Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

“माझ्यावर दाखल झालेला पहिला गुन्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी होता; आणि आज माझ्यावर दाखल झालेला दुसरा गुन्हा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा मला अत्यंत अभिमान आहे!“ - श्री. अमित राजसाहेब ठाकरे #MNVSAdhikrut #MNSAdhikrut

155,466 Aufrufe • vor 4 Tagen •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल. आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो #Nashik #RepublicDay

Prakash Ambedkar

77,117 Aufrufe • vor 7 Monaten

क्रांतिज्योती सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु होत आहे. या मालिकेत खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. डॉ कोल्हे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. या मालिकेसाठी त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा. एक चांगली मालिका रसिकांच्या भेटीस आणत असल्याबद्दल धन्यवाद...!

Supriya Sule

59,233 Aufrufe • vor 9 Monaten

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला. हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली. मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते.त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले.मी याबद्दल जाहीर माफी मागतो. गेली अनेक वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो ही बाब सगळ्यांना माहिती आहे.डॉ.बाबासाहेबांचा माझ्याकडून अनवधानाने झालेला हा अवमान माझ्यादेखील जिव्हारी लागलेला आहे. मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही.मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावलेली आहे.मात्र आज मी माफी मागतोय,कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील,हा विश्वास आहे.

Dr.Jitendra Awhad

96,784 Aufrufe • vor 2 Jahren

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा 'छावा' हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्यातल्या काही दृश्यांवरून वाद सुरु झाला. या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आज राजसाहेबांची भेट घेऊन छत्रपती संभाजी महाराजांवरचा हा सिनेमा आणि महाराजांच्या आयुष्यातील घडामोडी यावर चर्चा केली. यावेळी राजसाहेबांनी श्री. लक्ष्मण उतेकर यांना यातील वादग्रस्त दृश्य काढून टाकण्याची सूचना केली, ज्याला मान्यता देत ते भाग काढून टाकण्याची घोषणा लगेचच लक्ष्मण उतेकर यांनी माध्यमांसमोर बोलताना केली. #छावा #Chhava #RajThackeray #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

15,483 Aufrufe • vor 1 Jahr

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे मनःपुर्वक आभार. आपण माझ्यावर मतांच्या रुपात प्रेम आणि विश्वास दाखवला. याबद्दल मी नेहमी आपल्या ऋणात राहिल. काहीश्या फरकाने विजय हातून निसटला, हा पराभवही माझा लोकसेवेवरचा विश्वास अधिक वाढवणाराच आहे. तुमच्या प्रत्येक संघर्षात,अडचणीत आणि आनंदात मी सोबत आहे. या बरोबरच ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांनी मा.नरेंद्र मोदीजी साहेब आणि मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो. पराभवाने खचू नये विजयाचा उन्माद करु नये, ही शिकवण आम्हाला प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. येत्या शनिवारपासून मी पुन्हा जनसेवेत रुजु होतो आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता मुलुंडमध्ये 'जनता दरबार' भरवत आहे. ईशान्य मुंबईतील इतर भागातील जनता दरबार नियोजनाची माहिती आपणास लवकरच देण्यात येईल. आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं यासाठी उपस्थित रहावं, हीच विनंती. कळावे, आपला सेवक मिहिर कोटेचा

Mihir Kotecha (Modi Ka Parivar)

12,709 Aufrufe • vor 2 Jahren

SIT गठीत करण्याबाबत मा. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल. मला या विषयावर बोलायचे नव्हते, पण बोलावे लागते आहे. मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. ते हायकोर्टात टिकविले आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकविले. या संपूर्ण काळात सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी अनेक उपाय केले आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला आणि आजही होतो आहे. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे उभा राहिला आणि आहे. पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार? कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत! या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील? तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येते आहे आणि येईलच. मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल. छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉररूम कुणी सुरू केल्या, हेही तपासात पुढे येते आहे. एक नक्की हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल. अशी शिवीगाळ कुणालाही झाली, मग ते विरोधक का असेना, तर त्याच्यासोबत उभा राहणारा हा देवेंद्र फडणवीस पहिला असेल ! (विधानसभा । दि. 27 फेब्रुवारी 2024) #Maharashtra #SIT #BudgetSession #BudgetSession2024 #MarathaReservation

Devendra Fadnavis

253,211 Aufrufe • vor 2 Jahren

NEET परीक्षेत केंद्रसरकारने जो अभूतपूर्व गोंधळ घातला आणि त्याने विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालं त्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ ला सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सामील होतीलच पण त्यांच्या पालकांनी पण सामील व्हावे ही मनापासून विनंती. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे.

