मराठे हसले, कोणाच्या पोटात दुखले? जरांगेची भूमिका आपल्याला पटते/... नाही पटत हा भाग वेगळा पण गावखेड्यातून मराठ्यांची पोरं आबाळ होत असताना मुंबईत आली. वर्षभर शेतकरी म्हणून हाल अपेष्टा आहेतच. जरांगेनसोबत आल्यानंतर थोडं मुंबईत फिरले, बघितलं, आनंद घेतला तर इतरांच्या पोटात का दुखतंय? ते काय इराण/ पाकिस्तानातून आलेले नाहीत. आपलेच भाऊबंद आहेत. मुंबई त्यांची पण आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आले म्हणून काय त्यांनी सतत रडवेला चेहरा करून माहेरची साडी मधली अल्का कुबल व्हावं का? आव्हानं, संकट, अनिश्चितता पाचवीलाच पूजलीये. त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाहीच.. पण आरक्षणाच्या मागणीसाठी चूल बंद करत पोटाला चिमटा काढत मराठे मुंबईत आलेयत. 2 ठिकाणं फिरले, ठेका धरला, आनंद घेतला आणि शांतपणे आरक्षण मागितलं तर यात चुकीचं काय? बाया बापड्या म्हाताऱ्यानी नुसते मुंबईचे स्वप्न बघितले आहेत.. कधी यायची हिम्मत झाली नाही. जरांगेच्या एका हाकेवर आहे नाही तेव्हड बळ एकवटून हे गोर गरीब मुंबईत अलेयत... आज कुठं थांबणार, कुठं खाणार याचीही खात्री नाही. आयुष्यात डोंगराएव्हढ्या समस्या असताना आंदोलनासारख्या गोष्टीत थोडं समाधान आनंद शोधत असतील तर शोधू द्या की. कोणीतरी आपल्या त्रासावर फुंकर घालतय , कोणीतरी आपल्यासाठी उभं राहत्य, कोणीतरी आपल्याला न्याय देतंय आणि हे निर्णायक टप्यावर आलं याचा हा आनंद आहे. त्यांना बघून नाक मुरडण्यासारखा निचपणा दुसरा नाही. - सौरभ कोरटकर #jarangepatil #MarathaReservationshow more

Saurabh Koratkar
46,936 Aufrufe • vor 1 Jahr
बाईईईईई काय हा प्रकार... थोडं थोडं साम्याच आहे, नाही... ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!! #चित्रविचित्र #Maharashtrashow more

Adv Rohini Eknathrao Khadse
46,899 Aufrufe • vor 1 Jahr
अमित ठाकरेंना खूप चांगल्या राजकीय सल्लागाराची गरज आहे. योग्य... वेळी त्यांना राजकीय आणि सामाजिक समज आली नाही तर अनेक संधी हातून निसटतील. आपल्याला उमेदवारी मिळाल्यावर काय बोलावं आणि काय बोलू नये इतकं पण कोणी मार्गदर्शन करत नाही का?show more

Saurabh Koratkar
48,594 Aufrufe • vor 1 Jahr
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर युएईमध्ये गाडी चालवता येत नाही पण... नीलेश लंके याच्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट असेल. पण जर नसेल तर तिथल्या पोलिसांनी पकडले तर झाली का नाही बदनामी,कायदा तोडून गाडी चालवत आहेत म्हणून. आणि हे सगळे कार्यकर्त्यांच्या पैशावर चालू आहे पण सोबत एक पण कार्यकर्ता नाही.show more

शुभम कराड
87,913 Aufrufe • vor 2 Monaten
मराठे आरक्षणासाठी मुंबईत आले तेव्हा “अरेरे, लोकलमध्ये गर्दी झाली,... त्रास होतोय!” म्हणून कोर्टात गेलेले आज त्याच मुंबई लोकलमध्ये गरबा आणि दांडिया पार्टीसाठी झिंगाट झालेत. म्हणजे आरक्षणाच्या आंदोलनात येणारे शेतकरी, विद्यार्थी “ओझे” आणि नवरात्रीत मोकळं नाचणारे हेच “सोशलाईफ”! दुटप्पीपणा इतका उघडकीस येतोय की, न्यायासाठी रस्ता रोको केला की कोर्ट धाव घेतं, पण “गरब्याचा रोको” कुठेच नाही. म्हणजे शेवटी त्रास हा नाही, त्रास कोणाला आहे हे ठरवणारी मानसिकताच खरी समस्या आहे.! यावर आता कोणी बोलणार नाही बरोबर ना , Richa Pinto Anuja Dhakras #मुंबई #मराठा_आरक्षण #महाराष्ट्र #गरबा #MumbaiLocal #Mumbaishow more

