Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

ही कसली एनसीसीची ट्रेनिंग? हे तर अमानुषपणे मारले जात आहे 😐

166,522 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 9

Фото профиля गोल्या
गोल्या3 лет назад

जवळपास असंच असतं. हे अतीच आहे म्हणा. आम्ही हायस्कुलला असताना आमच्या सिनियरने ओल्या फोकाने पायांच्या लवनीवर असे फटके मारले होते. उभं राहता येत नव्हतं, वळ सुजले होते, काहींच्या जखमा झालेल्या. ट्रेनिंग संपल्या संपल्या सगळ्यांनी सरांकडे तक्रार देऊन त्याला निलंबित करायला लावलेलं.

Фото профиля Mandar
Mandar3 лет назад

हे ट्रेनर घरचा राग काढत आहेत की काय ??

Фото профиля vir jadhav
vir jadhav3 лет назад

@HQ_DG_NCC देशप्रेम म्हणून काय पण प्रकार चालू आहे का. इथ सिलेक्ट झालेली पोर सैन्यात डायरेक्ट टॉप rank वर घेतात का म्हणून अनुशासन च्या नावाखाली असले प्रकार चालू आहे.

Фото профиля Peter-endra Griffin 🇮🇳
Peter-endra Griffin 🇮🇳3 лет назад

This trainer needs to be arrested...This is NCC, not Al Qaeda

Фото профиля Avinash  🇮🇳
Avinash 🇮🇳3 лет назад

😡😡😡😡😡 आम्ही शाळेला असताना देखील असा एक भिकार शिक्षक होता .. कोण थांबवणार हे..???

Фото профиля Gautam Morarka
Gautam Morarka3 лет назад

This instructor should be arrested immediately and charged under relevant non bailable offences . Vase filed sgsinst the college also. Totally #inhuman

Фото профиля उमेश पाटील Umesh Patil
उमेश पाटील Umesh Patil3 лет назад

नवीन भारत घडवायचा आहे. भविष्यातील दहशतवादी घडवत असावेत बहुतेक....

Фото профиля Aniket Gawade
Aniket Gawade3 лет назад

ही शिक्षा नाहीये ही खुलेआम केलेली मारहाण जर कोणी याला शिक्षा म्हणत असेल त्यानी मेंदु तपासावा आपला

Фото профиля Vivek Gaikwad
Vivek Gaikwad3 лет назад

मणिपूर ला किंवा चीन बॉर्डर वर पाठवा यांना

Похожие видео

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज स्थानिक पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही. गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे? ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही. #pressconference

Sharad Pawar

80,241 просмотров • 3 лет назад

साताऱ्यातील शीतल दनावले या महिलेला ती सोशल मीडियावर भाजपाला अडचणीत आणणारे व्हिडिओ टाकते म्हणून भाजपाचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. तीची पोलीसांकडे तक्रार करत आहेत तसेच तीच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जात आहे. महिलांना न्याय देण्याच्या मोदीजींची इच्छेला फडणवीसांच्या राज्यात भाजपा कसे मूर्त स्वरूप देत आहे हे त्या महिलेनेच सांगितले आहे. भाजपाचे महिलांना न्याय देण्याचे ढोंग हे मणिपूर असेल, हाथरस असेल किंवा महिला खेळाडूंच्यावरील अत्याचारातून समोर आले आहेच. भाजपातील बलात्काराच्या आरोपी नेत्यांची संख्याही अभूतपूर्व आहे. मात्र महिलांचा आवाज दाबण्यासाठी किती खालच्या स्तरावर भाजपाचे कार्यकर्ते जात आहेत हे ही स्पष्ट होते. या महिलेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सातारा पोलीस आणि राज्य सरकारची आहे हे लक्षात ठेवा.

Sachin M. Sawant सचिन सावंत

19,298 просмотров • 3 месяцев назад

संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला ! गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीने संपविण्यात आले होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असेल अन् त्याची कातडी सोलली जात असेल तर आपणाला खरंच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचे नमूद करून सरकारचा उल्लेख "निर्दयी" असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल तर मी उल्लेख केलेला निर्दयी हा शब्द किती योग्य आहे, याची प्रचिती येते. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालहाल करून मारले जात असेल तर या गोरगरीब, दलित समाजातील तरूणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल !

Dr.Jitendra Awhad

130,248 просмотров • 1 год назад

संगमनेर मध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तीना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे, राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही? कीर्तनकार आता काँग्रेस नेत्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देणार, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार हे योग्य आहे का? राजकारण एक बाजूला पण उघडपणे नेत्यांना जीवे मारण्याची धमकी कीर्तनकारांनी देणे हे सर्व मर्यादा ओलांडणे आहे. महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला कधीच गेले नव्हते.

Vijay Wadettiwar

13,294 просмотров • 1 год назад