Supriya Sule's banner
Supriya Sule's profile picture

Supriya Sule

@supriya_sule1,747,325 subscribers

Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements

Shorts

Inspiration ⏰⏰😍✌️💪

Inspiration ⏰⏰😍✌️💪

1,237,327 Aufrufe

Extremely worried and anxious! Wishing ANIL DESHMUKH ji a speedy recovery!

Extremely worried and anxious! Wishing ANIL DESHMUKH ji a speedy recovery!

265,159 Aufrufe

देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. CMO Maharashtra

देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. CMO Maharashtra

219,517 Aufrufe

पुणे शहरातील वाहतुकीची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत असून नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सूस ते नांदे दरम्यानची ही वाहतूक कोंडी पुण्यातील वाहतूक कोंडीचे चित्र स्पष्ट करते. पुणे महापालिका आणि पुणे शहर पोलिस यांनी यावर तोडगा काढावा. PMC Care पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस

पुणे शहरातील वाहतुकीची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत असून नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सूस ते नांदे दरम्यानची ही वाहतूक कोंडी पुण्यातील वाहतूक कोंडीचे चित्र स्पष्ट करते. पुणे महापालिका आणि पुणे शहर पोलिस यांनी यावर तोडगा काढावा. PMC Care पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस

102,222 Aufrufe

प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध.

प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध.

53,775 Aufrufe

हिंजवडी फेज २ परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि इतर अनेक भागांत जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते. येथील नालेसफाईसारखी कामे वेळेत होण्याची गरज आहे. परंतु ही कामे वेळेत झालेली दिसत नाहीत. एमआयडीसीने याबाबत तातडीने लक्ष घालून येथे भविष्यात पाणी साठून नागरीकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. MIDC India

हिंजवडी फेज २ परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि इतर अनेक भागांत जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते. येथील नालेसफाईसारखी कामे वेळेत होण्याची गरज आहे. परंतु ही कामे वेळेत झालेली दिसत नाहीत. एमआयडीसीने याबाबत तातडीने लक्ष घालून येथे भविष्यात पाणी साठून नागरीकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. MIDC India

34,030 Aufrufe

हिंजवडी परिसरातील राजीव गांधी आयटी पार्क येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. याशिवाय विलास जावडेकर प्रोजेक्ट ते मेगापॉलिस सर्कल या दरम्यानचा भाग अंधारात आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याखेरीज रस्त्यांवर ठिकठिकाणी विशेषतः फेज १ ते फेज ३ दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडले असून याच मार्गावरील स्ट्रीटलाईट सतत बंद असतात, त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. परंतु पीएमआरडीए, एमआयडीसी, मेट्रो आदी आस्थापना जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की, हा सावळा गोंधळ लवकरात लवकर संपणे गरजेचे आहे. कारण याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. कोणती आस्थापना काय काम करणार याबाबतची स्पष्टता व तशी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. यासाठी कृपया तिन्ही आस्थापनांची एकत्रित बैठक बोलावून हा गोंधळ दूर करावा. CMO Maharashtra MIDC India PMRDA Pune Metro Rail

हिंजवडी परिसरातील राजीव गांधी आयटी पार्क येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. याशिवाय विलास जावडेकर प्रोजेक्ट ते मेगापॉलिस सर्कल या दरम्यानचा भाग अंधारात आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याखेरीज रस्त्यांवर ठिकठिकाणी विशेषतः फेज १ ते फेज ३ दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडले असून याच मार्गावरील स्ट्रीटलाईट सतत बंद असतात, त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. परंतु पीएमआरडीए, एमआयडीसी, मेट्रो आदी आस्थापना जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की, हा सावळा गोंधळ लवकरात लवकर संपणे गरजेचे आहे. कारण याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. कोणती आस्थापना काय काम करणार याबाबतची स्पष्टता व तशी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. यासाठी कृपया तिन्ही आस्थापनांची एकत्रित बैठक बोलावून हा गोंधळ दूर करावा. CMO Maharashtra MIDC India PMRDA Pune Metro Rail

26,512 Aufrufe

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच 'भिकारी' म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या. CMO Maharashtra Shivraj Singh Chouhan

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच 'भिकारी' म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या. CMO Maharashtra Shivraj Singh Chouhan

20,290 Aufrufe

Attended the all-party meeting in New Delhi, where we strongly condemned the cowardly terrorist attack in #Pahalgam, Jammu & Kashmir. Paid our heartfelt tributes to the citizens who lost their lives in this terrorist attack.

