
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks • 1,654,176 subscribers
संकल्प, निष्ठा, कर्म- हाच माझा धर्म! उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य | Commitment, Conviction, Service- My Vision | Deputy Chief Minister- Maharashtra
Shorts
Videos

गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी! आलंय राष्ट्रवादीचं नवं गाणं! #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra
Ajit Pawar606,929 просмотров • 1 год назад

Today, while on my way for election campaigning, the Election Commission conducted a routine check of my bags and helicopter. I fully cooperated and believe that such measures are essential to ensure free and fair elections. Let us all respect the law and support efforts to uphold the integrity of our democracy. #MaharashtraElection2024
Ajit Pawar455,369 просмотров • 1 год назад

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश ! #दादाचा_वादा
Ajit Pawar127,364 просмотров • 1 год назад

आपली मातृभाषा मराठी आलीच पाहिजे परंतु इंजिनिअरिंगचं अभ्यासक्रम मराठीत केल्यास त्या मुलांना पुढे कुणीही रोजगार देणार नाही.नव्या पिढीचं नुकसान होईल. यावर विचार करण्याची नितांत गरज आहे. रोजगारानिमित्त जगाच्या पाठीवर कुठेही जाताना अन्य भाषा येणं गरजेचं ठरतं. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
Ajit Pawar190,023 просмотров • 3 лет назад

आज मुंबईतील आझाद मैदान येथे देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ विधी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. देशाची सार्वभौमता, एकात्मता उन्नत राखेन. कामे निष्ठेनं पार पाडेन. कामाबाबतची गोपनीयता पाळेन, अशी प्रतिज्ञा केली.
Ajit Pawar98,490 просмотров • 1 год назад

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी आणि श्री गुरु गोबिंद सिंह जी यांच्या कार्याला, विचारांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन!
Ajit Pawar31,369 просмотров • 4 месяцев назад

नालायक प्रवृत्तीची माणसं माझ्या पक्षात नकोच.. त्या सुनेच्या दोषींवर कार्यवाही होणार आणि तिला न्यायही मिळणार..!
Ajit Pawar48,599 просмотров • 1 год назад

पिंपरी-चिंचवडकरांनो, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही सुधारणार. तुमच्यापर्यंत गुणवत्तापूर्ण पाणी दररोज पोहोचणार. ड्रेनेज व्यवस्था, गटार साफसफाई, घाणीचं साम्राज्य नष्ट करणार. येत्या १५ जानेवारीला विश्वासरुपी तुमची मतं आम्हाला द्या. #घड्याळाचा१अलार्म #NCPWorks #VajtoyAlarm
Ajit Pawar23,326 просмотров • 5 месяцев назад

गेल्यावर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. महाराजांचा तो पुतळा कोसळल्याची घटना महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींप्रमाणे माझ्यासाठी देखील अतिशय क्लेशदायक आहे. मी शासनाचा भाग म्हणून आज जाहीर माफी मागितली. महाराजांचा पुतळा उभारताना तेथील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान यासारख्या महत्वाच्या बाबींचा वैज्ञानिक अभ्यास केला होता का ? पुतळा बनवण्याच्या सामग्रीची गुणवत्ता याचा शोध घेत संबंधित जबाबदार लोकांची राज्य सरकारने तातडीने चौकशी करत गुन्हे देखील दाखल केले आहेत. लवकरात लवकर राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना केली जाईल पण अशा प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या प्रत्येक संबंधितावर कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
Ajit Pawar67,819 просмотров • 1 год назад

राज्य सरकारच्या वतीनं टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यांसारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ काही ठिकाणी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगानं माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू असून, सध्या या शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्च होत आहे. त्यामुळे इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. या स्वायत्त संस्थांच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्याच्या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली असून सदर चर्चेनंतर झालेल्या निर्णयानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत अधिछात्रवृत्ती योजनेंतर्गत यु.जी.सी. मार्फत विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करुन अधिछात्रवृत्ती योजनेचे निकष उच्च व तंत्रशिक्षण विभागानं तयार करावेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा वार्षिक प्रगती अहवाल तपासून उर्वरित अनुदान वितरीत करण्याच्या प्रक्रियेचा समावेश करुन त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना तंत्र शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्ती देताना प्रत्येक घटकासाठी लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोणत्या शैक्षणिक टप्प्यावर किती विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील. शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे. शिष्यवृत्ती मंजूर करताना संबंधित अभ्यासक्रमांचा राज्य व समाजाच्या विकासासाठी होणारा उपयोग तसंच विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आर्थिक परिस्थितीचा सखोल विचार करण्यात येत आहे. #हिवाळीअधिवेशन२०२५ #WinterSession2025
Ajit Pawar24,726 просмотров • 5 месяцев назад
