Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे, विरोध करु नका! 🙏

29,232 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.

Supriya Sule

191,134 görüntüleme • 3 yıl önce

कालपर्यंत चर्चेला तयार असलेल सरकार आज प्रतिसाद देताना दिसत नाही त्यात मुख्यमंत्री गणेशोत्सव महत्वाचा म्हणून आडमुठेपणा करताना दिसत आहे…..! तेव्हा हे आंदोलन जास्त काळ चालेल आसे वाटायला लागलंय तसे झालेच तर मुंबईत गेलेल्या आपल्या मराठा बांधवांची मुख्य जबाबदारी हि पुणे जिल्हा व नाशिक जिल्ह्यावर असणार आहे…! तेव्हा दोन्ही जिल्ह्यातील मराठा बांधवांनी आतापासुनच नियोजन करत तयारी ठेवा मराठा आरक्षण आंदोलन लांबलेच तर मुंबईतील आपल्या बांधवांच्या फक्त जेवनाची रसद मुंबईत पुरवण्याची महत्वाची जबाबदारी ही दोन्ही जिल्ह्यातील सर्व लोकांनी पार पाडायची आहे ती जबाबदारी स्वतः जरांगे पाटलांनी तुमच्याकडे दिलेली आहे तेव्हा तयारीत रहा ..!🙏🙏 #चलो_मुंबई #मराठा_आरक्षण #चला_मुंबई

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

16,158 görüntüleme • 1 yıl önce

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही... मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये... मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये. जालना जिल्ह्यातील आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या आंदोलनाचे नेते जरंगे पाटील यांच्याशी मी संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही सुरु होती. परंतु, त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. जरंगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची मी विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यांच्या जीवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी आणि एसपी तिथे गेले. जरंगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे अशी विनंती त्यांना केली जात होती. मात्र, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. नागरिकांनी आणि मराठा समाज बांधवांनी शांतता राखावी. माझी मराठा समाजाला आंदोलकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. मराठा समाजाला मी आवाहन करतो की, त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. हे शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे आहे.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

221,045 görüntüleme • 3 yıl önce

देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबतीत जातीचे घाणेरडे राजकारण सुरु आहे. मग मराठा नसलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे चालले. शरद पवार यांच्यासमोर मी लहान तरीही प्रश्न विचारतो जातीचा प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे हे मराठा नाहीत ते तुम्हांला चालतात त्यांच्या मुखपत्रात मुका मोर्चा बोलतात आमच्या वंशजांचा पुरावा मागितला जातो ते कसे चालतात माझा जुना व्हिडिओ फिरवला जात आहे मी मान्य करतो पण मुख्यमंत्री असताना टिकणारे आरक्षण देत त्यांनी आमचे तोंड गप्प केले मग आमच्या फडणवीस साहेबांबाबत का जातीचे राजकारण करत आहात याचे उत्तर समाजाला हवे आहे याबाबत लवकर उत्तर द्या नाहीतर फडणवीस यांबाबत घाणेरडे राजकारण सुरु आहे ते थांबवा फडणवीस यांनी भ्रष्टाचार थांबवला, खूप लोकांना कामाला लावले त्यांच्याविषयी जो राग आहे, त्यातून ही वैयक्तिक टीका केली जात आहे..

Nitesh Rane

67,122 görüntüleme • 3 yıl önce

भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे. “भाजपने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवले आहे.” जगन्नाथ डी. होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात, न्यायालयाने पॅराग्राफ 13 मध्ये म्हटले आहे की, सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधता येणार नाही. त्याआधीच्या पॅराग्राफमध्ये “कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे” असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलय की, सर्व मराठा हे कुणबी आहेत, असं सरसकट धरता येत नाही. त्यामुळे भाजपने जीआर मार्गे काढलेला निर्णय चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. “ओबीसींना स्वतःच्या हक्कासाठी आता लढा द्यावा लागेल. आंदोलन, मोर्चे, बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणणे गरजेचे आहे.” वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे की, मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाचे ताट वेगळे असले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. मात्र, शासनाने सर्व मराठे कुणबी समजावेत, असा जीआर काढून भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे व उबाठा, मराठा समाज यांनाही गंडवले आहे. #MarathaReservation #Maharashtra

Prakash Ambedkar

11,781 görüntüleme • 11 ay önce