मंगेश
23,319 Aufrufe • vor 11 Monaten
अख्खी #मुंबई जाम झाली. आत्तापर्यंत 10% पण समाज मुंबईत... आला नाही, वादळ तर अजुन रस्त्यानेच आहे. वाहतुक सुरळीत करण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत. माझी तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की पोलीस दादा ताईंना सहकार्य करा.. हा एका ठिकाणचा व्हिडिओ आहे, अख्खा रस्ता जाम आहे.. #मराठा_वादळ #मराठाआरक्षणshow more

Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
39,249 Aufrufe • vor 1 Jahr
एकीकडे मराठी माणूस व्यवसाय करत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे... आपला शेतकरी स्वतःचा भाजीपाला मुंबईत कोणाला त्रास न देता एक बाजूला टेम्पो लावून विक्री करत आहे तर हे आले लगेच दंड मारायला.. स्वतःही शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला असेल पण विसर पडला? #देवीपाडा Mumbai Traffic Police मुंबई पोलीस Mumbai Policeshow more

गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
25,404 Aufrufe • vor 9 Monaten
यासाठी मुंबईत भाजपा नको होती , आता असेच होणार... थोडे वर्षे जाऊ देत आपल्याला मुंबईत येण्यास पण परवानगी घ्यावी लागेल, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा👎🏻 ते तर बरे आहे की MNS Adhikrut - मनसे अधिकृत आहे 💪🏻💪🏻नाही तर.....👎🏻👎🏻show more

मराठा Empire🚩
30,157 Aufrufe • vor 7 Monaten
बेलापूर विधानसभेचे उमेदवार श्री. गजानन काळे आणि ऐरोली मतदारसंघाचे... उमेदवार श्री. निलेश बाणखेले यांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) या भागाला नवी मुंबई म्हणतात कारण त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा विचार व्यापक होता. मुंबई आणि त्याला लागून नवी मुंबई उभी करावी हा विचार वसंतराव नाईकांच्या डोक्यात आला. कारण त्यांच्या लक्षात आलं की १९५० ते १९७० या २० वर्षात मुंबईची लोकसंख्या दुपटीने वाढली. आणि आता यापुढे मुंबई माणसं घेऊ शकणार नाही म्हणून नवी मुंबईला आकार देण्यात आला. पुढे मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स उभं राहिलं. हे सगळं उभं करताना शहर कसं उभं करायचं याचा विचार केला गेलाच नाही. ब्रिटिशांनी मुंबई उभी करताना खूप विचार केला. आपल्याकडे शहराचा विकास आराखडा बनवला जातो पण इथे शहर नियोजन आराखडा बनवला जात नाही. २) ब्रिटिशांनी मुंबई उभारताना अनेक मैदानं उभी केली. पण त्यानंतर जी शहरं उभी राहिली त्यात कुठे मैदानं दिसत नाहीत. आज नवी मुंबईत खाजगी क्रीडासंकुल आहे पण सरकारी क्रीडासंकुल का नाही ? नवी मुंबईत फक्त एक नाट्यगृह का आहे ? हेच मुंबईत बघा तर किती नाट्यगृहं आहेत. नवी मुंबईत शिवाजी पार्कसारखं किंवा आझाद मैदानासारखं मैदान आहे? नाहीये... ३) ब्रिटिशांनी अनेक हॉस्पिटल्स एकत्र करणारा एक भाग बनवला. थोडक्यात लोकसंख्येला काय काय लागेल याचा केवढा विचार ब्रिटिशांनी केला ? पण नवी मुंबईत समजा एखाद्या कुटुंबाला कुठे जायचं असेल तर कुठे जायचं ? मॉलमध्ये ? थोडक्यात काय शहराच्या कुठल्याच गरजांचा विचार केला जात नाही. ४) गेली ६०-७० वर्ष निवडणुका होत आहे, पण तेच प्रश्न, तीच आश्वासनं हेच सुरु आहे आणि जगणं तसंच सुरु आहे. याला काय अर्थ आहे ? आपल्याकडे प्रगती म्हणजे विविध उपकरणं येणं, गाड्या येणं इतकं नसतं. मला विकासाचा विचार इतका तोकड्या पद्धतीने करता येत नाही. महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता. बरं तो जाहीरनामा होता, तर प्रत्येक प्रश्नावरच उत्तर आम्ही त्यात दिलं. ५) आज नवी मुंबईत एकाच घरातील २,२ जणं वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत, दिवसभर वेगवेगळ्या पक्षातून फिरतात रात्री घरी पुन्हा एकत्र येतात. काय चाललं आहे नवी मुंबईत ? ६) नाशिकमध्ये ५ वर्ष आमची सत्ता होती, त्या ५ वर्षाच्या काळात आम्ही मुकणे धरणांतून थेट पाईपलाईन टाकून नाशिकमध्ये पाणी आणलं, आणि नाशिक शहराचा ५० वर्षांचा प्रश्न सोडवला. असा विचार इतर कोणी करतं का हो तुमच्यासाठी ? ७) रतन टाटा गेल्यावर संपूर्ण भारत हळहळला. एक सज्जन आणि सरळ उद्योगपती गेला म्हणून लोकं दुखी झाले. का दुःखी झाले ? कारण लोकांना सरळ, सज्जन माणसं आवडतात जर सरळ, सज्जन माणसं लोकांना आवडतात, तर मग लोकांना सरळ विचार करणारे राजकारणी का नाही आवडत ? तिथेच नेमकी वेडावाकडा विचार करणारी आणि कृती करणारी माणसं का निवडता तुम्ही ? ८) महाराष्ट्रात दुकानांवर मराठी मध्ये पाट्या लागत नव्हत्या, मी साधंसोपं पत्र लिहिलं आणि त्यात त्यांना लिहिलं की तुम्ही ठरवाव की दुकानाची पाटी महाग आहे का दुकान महाग आहे ? आणि पुढे त्या पत्रात लिहीलं की जर तुम्ही पाट्या नाही केलात तर माझे महाराष्ट् सैनिक तुम्हाला भेटीला येतील. आणि पाट्या झाल्या. आम्ही सत्तेत नसताना कामं करून दाखवत असू तर सत्तेत आल्यावर किती कामं करू याचा विचार करा. ९) माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रातील माझ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४show more

