
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
@NCPspeaks • 764,922 subscribers
Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Shorts
Videos

परळीत लोकशाहीला धक्का आणि हुकुमशाहीने शिक्का?
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar117,774 views • 1 year ago

मुंबईच्या महापौर माननीय रितू तावडे यांनी मान्य केलंय की, मुलुंड मेट्रो दुर्घटना ही निष्काळजीपणामुळे घडली. महापौर महोदयांनी संवेदनशीलपणे केलेले हे प्राथमिक विश्लेषण नक्कीच स्वागतार्ह आहे. पण, महापौर महोदयांनी आणि महायुती सरकारने मुंबईकरांना पडलेल्या 'या' प्रश्नांचाही तातडीने खुलासा करायला हवा. १. हा निष्काळजीपणा नेमका कुणाचा? ठेकेदार कंपनीचा? की MMRDA प्रशासनाचा? ठेकेदार असेल तर त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणार का? २. या दुर्घटनेची सखोल चौकशी कोणत्या स्तरावर होणार? ठरावीक कालमर्यादेत ही चौकशी पूर्ण होणार का? ३. या दुर्घटनेची कारणे तुम्ही कधीपर्यंत शोधून काढणार? की चौकशीचं तुमचं आश्वासन हे आम्ही फक्त हवेतील गोळीबार समजायचा? ४. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना तुम्ही ५ लाखांची आर्थिक मदत दिली. माणसाच्या जिवाची किंमत इतकी स्वस्त आहे का? मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत तुम्ही सामावून घेणार का? ५. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. त्या ठिकाणाहून जाताना मुंबईकरांच्या मनात भीती आहे. त्यांना सुरक्षिततेची हमी तुम्ही देणार का?
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar33,253 views • 4 months ago

पुलवामा हल्ला झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच पाकिस्तानी कंपनीने भाजपला निधी देण्यासाठी SBI कडून इलेक्ट्रोल बाॅन्ड घेतले होते. परंतु देशभक्तीवर बोलणा-या भाजपने इलेक्ट्रोल बाॅन्ड देण्यापासून SBI ला का रोखले नाही ? जवानांच्या बलिदानापेक्षाही भाजपला इलेक्ट्रोल बाॅन्ड महत्त्वाचे वाटले का ?
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar123,131 views • 2 years ago

आपल्याला "भारत का बच्चा बच्चा..." ह्या गाण्यात मश्गुल ठेवून भाजपा नेत्याचा मुलगा तब्बल ३ वर्ष २५-३० अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करत राहिला, त्यांचे व्हिडीओ प्रसारित करु लागला... मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांना हृदयात स्थान देणाऱ्या आपल्या सर्वांना हे असं 'भाजपाई रामराज्य' नको !
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar20,047 views • 3 months ago

लोकशाहीच्या उत्सवात ठोकशाहीने मतांची बेगमी करणारे धनंजय मुंडे गटाचे गुंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस माधव जाधव यांना मारहाण करतात हे निंदनीय आहेच पण राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचे द्योतक सुद्धा आहे. अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतो..!
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar55,325 views • 1 year ago

मतांसाठी लाडक्या बहिणीचे गोडवे गायचे तर कधी त्याच राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांशी विशेषत: महिला अधिकाऱ्यांशी शेलक्या भाषेत बोलणं करायचं ही वागणूक अक्षम्यच. राज्यतील महिला पोलिस या सत्ताधाऱ्यांची लाडकी बहिण नाही का हे त्यांनी स्पष्ट केलच पाहीजे.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar50,850 views • 1 year ago

आज प्रश्न महामार्गाचा नाही, तर सरकारच्या संवेदनशीलतेचा आहे. 'शक्ती'चा वापर लोकांच्या कल्याणासाठी व्हायला हवा, लोकांवरच 'शक्ती' दाखवण्यासाठी नव्हे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि न्याय्य तोडगा काढावा.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar13,719 views • 4 months ago

“आदरणीय पवार साहेबांच्या साथीने महाराष्ट्राच्या हिताचा लढा पुरोगामी विचारांनी लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंत पाटील यांच्या पुढाकारातून 'एकनिष्ठतेची मोहीम' राबवण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि तुमचे अधिकृत डिजीटल कार्ड डाऊनलोड करून घ्या!"
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar42,660 views • 2 years ago

थोरामोठ्यांचा आदर करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रत्येक घराघरात हेच संस्कार केले जातात. परंतु, जेव्हा स्वार्थाचा विचार मनात येतो, तेव्हा सगळी नाती मागे पडतात आणि अशातच मग घर आणि पक्ष फोडावा लागला तरी कसलाच विचार लोक करत नाही. #Maharashtra #RiteishDeshmukh
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar31,076 views • 2 years ago

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले असून, देशातील अत्यंत कठीण काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यामुळे देशासमोरील खरे शत्रू कोण आहेत, हे त्यांना नेमकेपणाने ज्ञात आहे. राज्यात तसेच देशात धार्मिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी नेहमीच सजगपणे पावले उचललेली आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी परिस्थितीला ज्या संवेदनशीलतेने आणि दक्षतेने हाताळले, त्याचे स्मरण आजही प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात आहे. त्यामुळे शरद पवार काय व्यक्तिमत्त्व आहे, हे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला माहिती आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली वक्तव्यं ही देश विघातक शक्तींना बळ न देता, सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठीच आहे. ज्या नागरिकांना पवार साहेबांच्या विचारांची जाण आहे, त्यांना त्यांची भूमिका पूर्णपणे समजलेली आहे. त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद नीट ऐकली तर लक्षात येते की त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.. "धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य कोणीही करू नये." आणि अशीच समतोल भूमिकेबद्दल काही जण चुकीचा प्रचार करत आहेत. हे दुःखद असून त्यामागील हेतू जाणून घेण्याची गरज आहे. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय पर्यटकांनी अनुभवलेली भीती जितकी तीव्र होती, तितकेच माणुसकीची जाणीव तिथल्या अनेक काश्मिरी नागरिकांनी दाखवली. संकटाच्या त्या काळात मदतीला धावून गेलेली माणसे कोणत्या धर्माची होती, हे न सांगता, केवळ एकाच पद्धतीची मांडणी केली जात असेल, तर तो कुणाच्यातरी राजकीय प्रोपोगंडाचा भाग वाटतो. या घटनेनंतर उभी राहिलेली माणुसकीची ज्योत ती आपण सगळ्यांनी तेवत ठेवायला हवी. ४–६ दहशतवाद्यांच्या सैतानी कृत्यांमुळे आपण आपल्या देशात फूट पडू देता कामा नये. अशा तणावपूर्ण स्थितीत आपण भारतीयांनी एकसंघ राहून, विवेकाने आणि बांधिलकीने माणुसकीचा हा लढा लढणं आवश्यक आहे.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar16,863 views • 1 year ago