
Saurabh Koratkar
@saurabhkoratkar • 10,827 subscribers
Journalist | Criticizer | Investment learner | Experimental chef | News Anchor @zee24taasnews | Ex.TV9 Marathi,Abp majha (Views are personal)
Shorts
Videos
1:27
Sensitive content
This media may contain sensitive content.

या काकांनी फक्त परिसरात घाण करू नका एवढं सांगितल्यामुळे या ऑटोवाल्याने वयोवृद्ध माणसाला पाय तुटेपर्यंत मारलं.. गुन्हा काय तर ठाणे स्वच्छ असावं हा अट्टहास.. मारल्यानंतर पण याचा माज बघा.. शेवटी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी याला शोधलं, ठोकून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल.
Saurabh Koratkar424,653 次观看 • 6 天前

संविधानाच्या नावाने..... प्रभू रामाला शिव्या देणाऱ्या या मूलीच्या आईला म्हणजेच प्रतिभा जाधव यांना ३ महिन्यांआधी चित्रा वाघ यांनी बदलापूर पूर्व महिला अध्यक्ष पद दिले होते, तर हीचे वडिल महेश जाधव यांना बदलापूर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ समितीत सदस्य म्हणून भाजपने स्थान दिलय. फॉरेन मधून काही दिवसांसाठी आलेल्या या मुलीने काल रात्री हा व्हिडीओ टाकलाय. साभार- विवेक मोरे (facebook)
Saurabh Koratkar184,508 次观看 • 3 个月前

तोडलेली झाडं ही कमीतकमी 30 ते 80 वर्ष जुनी आहेत. नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा येतो. याचा अर्थ ही झाड 6 ते 7 कुंभमेळ्याची साक्षीदार आहेत. हे सर्व कुंभ मेळे झाड न तोडता झाले. याच कुंभमेळ्यात ही झाडं का तोडावी लागतायत? नाशिक डोळ्यासमोर उध्वस्त होतंय. भावी पिढ्या किंमत मोजणार.
Saurabh Koratkar34,728 次观看 • 1 个月前

"शिवाजी महाराज बौद्ध होते.दुसरा राज्याभिषेक बौद्ध पद्धतीने झाला. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर नाही बुद्ध गुहेत झाला" - भिख्खू ज्ञानज्योति आता ही कोणाला इतिहासाची, शिवरायांची विटंबना-अपमान वाटणार नाही तो भाग वेगळा. ना ब्रिगेड वगैरे यावरून आक्रमक होणार. या इतिहासाची सवय लावून घ्या..
Saurabh Koratkar51,027 次观看 • 1 个月前

हरित कुंभ मेळ्यासाठी 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल. पण नाशिककरांनो तुम्ही मस्त झोपा काढा, मिसळ खा पण या वृक्षतोडीला विरोध करू नका. कारण मुंबई पुण्यासारख्या गुडघाभर विकास काही वर्षांनी तुमच्याही दारात येणार आहे. बाकी तापमान कितीही वाढलं तरी AC आहेतच.. आणि ही वृक्ष तोडीला विरोध करणारी लोकं रिकामटेकडी आहेत. दुर्लक्ष करा.
Saurabh Koratkar37,360 次观看 • 2 个月前

इतिहास माहीत नसलेला हा बाबा कश्याला इथे येऊन ग्यान पेलतो? महाराष्ट्रात यायचं आणि उगाचंच काहीतरी बेताल असंबद्ध बडबडायचं आणि सामाजिक वातावरण गढूळ करायचं. महाराजांवर बोलायला हजार गोष्टी आहेत तरीही महाराजांना छोटं दाखवून खोड्या काढायची काय गरज? हे महान ज्ञान कोणत्या पुस्तकात वाचलं?
Saurabh Koratkar28,255 次观看 • 1 个月前

वडिलांच्या सन्मानासाठी राम वनवासात गेला आणि इथं या पोरीच्या वक्तव्यामुळे मायबापाला मान खाली घालावी लागली. आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिच्या आईवडिलांनी हात जोडून माफी मागितली आहे. चित्रा वाघ यांनीही या घटनेचा निषेध केलाय. क्षमा-द्वेषभाव न ठेवणं ही रामाची शिकवण आहे. भवतु सब्ब मंगलम.
Saurabh Koratkar46,852 次观看 • 3 个月前

रामदास स्वामींचं उदात्तीकरण ते आदिलशहाचे हेर याबद्दल पुराव्यासकट अतिशय संयत मांडणी पवार सरांनी बीबीसी च्या मुलाखतीत केली होती. इतिहासाच्या नावाखाली महाराष्ट्र गढूळ करण्याचं काम सुरू असताना जयसिंगराव पवार कोणाच्याही दबावाला बळी न पडता सत्य सांगत राह्यले. नेमकी आज दासनवमी. रामदास स्वामींची जयंती. जयसिंगराव पवारांना विनम्र आदरांजली. इतिहास सांगणारा विश्वसनीय मार्गदर्शक हरवला🙏
Saurabh Koratkar35,262 次观看 • 2 个月前