Raj Thackeray

229,573 Aufrufe • vor 1 Monat

'भीमा तुम्हा वंदना' 📘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विशेष माहिती पुस्तिका आज प्रकाशित करण्यात आली आहे. 📱'भीमा तुम्हा वंदना' या संकल्पनेवर आधारित या पुस्तिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित गीतांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. ही सर्व गीते वाचकांना ऐकता यावीत, यासाठी क्यूआर कोड देखील पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. 🔹महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे दादर येथे चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुरवलेल्या नागरी सेवा सुविधांची माहिती देखील पुस्तिकेत समाविष्ट आहे. 🔗ही पुस्तिका बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्यासाठी कृपया पुढील लिंकचा उपयोग करावा. #MyBMCUpdates #MahaparinirvanDiwas #महापरिनिर्वाणदिन

माझी Mumbai, आपली BMC

28,771 Aufrufe • vor 1 Jahr

तरुणांच्या आंदोलनाचा विजय झाला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं. आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कोणाशी बोलणार नाही, आम्हाला कोणी सांगायचं नाही असा या सरकारचा जो माज होता तो या आंदोलकानी उतरवला. यासाठी या देशातील तमाम तरुण-तरुणीचं आणि त्यांच्या पालकांचं मनापासून अभिनंदन. हे अभिनंदन करण्यासाठी आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. उद्या २६ जुलै २०२६ ला जो तिरंगा मार्च होणार होता त्याचं रूपांतर विजयोत्सव सोहळ्यात होत आहे. उद्या ठरलेल्या वेळेतच सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आपण सगळे ठरलं तसं जमणार आहोत. देशभरातील तरुण-तरुणींनी केलेल्या संघर्षाचं कौतुक आणि अभिनंदन करणार आहोत. तेंव्हा आपलं ठरलं आहे तसं भेटूया. पत्रकार परिषदेत बाकी जे काही बोललो त्याची चित्रफीत सोबत जोडली आहे.

Raj Thackeray

99,408 Aufrufe • vor 1 Monat

मराठी भाषा गौरव दिन..... कविवर्य कै. विष्णू वामन शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन‘ साजरा केला जातो. मराठी भाषेचा इतिहास हा कैक शतकांचा इतिहास आहे. तिची जडणघडण, तिच्यातील बोली, व्याकरण आणि शब्दसिद्धी उत्तरोत्तर बहरत गेली आहे. भाषेचे वहन सामान्य माणूस आणि प्रतिभासंपन्न साहित्यिकांच्या एकत्रित यत्नांनी होत असते. मराठी भाषेची वाटचाल पाहता, अनेक लेखक, कवी, नाटककार, निबंधकार, पत्रकार, समीक्षक आणि तितक्याच सापेक्षी वाचकांनी तिच्या उन्नतीत भरघोस योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहारकोषाच्या माध्यमातून मराठीवरील फारसी भाषेचे आक्रमण थोपवून धरले. आज हिंदी व इंग्रजीचा आक्रमक विस्तार तसेच नुकसान करू पाहते आहे. त्यामुळे मराठी भाषेतील कथा, कादंबऱ्या, नाटके, निबंध आणि कविता यांच्या वाचनाची आवड नव्या पिढीत निर्माण करणे हे जरुरीचे कर्तव्य झाले आहे. मराठी बोलणे आणि लिहिणे हा आपल्या जीवनक्रमाचा मूलभूत भाग करण्याचा संकल्प यानिमित्ताने सोडणे आणि त्यावर अंमल करणे गरजेचे आहे. मराठी भाषा आणि मराठी नागरिकांना उदंड यश लाभो, या सदिच्छेसह ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !! #मराठीसाहित्य #मराठीलेखणी #marathi #maharashtra

Shekhar

20,691 Aufrufe • vor 6 Monaten

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राज्याच्या व देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या विचारांना जागत, येवला-लासलगावच्या जनतेच्या आणि समस्त ओबीसींच्या विश्वासाच्या, आशीर्वादाच्या जोरावर आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची शपथ घेतली. महाराष्ट्राला विकासाचा रोडमॅप दाखवणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा व सर्वसमावेशक कामाचा आणि माझे बंधू लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षमय व झुंजार वाटचालीचा आदर्श सदैव माझ्यासमोर राहील. तसेच भारतीय संविधानाची तत्वे, विचार व आदर्शांवर चालत समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे व झोकून देऊन काम करण्याचा निश्चय मी पुन्हा एकदा या निमित्ताने केला आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहेतच, असा मला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे मी मनापासून आभार मानतो. #maharashtracabinet #cabinetoath #publicservicecommitment #jaimaharashtra

Chhagan Bhujbal

22,304 Aufrufe • vor 1 Jahr