Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

बारामती आणखी प्रगत होणार, विकासाचा वेग दुपटीनं वाढणार..!

14,973 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

It's Shree profil fotoğrafı
It's Shree1 yıl önce

धनंजय मुंडे चा राजीनामा मागतोय संपूर्ण महाराष्ट्र. एवढे दबून भिऊन का आहेत त्याला ?

संतोष profil fotoğrafı
संतोष1 yıl önce

संतोष देशमुखांना न्याय द्यायला तुमी कमी पडत आहात. त्याना सरकार तर्फे 2 कोटी रू मदत तरी द्या. अपघाती मरणार्या परप्रांतीय मजूराच्या बायकोला 50 लाख देता. आपल्याच मराठी माणसाला मदत का करत नाही?

Yogesh Hagavane profil fotoğrafı
Yogesh Hagavane1 yıl önce

बारामतीच्या विकास कामातून जर वेळ भेटला असेल तर जरा बीड प्रकरणावर व्यक्त व्हा 🙏🏻

माऊलीभाऊ profil fotoğrafı
माऊलीभाऊ1 yıl önce

सगळा निधी बारामती ला घेऊन जा आणि उरलेला बिड ला द्या... आम्ही टॅक्स भरून भरून मरतो...

UmaKant profil fotoğrafı
UmaKant1 yıl önce

Ya desha la pude yenyasathi brastwadi gundagardi party pude geun jaiel ka

Rahul SR profil fotoğrafı
Rahul SR1 yıl önce

आदरणीय दादा.तुम्ही सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये राज्यातील हजारो युवक बेरोजगारी पासून वाचले आहे.तुम्हाला विनंती आहे की,जे प्रशिक्षणार्थी सध्या विविध प्रकारच्या शासकीय आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत कुपया त्यांचा कालावधी हा सहा महिने

Harshada Patil profil fotoğrafı
Harshada Patil1 yıl önce

धनंजय मुंडे चांगला विकास करताय

Aryan rajguru profil fotoğrafı
Aryan rajguru1 yıl önce

दादा मी बारामती(पुणे) तालुक्यातील एक सैनिक 💂🏻‍♂️असून सध्या आंध्रप्रदॆश(नक्सल क्षेत्र) येथे पोस्टिंग आहे. घराच्या रस्त्या संदर्भात समस्या आहे. दादा आजून पर्यंत कोणतीही कार्यवाही पुण्याचे जिल्हाधिकारी व बारामती तहसिलदारा कडून होत नाही .

Random Bhakt profil fotoğrafı
Random Bhakt1 yıl önce

Look beyond Baramati… Sharad Pawar also did the same thing for 50 years and thing is Barmati is still developing …

social profil fotoğrafı
social1 yıl önce

No vote if Munde not give resignation

Benzer Videolar

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शहर विभागातील भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे जिओपॉलिमर अस्तराचे खंडकविरहित तंत्रज्ञानाद्वारे (Storm Water Arch Drains By Geopolymer Lining Trenchless Technology) मजबुतीकरण करण्यात येत आहे. यामुळे सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या ब्रिटिशकालीन कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे आयुष्य किमान ५० वर्षांनी वाढणार आहे. तसेच अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाजवळील शांतिनिकेतन पर्जन्य जल पातमुख (आऊटफॉल) जवळ सुरू असलेल्या जिओपॉलिमर अस्तरिकरणाची ही चित्रफीत... #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