Raj Thackeray
42,727 Aufrufe • vor 1 Jahr
मुंबईला मरीन लाईनला ऑफिस सुरू केलेल्या मराठी तरुणाला ऐका.... जेव्हा आम्ही बोलतो की मुंबईत अमराठी , मराठी लोकांना लॉबिंग करून उद्योग-धंद्यात घुसू देत नाही, पुढे जाऊ दिले जात नाही फक्त कारण तो मराठी आहे म्हणून, तर ते लोकांना खोटं वाटतं. पण ते सत्य आहे.show more

MadhavVarun
39,652 Aufrufe • vor 8 Monaten
मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही. जर असे... केले तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही. दोन वेळेस मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न मान्य केलेले नाहीत. सुप्रीम कोर्टने त्याविरोधी निर्णय दिले आहेत. मराठा समाजातला एक वर्ग आहे, जो निजामी मराठा आहे. तो रयतेतल्या मराठ्यांना जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. निजामी मराठे हे निजामाबरोबर राहिलेले आहेत. रयतेतले मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत. सोळाव्या शतकातले भांडण आताही चालू आहे. सत्तेत बसलेला निजामी मराठा आहे आणि तो रयतेतल्या मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. हे जेवढ लवकर रयतेतल्या मराठ्याच्या डोक्यात जाईल आणि जोपर्यंत निजामी मराठ्यांकडून तो फारकत घेणार नाही, तोपर्यंत रयतेतल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. रयतेतल्या मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, तो श्रीमंत मराठा नाही, म्हणून देशभरात हमीभाव हा जाहीर केला जातो त्यासंदर्भातील कायदा करावा ही मागणी सुद्धा निजामी मराठा मान्य करत नाही. निजामी मराठ्यांपासून रयतेतल्या मराठ्यांनी फारकत घेतल्याशिवाय त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही. निजामी मराठ्यांच्या हातातली सत्ता रयतेच्या मराठ्यांच्या हातात जाईल या भितीमुळे निजामी मराठा हा रयतेच्या मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाही. आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की त्यांना बदल हवा आहे की नाही?show more

