Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar's banner
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar's profile picture

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

@NCPspeaks764,922 subscribers

Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Shorts

कितीही क्षमायाचना करा... शिवद्रोह्यांना आता माफी नाही !

कितीही क्षमायाचना करा... शिवद्रोह्यांना आता माफी नाही !

53,720 görüntüleme

जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!

जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!

46,084 görüntüleme

Videos

NCPspeaks's profile picture

मुंबईच्या महापौर माननीय रितू तावडे यांनी मान्य केलंय की, मुलुंड मेट्रो दुर्घटना ही निष्काळजीपणामुळे घडली. महापौर महोदयांनी संवेदनशीलपणे केलेले हे प्राथमिक विश्लेषण नक्कीच स्वागतार्ह आहे. पण, महापौर महोदयांनी आणि महायुती सरकारने मुंबईकरांना पडलेल्या 'या' प्रश्नांचाही तातडीने खुलासा करायला हवा. १. हा निष्काळजीपणा नेमका कुणाचा? ठेकेदार कंपनीचा? की MMRDA प्रशासनाचा? ठेकेदार असेल तर त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणार का? २. या दुर्घटनेची सखोल चौकशी कोणत्या स्तरावर होणार? ठरावीक कालमर्यादेत ही चौकशी पूर्ण होणार का? ३. या दुर्घटनेची कारणे तुम्ही कधीपर्यंत शोधून काढणार? की चौकशीचं तुमचं आश्वासन हे आम्ही फक्त हवेतील गोळीबार समजायचा? ४. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना तुम्ही ५ लाखांची आर्थिक मदत दिली. माणसाच्या जिवाची किंमत इतकी स्वस्त आहे का? मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत तुम्ही सामावून घेणार का? ५. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. त्या ठिकाणाहून जाताना मुंबईकरांच्या मनात भीती आहे. त्यांना सुरक्षिततेची हमी तुम्ही देणार का?

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

33,253 görüntüleme • 4 ay önce

NCPspeaks's profile picture

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले असून, देशातील अत्यंत कठीण काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यामुळे देशासमोरील खरे शत्रू कोण आहेत, हे त्यांना नेमकेपणाने ज्ञात आहे. राज्यात तसेच देशात धार्मिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी नेहमीच सजगपणे पावले उचललेली आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी परिस्थितीला ज्या संवेदनशीलतेने आणि दक्षतेने हाताळले, त्याचे स्मरण आजही प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात आहे. त्यामुळे शरद पवार काय व्यक्तिमत्त्व आहे, हे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला माहिती आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली वक्तव्यं ही देश विघातक शक्तींना बळ न देता, सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठीच आहे. ज्या नागरिकांना पवार साहेबांच्या विचारांची जाण आहे, त्यांना त्यांची भूमिका पूर्णपणे समजलेली आहे. त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद नीट ऐकली तर लक्षात येते की त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.. "धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य कोणीही करू नये." आणि अशीच समतोल भूमिकेबद्दल काही जण चुकीचा प्रचार करत आहेत. हे दुःखद असून त्यामागील हेतू जाणून घेण्याची गरज आहे. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय पर्यटकांनी अनुभवलेली भीती जितकी तीव्र होती, तितकेच माणुसकीची जाणीव तिथल्या अनेक काश्मिरी नागरिकांनी दाखवली. संकटाच्या त्या काळात मदतीला धावून गेलेली माणसे कोणत्या धर्माची होती, हे न सांगता, केवळ एकाच पद्धतीची मांडणी केली जात असेल, तर तो कुणाच्यातरी राजकीय प्रोपोगंडाचा भाग वाटतो. या घटनेनंतर उभी राहिलेली माणुसकीची ज्योत ती आपण सगळ्यांनी तेवत ठेवायला हवी. ४–६ दहशतवाद्यांच्या सैतानी कृत्यांमुळे आपण आपल्या देशात फूट पडू देता कामा नये. अशा तणावपूर्ण स्थितीत आपण भारतीयांनी एकसंघ राहून, विवेकाने आणि बांधिलकीने माणुसकीचा हा लढा लढणं आवश्यक आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16,863 görüntüleme • 1 yıl önce