Attended the all-party meeting in New Delhi, where we strongly condemned the cowardly terrorist attack in #Pahalgam, Jammu & Kashmir. Paid our heartfelt tributes to the citizens who lost their lives in this terrorist attack.

15,421 Aufrufe

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील हे अतिशय दुःखद चित्र आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रमी भावाने विकला. पण आता त्याला कवडीमोल दराने व्यापाऱ्यांच्या स्वाधीन करावे लागत आहे. शेतमाल आणि जीवनावश्यक वस्तू यांच्या बाजारभावाबाबत हे सरकार अजिबात गंभीर नाही. ग्राहक आणि उत्पादक यांच्या हिताचा सुवर्णमध्य साधण्यासाठी शासनाने काम करणे अपेक्षित आहे परंतु सरकार निवडणूकीचे तात्कालिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी वर्गाची क्रूर थट्टा करीत आहे. हि अतिशय दुर्दैवी बाब आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील हे अतिशय दुःखद चित्र आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रमी भावाने विकला. पण आता त्याला कवडीमोल दराने व्यापाऱ्यांच्या स्वाधीन करावे लागत आहे. शेतमाल आणि जीवनावश्यक वस्तू यांच्या बाजारभावाबाबत हे सरकार अजिबात गंभीर नाही. ग्राहक आणि उत्पादक यांच्या हिताचा सुवर्णमध्य साधण्यासाठी शासनाने काम करणे अपेक्षित आहे परंतु सरकार निवडणूकीचे तात्कालिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी वर्गाची क्रूर थट्टा करीत आहे. हि अतिशय दुर्दैवी बाब आहे.

18,150 Aufrufe

Videos

supriya_sule's profile picture

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे.याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे. Election Commission of India

Supriya Sule

1,610,316 Aufrufe • vor 2 Jahren

supriya_sule's profile picture

'राज्य राखीव पोलीस दला'च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करीत असतात.आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल ८५ प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Supriya Sule

32,230 Aufrufe • vor 1 Monat

supriya_sule's profile picture

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविण्यात येत आहे. भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस

Supriya Sule

24,680 Aufrufe • vor 27 Tagen

supriya_sule's profile picture

महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर (Sharad Pawar) नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. आणि साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या. स्थळ - यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई वेळ - दुपारी १.०० वाजता

Supriya Sule

293,614 Aufrufe • vor 2 Jahren

supriya_sule's profile picture

क्रांतिज्योती सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु होत आहे. या मालिकेत खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. डॉ कोल्हे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. या मालिकेसाठी त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा. एक चांगली मालिका रसिकांच्या भेटीस आणत असल्याबद्दल धन्यवाद...!

Supriya Sule

59,177 Aufrufe • vor 6 Monaten

supriya_sule's profile picture

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.

Supriya Sule

191,121 Aufrufe • vor 2 Jahren

supriya_sule's profile picture

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वाहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सांगितले. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती.त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे सांगितले. यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहन केले.

