपये खर्च करून टर्मिनल बिल्डिंग तयार करतो आहे. (विधानसभा । दि. 21 जुलै 2023) #MonsoonSession2023 #Monsoon2023 #Monsoon #Maharashtra #Mumbai #airports #connectivity #NaviMumbai #NaviMumbaiAirport #Nanded #Latur #Shirdi

Devendra Fadnavis

476,946 Aufrufe • vor 3 Jahren

भर पावसात घाटकोपर पूर्व परिसरात ठिकठिकाणी महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी, स्थानिक यंत्रणेला दिल्या सूचना 🔹मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक ३ जुलै २०२६) त्या प्रतिनिधित्व करीत असलेल्या निवडणूक प्रभाग क्रमांक १३२ (घाटकोपर पूर्व) मधील विविध भागांचा भर पावसात प्रत्यक्ष दौरा केला. मुसळधार पावसाचा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि योग्य त्या उपाययोजना तातडीने व्हाव्यात, यासाठी महापौरांनी प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन विविध ठिकाणी पाहणी केली आणि आवश्यक निर्देश दिले. 🔹या पाहणी दौऱ्यात स्थानिक आमदार श्री. पराग शाह, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी यांच्यासह महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी व अभियंता उपस्थित होते. 🔹घाटकोपर पूर्व परिसरातील सखल आणि अतिसखल भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी विशेष लक्ष दिले आहे. आजच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुढीलप्रमाणे महत्त्वाच्या सूचना व निर्देश दिले. 🔹संपूर्ण मतदारसंघात पुनर्विकास (Redevelopment) होत असलेल्या सर्व इमारतींच्या बाहेर पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन गटारे बांधण्याचे तसेच मॅनहोल्सवर मजबूत झाकणे लावण्याचे आदेश देण्यात आले. संकल्प सेवा जवळील रुपारेल इमारतीच्या बाहेर संपूर्ण गटार नव्याने बांधण्याचे काम तातडीने हाती घेण्यास सांगितले. 🔹सत्कार आणि सुखदा इमारतीबाहेर साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नवीन नलिका बांधण्यात येतील. तसेच विद्याभवन रस्ता, भजन समाज मार्ग (गारोडिया पॅलेस समोर) पदपथावर ढापा झाकण लावण्याच्या सूचना महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिल्या. 🔹डॉ. हेडगेवार उद्यानाजवळ नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकावी, जेणेकरून भर रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी थांबून ते थेट पर्जन्य जल वाहिनीद्वारे वाहून जाईल, असे महापौरांनी सांगितले. पुष्प विहार मार्गावर ठिकठिकाणी पदपथालगत नलिकांवर जाळ्या व झाकणे लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. 🔹प्रगती चाळीच्या प्रवेशद्वारावरील मॅनहोलवर नवीन बांधकाम करून सुरक्षित झाकण लावावे. तसेच, प्रगती चाळीच्या पाठीमागे असलेल्या नाल्याला दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे (Railing) उभारावे. याशिवाय, नागरिकांना नाला ओलांडून शौचालयात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग आणि त्यावर संरक्षक कठडे तयार करण्याचे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले. 🔹दरम्यान, नाथ पै रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या पार्किंगमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी येथे 'नो पार्किंग' अंमलबजावणी करण्याच्या आणि मेट्रो उड्डाणपुलाखाली पादचाऱ्यांसाठी सुरक्षित 'क्रॉसिंग' देण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक पोलिस विभागाला दिल्या. 🔹गारोडिया नगर फेडरेशनच्या जागेवर कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून खासगी जागेमध्ये सुंदर उद्यान (Garden) विकसित करण्याचे नियोजन करावे, असे महापौरांनी उद्यान विभागाला सूचित केले. तसेच, रस्त्यांच्या कामांमुळे झाडांना इजा पोहोचू नये म्हणून झाडांची मुळे मोकळी राखण्याचे निर्देशही दिले. यासोबतच, श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्वान लसीकरण आणि निर्बीजीकरण मोहीम वेगाने राबवण्याच्या सूचना संबंधित विभागाला महापौरांनी दिल्या. 🔹पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षा आणि सोयी-सुविधांना महानगरपालिकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभागात अनेक सखल परिसर आहेत. तेथील पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने व्हावा आणि पायाभूत कामे दर्जेदार व्हावीत यासाठी स्थानिक प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे, असे महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या. 🔹भर पावसात महापौर श्रीमती रितू तावडे, आमदार श्री. पराग शाह, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी आणि इतर लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून पाहणी करीत असल्याने स्थानिक नागरिकांनी या पाहणीचे स्वागत केले. निर्देश दिलेली सर्व कामे वेगाने पूर्ण होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

36,883 Aufrufe • vor 1 Monat