हे आहे सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी पुण्यातील आयटी पार्कजवळचं बाणेर... -एक बिल्डर सोसायटीतल्या रहिवाश्यांना बेसबॉल स्टिक, बॅट घेऊन मारहाण करतो, बायका पोरांसमोर घाणेरड्या शिव्या देतो. धमक्या देतो, जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो, आरोपानुसार अंगावर जेसीबी घालायचा प्रयत्न करतो. ही सगळी गुंडागर्दी सामान्य नागरिक आणि मेहनतीच्या पैशाने घर घेतलेले रहिवासी निमूटपणे सहन करतायत, आई बहिणींवर शिव्या खाऊन घेतायत, स्टिक ने दोन चार रट्टे पन खाऊन घेतायत, बायका पण अभद्र भाषा सहन करताय.. बिट मार्शलने वाचवलं नसतं तर या लोकांना बिल्डर ने आणखी भयंकर मारहाण केली असती. तिसऱ्या व्हिडिओत गाडीच्या डिक्की मध्ये मारहाण करण्यासाठी आणलेलं साहित्य सुद्धा दिसतंय. यशवंत निम्हण नावाचा हा बिल्डर असल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे. I hope या प्रकरणात उचित कारवाई होईल. Chandrakant Patil पुणे शहर पोलीस Devendra Fadnavis Ajit Pawar Vijay Wadettiwar Nana Patole Supriya Sule
Saurabh Koratkar186,836 次观看 • 1 年前

राज्यातील सर्वात प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातला 'नाच' कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरिबांच्या पोरांना शिक्षण मिळावे म्हणून चालू केलेली ही शिक्षण संस्था आहे! राजकीय दलालांनी ही शिक्षण संस्था अक्षरशः हडप केली आहे, आता त्याठिकाणी असे कार्यक्रम केल्यावर, त्यातून पुढे घडणारे विद्यार्थि जनते बरोबर काय करतील? रयत शिक्षण संस्थेमध्ये 13 हजार कर्मचारी आहेत, तर 4.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. शिक्षण आणि सहकार पिळून, पिळून खाणे यावरच या दलालांचे राजकरण आहे! तुमच्या पिढ्या न पिढ्या अशाच बरबाद करणे यातच हित यांचे आहे! Courtesy- @जागरुकहोऊयात
Saurabh Koratkar84,581 次观看 • 10 个月前

प्रत्येक रस्त्यावर, गावात हेच चित्र आहे. वर्षानुवर्षे सावली देणारी झाडं तोडली जातायत. नवीन लावण्याचा तर प्रश्नच नाही. हे बघून खूप त्रास होतो, हतबल वाटतं. या झाडांसाठी आपण काहीच करू शकत नसल्याचा गिल्ट येतो. जाती धर्मासाठी एकत्र येणारी माणसं झाडांसाठी का एकत्र येत नसतील? C- bbc
Saurabh Koratkar11,679 次观看 • 28 天前

ठिकाण - लालबागचा राजा ♦️व्हिडीओ 1- सामान्य चेंगरणारे, गुदमरणारे, मुंबई स्पिरिट वाले भक्त ♦️व्हिडीओ 2 - तुरुंगवास भोगून आलेले पण अति श्रीमंत भाविक -स्वतःची इतकी अवहेलना, इतका मानसिक आणि शारीरिक त्रास, चेंगरणं कश्यासाठी? -देवाच्या दरबारात सुद्धा इतक झिडकारल जात असेल तरी ही मरमर कश्याला? -भक्तीच्या नावाखाली स्वतःची किती विटंबना करून घ्यायची याला मर्यादा आहे की नाही? -चेंगरायला सकाळची मुंबई लोकल मधली गर्दी काय पुरेशी नाही का? #LalbaugchaRaja #LalBagh #GaneshFestival2024
Saurabh Koratkar141,870 次观看 • 1 年前
1:00
Sensitive content
This media may contain sensitive content.

वसईत प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात पान्ह्याने हत्या केली.आसपास बरीच लोकं होती पण त्यातला फक्त एक माणूस आरोपीला थांबवायला पुढे आला. त्याच्या मदतीला एक जरी व्यक्ती पुढे आली असती तर ती मुलगी आज जिवंत असती. एका २० वर्षाच्या मुलीवर पान्ह्याने १५ वार केले जातात आणि कोणीही मदतीला येत नाही. कसल्या नपुंसक समाजात आपण राहतोय.. षंढ, नामर्द हे शब्द ही तोकडे पडतील
Saurabh Koratkar154,791 次观看 • 2 年前
1:22
Sensitive content
This media may contain sensitive content.

- पालघरच्या वाडा तालुक्यातला गावठाण पाडा - वेळ रात्री २ ते ३ दरम्यानची... एक हात डोक्यावरच्या हंड्यांवर आणि एका कडेवर लेकरु.. काळोखात पायात साधी चप्पल सुद्धा नाही - आपण ज्या वेळी साखरझोपेत असतो त्याच वेळी या बायकांना अंधाऱ्या रात्री लेकरा बाळांसह विहीर गाठावी लागते... कधी कधी रात्री २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्यासाठी ताटकळत उभं राहावं लागतं. -एवढं केल्यानंतर पाणी किती मिळतं तर ते फक्त २ हंडे. ते सुद्धा विहीरीच्या झऱ्यातून तळाशी आलं तर.... नाहीतर नुसता तळ खरवडत राहावं लागतं. पाणी नाही म्हणून गावातल्या लोकांनी आंघोळी करणं सुद्धा सोडलंय. पिण्यापुरता कसंबसं भागतं. - दिवसभर हजारो लिटर पाणी वाया घालून आपण झोपलेलो असताना त्याच वेळी काहींना हंडाभर पाण्यासाठी कसं धडपडावं लागतंय त्याचं हे उदाहरण
Saurabh Koratkar92,188 次观看 • 1 年前