Supriya Sule

14,532 Aufrufe • vor 1 Monat

supriya_sule's profile picture

लोकसभेत आज शून्य प्रहरात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री व माझे ज्येष्ठ बंधू स्व. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या भावाला जाऊन दोन महिने झाले. याच वर्षी २८ जानेवारीला माझ्या भावाचे प्लेन क्रॅश झाले. या घटनेला केवळ दोन महिने झाले आहेत. एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जेव्हा जातो, त्याचं दुःख त्या कुटुंबालाच माहिती असतं. आम्ही पण हे सोसलं आहे. या घटनेला दोन महिने झाले पण माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला का ? माझा मोठा भाऊ महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. त्याला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाला कसा मिळणार? माझ्या मोठ्या भावाचा मुलगा रोहितला एक एफआयआर करायला जंग-जंग पछाडावे लागले. आमच्या राज्याने तर 'एफआयआर' नोंदवून घेतलाच नाही. त्यासाठी रोहित सर्वपक्षीय नेत्यांना भेटला. इतर राज्यांमध्ये गेला, अनेकांना विनवण्या केल्या की एफआयआर करा आणि त्याच्या काकाला म्हणजे अजितदादांना न्याय मिळू द्या, असे नमूद केले. एक एफआयआर करायला एवढी अडचण? या देशातील एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा जेव्हा एवढा मोठा अपघात होतो, त्याचा एफआयआर होत नसेल तर सामान्य माणसाने जायचं कुठे? तो माझा भाऊ होता, अजित पवार जेवढा माझा भाऊ होता, तेवढाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामधला एक लाडका नेता होता. तर एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? माझी नम्रपणे हात जोडून महाराष्ट्र आणि भारत सरकारला विनंती आहे की अजितदादांसह सगळ्यांच्या अपघातांची पारदर्शक चौकशी करा. मग तो अहमदाबादचा असुदे, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये सीडीएस बिपिन रावत गेले तो असुदे, अगर एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा झारखंडला झालेला अपघात असुदे, न्याय हा समानच असला पाहिजे. प्रत्येक कुटुंब मग तो पायलट असेल, माझा दादा असेल, अंगरक्षक असेल किंवा त्या विमानात असलेल्या महिला असतील, त्या विद्यार्थिनी होत्या, त्या तरुण मुलीला पण न्याय मिळाला पाहिजे. आधी आम्हाला सांगितलं गेलं की ब्लॅक बॉक्स मिळणार, आता सांगितलं जातंय की तो खराब झालाय, हे काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित केला. रोहित पवारांच्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी काल याच्यावर स्टेटमेंट केलं. पण माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे की तुम्ही जी काही चौकशी अगर तपास करणार आहात तो कालबद्ध चौकटीत करा. या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत. स्व अजितदादा पवारांच्या विमान अपघातातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे, अशी ठाम भूमिका मांडली.

Supriya Sule

19,448 Aufrufe • vor 2 Monaten

supriya_sule's profile picture

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दाैऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले. गाडी नादुरुस्त झाल्याने प्रवासी पर्यायी वाहनाची वाट पाहत तिथंच उन्हांत थांबले होते. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने हे प्रवासी आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही जणांना दुसऱ्या बसमधून खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर सोडण्याची विनंती केली. तर काही प्रवाशांना माझ्यासोबत असणाऱ्या गाडीतून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत आणले. याठिकाणी त्यांची तात्पुरती व्यवस्था केली. यातील बरेच प्रवासी सांगली आणि मिरजला जाणारे होते. यावेळी माझ्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि माझे काही सहकारी यांना प्रवाशांची सोय करण्याबाबत सांगितले. हे सर्वजण प्रवासी त्याच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये पाठवेपर्यंत थांबतील असा विश्वास दिला. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. तसेच प्रवाशांना टोलनाक्यापर्यंत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एसटी बसचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांचे आभार मानले. एसटी महामंडळाने आपण बाहेर सोडत असणारी प्रत्येक गाडी तपासून पाठविली पाहिजे. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील आजकाल वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Supriya Sule

110,632 Aufrufe • vor 3 Jahren

supriya_sule's profile picture

आपला मतदार संघ, आपला अभिमान! 'एअर इंडिया' च्या विमानाने पुण्याहून दिल्लीला जात असताना एअर इंडीयातर्फे दिल्या जाणाऱ्या जेवणात हे मिक्स्ड लोणचे देण्यात आले. आनंदाची बाब म्हणजे हे लोणचे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खळद, ता. पुरंदर येथील त्रिवेणी इंडस्ट्रीमध्ये तयार करण्यात आलेले आहे. आकर्षक पद्धतीची पॅकिंग आणि छान चव यामुळे हे लोणचे सगळ्यांच्याच पसंतीला उतरले आहे. एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जेवणात आपल्या मतदारसंघातील हे पुरंदरचे लोणचे दिले जाते, याचा मला सार्थ अभिमान आहे. आदरणीय पवार साहेब आणि आईने देखील या लोणच्याची चव छान असल्याचे सांगितले. अशा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी खुपच अभिमानास्पद आहे.

Supriya Sule

44,185 Aufrufe • vor 1 Jahr