Prakash Ambedkar
17,019 Aufrufe • vor 10 Monaten
आज १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर,... राजसाहेबांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात राजसाहेबांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे... सध्या मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यावरून जो वाद सुरु आहे, त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यानुसार सर्वानी वागलं पाहिजे. आणि न्यायालयाने जर बंदी घातली आहे तर जैन मुनींनी पण त्याचा विचार केला पाहिजे. कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे अनेक डॉक्टरांनी सांगितलं आहे तरीही कबुतरांना खायला घातलं जाणार असेल तर पोलिसांनी खायला घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. जेंव्हा मुळातच न्यायालयाचा आदेश असताना आंदोलन झालं तेंव्हाच सरकारने कारवाई करायला पाहिजे होती. त्यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले. कोर्टाचा आदेश काय आहे हे लोढांना माहित नाही का ? लोढांनी हे विसरू नये की ते राज्याचे मंत्री आहेत कुठल्या धर्माचे नाहीत. काल मराठी लोकांनी आंदोलन केली तेंव्हा त्यांची धरपकड झाली, पत्रकारांना मारहाण झाली... सरकारचं नक्की काय सुरु आहे हेच कळत नाहीये... निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत... आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय... तसंच १५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्याचा आणि मांसविक्री बंद करण्याचा आदेश दिलाय... मुळात कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला ? मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे की ही बंदी पाळू नका... स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट साजरा करायचा आणि त्या दिवशी खायचं स्वातंत्र्य नाही हा काय प्रकार आहे ? #राजठाकरे #MNSAdhikrutshow more

MNS Adhikrut - मनसे अधिकृत
32,880 Aufrufe • vor 1 Jahr
हे असले हरामखोर भडखाऊ पंधरा मिनिटे म्हणून हिंदू समाजाला... हिनावता काय😡😡😡 हिंदू बंधावननो यंदा नाही तर कधीच नाही🚩🚩🖖🏼 ह्या भडखाऊ लोकांना ह्यांची जागा दाखवावी लागेल आणि हे मविआ वाले पण जे ह्यांना सामील आहेshow more

Prasad Wakte Patil
36,146 Aufrufe • vor 1 Jahr
एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या... महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।show more

Raj Thackeray
98,369 Aufrufe • vor 6 Monaten
विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय हा देश पुढे जाणार नाही. पण... आम्ही कोरोनाकाळात काय पाहिलं? थाळ्या वाजवा.. टाळ्या वाजवा.. हे विज्ञान आणि तंत्रज्ञान नाही आहे. श्री. संजय राऊत, खासदार Sanjay Rautshow more

