
Supriya Sule
@supriya_sule • 1,744,682 subscribers
Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements
Shorts
Videos

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे.याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे. Election Commission of India
Supriya Sule1,611,075 views • 2 years ago

बावधन बुद्रुक येथील श्री. दिलीप दगडे यांच्या निवासस्थानाशेजारी तसेच रायन आंतरराष्ट्रीय शाळेच्या परिसरालगत एका बांधकाम व्यावसायिकाने निसर्ग पाम सोसायटी या बंगलो प्रकल्पाचे प्लॉटिंग व बांधकाम केले आहे. या बांधकामादरम्यान परिसरातील पारंपरिक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेला केतकीचा ओढा पूर्णपणे बुजविण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, सध्या पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारा मार्गही अडविण्यात आल्याचे निसर्ग पाम सोसायटीचे सदस्य व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट सोसायटीलगतच्या नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असून, घरातील फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय, निसर्ग पाम सोसायटीला मुख्य रस्त्याशी जोडणारा संपर्करस्ता पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण होते. अनेकदा या पाण्यात दुचाकी अर्ध्यापर्यंत बुडत असल्याने मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा फटका केवळ सोसायटीतील रहिवाशांनाच नव्हे, तर सर्व्हिस रोडलगत असलेल्या व्यावसायिकांनाही बसत असून त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान होत आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस अथवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे माझी जिल्हा प्रशासनास नम्र विनंती आहे की, संबंधित विभागाने तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी. पाहणीत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आढळल्यास, तो प्रवाह तात्काळ पूर्ववत करून पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल, अशी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात नागरिकांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. PMC Care PMRDA NHAI collectorpune Maharashtra Pollution Control Board Maha Forest Official
Supriya Sule62,924 views • 1 month ago

The brutal crackdown on students who were peacefully protesting and demanding accountability is deeply condemnable. Equally shocking is the reported manhandling of the Leader of the Opposition, Shri Rahul Gandhi ji, who sought to question this assault, along with the detention of Smt. Priyanka Gandhi ji and Shri Akhilesh Yadav ji. Such treatment of the Leader of the Opposition in the world’s largest democracy is an affront to democratic norms and constitutional values. A government that responds to peaceful dissent with force instead of dialogue undermines the very foundations of our Republic. We strongly condemn this repression and will continue to stand with the students and fight to protect our Constitution and democracy. लोकशाही मार्गाने आंदोलन करीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा जाब विचारणारे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना लोककल्याण मार्ग येथे धक्काबुक्की करण्यात आली. त्यांना खाली पाडून, खेचण्यात आले. त्यांना तसेच खासदार प्रियांकाजी गांधी, समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेशजी यादव यांनाही पोलीसांनी बळाचा वापर करुन ताब्यात घेतले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारताच्या विरोधी पक्षनेत्याला मिळालेली ही वागणूक लोकशाहीविरोधी आहे. या देशातील संवैधानिक मूल्ये आणि लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही कायम संघर्ष करीत राहू. आम्ही या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत.
Supriya Sule48,179 views • 1 month ago

इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी गांधी स्मृती येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. याप्रसंगी NEET आणि Re-NEET परीक्षेतील गोंधळामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. या परीक्षेतील गोंंधळाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनास आमचा पाठिंबा असून त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्याच पाहिजेत, अशी आमची ठाम भूमिका आहे. Members of Parliament from the INDIA Alliance paid tribute at Gandhi Smriti to the students who lost their lives in the aftermath of the NEET paper leak. Those young lives will forever remain in our hearts and memories. We stand with their families in their grief and will continue to fight for justice, accountability, and an education system that upholds the trust and aspirations of every student.
Supriya Sule39,287 views • 1 month ago

मुंबईतील दादर येथे एका महिला आंदोलनकर्त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ बघा. साध्या पोशाखातील ही व्यक्ती पोलीस कर्मचारी आहे. मुंबई पोलीसांबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण अशा पद्धतीने महिलांना असभ्य वागणूक देणारे पोलीस जर या दलात आहेत ही खेदाची बाब आहे. आंदोलनकर्ते हे गुन्हेगार नाहीत, लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानले जाते पण जेंव्हा सत्ताधाऱ्यांना लोकशाहीची मूल्येच मान्य नसतात तेंव्हा अशा पद्धतीने असभ्य वागणाऱ्यांना बळ मिळते. महिलांचा अवमान करणाऱ्यांचा चौरंग करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. येथे अशा अपप्रवृत्तींना अभय मिळता कामा नये, सदर कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. Devendra Fadnavis मुंबई पोलीस Mumbai Police
Supriya Sule31,334 views • 1 month ago