12,991 görüntüleme • 3 ay önce

🚇 पुणे मेट्रो मार्गिका ३ : प्रगतीला वेग देणारे नवे पर्व! ✅ पुणे मेट्रोच्या ‘हिंजवडी माण ते शिवाजीनगर’ या २३.२०३ किमी लांबीच्या महत्त्वपूर्ण मार्गिकेवरील ट्रायल रन चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, व्यावसायिक सेवा सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. या यशस्वी चाचणीमुळे लवकरच नागरिकांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि जलद मेट्रो सेवांचा लाभ मिळणार आहे. 💼 हिंजवडी आयटी पार्क, शैक्षणिक संस्था आणि प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारी ही मार्गिका हजारो आयटी व्यावसायिक, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ‘गेम-चेंजर’ ठरेल. 🌿 वाहतूक कोंडी कमी करून वेळेची बचत, प्रदूषणात घट आणि पर्यावरणपूरक प्रवास यामुळे पुणे महानगर अधिक स्मार्ट, गतिमान आणि शाश्वत बनणार आहे. 🏗️ पुणे महानगराच्या आधुनिक पायाभूत सुविधांकडे वाटचाल करत, शहरी विकासाचा नवा आदर्श निर्माण करणारे हे एक महत्वाचे पाऊल! #MetroLine3 #TrialRun #HinjewadiITPark #HinjawadiShivajinagar #Metro #UrbanMobility #PMRDA

PMRDA

23,284 görüntüleme • 5 ay önce

तलाठी भरतीतील गैरप्रकार ताजा असतानाच काल पुन्हा सारथी, बार्टी आणि महाज्योतीमार्फत पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेचाही पेपर फुटला.. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? वारंवार होणाऱ्या #पेपरफुटी मुळं प्रामाणिक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत असून त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय. त्यामुळं #पेपरफुटी वर कडक कायदा करा अशी मागणी युवांनी आणखी किती वेळा करायची? युवांना #SERIOUS होण्याचा सल्ला देत असताना आपल्या जबाबदारीबाबत आपण #SERIOUS होणार की नाही? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil

Rohit Pawar

32,028 görüntüleme • 2 yıl önce

बारामती येथे होणाऱ्या विभागास्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासंदर्भात आढावा बैठक झाली. महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रमांचं काटेकोर नियोजन करावं, असे निर्देश संबंधितांना बैठकीत दिले. इतर विभागस्तरीय मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता बारामतीत २ आणि ३ मार्च असे दोन दिवस नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याबरोबरच बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचं उद्घाटन, पोलिसांसाठीच्या घरांचं लोकार्पण, पोलीस विभागाला देण्यात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचं लोकार्पण, सीसीटीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचं उद्घाटन, बारामती बसस्थानकाचं लोकार्पण आदी कार्यक्रम होणार आहेत. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारक, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या ठिकाणीही कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्याकरिता बंदिस्त दालन, विविध स्टॉल्स, पिण्याचे पाणी, कार्यक्रम स्थळी स्वच्छतेच्या सुविधा, वाहनतळ, अल्पोपहार, बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही, एलईडी डिस्प्ले, जनरेटर आदी सुविधांची उत्तम व्यवस्था करावी. या मेळाव्यामध्ये रोजगार इच्छुक असणाऱ्या दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तिथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्यासाठी नाव नोंदणी करून रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असं आवाहन आहे. ह्या मेळाव्यात युवक व युवतींनी सहभागी होण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि नियुक्तांसाठी (For Employer registration) हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Ajit Pawar

24,582 görüntüleme • 2 yıl önce

धाराशिव शहराच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय! उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामे : • आठवडी बाजार विकसित करणे – ८ कोटी रुपये • राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करणे – ५ कोटी रुपये • छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे – ३ कोटी रुपये • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करणे – २ कोटी रुपये एकूण मंजूर निधी – १८ कोटी रुपये या कामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. धाराशिवच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ देणारे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार! धाराशिवच्या विकासाचा हा प्रवास असाच वेगाने सुरू राहील. #धाराशिव #विकासकामे #एकनाथशिंदे #धाराशिवशहर #विकास #जनतेच्यासेवेसाठी #महाराष्ट्रसरकार #धाराशिवनगरपरिषद #OmrajeNimbalkar #EknathShinde #DharashivDevelopment