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
56,094 Aufrufe • vor 2 Jahren
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभेचे उमेदवार श्री. अशोक मेश्राम... यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) गेली अनेक वर्ष विदर्भात फिरतोय. १९८९ ला मी प्रत्यक्ष राजकारणात आलो. १९९३ साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढला होता. १९९२ ला बाबरी मस्जिद पडली, मुंबई आणि इतर ठिकाणी दंगली झाल्या, पुढे १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यावेळेस १९९३ च्या डिसेंबरमध्ये माझा मोर्चा झाला. १९९१ ते १९९३ माझा सगळ्यात जास्त वेळ माझा मराठवाड्यात आणि विदर्भात गेला. यवतमाळला यायचो, अमरावती तर माझं घर आहे. हा प्रदेश मला नवीन नाही, इथली माणसं मला नवीन नाही. २) १९९० ते २०२४ मी इथे येतोय, फक्त वाईट एकच वाटतं की प्रश्न तेच आहेत. प्रश्न बदलले नाहीत. हा जिल्हा पांढऱ्या सोन्याचा म्हणजे कापसाचा जिल्हा. खरंतर हा श्रीमंत जिल्हा हवा होता, पण राज्यकर्त्यांनी इथे योजनाच आणल्या नाहीत. हा जिल्हा ओळखला जातो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा. इतकी सरकारं आली गेली पण तरीही आत्महत्या थांबल्या नाहीत. तीच तीच लोकं निवडून येत आहेत आणि ती माणसं तुमच्यासाठी काहीही करत नाही. याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का ? ३) गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात जे झालं त्यात तुम्ही मतदार म्हणून कुठे आहात ? याचा विचार करताय कधी? आत्महत्या करणाऱ्यांच्या घरी परिस्थिती काय होत असेल याचा विचार करवत नाही. पण ही परिस्थिती ज्यांच्यामुळे येते अशा लोकांना शिक्षा देणार आहात का नाही ? ४) यवतमाळमधून वसंतराव नाईक ११ वर्ष मुख्यमंत्री होते तर सुधाकरराव नाईक अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तरीही हा जिल्हा आत्महत्यांचा जिल्हा ठरत असेल तर काय बोलायचं ? जोपर्यंत तुम्ही भाकरी पलटवत नाही, जोपर्यंत या लोकांना तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. ५) २०१४ ला महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा माझा पक्ष या देशातील एकमेव पक्ष आहे. यातून आमची महाराष्ट्राबद्दलची आस्था दिसून येते. आज महाराष्ट्राला जातीपातीत गुंतवून टाकलं जात आहे. जाती याआधी होत्या, जातीबद्दलच प्रेम या आधी होतं पण आता दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण झाला. आणि हा द्वेष शरदचंद्र पवारांनी पेरला. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या जातीपातीत पडू नका. माझ्या तरुण तरुणींना सक्षम करणं हे माझं स्वप्न आहे, त्याला तुम्ही बळ द्या. ६) पाच वर्षांनी पुन्हा एकदा मतदानाची संधी येत आहे, पाच पाच वर्ष तुमच्या आयुष्यातील जात आहेत आणि म्हणून तुम्हाला मतदानाकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. अशोक मेश्राम यांच्यासारखी व्यक्ती मी तुमच्यासमोर आणलं आहे, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं हे माझं आवाहन आहे. #विधानसभा_२०२४show more

Raj Thackeray
32,795 Aufrufe • vor 1 Jahr
ज्या अर्थी तुम्ही मुंबईत आल्यावर शब्द देता, गुलाल उधळायला... लावता त्यानंतर मात्र जे आश्वासन सरकारकडून दिलं ते पूर्ण करत नाही ही फसवणूक नाही तर काय आहे? - ओमराजे निंबाळकर, खासदार Omprakash Rajenimbalkarshow more

Shivsena UBT Communication
17,864 Aufrufe • vor 1 Jahr
यांचा हा सकाळचा व्हिडिओ मी आता पाहिला. मला वाटले... माफीनामा देतील...त्यात काय राजकारणी चूक करत नाहीत का? पण इथे तर समोरच्याला वेड्यात काढत आहेत.. हे पाहिल्यापासून हसत बोलले..न की जयंत पाटील हसल्यावर.. आणि तरीही..तुम्ही मुंबईचे पालक आहात..तुमच्या घरात मयत झाली आणि एखादा माणूस हसला तर तुम्ही विक्षिप्त पने हसून उत्तर द्याल का?... त्या मुलाचा चेहरा पहा.. या माणसाची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत राज्य भाजप ची बाजू घेणे बंद..उद्यापासून फक्त टीका.. सहन करा आता.show more

यदुनाथ जवळकर🔥
78,971 Aufrufe • vor 1 Monat
आज मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे.... या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये. मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही. आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये. आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत — हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. माध्यमं हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहेत का? कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे. आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का? मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – तिथून काही शिकून येतात का? परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही. #मुंबईलोकल #MumbaiLocalshow more

Raj Thackeray
105,280 Aufrufe • vor 1 Jahr
आज २५ जुलै २०२४ रोजी, मुंबईतील रंगशारदा सभागृहात, मी... आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यातील काही महत्वाचे मुद्दे... १) मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला. एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं. २) अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. ३) पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं. ४) पण सध्या कोणाचं लक्ष नाहीये. सगळे व्यस्त आहेत 'लाडकी बहीण', 'लाडक्या भावात'. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मुळात अशा योजना राबवायला राज्यसरकारकडे पैसे आहेत का? सरकारकडे रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनांना कुठून पैसे येणार ? ५) माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे जा, त्यांना मदत करा, त्यांना काय हवं नको ते पहा. ६) महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हेच तुमचं प्रचाराचं कॅम्पेन पाहिजे. ७) आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे. ८) निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही.show more

Raj Thackeray
43,313 Aufrufe • vor 2 Jahren