Today in the Lok Sabha, I questioned the Public Examinations (Amendment) Bill, 2026, and pointed out that this is not a new Bill but an amendment to the 2024 Act, which still leaves serious contradictions unanswered. I asked why the Government promised wider consultation, yet enacted the law before completing it, and why a committee was constituted a day after the Act came into force. I also sought clarity on conflicting official records regarding NEET and reminded the House that transparency is essential to restoring public trust. Education cannot be governed through confusion and inconsistency. This debate is not about scoring political points; it is about the future of our students. The growing dependence on expensive coaching, repeated examination failures, and the anguish of students and parents require empathy, accountability and systemic reform. Even the Government’s ally Shri Chhagan Bhujbal and senior BJP leader Dr. Murli Manohar Joshi have expressed concern over the handling of this issue and the treatment of protesting students. Their voices reinforce that this is a national concern, not a partisan one. I urged the Government to order an impartial inquiry into the events at Jantar Mantar, constitute a Joint Parliamentary Committee, and convene an all-party consultation to build a truly fair and leak-proof examination system. As I said in the House, this is not BJP versus Congress or UPA versus NDA, it is the system versus the aspirations of our children. India’s youth deserve an examination system that rewards merit, inspires confidence, and treats every student’s dream with dignity.
Supriya Sule25,018 views • 1 month ago

महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर (Sharad Pawar) नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. आणि साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या. स्थळ - यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई वेळ - दुपारी १.०० वाजता
Supriya Sule293,626 views • 3 years ago

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.
Supriya Sule191,134 views • 3 years ago

'राज्य राखीव पोलीस दला'च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करीत असतात.आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल ८५ प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी. CMO Maharashtra Devendra Fadnavis
Supriya Sule32,471 views • 4 months ago

क्रांतिज्योती सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु होत आहे. या मालिकेत खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. डॉ कोल्हे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. या मालिकेसाठी त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा. एक चांगली मालिका रसिकांच्या भेटीस आणत असल्याबद्दल धन्यवाद...!
Supriya Sule59,233 views • 9 months ago

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविण्यात येत आहे. भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस
Supriya Sule24,887 views • 3 months ago

यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे वरुन मुंबई ते पुणे हा प्रवास करीत असताना घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. यापुर्वी हा रस्ता प्रवासासाठी अतिशय उत्तम असा होता. परंतु अलिकडे या रस्त्याने प्रवास करताना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.यात वेळ, पेट्रोल-डिझेल वाया तर जातेच याशिवाय पर्यावरणाचेही नुकसान होते. राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालून प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा ही विनंती. CMO Maharashtra Dadaji Bhuse
Supriya Sule132,254 views • 2 years ago

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दाैऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले. गाडी नादुरुस्त झाल्याने प्रवासी पर्यायी वाहनाची वाट पाहत तिथंच उन्हांत थांबले होते. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने हे प्रवासी आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही जणांना दुसऱ्या बसमधून खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर सोडण्याची विनंती केली. तर काही प्रवाशांना माझ्यासोबत असणाऱ्या गाडीतून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत आणले. याठिकाणी त्यांची तात्पुरती व्यवस्था केली. यातील बरेच प्रवासी सांगली आणि मिरजला जाणारे होते. यावेळी माझ्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि माझे काही सहकारी यांना प्रवाशांची सोय करण्याबाबत सांगितले. हे सर्वजण प्रवासी त्याच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये पाठवेपर्यंत थांबतील असा विश्वास दिला. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. तसेच प्रवाशांना टोलनाक्यापर्यंत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एसटी बसचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांचे आभार मानले. एसटी महामंडळाने आपण बाहेर सोडत असणारी प्रत्येक गाडी तपासून पाठविली पाहिजे. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील आजकाल वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
Supriya Sule110,647 views • 3 years ago

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील आंबेगाव पठार भागात कोयता गॅंगने धिंगाणा घालत दहशत माजविली. या टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून लोकांचे नुकसान केले. तर राजगड तालुक्यातील कोदवडी फाट्यावर टोळक्याने गोळीबार करुन एका हॉटेलची तोडफोड केले. याप्रसंगी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या घटना गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. गृहखात्याची निष्क्रियता जनतेच्या जीवावर उठत असून जनता भीतीच्या छायेखाली जगत आहे. हे सरकार जनतेला सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही, यावर दिवसेंदिवस शिक्कामोर्तब होत आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police
Supriya Sule16,709 views • 3 months ago