Loading video...

Video Failed to Load

Go Home

पंढरपूर येथे ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या पर्यावरणविषयक जनजागृती उपक्रमाच्या कार्यक्रमास श्री Devendra Fadnavis आणि दिविजा सोबत उपस्थित होते. वायूचे, पर्यावरणाचे, झाडांचे महत्त्व आपण जोपर्यंत समजून घेणार नाही, तोपर्यंत पर्यावरणाचा ऱ्हास होणे थांबणार नाही. #Maharashtra #Pandharpur

528,374 views • 1 year ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

महाराष्ट्र आता थांबणार नाही... सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही... असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... (विधानसभा, नागपूर | दि. 19 डिसेंबर 2024) #Maharashtra #Nagpur #ViksitMaharashtra

Devendra Fadnavis

18,833 views • 1 year ago

मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही. जर असे केले तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही. दोन वेळेस मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न मान्य केलेले नाहीत. सुप्रीम कोर्टने त्याविरोधी निर्णय दिले आहेत. मराठा समाजातला एक वर्ग आहे, जो निजामी मराठा आहे. तो रयतेतल्या मराठ्यांना जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. निजामी मराठे हे निजामाबरोबर राहिलेले आहेत. रयतेतले मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत. सोळाव्या शतकातले भांडण आताही चालू आहे. सत्तेत बसलेला निजामी मराठा आहे आणि तो रयतेतल्या मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. हे जेवढ लवकर रयतेतल्या मराठ्याच्या डोक्यात जाईल आणि जोपर्यंत निजामी मराठ्यांकडून तो फारकत घेणार नाही, तोपर्यंत रयतेतल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. रयतेतल्या मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, तो श्रीमंत मराठा नाही, म्हणून देशभरात हमीभाव हा जाहीर केला जातो त्यासंदर्भातील कायदा करावा ही मागणी सुद्धा निजामी मराठा मान्य करत नाही. निजामी मराठ्यांपासून रयतेतल्या मराठ्यांनी फारकत घेतल्याशिवाय त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही. निजामी मराठ्यांच्या हातातली सत्ता रयतेच्या मराठ्यांच्या हातात जाईल या भितीमुळे निजामी मराठा हा रयतेच्या मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाही. आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की त्यांना बदल हवा आहे की नाही?

Prakash Ambedkar

17,019 views • 10 months ago