Omprakash Rajenimbalkar

139,174 görüntüleme • 1 ay önce

📍संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 🛣️ पालखी मार्ग निरीक्षण दर वर्षी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि विना अडथळ्यांची व्हावी या उद्देशाने श्रद्धा व आधुनिकतेचा प्रभावी संगम साकारत पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) कामाचे आज राज्याचे कृषीमंत्री श्री Dattatray Bharane जी, आमदार श्री Rahul Subhash Kool जी, माजी आमदार श्री Harshvarrdhan Patil जी यांच्यासह निरीक्षण केले. भारत भूमीच्या सनातन परंपरेत वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजेच ‘वारी’ ही श्रद्धा, तपस्या आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. दर वर्षी आषाढी एकादशीच्या पर्वावर लाखो वारकरी पालखी समवेत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मात्र अनेक वर्षे ही वारी विविध आव्हानांना, अडचणींना सामोरे जात होती. या समस्यांवर उपाय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) या मार्गांचा व्यापक पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला, जो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांची वारी आता सुखकर व आल्हाददायक होणार आहे. देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) हा पाटस ते पंढरपूर असा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. ४,४१६ रुपयांच्या तरतुदीतून उभारण्यात येत असलेला हा मार्ग वारकऱ्यांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवून विकसित करण्यात येत आहे. पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा ३ पॅकेजमध्ये या मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून इंदापूर ते तोंडले भागाचे काम ९६% आणि बारामती ते इंदापूर भागाचे काम ८४% पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण केले जाईल. हा महामार्ग बारामती, भिगवण, अकलूज आणि श्रीपूर यांसारख्या भागांना बायपास करून जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाप्रमाणेच या मार्गावरही स्वतंत्र पदयात्रा मार्ग, आधुनिक पूल, अंडरपास आणि बायपास मार्गांच्या सहाय्याने यात्रा अधिक सुरक्षित आणि वेळेवर होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पालखी मार्गांचा विकास केवळ रस्ते बांधकामापुरता मर्यादित नसून, तो एक समग्र विकास मॉडेल म्हणून साकार झाला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सदर पालखी मार्गावर पॅकेज क्र. २ व ३ वर सुमारे ४०० वृक्षांचे पुनर्स्थापन (ट्रान्सप्लांटेशन) यशस्वीरीत्या करून त्यांचे संगोपन केले गेले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बारामती, निमगाव केतकी, भवानीनगर, बावडा, अकलूज व श्रीपूर/बोरगाव याठिकाणी बायपास रस्ते प्रस्तावित केले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल आणि वाहतूक जलद गतीने होईल. महामार्गाच्या परिसरातील जलसंधारण क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जवळपास २५ तलावांचे खोलीकरण करून अतिरिक्त जलसाठी निर्माण करण्यात आला आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या २५ गावांना याचा फायदा झाला आहे. याठिकाणी आवर्जून स्व. अजितदादा पवार यांची आठवण येते. त्यांनी बारामतीच्या बायपासवर कान्हेरी गावाजवळ तलावाचे खोलीकरण करून घेतले होते. यामध्ये महामार्गाच्या कामासाठी जवळपास २ लाख क्युबिक मटेरियल काढून वापरण्यात आले. पुढे याचे खोलीकरण झाल्यावर तलावाच्या इरिगेशन मधून कॉंक्रीटचा सांडवा तयार करून घेतला. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूने हिंगणगडा व कान्हेरी येथे वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्ग निर्माण करून वन्य प्राण्यांचे अधिवास जतन केले आहेत. त्यामुळे प्राणी व वाहनांच्या अपघाताला आळा बसला आहे. #Palkhi_Marg_Inspection #SantTukaramMaharajPalkhiMarg #PalkhiMarg #पालखीमार्ग #PragatiKaHighway #GatiShakti

Nitin Gadkari

12,039 görüntüleme • 2 ay önce

🚆 पुणे मेट्रो लाईन-३ लवकरच आपल्या सेवेत! 🔥 🚇 माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर... पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला मिळणार वेग, सोय आणि आधुनिकतेची जोड! 🏁 ‘मेट्रो लाईन ३’ चे काम अंतिम टप्प्यात असून, महानगराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवण्यास सज्ज आहे. आयटी हब हिंजवडीपासून पुण्याच्या मध्यवर्ती भागापर्यंतचा प्रवास आता अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. ✅ मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट ✅ प्रकल्पाचे तब्बल ९४.२०% काम पूर्ण ✅ सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी व सुरक्षा तपासणी (RDSO/CMRS) पूर्ण ✅ शिवाजीनगर ते हिंजवडी अंतर आता काही मिनिटांत पार ✅ सार्वजनिक-खासगी भागीदारीतील (PPP) देशातील पहिली मेट्रो लाईन ✨ पुणेकरांसाठी जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा अध्याय सुरू होण्याच्या उंबरठ्यावर…🚇 #PuneMetro #MetroLine3 #ComingSoon #SmartCityPune #HinjewadiToShivajinagar #FutureOfPune #ITPark #Connectivity

PMRDA

13,104 görüntüleme • 4 ay önce

महाराष्ट्र आता थांबणार नाही... सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही... असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... (विधानसभा, नागपूर | दि. 19 डिसेंबर 2024) #Maharashtra #Nagpur #ViksitMaharashtra

Devendra Fadnavis

18,833 görüntüleme • 1 yıl önce

पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही... ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे! पहिल्या पावसात झाड कोसळून एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला..आज साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला. हे अपघात नाहीत, तर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराच्या हत्या आहेत! मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? महापौर प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत, तर प्रशासन नेहमीप्रमाणे सूचना दिल्या,कारवाई सुरू आहे, चौकशी करू अशी उत्तर देत आहे. पण एकमेकांवर जबाबदारी ढकलताना यांना लाज वाटत नाही का? मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडण्याच्या एक-दोन नव्हे तर सलग तीन घटना घडल्या. मागील वेळी महापौरांच्या दौऱ्यात कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्यावर चौकशीचे आदेश दिले गेले होते. आता एका सामान्य मुंबईकराचा जीव गेला आहे...आता कोणाची चौकशी होणार? आणि त्या चौकशीतून मृत व्यक्ती परत येणार आहे का? मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी कारभाराची जबाबदारी महापौर, उपमहापौर आणि महापालिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. तुमच्या चौकशीने जीव गेलेल्या मुंबईकरांचा जीव परत येणार नाहीत. मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी आहे!

Prof. Varsha Eknath Gaikwad

23,255 görüntüleme • 29 gün önce

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दाैऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले. गाडी नादुरुस्त झाल्याने प्रवासी पर्यायी वाहनाची वाट पाहत तिथंच उन्हांत थांबले होते. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने हे प्रवासी आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही जणांना दुसऱ्या बसमधून खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर सोडण्याची विनंती केली. तर काही प्रवाशांना माझ्यासोबत असणाऱ्या गाडीतून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत आणले. याठिकाणी त्यांची तात्पुरती व्यवस्था केली. यातील बरेच प्रवासी सांगली आणि मिरजला जाणारे होते. यावेळी माझ्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि माझे काही सहकारी यांना प्रवाशांची सोय करण्याबाबत सांगितले. हे सर्वजण प्रवासी त्याच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये पाठवेपर्यंत थांबतील असा विश्वास दिला. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. तसेच प्रवाशांना टोलनाक्यापर्यंत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एसटी बसचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांचे आभार मानले. एसटी महामंडळाने आपण बाहेर सोडत असणारी प्रत्येक गाडी तपासून पाठविली पाहिजे. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील आजकाल वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Supriya Sule

110,641 görüntüleme • 3 yıl önce

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वाहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सांगितले. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती.त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे सांगितले. यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहन केले.

Supriya Sule

14,606 görüntüleme • 3 ay önce